शहरं
Join us  
Trending Stories
1
"आशिष शेलारांची बुद्धी चांगली होती, आता गंज लागलाय कारण..."; संदीप देशपांडेंचे दुबार मतदारांवरून उलट सवाल
2
रझा अकादमीविरोधात लाखोंचा मोर्चा राज ठाकरेंनी काढला, तेव्हा भाजपावाले कुठे होते?; मनसेचा पलटवार
3
डंपर बनला काळ! कारला धडक देत ५ वाहनांना उडवले, ५० जणांना चिरडले, १० जणांचा मृत्यू   
4
प्रसिद्ध वकील असिम सरोदे यांची सनद तीन महिन्यांसाठी रद्द, समोर आलं असं कारण
5
"आशिष शेलारांनी एकाच दगडात अनेक पक्षी मारले.."; उद्धव ठाकरेंनी केले कौतुक, नेमकं काय म्हणाले?
6
‘हर-मन-की बात’... कुशीत ट्रॉफी, आणि टी-शर्टवरील खोडलेला ‘A Gentleman’s’ शब्दासह दिलेला मेसेज चर्चेत
7
टेक फंडांचा एका वर्षात निगेटिव्ह परतावा! 'या' ५ योजनांमध्ये सर्वाधिक नुकसान, गुंतवणूकदारांनी काय करावे?
8
"तेव्हा वाचलो पण आता प्रत्येक दिवस..."; अहमदाबाद विमान दुर्घटनेतून बचावलेल्या एकमेव व्यक्तीला 'या' गोष्टीचं दुःख!
9
आलिया भटच्या 'अल्फा' सिनेमाची रिलीज डेट पुढे ढकलली, 'या' कारणामुळे घेतला निर्णय
10
खळबळजनक! बायकोची हत्या; मृतदेहासह दीड वर्षांच्या लेकाला खोलीत बंद करून पळाला नवरा
11
IAS बनण्याचं स्वप्न अपूर्ण राहिलं...; UPSC तयारी करणाऱ्या युवतीने का उचललं टोकाचं पाऊल?
12
'आमच्याकडे सर्वाधिक अणुबॉम्ब, पृथ्वी 150 वेळा नष्ट होईल', डोनाल्ड ट्रम्पचा यांचा धक्कादायक दावा
13
Gen Z युवकांना सरकार का घाबरतंय?; उद्धव ठाकरेंचा सवाल, शाखेत उभी राहणार 'मतदार ओळख केंद्र'
14
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा बदल; पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेट Gold चे लेटेस्ट रेट
15
पाकिस्तानने अण्वस्त्रचाचणी केली, डोनाल्ड ट्रम्प यांचा सनसनाटी दावा, दक्षिण आशियात तणाव वाढणार?
16
पडद्यामागचे तीन ‘शिल्पकार’! 'या' त्रिसूत्री धोरणासह भारतीय महिला संघानं लिहिली अविस्मरणीय स्क्रिप्ट
17
"मी तर चांगलं काम केलं होतं...", राष्ट्रीय पुरस्कार उशिरा मिळाल्याने शाहरुख खानने व्यक्त केली खंत
18
Tulsi Vivah 2025: तुलसी विवाहासाठी रामा तुळस योग्य की श्यामा? जाणून घ्या मुख्य भेद 
19
चीनला शह देण्याचा प्रयत्न! भारत ₹७००० कोटींपेक्षा अधिक रकमेची बनवतोय योजना
20
Deepti Sharma : "मुलीला क्रिकेट खेळू देऊ नका..."; दीप्ती शर्माचे आई-वडील भावुक, सांगितला संघर्षमय प्रवास

पोलिसांसाठी खबऱ्यांचे सक्षम नेटवर्क गरजेचे --- सजन हंकारे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2019 23:54 IST

कौटुंबिक हिंसाचाराच्या घटना या आपल्या नात्यातील लोकांकडून घडत असतात. या रोखण्यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे. - सजन हंकारे, पोलीस निरीक्षक, सातारा तालुका

ठळक मुद्देचर्चेतील व्यक्तीशी थेट संवाद - गुन्हा घडण्यापूर्वीच आरोपी सापडतील

दत्ता यादव ।पोलिसांची मदार सर्वसामान्य नागरिक आणि खबऱ्यांवर असते. हे लोक सतर्क असतील तर शंभर टक्के गुन्हे घडतच नाहीत. कोणत्याही प्रकारचे गुन्हे रोखायचे असतील तर त्यासाठी खबºयांचे नेटवर्क अत्यंत मजबूत असायला हवे. खबºयांचे नेटवर्क स्ट्राँग करण्यासाठी पोलीस निरीक्षक सजन हंकारे यांनी अनोखी पद्धत अवलंबली असून, यासंदर्भात त्यांच्याशी केलेली बातचित...

प्रश्न : गुन्हे घडूच नयेत, यासाठी काय करायला हवं?उत्तर : चार भिंतीच्या आत गुन्हे घडले तर ते बाहेर समजणे फार जिकिरीचे असते; परंतु सार्वजनिक ठिकाणी घडत असलेले बहुतांश गुन्हे नागरिकांच्या सतर्कतेमुळे टळत असतात. त्यामुळे नागरिक आणि पोलिसांचे सौहदर्याचे संबंध हवेत. यापेक्षाही पोलिसांसाठी खबºयांचे नेटवर्क महत्त्वाचे आहे. त्यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे.

प्रश्न : खबºयांबाबत आपण वेगळी पद्धत काय अवलंबत आहात?उत्तर : प्रत्येक गावात एक तरी खबरी पोलिसांना ठेवावा लागतो. त्याच्याशी सतत संपर्क साधून त्याच्या अडीअडचणीला आम्हाला धाव घ्यावी लागते. पोलिसांबाबत त्यांच्यामध्ये विश्वास निर्माण केला जातो. तुझे काम हे दलाली नसून, कर्तव्य आहे. हे त्याला समजावून सांगितले जात आहे. त्यामुळे खबºयांचे नेटवर्क चांगले झाले आहे. कास पठारावर लूटमार करणारी टोळी असो की, दुचाकी चोरणारी टोळीचा उलगडा हा केवळ खबºयांमार्फतच झाला. यापुढे आणखी खबºयांचे नेटवर्क चांगले करण्यासाठी आमची टीम प्रयत्नशील राहणार आहे.

प्रश्न : कोणत्या गुन्ह्यांचे प्रमाण सगळ्यात जास्त आहे?उत्तर : पूर्वी दरोड्याचे प्रमाण जास्त होते. मात्र, अलीकडे कौटुंबिक हिंसाचाराच्या घटना लक्षणीय घडत आहेत. तसेच मारामारी, छेडछाडीचे प्रकारही घडत असतात. यातील बहुतांश गुन्हे हे परस्परांच्या द्वेषभावनेतून तक्रारी केलेले असतात. त्यामुळे या गुन्ह्यांचे प्रमाण जास्त दिसत आहे. पोलीस ठाण्यात आल्यानंतर आम्ही अनेक कुटुंबांचे समुपदेशही करत असतो.जिल्ह्यात आठ वर्षांचा अनुभवपोलीस निरीक्षक सजन हंकारे यांना सातारा जिल्ह्यात काम करण्याचा आठ वर्षांचा अनुभव आहे. त्यामुळे गुन्हेगारांचे पाळेमुळे शोधून काढण्यात त्यांचा हातखंडा आहे. महाबळेश्वर, रहिमतपूर, फलटण या ठिकाणीही त्यांनी चांगली कामगिरी केली आहे. आत्तापर्यंत त्यांनी शंभरहून अधिक जणांना हद्दपार करण्यासाठी प्रयत्न केले आहेत. 

सर्वसामान्यांना चांगली वागणूकपोलीस ठाण्यात आलेला प्रत्येक माणूस हा आरोपी नसतो. तो मुळातच पीडित असतो. त्यामुळे त्याच्याशी आपुलकीने वागले पाहिजे. त्याचे म्हणणे नेमके काय आहे, हे जाणून घेतले पाहिजे. माझ्यासह आमची टीम यासाठी नेहमी प्रयत्नशील असते. जो गुन्हेगार आहे, तो पोलिसांच्या नजरेतून कधीच सुटत नाही. त्याच्या डोळ्यातून आम्हाला सर्व समजते. सर्वसामान्यांना पोलिसांकडून कधीच त्रास होत नसतो.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरPolice Stationपोलीस ठाणे