शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
5
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
6
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
7
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
8
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
9
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
10
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
11
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
12
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
13
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
14
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
15
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
16
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
17
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

अज्ञानाच्या वणव्यात निसर्गाची होरपळ...!

By admin | Updated: April 21, 2017 22:29 IST

सर्व स्तरामधून संतप्त प्रतिक्रिया : अटकाव करण्यासाठी वन विभागाकडून प्रबोधन आणि दंडाची तरतूद करणे आवश्यक

सातारा : उन्हाळा सुरू झाला की डोंगरांमध्ये वणवे लावण्याची विकृती अलीकडे जोर धरू लागली आहे. वणवे लावण्याने होणारे नुकसान कधीच न भरून येणारं आहे. अनेकदा पर्यटनासाठी म्हणून जंगलात फिरायला जाणारे आणि हातात स्मार्ट फोन घेऊन स्वत:ला खूपच हायटेक म्हणवणारेही वणवे लावण्यात आघाडीवर आहेत. उन्हाळ्यात आठवड्यातून किमान एकदा अजिंक्यतारा होरपळताना पाहून अनेक सातारकरांच्या कडा आजही ओल्या होतात. कारण अज्ञानामुळे लावण्यात आलेल्या या वणव्यांमुळे वन्यजीव मृत्युमुखी पडत आहेत.अजिंक्यतारा किल्ल्याच्या खडकावर वनप्रेमींनी कष्टाने फुलविलेली झाडेही त्यात होरपळून जात आहेत. उन्हाळ्याबरोबर वणव्यांचे प्रमाण वाढते आणि या वणव्यात निसर्गाची अपरिमित हानी होते. वणव्यांबाबत वनविभाग बऱ्यापैकी प्रबोधन करतो; पण त्याचा परिणाम फारसा होताना दिसत नाही. आजही वणव्याचे प्रमाण वाढलेलेच आहे. रोज कोठेना कोठे वणव्यात निसर्ग संपत्ती भरडून जात आहे. वणव्याच्या दृश्य परिणामांपेक्षा त्याचे न दिसणारे परिणाम भयानक असतात. त्यात कधीही भरून न येणारी हानी होत असते म्हणूनच आता आपण काडीपेटी टाकून निसर्गाच्या संवर्धनाची कास धरायला हवी.वाळलेल्या गवतातून वाऱ्याद्वारे उडून पडणारे बी सर्वत्र पसरलेले असते. ते बी पावसाला सुरुवात होताच जमिनीत रुजून गवत वाढीची क्रिया होत असते. मात्र, वणवे लावण्यामुळे जमिनीवर पसरलेले गवताचे बी जळून जाण्याने गवत चांगले कशाच्या साह्याने वाढणार, हे समजत नाही. संपूर्ण गवत जाळण्यासाठी वणवे लावण्यामुळे किडे, मुंग्या, पाली, सरडे, पक्षी, साप व इतर सरपटणारे प्राणी असे असंख्य जीव वणव्याच्या आगीत होरपळून मरतात. त्यामुळे वणवे विनाशकारी ठरत आहेत. वणवे लावले जाऊ नयेत, यासाठी वन विभागाने केवळ जनतेला आवाहन करणारे फलक लावून आपली जबाबदारी झटकण्यापेक्षा गावागावांत वणवाविरोधी पथके तयार करणे, त्याद्वारे जनतेची जागृती करणे, एखाद्या ठिकाणी वणवा लागला असल्यास या पथकाच्या साह्याने तो तत्काळ विझविणे, त्यासाठी या पथकांना प्रशिक्षण देणे, वणवा लावणाऱ्यांचा शोध घेऊन त्यांना कडक शिक्षा केल्यास त्यामुळे शिक्षेची भीती निर्माण होऊन वणवा लावणाऱ्यांना धाक निर्माण होईल. (प्रतिनिधी) गैरसमज दूर करण्याची गरज...!वणवा हा काही आपोआप लागत नसतो, तो कोणीतरी लावल्याशिवाय लागत नाही. हा वणवा लावण्यापाठीमागे अनेक अंधश्रद्धा आहेत. गवत जाळले की पुन्हा पुढील वर्षी तेथे जोमाने गवत येते असा समज आहे. त्या गैरसमजातून दरवर्षी डोंगर पेटविले जातात. या वणव्याने त्यांच्या समजुतीप्रमाणे रान चांगले भाजले जाते; पण त्या वणव्यात जमिनीचा पोत सुधारणारे कितीतरी जीवजंतू जळून खाक होतात. जमिनीतील वरच्या थरातील सेंद्रिय पदार्थही जळून जातात. वाढलेल्या, वाढीच्या अवस्थेतील वनस्पती, लहान पक्षी, प्राणी, त्यांची घरटी सारेकाही जळून जाते. वणवे लावले जाऊ नयेत, यासाठी वन विभागाच्या वतीने विविध प्रयत्न केले जातात. नागरिकांचे प्रबोधन केले जाते. त्याशिवाय कायद्याचाही धाक दाखविला जातो. वणवा लागलाच तर तो फारसा पसरू नये, यासाठी अग्निरेखाही खोदल्या जातात. मात्र, तरीही दरवर्षी वणवे लागतातच.