शहरं
Join us  
Trending Stories
1
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
2
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
3
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
4
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
5
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
6
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
7
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
8
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
9
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
10
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
11
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
12
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
13
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
14
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
15
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
16
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
17
Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
18
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
19
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या
20
३ बायका ४ मुलं! संजय कपूर यांच्या १०,००० कोटींचा वारसदार कोण? करिश्माच्या मुलांना काय मिळणार?

‘असले शेजारी’ नको रे बाबा..!

By admin | Updated: February 12, 2015 00:39 IST

‘झोपडपट्टी’ शब्दाची उच्चभ्रूंना अ‍ॅलर्जी : हक्काच्या जागेसाठी १७ कुटुंबांचा ‘फुटबॉल’

दत्ता यादव - सातारा  -झोपडपट्टी म्हटलं की, डोळ्यासमोर येते ती अस्वच्छता, अशिक्षितता, गुन्हेगारी स्वरूपाची पार्श्वभूमी असलेले लोक, या ठिकाणी वास्तव्य करतात. असा आजपर्यंतचा नागरिकांचा समज. परंतु संपूर्ण कुटुंबीय सुशिक्षित आणि शासकीय नोकरदार असलेल्या नागरिकांच्या वसाहतीला ‘झोपडपट्टी’चा धब्बा लागतो, त्यावेळी त्या लोकांकडेही बघण्याचा दृष्टिकोनही साहजिकच वेगळा नसतो, याचा प्रत्यय केसरकर पेठेतील बेघर झालेल्या १७ कुटुंबांना येत आहे. केसरकर पेठेतील वसाहतीची पालिकेने ‘झोपडपट्टी’ अशी दप्तरी नोंद केल्यामुळे या कुटुंबांना झोपडपट्टीचा शेजारधर्म नको रे..बाबा असे म्हणत त्यांना पर्यायी जागा देण्यास सातारकर धजावत नाहीत.येथील केसरकर पेठेमध्ये गेल्या तीस वर्षापासून पालिकेच्या आजी-माजी कर्मचाऱ्यांनी वसाहत थाटली आहे. सध्या या ठिकाणी एकूण १७ कुटुंबे वास्तव करत आहेत. जवळपास सगळ्यांनीच पक्की बांधकामे केलेली घरे बांधली आहेत. मात्र या वसाहतीमध्ये सध्या ‘एकात्मिक गृहनिर्माण झोपडपट्टी व सुधारणा योजने’अंतर्गत नवीन वसाहत २७ कुटुंबांसाठी बांधण्यात येत आहे. त्यामुळे सध्या पालिकेने या ठिकाणी राहणाऱ्या १७ कुटुंबांची घरे जमीनदोस्त केली आहेत. मात्र या सर्व कुटुंबांनी आमची राहण्याची पर्यायी व्यवस्था केल्याशिवाय इथून हलणार नाही, अशी भूमिका घेतली आहे. त्यामुळे हा वाद अखेर न्यायालयात गेला. पालिकेने या कुटुंबांचे पुनर्वसन करावे, असा आदेश न्यायालयाने दिलाय. या नागरिकांना सुरूवातीला करंजे येथील पालिकेची मोकळी जागा दाखविण्यात आली. या कुटुंबांनी त्या जागेवर राहण्यास जाण्यास अनुकलताही दाखविली. मात्र तेथील लोकांनी विरोध केला. शाहूपुरीतील लोकांच्या दट्ट्यामुळे पालिका प्रशासनानेही नमते घेतले. पालिकेने पुन्हा दुसरी जागा निवडली. ती म्हणजे हुतात्मा स्मारकाशेजारील. या जागेवरही राहण्यास ही कुटुंबे तयार झाली. मात्र येथेही हीच परिस्थिती उद्भवली. स्वातंत्र्य सैनिकांनीही या ठिकाणी या लोकांना राहण्यास कडाडून विरोध केलाय. त्यामुळे केवळ हे झोपडपट्टीतील लोक आहेत, म्हणून त्यांना शेजारी करून घेण्यास नागरिक नकार देत आहेत, असा आरोप या कुटुंबांनी केला आहे. पालिकेने ‘झोपडपट्टी’ अशी नोंद केली नसती तर आज आमच्यावर ही वेळ आली नसती. इकडून-तिकडे केवळ आमचा फूटबॉल होत आहे. दीड महिन्यांपासून लाईट-पाण्याविना आम्ही वास्तव्य करत आहे. पालिका प्रशासन न्यायालयाचा आदेशही धुडकावत असून आम्हाला बेघर करत आहे, असाही आरोप नागरिकांनी केलाय.