शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Jarange Patil Maratha Morcha Live: ३० सप्टेंबरपर्यंत मराठा आंदोलकांवरील सर्व गुन्हे मागे घेणार, सरकारने लेखी दिले: मनोज जरांगे पाटील
2
"कुठलाही विषय असू दे, मी नेहमी धावून जातो, पण...!" जरांगेंच्या आंदोलनावर उदयनराजेंची पहिली प्रतिक्रिया; स्पष्टच बोलले
3
मराठा आरक्षणाबाबत मोठी बातमी! अंतिम मसुदा घेऊन सरकारचे ४ मंत्री मनोज जरांगेंच्या भेटीला
4
८ वर्षांपूर्वी गायब झालेला 'रीलस्टार' पती, सतत शोध घेत होती पत्नी! आता समोर आलं धक्कादायक सत्य
5
शेअर बाजारापेक्षा जास्त परतावा देणारी सरकारी योजना; EPF का ठरत आहे सरस? संपूर्ण गणित समजून घ्या
6
Video: आझाद मैदान परिसरात तणावाची स्थिती, आंदोलकांनी वाट अडवली; पोलिसांनी अतिरिक्त कुमक मागवली
7
Anant Chaturdashi 2025: अनंत चतुर्दशीला का बांधला जातो अनंताचा धागा? हे व्रत गणेशाचे नाही तर... 
8
भाक्रा धरणापासून एअरबेसपर्यंत पाकिस्तानला दिली माहिती; प्रसिद्ध युटयूबर विरोधात आरोपपत्र दाखल
9
"पूर नव्हे, हा तर देवाचा आशीर्वाद"; पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांनी जनतेला दिला अजब सल्ला! म्हणाले...
10
'आंदोलक रस्त्यावर नाचताहेत म्हणून तुम्ही न्यायमूर्तींना पायी कोर्टात जायला भाग पाडू शकत नाही'; उच्च न्यायालयाने सरकारला झापले
11
'सरकारचा एकही प्रतिनिधी मनोज जरांगे पाटलांना भेटायला आला नाही,' रोहित पवारांची टीका
12
सेबीचा नवा नियम! F&O ट्रेडिंगमध्ये १ ऑक्टोबरपासून पोझिशन लिमिट वाढणार; लहान गुंतवणूकदारांना फायदा
13
स्वार्थी ट्रम्प यांच्या 'टॅरिफ बॉम्ब'नंतरही भारताची अर्थव्यवस्था 'बम-बम'! ग्रोथ पाहून पंतप्रधान मोदीही खूश; स्पष्टच बोलले...
14
“बस… जरांगे आता थांबा! आंदोलन संपवून सरकारला सहकार्य करा, नामुष्की टाळा”; कुणी दिला सल्ला?
15
'या' देशात भाड्याने मिळते पत्नी; लग्न करून एकत्रही राहू शकता, पण मोजावे लागतील 'इतके' पैसे!
16
"काँग्रेसच्या स्टेजवरून माझ्या आईला शिवी दिली, हा अपमान..."; पंतप्रधान नरेंद्र मोदी झाले भावूक
17
Ganesh Visarjan: गौरी-गणपतीच्या निरोपासाठी जय्यत तयारी
18
बुरख्यातली गर्लफ्रेंड निघाली मुलगा! एकत्र प्रवास करूनही ओळखू शकला नाही बॉयफ्रेंड; पुढचं ऐकून व्हाल हैराण
19
अवनीत कौरने विराट कोहलीच्या इंस्टाग्राम पोस्ट लाइकवर सोडलं मौन, म्हणाली - "मी कधीच विसरत नाही..."
20
"अकाली एक्झिट वगैरे शब्द...", प्रिया मराठेच्या निधनानंतर अभिजीतची भावुक पोस्ट

पोलिसांसाठी खबऱ्यांचे सक्षम नेटवर्क गरजेचे --- सजन हंकारे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2019 23:54 IST

कौटुंबिक हिंसाचाराच्या घटना या आपल्या नात्यातील लोकांकडून घडत असतात. या रोखण्यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे. - सजन हंकारे, पोलीस निरीक्षक, सातारा तालुका

ठळक मुद्देचर्चेतील व्यक्तीशी थेट संवाद - गुन्हा घडण्यापूर्वीच आरोपी सापडतील

दत्ता यादव ।पोलिसांची मदार सर्वसामान्य नागरिक आणि खबऱ्यांवर असते. हे लोक सतर्क असतील तर शंभर टक्के गुन्हे घडतच नाहीत. कोणत्याही प्रकारचे गुन्हे रोखायचे असतील तर त्यासाठी खबºयांचे नेटवर्क अत्यंत मजबूत असायला हवे. खबºयांचे नेटवर्क स्ट्राँग करण्यासाठी पोलीस निरीक्षक सजन हंकारे यांनी अनोखी पद्धत अवलंबली असून, यासंदर्भात त्यांच्याशी केलेली बातचित...

प्रश्न : गुन्हे घडूच नयेत, यासाठी काय करायला हवं?उत्तर : चार भिंतीच्या आत गुन्हे घडले तर ते बाहेर समजणे फार जिकिरीचे असते; परंतु सार्वजनिक ठिकाणी घडत असलेले बहुतांश गुन्हे नागरिकांच्या सतर्कतेमुळे टळत असतात. त्यामुळे नागरिक आणि पोलिसांचे सौहदर्याचे संबंध हवेत. यापेक्षाही पोलिसांसाठी खबºयांचे नेटवर्क महत्त्वाचे आहे. त्यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे.

प्रश्न : खबºयांबाबत आपण वेगळी पद्धत काय अवलंबत आहात?उत्तर : प्रत्येक गावात एक तरी खबरी पोलिसांना ठेवावा लागतो. त्याच्याशी सतत संपर्क साधून त्याच्या अडीअडचणीला आम्हाला धाव घ्यावी लागते. पोलिसांबाबत त्यांच्यामध्ये विश्वास निर्माण केला जातो. तुझे काम हे दलाली नसून, कर्तव्य आहे. हे त्याला समजावून सांगितले जात आहे. त्यामुळे खबºयांचे नेटवर्क चांगले झाले आहे. कास पठारावर लूटमार करणारी टोळी असो की, दुचाकी चोरणारी टोळीचा उलगडा हा केवळ खबºयांमार्फतच झाला. यापुढे आणखी खबºयांचे नेटवर्क चांगले करण्यासाठी आमची टीम प्रयत्नशील राहणार आहे.

प्रश्न : कोणत्या गुन्ह्यांचे प्रमाण सगळ्यात जास्त आहे?उत्तर : पूर्वी दरोड्याचे प्रमाण जास्त होते. मात्र, अलीकडे कौटुंबिक हिंसाचाराच्या घटना लक्षणीय घडत आहेत. तसेच मारामारी, छेडछाडीचे प्रकारही घडत असतात. यातील बहुतांश गुन्हे हे परस्परांच्या द्वेषभावनेतून तक्रारी केलेले असतात. त्यामुळे या गुन्ह्यांचे प्रमाण जास्त दिसत आहे. पोलीस ठाण्यात आल्यानंतर आम्ही अनेक कुटुंबांचे समुपदेशही करत असतो.जिल्ह्यात आठ वर्षांचा अनुभवपोलीस निरीक्षक सजन हंकारे यांना सातारा जिल्ह्यात काम करण्याचा आठ वर्षांचा अनुभव आहे. त्यामुळे गुन्हेगारांचे पाळेमुळे शोधून काढण्यात त्यांचा हातखंडा आहे. महाबळेश्वर, रहिमतपूर, फलटण या ठिकाणीही त्यांनी चांगली कामगिरी केली आहे. आत्तापर्यंत त्यांनी शंभरहून अधिक जणांना हद्दपार करण्यासाठी प्रयत्न केले आहेत. 

सर्वसामान्यांना चांगली वागणूकपोलीस ठाण्यात आलेला प्रत्येक माणूस हा आरोपी नसतो. तो मुळातच पीडित असतो. त्यामुळे त्याच्याशी आपुलकीने वागले पाहिजे. त्याचे म्हणणे नेमके काय आहे, हे जाणून घेतले पाहिजे. माझ्यासह आमची टीम यासाठी नेहमी प्रयत्नशील असते. जो गुन्हेगार आहे, तो पोलिसांच्या नजरेतून कधीच सुटत नाही. त्याच्या डोळ्यातून आम्हाला सर्व समजते. सर्वसामान्यांना पोलिसांकडून कधीच त्रास होत नसतो.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरPolice Stationपोलीस ठाणे