शहरं
Join us  
Trending Stories
1
अल कायदाच्या दहशतवाद्यांनी केलं तीन भारतीयांचं अपहरण, या देशात घडली धक्कादायक घटना
2
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धविराम कुणी केला? अखेर एस. जयशंकर यांचं वॉशिंग्टनमधून मोठं विधान, म्हणाले...
3
गोव्याहून पुण्याला निघालेले स्पाईसजेटचे विमान, हवेत असताना खिडकीच बाहेर आली...
4
वायफाय बसवायला आलेला, एनआरआयची बायकोच आवडली; तिला मैत्रीसाठी विचारले, पुढे जे घडले...
5
धक्कादायक! टीव्ही अभिनेत्रीच्या एकुलत्या एक मुलाची आत्महत्या, ५७व्या मजल्यावरुन उडी मारून संपवलं जीवन
6
शेजारी राष्ट्राकडे आलं इलॉन मस्कचं हाय-स्पीड इंटरनेट! एका महिन्याचा खर्च पाहून धक्का बसेल!
7
Pune Rape: तोंडावर स्प्रे फवारून तरुणीवर बलात्कार; डिलिव्हरी बॉयच्या कृत्यानं पुणे हादरलं
8
Mumbai Crime: शिक्षिका आधी कारमध्येच करायची बलात्कार, नंतर हॉटेलमध्ये...; वर्षभर केले विद्यार्थ्याचे शोषण; काय काय घडलं?
9
Bank of Baroda मध्ये जमा करा २,००,००० रुपये; मिळेल, ₹४७,०१५ चं फिक्स व्याज आणि हमीही, जाणून घ्या
10
Today's Horoscope: आर्थिक लाभ होण्याचा योग; तुमची राशी काय सांगतेय?
11
आणखी एक मोठा अपघात, वैमानिकाचं नियंत्रण सुटलं, विमानतळाची भिंत तोडून विमान पुढे गेलं
12
आमदाराचे बनावट लेटरहेड, सही वापरून ३ काेटींचा निधी पळवला
13
कार खरेदीवर ४ लाखांपर्यंत डिस्काउंट; कंपन्या करत आहेत ‘स्टॉक’ क्लीअर
14
सिबिल स्कोअर खराब होता, स्टेट बँकेनं नोकरीच दिली नाही; कोर्टानंही म्हटलं, "पैशांच्या बाबतीत..."
15
भारताचा पाकिस्तानी सेलिब्रिटींना दणका, २४ तासांत पुन्हा एकदा सोशल मीडिया अकाउंट केले ब्लॉक!
16
पत्नीसोबत Post Office च्या स्कीममध्ये करा गुंतवणूक; दर महिन्याला मिळेल ₹९००० चं फिक्स व्याज
17
"अभिनेत्यांना सकाळी डाएट फुड अन् रात्री ड्रग्स हवे", पहलाज निहलानींचा खुलासा; अक्षयबद्दल म्हणाले...
18
गरीब अन् मध्यमवर्गीयांना दिलासा; ‘जीएसटी’त बदलाचा केंद्राचा विचार; आवश्यक वस्तूंवरील १२% कर रद्द करण्याची शक्यता
19
बेपर्वाईने गाडी चालवणे आत्ताच थांबवा, मृत्यू झाल्यास नातेवाईकांना इन्शुरन्सचा एकही रुपया मिळणार नाही!
20
स्विमिंगपूलमध्ये पोहून घरी परतताना भीषण अपघात, चार मुलांसह पाच जण ठार!

सातारा तालुक्यात राष्ट्रवादी अजूनही शिवेंद्रसिंहराजेंच्या प्रतीक्षेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2021 04:43 IST

सातारा तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे कदम सध्या धीम्या गतीनेच पडत आहेत. पक्षाचे प्रवक्ते शशिकांत शिंदे जिल्ह्यातील लोकांना सोबत घेऊन जाण्याचा ...

सातारा तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे कदम सध्या धीम्या गतीनेच पडत आहेत. पक्षाचे प्रवक्ते शशिकांत शिंदे जिल्ह्यातील लोकांना सोबत घेऊन जाण्याचा प्रयत्न करत असले तरी सातारा तालुक्यात फारशी राजकीय ताकद लावण्याचा त्यांचा इरादा दिसत नाही. आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले राष्ट्रवादी काँग्रेससोबत येतील, अशी भाबडी आशा राष्ट्रवादीच्या नेत्यांनी सोडलेली नाही. त्यामुळे त्यांना नाराज करुन साताऱ्यात त्यांच्याशिवाय राजकीय ताकद वाढविण्याच्या फंदात सध्यातरी राष्ट्रवादी पडताना दिसत नाही. त्यामुळे इतर पक्षांनी आपली राजकीय ताकद वाढविण्यास सुरुवात केली असून, भविष्यात त्याचा राष्ट्रवादीला मोठा फटका बसणार आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसने स्थापनेपासून सातारा जिल्हा आणि तालुक्यावर आपला पगडा कायम ठेवला होता. स्थापनेपासून सातारा तालुक्याची जागा राष्ट्रवादी काँग्रेसकडे कायमस्वरुपी आहे. पण, यावेळी शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी पक्षबदल केल्यामुळे ही जागा भाजपकडे गेली. सातारा आणि जावळी या तालुक्यांत शिवेंद्रराजेंनी आपली मोठी ताकद निर्माण केली आहे. त्यामुळे याठिकाणी इतर कोणालाही सहज राजकीय ताकद वाढवता येणार नाही. शिवेंद्रसिंहराजे भाजपमध्ये आहेत त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसने आपली ताकद वाढविण्याची आवश्यकता होती. पण, आज ना उद्या शिवेंद्रसिंहराजे भोसले आपल्यासोबतच येतील, अशी आशा स्थानिक नेत्यांसह राष्ट्रीय पातळीवरील नेत्यांनाही असल्यामुळे त्यांनी सातारा तालुक्यात फारसे लक्ष दिलेले नाही. याचा फायदा आता इतर पक्ष घेऊ लागले आहेत. ज्याठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसशिवाय इतर कोणालाही पाय ठेवता येत नव्हता त्याठिकाणी आता राष्ट्रवादीची पोकळी भरुन काढण्याचे काम शिवसेनेच्यावतीने सुरु झाले आहे.

दरडी कोसळणे आणि कोसळण्याची शक्यता असलेल्या गावांसाठी त्याबरोबरच अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या लोकांपर्यंत शिवेंद्रसिंहराजे पहिल्यांदा पोहोचले. पण, त्यांच्यानंतर शिवसेनेच्या नेत्यांनी ही संधी सोडली नाही. तालुक्यातील लोकांचे शिवसेनेच्या वरिष्ठ नेते आणि मंत्री महोदयांशी असलेल्या संबंधांमुळे थेट मुंबईतून मदत गावातील लोकांपर्यंत पोहोचली आहे. कोण मदत करतो, कशासाठी करतो याबाबत मदत घेणाऱ्यांमध्ये तेवढी सजगता नसली तरीदेखील एक वेगळे वातावरण तयार होऊन राजकीय पोकळी भरुन काढण्याचे काम सुरु आहे.

शिवसेनेकडून राष्ट्रवादीची पोकळी भरुन काढण्याचे नियोजन

शिवसेनेने अनेक तालुक्यांमध्ये सध्या आपल्या कार्यकर्त्यांना ताकद देण्याचे काम केले आहे. यापूर्वी अशा गोष्टी होत नव्हत्या. त्यामुळे कार्यकर्त्यांना कामासाठी मर्यादा येत होत्या. केवळ आंदोलने आणि विरोध यापुरतेच शिवसेनेचे अस्तित्व मर्यादीत राहत होते. पण, सध्या परिस्थिती बदललेली आहे. नेत्यांनी स्थानिक पातळीवरील पदाधिकाऱ्यांना ताकद देण्याचा प्रयत्न केल्यामुळे हे कार्यकर्ते आता गावोगावी पोहोचत आहेत. यापूर्वी केवळ शिवेंद्रसिंहराजे आहेत आणि त्यांना डावलून पुढे जायचे नाही, असा अनेकांचा दंडक असल्यामुळे कोणीही तालुक्यात फारसे लक्ष घालत नव्हते. मात्र, आता राष्ट्रवादी काँग्रेसची पोकळीच भरुन काढण्याचा प्रयत्न होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस लवकर जागी झाली नाही तर भविष्यात तालुक्यात अनेक राजकीय उलथापालथी होण्याची शक्यता आहे.

राष्ट्रवादीने का केले दुर्लक्ष

राष्ट्रवादीने सातारा तालुक्याकडे दुर्लक्षच केले आहे. शिवेंद्रसिंहराजे भोसले हे भाजपमध्ये गेले असले तरी त्यांचे कार्यकर्ते अजूनही मनाने आणि अस्तित्वाने राष्ट्रवादी काँग्रेससोबतच आहेत. ते राष्ट्रवादीलाही सोडत नाहीत आणि शिवेंद्रसिंहराजेंनाही सोडत नाहीत. अशीच अवस्था राष्ट्रवादी काँग्रेसचीही झाली आहे. त्यांना पक्षालाही ताकद द्यायची नाही आणि शिवेंद्रसिंहराजेेंनाही नाराज करायचे नाही. पण, यामुळे भविष्यात होणाऱ्या गुंतागुंतीला स्वत: पक्षच जबाबदार असणार आहे.

कार्यकर्ते काय म्हणतात...

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असलेले अनेक कार्यकर्ते आजही शिवेंद्रसिंहराजेंसोबतच आहेत. त्यांनी पक्षाच्या कोणत्याही पदाचा राजीनामा दिलेला नाही किंवा पक्ष सदस्यत्वाचाही राजीनामा दिलेला नाही. ते पक्षासोबत आणि राजेंसोबत असे दोन्ही ठिकाणी आहेत. त्यामुळे त्यांना राष्ट्रवादी सोडून भाजपमध्ये जायचे नसले तरी राजेंसोबत राहायचे आहे. त्यामुळे नेमकी काय भूमिका घ्यावी, असा प्रश्न राष्ट्रवादी, कार्यकर्ते आणि नेत्यांनाही पडला आहे.