शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातमधील पंचमहल यथे मोठा अपघात; पावागडमध्ये रोपवे कोसळला, 6 जणांचा मृत्यू
2
“PM मोदींच्या नेतृत्वाखालील सक्षम, नवीन भारत आपले परराष्ट्र धोरण स्वतः ठरवतो”: CM फडणवीस
3
एकनाथ शिंदे यांनी घेतली शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांची भेट; म्हणाले, “अभिमानास्पद...”
4
गोपाळ शेट्टींसह मेहता, गुप्ता, मिश्रा अन् शर्मा यांच्यावर मुंबई भाजपानं दिली मोठी जबाबदारी
5
Asia Cup Record : सचिन तेंडुलकर भारताचा 'नंबर वन ऑलराउंडर'; जयसूर्याची तर गोष्टच न्यारी
6
अमेरिका निघाली होती रशियाला पंगू बनवायला, आता स्वतःवरच आली अंडी खरेदीची वेळ! ३२ वर्षांत पहिल्यांदाच...
7
CM फडणवीसांकडून ग्रीन सिग्नल मिळताच अजित पवार गटाला बसणार झटका?; भाजपा आमदार लागले कामाला
8
राज ठाकरेंना मिळणार खास मान...यंदाचा शिवसेनेचा 'दसरा मेळावा' ठाकरे बंधू गाजवणार?
9
जीएसटी कमी झाल्यानंतर, किती रुपयांवर येईल Maruti Baleno? किती रुपयांचा होईल फायदा? जाणून घ्या
10
जगातील सगळ्यात महागडी शाळा; वर्षाची फी तब्बल १,१३,७३,७८० रुपये! आहे तरी कुठे नक्की?
11
चंद्रग्रहण २०२५: तुमच्या राशीनुसार करा ‘हे’ दान, धनवान बनाल; कल्याण होईल, सुख-सुबत्ता लाभेल
12
"गणित जुळलं की...", अभिनेत्री ऋतुजा बागवे लग्नाबद्दल स्पष्टच बोलली
13
DCM अजित पवार अन् पोलीस अधिकारी अंजना कृष्णा यांच्यात नेमका काय झाला संवाद? वाचा शब्द न् शब्द
14
भारत, पाकिस्तान, अमेरिका अन् जपानमध्ये आपत्ती येणार; बाबा वेंगाची 'ती' भविष्यवाणी खरी होणार?
15
“...तोपर्यंत मराठा समाजाला कायमस्वरूपी टिकणारे आरक्षण मिळणार नाही”: बाळासाहेब थोरात
16
५०० वर्षांनी चंद्रग्रहणात शुभ योग: ५ राशींचे पंचक सुटेल, लाभ मिळेल; ४ राशींनी सावध राहावे!
17
मनोज जरांगे पाटलांचा फॉर्म्युला ‘हिट’, शेतकरी, धारावी पुनर्वसन आंदोलन याच मार्गाने जाणार?
18
“आज BJP आहे, उद्या बाजी पलटेल, काँग्रेस सत्तेत येईल”; कोणत्या नेत्यांनी व्यक्त केला विश्वास?
19
VIRAL : खोदकाम करताना सापडलं १९९७चं जलजीऱ्याचं पाकिट; पण सोशल मीडियावर का होतंय व्हायरल?
20
BCCI नं श्रेयस अय्यरला दिलं कॅप्टन्सीचं गिफ्ट; ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या मालिकेसाठी असा आहे भारतीय संघ

नवीन २५ दुचाकी जळून खाक

By admin | Updated: May 11, 2017 23:15 IST

नवीन २५ दुचाकी जळून खाक

लोकमत न्यूज नेटवर्कसातारा/काशीळ : पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर भरतगाववाडी (ता. सातारा) गावच्या हद्दीत दुचाकी घेऊन निघालेल्या कंटेनरला भरधाव वेगाने आलेल्या कारने पाठीमागून धडक दिल्यानंतर कंटेनरखाली अडकलेल्या कारने पेट घेतल्याने महामार्गावर एकच थरार निर्माण झाला. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी कार, कंटेनर व त्यामधील २५ दुचाकी आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्याने कोट्यवधींचे नुकसान झाले. गुरुवारी सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास हा बर्निंग थरार झाला.याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, मुंबईहून रात्री कार (एमएच ०२ एजी ९५९८) कोल्हापूरकडे निघाली होती. या कारमध्ये चालकासह एक दाम्पत्य आणि एक लहान मुलगा होता. गुरुवारी सकाळी सहाच्या सुमारास ही कार भरतगाववाडी येथे आली असता पुढे चाललेल्या कंटेनरच्या मागच्या बाजूला जोरात जाऊन धडकली. कार कंटेनरमध्ये तशीच अडकली. याच स्थितीत ही दोन्ही वाहने सुमारे चारशे फूट पुढे फरफटत गेली. चालकाने घटनास्थळावरून पलायन केले . ग्रामस्थांनी कारमधील जखमींना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल केले. अग्निशामक घटनास्थळी दाखल होईपर्यंत सर्वच वाहने जळून खाक झाली होती.अन् युवकाने चालविला कंटेनर !कार कंटेनरखाली अडकल्याने कंटेनरमध्ये असणाऱ्या नव्या कोऱ्या दुचाकींनाही झळ बसू लागली. संभाजी चव्हाण, सुनील शेडगे यांनी युवकांच्या मदतीने कोल्हापूर बाजूकडील महामार्गावरील वाहतूक सेवा रस्त्याने वळविली. बोरगाव पोलिस व अग्निशामक दलही घटनास्थळी आले.भरतगाववाडी येथील युवक मंगेश रघुनाथ गोडसे हा कंटेनरमध्ये बसला. त्याने कंटेनर त्याच स्थितीत पुढे नेला. मात्र, आगीची झळ आतील दुचाकींनाही बसल्याने दुचाकी जळाल्या.