शहरं
Join us  
Trending Stories
1
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
2
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
3
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
4
'दोन महिन्यांचे राशन साठवून ठेवा', भारताच्या कारवाईने घाबरेल्या पाकिस्तानचे जनतेला आवाहन
5
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
6
भरधाव कंटेनरने दोन कारला उडविले; पुण्यातील तीन भाविकांचा मृत्यू
7
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
8
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
9
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 
10
नॅशनल हेराल्ड प्रकरण; राहुल आणि सोनिया गांधींच्या अडचणी वाढल्या, कोर्टाने बजावली नोटीस
11
शिखर धवनने दिली प्रेमाची कबुली..!! कोण आहे Sophie Shine? पहिली भेट कशी झाली?
12
एजाज खानचा 'हाऊस अरेस्ट' शो बंद होणार? महिला आयोगाचं थेट पोलीस महासंचालकांना पत्र
13
“भावाला न्याय मिळत नाही तोपर्यंत चप्पल घालणार नाही”; संतोष देशमुख यांच्या बहिणीचा निर्धार
14
लग्न ठरलं, साखरपुडा झाला, शरीरसंबंधही ठेवले, त्यानंतर... मुंबई इंडियन्सकडून खेळलेल्या खेळाडूवर गंभीर आरोप  
15
पहलगाममधील हल्ल्याचं निमित्त, पूजा करायची असल्याचे सांगून पुजाऱ्याला गंडा, बँक खातं केलं साफ     
16
“जातनिहाय जनगणनेचा मुद्दाही सुप्रीम कोर्टात जाईल, १० वर्षे तरी...”; वकिलांनी कायदाच सांगितला
17
OLA Electric ची डोकेदुखी वाढली, इनसाइडर ट्रेडिंग प्रकरणी SEBI कडून तपास; प्रकरण काय?
18
"मी माझ्या पत्नीवर खरं प्रेम केलं होतं पण तिने..."; तरुणाने Video बनवून स्वत:वर झाडली गोळी
19
"अनेकांची झोप उडवेल आजचा कार्यक्रम, जेथे मेसेज जायला हवा होता, तेथे पोहोचला"; नेमकं काय म्हणाले पीएम मोदी
20
भारतीयांवर लक्ष्मी प्रसन्न! लोकांनी तीन वर्षात 'यु ट्यूब'वरून कमावले तब्बल 21000 कोटी

पश्चिम घाटातील पडीक जमिनीवर वृक्ष लागवडीची गरज : पाटणकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2021 04:30 IST

विक्रमसिंह पाटणकर म्हणाले, ‘वाढते प्रदूषण, पर्यावरणाचा बिघडलेला समतोल, ग्लोबल वाॅर्मिंग, आदी बाबींचा विचार करता आयुष्यात वन मोठे की धन ...

विक्रमसिंह पाटणकर म्हणाले, ‘वाढते प्रदूषण, पर्यावरणाचा बिघडलेला समतोल, ग्लोबल वाॅर्मिंग, आदी बाबींचा विचार करता आयुष्यात वन मोठे की धन मोठे याचा विचार प्रत्येकाने करण्याची वेळ आली आहे. पैसा आणि संपत्ती ऑक्सिजन विकत घेऊ शकत नाही. निसर्गामधून फुकट मिळणाऱ्या ऑक्सिजनची किंमत आपणाला कधी कळणार म्हणून भविष्यात जगण्यासाठी धनापेक्षा वनसंपत्ती महत्त्वाची आहे.’

आता शंभर कोटी झाडे लावण्याचे फसवे कार्यक्रम थांबवू या आणि निसर्गाच्या सान्निध्यात राहत असलेल्या आणि निसर्गाचे संगोपन करणाऱ्या पश्चिम घाटातील गरीब इमानदार शेतकऱ्यांना झाडे लावून जगविण्याची जबाबदारी देऊया. ते या वृक्षांची आपल्या मुलांप्रमाणे काळजी घेतील. महाराष्ट्रतील पश्चिम घाटातील कोट्यवधी पडीक जमिनीवर औषधी वनस्पती, सुगंधी वनस्पती, मसाल्याच्या वनस्पती लावून त्यांचे संगोपन केले तर आयुष्यभर स्थानिकांना उत्त्पन्न मिळेल. डोंगरावर वृक्षारोपण करण्यासाठी लागणारी पाण्याची गरज ही डोंगरावर पडणाऱ्या पावसाच्या पाण्याची साठवण करण्यासाठी मोठ्या साईट आहेत त्या ठिकाणी शेततळी काढून त्यामध्ये साठवण केली तर वृक्षारोपणासाठी ग्रॅव्हिटीने झाडांना विना इंधन पाणी मिळेल. डोंगर उतारावर पडीक जमिनीवर नैसर्गिक पाण्यावर झाडे लावून ग्रीन कव्हर वाढवता येईल. शासनाच्या वतीने झाडे लावण्याच्या योजना पुष्कळ आहेत; पण त्या दुर्गम भागात असलेल्या प्रत्येक गावात पोहोचण्यासाठी यंत्रणा अपुरी पडत आहेत. ही पश्चिम घाटातील दुर्गम डोंगराळ भागात पोहोचविण्यासाठी समाजसेवा संस्था पुढे आल्या पाहिजेत. त्याच्या माध्यमातून अर्धशिक्षित डोंगराळ भागातील शेतकऱ्यांपर्यंत या वृक्षारोपणच्या योजना पोहोचल्या पाहिजेत, असे मत माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर यांनी व्यक्त केले.