शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटीमुळे वाहनांच्या किंमतीच नाही, RTO Tax देखील कमी झाला; तिहेरी फायदा कोणालाच कळला नाही...
2
'शेतकऱ्यांना १०० टक्के नुकसानभरपाई द्या, अन्यथा महाराष्ट्र बंद करू'; मनोज जरांगेंचा इशारा
3
Swami Chaitanya Saraswati: 'माझ्या खोलीत ये, तुला...'; स्वामी चैतन्यानंद सरस्वतीचे 'अश्लील कारनामे', व्हॉटसअप चॅटमध्ये काय?
4
आयटी-मेटलसह 'या' क्षेत्रातील शेअर्समध्ये मोठी पडझड; गुंतवणूकदारांचे ३ लाख कोटी रुपये बुडाले
5
Vaibhav Suryavanshi : वैभव सूर्यवंशी U19 तील नवा सिक्सर किंग! सेट केला नवा वर्ल्ड रेकॉर्ड
6
VIDEO: भारतीय संघाची जर्सी घालून पाकिस्तानच्या गल्लीबोळात फिरला तरूण, पुढे काय घडलं?
7
लडाखच्या पूर्ण राज्याच्या दर्जासाठी लेह पेटले; सोनम वांगचूक म्हणाले, हा तरुणांचा राग होता, GenZ क्रांती...
8
नोकरी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! नवीन वर्षाच्या 'या' महिन्यापासून ATM मधून काढता येणार PF चे पैसे
9
Smartphones: १०,००० रुपयांपेक्षा कमी किमतीत ५० मेगापिक्सेलचा कॅमेरा; जाणून घ्या 'या' ७ स्मार्टफोनबद्दल!
10
समस्या संपतील, स्वामी कायम सोबत असतील; ९ गुरुवार व्रताने बदल नक्की दिसतील, अशक्य शक्य होईल!
11
अतिवृष्टी, पुराचा रेल्वे गाड्यांनाही फटका; पावसामुळे रेल्वे गाड्यांच्या वेळापत्रकात बदल
12
नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी 'गरबा'त विघ्न; नियमाचे पालन की 'मॉरल पोलिसिंग'? नागपूरमध्ये वाद का उफाळला?
13
उद्धव ठाकरेंचा दौरा ठरला; पुराचा फटका बसलेल्या 'या' पाच जिल्ह्यांत करणार पाहणी
14
डिलिव्हरी बॉय जेवण देण्यासाठी आला अन् समोर भिकारी; पेमेंटसाठी फोन काढताच बसला धक्का
15
17 मुलींची छेडछाड केल्याचा आरोप, स्वामी चैतन्यानंद सरस्वती फरार; खोट्या नंबर प्लेटसह व्हॉल्वो जप्त; कुणी केली तक्रार?
16
Railway Employee Diwali Bonus: रेल्वे कर्मचाऱ्यांची दिवाळी लवकरच होणार गोड, मिळणार ७८ दिवसांचा बोनस
17
शांत, सुंदर लडाख का पेटलं? पूर्ण राज्याच्या दर्जासह आंदोलकांच्या या आहेत ४ प्रमुख मागण्या  
18
४ बहि‍णींवर अत्याचार करणाऱ्या आरोपीचा नवा कारनामा; मेहुण्याला संपवून घरामागे पुरलं, सहा महिन्यांनी...
19
Navratri 2025: नवरात्रीत का खेळला जातो भोंडला? हातगा प्रकार वेगळा असतो का? वाचा 
20
Viral Video: ज्ञानाच्या मंदिरात मुख्याध्यापिकाच दारू पिऊन तर्राट; व्हिडीओ पाहून संतापले लोक!

राष्ट्रवादी ‘सह्याद्री’वर तर काँगे्रस ‘भवन’मध्ये!

By admin | Updated: July 23, 2016 00:10 IST

आज ठरणार धोरण : अविश्वास ठरावाच्या निमित्ताने दोन्ही पक्षांमध्ये कुरघोड्यांचे राजकारण रंगण्याची चिन्ह

सातारा : जिल्हा परिषदेचे कृषी सभापती शिवाजीराव शिंदे यांना पदावरून हटविण्यासाठी राष्ट्रवादीने अविश्वास ठरावाचा सापळा रचला आहे. राष्ट्रवादीमधील या वादळी वातावरणाचा फायदा घेऊन काँगे्रस राष्ट्रवादीला कोंडीत पकडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. शनिवारी (दि. २३) राष्ट्रवादीची सह्याद्री साखर कारखान्याच्या विश्रामगृहावर तर काँगे्रसची कमिटी कार्यालयात बैठक होणार आहे.उपजिल्हाधिकारी तथा साताऱ्याचे प्रभारी प्रांताधिकारी अमृत नाटेकर यांच्या अध्यक्षतेखाली अविश्वास ठरावाच्या अनुषंगाने शनिवारी (दि. ३० जुलै) जिल्हा परिषदेची विशेष सभा आयोजित केली आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीच्या वतीने आपल्या पक्षाच्या सर्व जिल्हा परिषद सदस्यांना ‘व्हीप’ (पक्षादेश) बजावला आहे. ठरावाच्या बाजूने कमीत कमी ४४ मतांची गरज असल्याने ऐनवेळी आपली मते फुटू नयेत, यासाठी राष्ट्रवादीने हे सावध धोरण राबविले आहे. जिल्हा परिषदेतील ६६ सदस्यांपैकी ३७ सदस्य राष्ट्रवादीचे आहेत. या सर्व सदस्यांना राष्ट्रवादीने व्हीप बजावली आहे. काँगे्रसच्या चिन्हावर निवडून आलेले; मात्र त्यानंतर राष्ट्रवादीत दाखल झालेले सदस्यही आपल्याला पाठिंबा देतील, असा राष्ट्रवादीचा कयास आहे. साहजिकच ४४ चा जादुई आकडा गाठण्यासाठी राष्ट्रवादीने काँगे्रस व अपक्षांचीही मने आपल्या बाजूला वळविण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. राष्ट्रवादीने शनिवारी सह्याद्री कारखान्याच्या विश्रामगृहावर बैठक आयोजित केली आहे. या बैठकीचे जिल्हा परिषद सदस्यांना निमंत्रण देण्यात आले आहे. चौथ्या शनिवारच्या सुटीमुळे विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचे कामकाज बंद राहणार असल्याने विधान परिषद सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांच्यासह राष्ट्रवादीचे जिल्ह्यातील सर्व आमदार या बैठकीला उपस्थित राहणार आहे. खासदार उदयनराजे भोसले, माजी खासदार लक्ष्मणराव पाटील यांचीही या बैठकीला उपस्थिती असल्याने बरीच चर्चा झडण्याची शक्यता आहे.राष्ट्रवादीच्या या हालचाली सुरू असतानाच माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, काँगे्रसचे जिल्हाध्यक्ष आनंदराव पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत शनिवारी जिल्हा काँगे्रस कमिटीत बैठक घेण्यात येणार आहे. जिल्हा परिषद व पंचायत समित्यांची निवडणूक काही महिन्यांवर येऊन ठेपली असताना राष्ट्रवादीला खिंडीत पकडण्याची आयती संधी काँगे्रसला मिळालेली आहे. मुळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत राष्ट्रवादी व काँगे्रस हे दोनच मोठे प्रतिस्पर्धी सातारा जिल्ह्यामध्ये आहेत. जिरवा-जिरवीच्या राजकारणातून राष्ट्रवादीतील अस्वस्थतेचा फायदा काँगे्रस घेण्याची शक्यता आहे. काँगे्रसजणांना बाबांच्या आदेशाची प्रतीक्षाजिल्हा काँगे्रस कमिटीमध्ये शनिवारी होणाऱ्या बैठकीत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या अनुषंगाने काँगे्रस आडाखे बांधण्याची शक्यता आहे. पृथ्वीराज चव्हाण काय आदेश देतात, याची प्रतीक्षा आता काँगे्रसजणांना लागून राहिली आहे.अविश्वासाची कोंडीपक्षाच्या शिवाजीराव शिंदे यांच्यावर अविश्वासाची खेळी करून राष्ट्रवादीने संकट तर ओढावून घेतले नाही ना? अशी चर्चाही सध्या सुरू आहे. राष्ट्रवादीचे हे मोठे धाडस असल्याच्या गप्पाही राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत. या ठरावाच्या अनुषंगाने राष्ट्रवादीचे राजकीय सत्त्व पणाला लागलेय, हे मात्र नक्की! कोणीही डोईजड नको...पक्षाच्या नेत्यांपेक्षा कोणी डोईजड झाला तर ते परवडणारे नसल्याने पक्षाच्या माध्यमातून स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये प्रतिनिधीत्व करणाऱ्या प्रत्येक सदस्याला पक्ष शिस्तीची जरब बसली पाहिजे, हाच अविश्वास ठराव आणण्यामागे राष्ट्रवादीचा उद्देश आहे. बैठकीसाठी बोलावणे...काँगे्रसच्या सदस्यांनीही सह्याद्री विश्रामगृहावर बैठकीला उपस्थित राहावे, यासाठी राष्ट्रवादीतील काही बिनीचे शिलेदार प्रयत्न करत आहेत. आता त्यांच्या विनवण्यांना काँगे्रसचे मंडळी दाद देतात का?, ही बाब अनुत्तरित आहे.