शहरं
Join us  
Trending Stories
1
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
2
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
3
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
4
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
5
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
6
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
7
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
8
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
9
"पहिल्यांदाच लेकाला सोडून शहराबाहेर आलोय..." विकी कौशलची भावुक प्रतिक्रिया
10
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
11
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
12
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
13
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
14
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
15
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
16
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
17
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
18
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
19
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
20
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
Daily Top 2Weekly Top 5

सातारा तालुक्यात राष्ट्रवादी अजूनही शिवेंद्रसिंहराजेंच्या प्रतीक्षेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2021 04:43 IST

सातारा तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे कदम सध्या धीम्या गतीनेच पडत आहेत. पक्षाचे प्रवक्ते शशिकांत शिंदे जिल्ह्यातील लोकांना सोबत घेऊन जाण्याचा ...

सातारा तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे कदम सध्या धीम्या गतीनेच पडत आहेत. पक्षाचे प्रवक्ते शशिकांत शिंदे जिल्ह्यातील लोकांना सोबत घेऊन जाण्याचा प्रयत्न करत असले तरी सातारा तालुक्यात फारशी राजकीय ताकद लावण्याचा त्यांचा इरादा दिसत नाही. आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले राष्ट्रवादी काँग्रेससोबत येतील, अशी भाबडी आशा राष्ट्रवादीच्या नेत्यांनी सोडलेली नाही. त्यामुळे त्यांना नाराज करुन साताऱ्यात त्यांच्याशिवाय राजकीय ताकद वाढविण्याच्या फंदात सध्यातरी राष्ट्रवादी पडताना दिसत नाही. त्यामुळे इतर पक्षांनी आपली राजकीय ताकद वाढविण्यास सुरुवात केली असून, भविष्यात त्याचा राष्ट्रवादीला मोठा फटका बसणार आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसने स्थापनेपासून सातारा जिल्हा आणि तालुक्यावर आपला पगडा कायम ठेवला होता. स्थापनेपासून सातारा तालुक्याची जागा राष्ट्रवादी काँग्रेसकडे कायमस्वरुपी आहे. पण, यावेळी शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी पक्षबदल केल्यामुळे ही जागा भाजपकडे गेली. सातारा आणि जावळी या तालुक्यांत शिवेंद्रराजेंनी आपली मोठी ताकद निर्माण केली आहे. त्यामुळे याठिकाणी इतर कोणालाही सहज राजकीय ताकद वाढवता येणार नाही. शिवेंद्रसिंहराजे भाजपमध्ये आहेत त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसने आपली ताकद वाढविण्याची आवश्यकता होती. पण, आज ना उद्या शिवेंद्रसिंहराजे भोसले आपल्यासोबतच येतील, अशी आशा स्थानिक नेत्यांसह राष्ट्रीय पातळीवरील नेत्यांनाही असल्यामुळे त्यांनी सातारा तालुक्यात फारसे लक्ष दिलेले नाही. याचा फायदा आता इतर पक्ष घेऊ लागले आहेत. ज्याठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसशिवाय इतर कोणालाही पाय ठेवता येत नव्हता त्याठिकाणी आता राष्ट्रवादीची पोकळी भरुन काढण्याचे काम शिवसेनेच्यावतीने सुरु झाले आहे.

दरडी कोसळणे आणि कोसळण्याची शक्यता असलेल्या गावांसाठी त्याबरोबरच अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या लोकांपर्यंत शिवेंद्रसिंहराजे पहिल्यांदा पोहोचले. पण, त्यांच्यानंतर शिवसेनेच्या नेत्यांनी ही संधी सोडली नाही. तालुक्यातील लोकांचे शिवसेनेच्या वरिष्ठ नेते आणि मंत्री महोदयांशी असलेल्या संबंधांमुळे थेट मुंबईतून मदत गावातील लोकांपर्यंत पोहोचली आहे. कोण मदत करतो, कशासाठी करतो याबाबत मदत घेणाऱ्यांमध्ये तेवढी सजगता नसली तरीदेखील एक वेगळे वातावरण तयार होऊन राजकीय पोकळी भरुन काढण्याचे काम सुरु आहे.

शिवसेनेकडून राष्ट्रवादीची पोकळी भरुन काढण्याचे नियोजन

शिवसेनेने अनेक तालुक्यांमध्ये सध्या आपल्या कार्यकर्त्यांना ताकद देण्याचे काम केले आहे. यापूर्वी अशा गोष्टी होत नव्हत्या. त्यामुळे कार्यकर्त्यांना कामासाठी मर्यादा येत होत्या. केवळ आंदोलने आणि विरोध यापुरतेच शिवसेनेचे अस्तित्व मर्यादीत राहत होते. पण, सध्या परिस्थिती बदललेली आहे. नेत्यांनी स्थानिक पातळीवरील पदाधिकाऱ्यांना ताकद देण्याचा प्रयत्न केल्यामुळे हे कार्यकर्ते आता गावोगावी पोहोचत आहेत. यापूर्वी केवळ शिवेंद्रसिंहराजे आहेत आणि त्यांना डावलून पुढे जायचे नाही, असा अनेकांचा दंडक असल्यामुळे कोणीही तालुक्यात फारसे लक्ष घालत नव्हते. मात्र, आता राष्ट्रवादी काँग्रेसची पोकळीच भरुन काढण्याचा प्रयत्न होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस लवकर जागी झाली नाही तर भविष्यात तालुक्यात अनेक राजकीय उलथापालथी होण्याची शक्यता आहे.

राष्ट्रवादीने का केले दुर्लक्ष

राष्ट्रवादीने सातारा तालुक्याकडे दुर्लक्षच केले आहे. शिवेंद्रसिंहराजे भोसले हे भाजपमध्ये गेले असले तरी त्यांचे कार्यकर्ते अजूनही मनाने आणि अस्तित्वाने राष्ट्रवादी काँग्रेससोबतच आहेत. ते राष्ट्रवादीलाही सोडत नाहीत आणि शिवेंद्रसिंहराजेंनाही सोडत नाहीत. अशीच अवस्था राष्ट्रवादी काँग्रेसचीही झाली आहे. त्यांना पक्षालाही ताकद द्यायची नाही आणि शिवेंद्रसिंहराजेेंनाही नाराज करायचे नाही. पण, यामुळे भविष्यात होणाऱ्या गुंतागुंतीला स्वत: पक्षच जबाबदार असणार आहे.

कार्यकर्ते काय म्हणतात...

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असलेले अनेक कार्यकर्ते आजही शिवेंद्रसिंहराजेंसोबतच आहेत. त्यांनी पक्षाच्या कोणत्याही पदाचा राजीनामा दिलेला नाही किंवा पक्ष सदस्यत्वाचाही राजीनामा दिलेला नाही. ते पक्षासोबत आणि राजेंसोबत असे दोन्ही ठिकाणी आहेत. त्यामुळे त्यांना राष्ट्रवादी सोडून भाजपमध्ये जायचे नसले तरी राजेंसोबत राहायचे आहे. त्यामुळे नेमकी काय भूमिका घ्यावी, असा प्रश्न राष्ट्रवादी, कार्यकर्ते आणि नेत्यांनाही पडला आहे.