शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
ट्रम्प, क्लिंटन ते बिल गेट्स; एपस्टीनच्या 'काळ्या' डायरीतील बड्या नेत्यांचे फोटो बाहेर, आक्षेपार्ह वस्तूंचाही समावेश
3
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
4
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
5
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
6
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
7
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
8
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
9
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
10
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
11
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
12
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
13
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
14
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
15
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
16
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
17
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
18
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
19
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
20
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
Daily Top 2Weekly Top 5

्नराष्ट्रवादी-शिवसेना जिल्हाध्यक्षांमध्ये जुंपली!

By admin | Updated: September 7, 2015 21:10 IST

दुष्काळी दौरा : शरद पवार, विजय शिवतारे यांच्यावर स्थानिक पदाधिकाऱ्यांकडून टीका

सातारा : अत्यल्प पावसामुळे सातारा जिल्ह्यात भीषण दुष्काळाचे सावट पडले असले तरी राजकीय पदाधिकाऱ्यांच्या आरोप-प्रत्यारोपाचा मात्र भलताच सुकाळ झाल्याचे चित्र दिसू लागले आहे.‘सातारा जिल्ह्यातील दुष्काळ म्हणजे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचेच पाप’ अशा भाषेत पालकमंत्री विजय शिवतारे यांनी टीकास्त्र सोडल्यानंतर राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुनील माने यांनीही शिवतारे यांच्यावर पलटवार केला आहे. त्यानंतर शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष हर्षल कदम यांनीही सुनील माने यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे.शरद पवार यांनी दुष्काळी भागात जावून जनतेला दिलासा दिला. त्याबाबत हा दौरा म्हणजे दुष्काळी पर्यटन अशी टिका करणाऱ्या पालकमंत्र्यांनीच दृष्काळ दौरा जाहीर केला आहे. तत्पूर्वी कोणतीही माहिती न घेता पालकमंत्री विजय शिवतारे यांनी अकलेचे तारे तोडले,’ अशी खरमरीत टिका राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुनील माने यांनी पत्रकाव्दारे केली आहे. ‘हिम्मत असेल तर पालकमंत्र्यांनी शासकीय खर्चाने दौरा न करता दुष्काळी भागात चारा व पाणी घेऊन जावे,’ असेही प्रतिआव्हान माने यांनी केले आहे. पालकमंत्री शिवतारे यांनी टीकात्मक स्वरूपात जनतेसमोर मांडले तर त्यात गैर काय? राष्ट्रवादी जिल्हाध्यक्षांनी पालकमंत्र्यांना फिरू न देण्याची भाषा म्हणजेच राष्ट्रवादीची या निमित्ताने टगेगिरी पुन्हा जनतेसमोर आली आहे,’ अशी टीका शिवसेनेचे जिल्हाप्रमुख हर्षद कदम यांनी केली. दुष्काळी जनतेने त्यांचे अश्रू पुसण्यासाठी पवार त्यांना खासदार म्हणून लोकसभेत पाठविले, हेच सर्व सत्य पालकमंत्री शिवतारे यांनी टीकात्मक स्वरूपात जनतेसमोर मांडले तर त्यात गैर काय? या निमित्ताने टगेगिरी पुन्हा जनतेसमोर आली आहे,’ अशी टीका शिवसेनेचे जिल्हाप्रमुख हर्षद कदम यांनी केली. (प्रतिनिधी)