शहरं
Join us  
Trending Stories
1
पहिला दिवस गोंधळाचा; विरोधक झाले आक्रमक; पहलगाम हल्ला ते बिहार मतदारयादीवरून गोंधळ 
2
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
3
शाळेवर विमान कोसळून २० ठार; बांगलादेशात अहमदाबादची पुनरावृत्ती!
4
६३ खासदार म्हणतात, न्या. वर्मांना पदावरून हटवा! कारण काय?
5
महाराष्ट्रातील ४ लाख शेतकरी लाभार्थी यादीतून झाले गायब; लाभार्थी १०.२ लाखांवरून केवळ १५ हजारांवर
6
धनखड यांचा राजीनामा, आता पद कोण सांभाळणार, नव्या उपराष्ट्रपतींची निवड कशी होणार? अशी आहे संपूर्ण प्रक्रिया
7
शेतकऱ्याचा मुलगा ते उपराष्ट्रपती, अशी राहिली आहे जगदीप धनखड यांची वादळी कारकीर्द
8
संविधानाचे कलम ६७(अ) काय सांगते? ज्याअंतर्गत जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा
9
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
10
सुनील तटकरे यांच्या सांगण्यावरूनच विजयकुमार घाडगे यांना मारहाण, मनोज जरांगे-पाटील यांचा आरोप
11
दातांवर उपचार करताना महिलेचे कानही झाले बरे, २० वर्षांपासून येत नव्हतं ऐकू, असा घडला चमत्कार
12
ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपसंदर्भात ईडीची कारवाई, राणा दग्गुबाती अन् प्रकाश राजसह ४ कलाकारांना समन्स
13
'आखडू' पाकिस्तानची मस्ती भारत जिरवणार! BCCIच्या एका निर्णयाने पाकचे ११६ कोटी बुडणार...
14
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
15
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
16
धक्कादायक! प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल
17
मनोज जरांगेंनी घेतली महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची भेट; बीडसह राज्यभर आंदोलनाचा दिला इशारा...
18
"...तर आम्ही तुम्हाला बरबाद करू’’, अमेरिकन सिनेटरची भारतासह या देशांना धमकी, कारण काय?  
19
अखेर वेळ ठरली; अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर 25, तर आयकर विधेयकावर 12 तास चर्चा होणार
20
४१ वर्षांनंतर नवीन अवतारात येतेय Kinetic DX; याच महिन्यात होणार लॉन्च, किंमत...

नवीन २५ दुचाकी जळून खाक

By admin | Updated: May 11, 2017 23:15 IST

नवीन २५ दुचाकी जळून खाक

लोकमत न्यूज नेटवर्कसातारा/काशीळ : पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर भरतगाववाडी (ता. सातारा) गावच्या हद्दीत दुचाकी घेऊन निघालेल्या कंटेनरला भरधाव वेगाने आलेल्या कारने पाठीमागून धडक दिल्यानंतर कंटेनरखाली अडकलेल्या कारने पेट घेतल्याने महामार्गावर एकच थरार निर्माण झाला. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी कार, कंटेनर व त्यामधील २५ दुचाकी आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्याने कोट्यवधींचे नुकसान झाले. गुरुवारी सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास हा बर्निंग थरार झाला.याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, मुंबईहून रात्री कार (एमएच ०२ एजी ९५९८) कोल्हापूरकडे निघाली होती. या कारमध्ये चालकासह एक दाम्पत्य आणि एक लहान मुलगा होता. गुरुवारी सकाळी सहाच्या सुमारास ही कार भरतगाववाडी येथे आली असता पुढे चाललेल्या कंटेनरच्या मागच्या बाजूला जोरात जाऊन धडकली. कार कंटेनरमध्ये तशीच अडकली. याच स्थितीत ही दोन्ही वाहने सुमारे चारशे फूट पुढे फरफटत गेली. चालकाने घटनास्थळावरून पलायन केले . ग्रामस्थांनी कारमधील जखमींना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल केले. अग्निशामक घटनास्थळी दाखल होईपर्यंत सर्वच वाहने जळून खाक झाली होती.अन् युवकाने चालविला कंटेनर !कार कंटेनरखाली अडकल्याने कंटेनरमध्ये असणाऱ्या नव्या कोऱ्या दुचाकींनाही झळ बसू लागली. संभाजी चव्हाण, सुनील शेडगे यांनी युवकांच्या मदतीने कोल्हापूर बाजूकडील महामार्गावरील वाहतूक सेवा रस्त्याने वळविली. बोरगाव पोलिस व अग्निशामक दलही घटनास्थळी आले.भरतगाववाडी येथील युवक मंगेश रघुनाथ गोडसे हा कंटेनरमध्ये बसला. त्याने कंटेनर त्याच स्थितीत पुढे नेला. मात्र, आगीची झळ आतील दुचाकींनाही बसल्याने दुचाकी जळाल्या.