शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

राष्ट्रवादीच्या सत्तेची गणिते सेना-भाजपवर अवलंबून!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2017 00:22 IST

लोकमत न्यूज नेटवर्कमेढा : जावळी तालुक्यातील १५ ग्रामपंचायतींची निवडणूक आॅक्टोबर महिन्यात होत आहे. या निवडणुकीत सेना-भाजपची युती होणार की वेगवेगळे लढणार यावरच राष्ट्रवादीच्या सत्तेची गणिते मांडली जाणार आहेत. सध्या वर्चस्व असलेली राष्ट्रवादी ही सेना-भाजपची रणनिती भेदून आपली सत्ता कायम ठेवण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहे.जावळी तालुक्यातील बहुतेक ग्रामपंचायती राष्ट्रवादीच्या ताब्यात आहेत. काही ...

लोकमत न्यूज नेटवर्कमेढा : जावळी तालुक्यातील १५ ग्रामपंचायतींची निवडणूक आॅक्टोबर महिन्यात होत आहे. या निवडणुकीत सेना-भाजपची युती होणार की वेगवेगळे लढणार यावरच राष्ट्रवादीच्या सत्तेची गणिते मांडली जाणार आहेत. सध्या वर्चस्व असलेली राष्ट्रवादी ही सेना-भाजपची रणनिती भेदून आपली सत्ता कायम ठेवण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहे.जावळी तालुक्यातील बहुतेक ग्रामपंचायती राष्ट्रवादीच्या ताब्यात आहेत. काही ठिकाणी गटातटाची सत्ता असली तरीही राष्ट्रवादीच खºयाअर्थाने सत्तेवर आहे. तसेच तालुक्यात आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, आमदार शशिकांत शिंदे यांचे वर्चस्व अबाधित आहे. शिवसेना तालुक्यातील प्रत्येक गावात आहे. मात्र, कणखर नेतृत्वाचा अभाव असल्याने या निवडणुकीत सेना तह करणार की शह देणार यावरच बरेचसे अवलंबून राहणार आहे.तालुक्यात १५ ग्रामपंचायतींपैकी बहुतांशी ग्रामपंचायती या कुडाळ भागातील असून, यामध्ये करहर, आखाडे, मोरघर, वालूथ, सोमर्डी या राजकीयदृष्ट्या संवेदनशील गावांचा समावेश आहे. मेढा विभागातील रिटकवली, कुसुंबी, ओझरे, केळघर या प्रमुख गावांमधील निवडणूक अटीतटीची होणार की बिनविरोध याबाबत मात्र साशंकता आहे.केळघर, कुसुंबी, रामवाडी, रुईघर, सोमर्डी, वालूथ, मोरघर, शिंदेवाडी, वाकी, आखाडे, भोगावली तर्फ कुडाळ, रिटकवली, करहर, ओझरे या गावांमध्ये प्रथमच थेट सरपंच निवड होणार आहे. कुडाळ भागात राष्ट्रवादीचे व जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष वसंतराव मानकुमरे, भाजपचे जिल्हा परिषद सदस्य दीपक पवार, शिवसेनेचे तालुका प्रमुख प्रशांत तरडे यांच्या भूमिका महत्त्वाच्या ठरणार आहेत. कुडाळ भागात राष्ट्रवादी, भाजप, शिवसेना या पक्षांचीताकद आहे.