शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई सेंट्रल स्टेशनचे नाव बदलले जाणार, नवे नाव काय असणार? CM देवेंद्र फडणवीस म्हणाले...
2
हरयाणा,गोव्यासह लडाखला मिळाले नवे राज्यपाल; घोष, गुप्ता आणि गजपती राजू यांची राष्ट्रपतींकडून नियुक्ती
3
IND vs ENG : गौतम गंभीरने Live सामन्यात दिली शिवी; अपशब्द उच्चारतानाचा Video झाला व्हायरल
4
जिममध्ये चोरी करणं महागात पडलं, ट्रेनरनं अशी शिक्षा दिली की...; आता चोर कधी मनात चोरीचा विचारही आणणार नाही!
5
पाकिस्तान जय श्रीरामच्या घोषणेने दुमदुमले; कराचीत मुस्लिम कलाकारांकडून रामलीलेचे सादरीकरण
6
काव्या मारनचा अजब निर्णय ! ५० विकेट्सही न घेता आलेल्या गोलंदाजाला केलं SRH 'बॉलिंग कोच'
7
"सरकार आणि उद्योगपतींच्या फायद्यासाठी जनसुरक्षा कायदा, काँग्रेस त्याची प्रत्येक जिल्ह्यात होळी करणार”, हर्षवर्धन सपकाळ यांची घोषणा
8
नो टॅक्स, नो टेन्शन! 'या' देशांमध्ये श्रीमंत लोकही भरत नाहीत एक रुपयाही कर, मग पैसा कुठून येतो?
9
खऱ्या आयुष्यातही सचिवजी अन् रिंकी प्रेमात? सानविकाच्या 'त्या' उत्तरावर जितेंद्र लाजला
10
टी लव्हर्ससाठी धोक्याची घंटा! चहा जास्त उकळणं आरोग्यासाठी हानिकारक, कारण...
11
वैभव सूर्यवंशीची स्फोटक फलंदाजीनंतर आता गोलंदाजीत कमाल! युवा टीम इंडियाकडून कसोटीत रचला इतिहास
12
"नाव घ्यायला भीती वाटते तर बोलू नका" ; आदित्य ठाकरेंनी चड्डी बनियन गॅँगचा उल्लेख करताच राणे संतापले
13
घरभाडं, वीजबिल भरायला पैसे नव्हते, राष्ट्रीय खेळाडू बनले चोर, व्यापाऱ्याचं अपहरण करून लुटले, त्यानंतर... 
14
भाच्याच्या प्रेमात वेडी झालेली बायको पळाली, घरी आणण्यासाठी गेलेल्या नवऱ्याचा हार्ट अटॅकने मृत्यू
15
भारताच्या शेअर बाजारात घसरण, पण पाकिस्तानच्या स्टॉक मार्केटमध्ये तुफान तेजी; १,३५,००० अंकांच्या पार, कारण काय?
16
"पहाटे ४ वाजता उठतो, रात्री ८ ला झोपतो", लेकाची शिस्त पाहून आर माधवनही होतो दंग; म्हणाला...
17
IND vs ENG :दुखापतग्रस्त पंत 'डिफेन्स' करताना फसला! जोफ्रा आर्चरची 'वेदनादायी' गोलंदाजी
18
Viral Video: चक्क माणसासारखं दोन पायावर उभा राहिला बिबट्या; स्वत: बघितल्याशिवाय विश्वास बसणार नाही!
19
"राज ठाकरे मराठीच्या नावावर द्वेष पसरवतात, त्यांच्यावर रासुका लावा’’, मुंबई हायकोर्टातील वकिलांची मागणी  
20
DSP सिराजला इंग्लिश बॅटर बेन डकेटशी पंगा घेणं पडलं महागात! ICC नं फाडलं 'चलान'

सांगली-साताऱ्याच्या जागेवर राष्ट्रवादीही ठाम

By admin | Updated: October 23, 2016 00:40 IST

आघाडीत संघर्ष : दोन्ही जिल्ह्यातील नेत्यांची शरद पवारांशी चर्चा, संख्याबळानुसार नेत्यांचा आग्रह

सांगली : सांगली-सातारा स्थानिक स्वराज्य संस्था विधानपरिषदेच्या जागेवर काँग्रेसने दावेदारी सुरू केली असली तरी, राष्ट्रवादीचे नेतेही या जागेवर ठाम आहेत. शरद पवारांशी गुरुवारी मुंबईत झालेल्या चर्चेवेळीही सांगली-सातारा जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या नेत्यांनी संख्याबळाचा दाखला देत, ही जागा आपल्याकडेच ठेवण्याची जोरदार मागणी केली. त्यामुळे दोन्ही काँग्रेसमधील संघर्ष पेटण्याची चिन्हे दिसत आहेत. विधानपरिषदेच्या या जागेवरून दोन्ही काँग्रेसचे नेते आक्रमक बनले आहेत. एका बाजूस पृथ्वीराज चव्हाण, पतंगराव कदम यांनी काँग्रेससाठी ही जागा मिळविण्यासाठी जोरदार ताकद लावली आहे, तर दुसरीकडे राष्ट्रवादीचे दोन्ही जिल्ह्यातील दिग्गज नेतेही ही जागा न सोडण्याच्या भूमिकेवर ठाम आहेत. गुरुवारी शरद पवारांशी झालेल्या चर्चेवेळी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, सांगलीतून आ. जयंत पाटील, साताऱ्यामधून रामराजे नाईक-निंबाळकर, आ. शशिकांत शिंदे उपस्थित होते. दोन्ही जिल्ह्यातील नेत्यांनी काँग्रेसच्या एकतर्फी भूमिकेबद्दल नाराजी व्यक्त केली. आघाडी करताना ही जागा राष्ट्रवादीला सोडण्याचा निर्णय झाला होता, हे अधोरेखित करत मतदारसंघात राष्ट्रवादी क्रमांक एकचा पक्ष असल्याने ही जागा ताकदीने लढविण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली. यासंदर्भात अंतिम निर्णय घेण्यासाठी २६ आॅक्टोबररोजी पुन्हा बैठक घेण्याचा निर्णय राष्ट्रवादीच्या नेत्यांनी घेतला आहे. सांगली आणि सातारा जिल्ह्यात राष्ट्रवादीचे वर्चस्व अधिक आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मतदारांची संख्याही काँग्रेसपेक्षा चाळीसने जास्त आहे. सांगली-सातारा विधानपरिषदेच्या जागेवर होणाऱ्या चुरशीच्या निवडणुकांना गतवेळी दोन्ही काँग्रेसमधील तडजोडीमुळे ब्रेक लागला. संख्याबळानुसार ही जागा काँग्रेसच्या नेत्यांनी राष्ट्रवादीला दिली. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आता असलेले संख्याबळच गृहीत धरले जाणार असल्याने राष्ट्रवादीने संख्याबळाचा दाखला देत ही जागा आपलीच असल्याचे स्पष्ट केले आहे. काँग्रेसचे नेते पतंगराव कदम यांनी त्यांचे ज्येष्ठ बंधू मोहनराव कदम यांचा उमेदवारी अर्ज २७ रोजी दाखल करणार असल्याचे शनिवारी जाहीर केले. मोहनराव कदमांनीही आता माघार घेणार नसल्याचे स्पष्ट केल्यामुळे आघाडीत संघर्षाची ठिणगी पडली आहे. ती वेळीच विझवली जाणार की आणखी फुलवली जाणार, याकडे आता दोन्ही पक्षातील इच्छुक व कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे. अशा स्थितीत विधानपरिषदेच्या जागेवरून आघाडीत बिघाडीची चिन्हे दिसत आहेत. येत्या दोन दिवसात विधानपरिषदेच्या या जागेचे चित्र स्पष्ट होण्याची शक्यता आहे. त्यानंतर उमेदवारी निश्चितीसाठी पक्षीय पातळीवर हालचाली होणार आहे. (प्रतिनिधी)हे तर अतिक्रमणच...आघाडी झाली त्यावेळी संख्याबळाचा विचार करून राष्ट्रवादीला ही जागा सोडण्यात आली होती. आजही संख्याबळाचा विचार केला तर सांगली-सातारा विधानपरिषद मतदारसंघात राष्ट्रवादीच क्रमांक एकचा पक्ष आहे. त्यामुळे अचानक काँग्रेसने या जागेवर दावेदारी करून उमेदवारीसाठी अर्ज भरण्याची तयारी करणे म्हणजे राष्ट्रवादीच्या जागेवरील अतिक्रमणच आहे, असे मत जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष व राष्ट्रवादीचे इच्छुक उमेदवार दिलीपतात्या पाटील यांनी शनिवारी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केले. ते म्हणाले की, गेल्या चाळीस वर्षांपासून मी सार्वजनिक, राजकीय जीवनात कार्यरत आहे. सहकार क्षेत्रातील अनेक संस्थांचे प्रामाणिकपणे नेतृत्व केले. जिल्हा बँकेचा अध्यक्ष म्हणूनही जबाबदारी सांभाळत आहे. त्यामुळे विधानपरिषदेसाठी मला संधी मिळावी, अशी अपेक्षा आहे. याबाबत पक्षाचे नेते जयंत पाटील आणि जिल्हाध्यक्ष विलासराव शिंदे यांच्याकडे रितसर मागणी केली आहे. याबाबत मी आशावादी आहे.तर्कवितर्कांना सुरुवातदोन्ही काँग्रेसमधील ज्येष्ठ नेत्यांनी स्वबळाच्या शक्यतेवरून तर्कवितर्क सुरू केले आहेत. काहींनी राष्ट्रवादीला ही निवडणूक सोपी असल्याचा दावा केला आहे, तर काहींच्या मते भाजप, शिवसेना, अपक्ष व अन्य सदस्यांची भूमिका महत्त्वाची ठरू शकते. काँग्रेसने ताकद लावली तर काहीही घडू शकते. या मतदारसंघात आघाडी करण्याचा निर्णय तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतला होता. आता याच जागेवरून हे दोन्हीही नेते आपली प्रतिष्ठा पणाला लावताना दिसत आहेत. दोन्हीही नेत्यांनी दावेदारी करतानाच पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांकडे आग्रह धरला आहे.