शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ८५ व्या वर्षी निधन
2
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
3
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
4
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
5
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
6
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
7
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
8
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
9
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
10
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
11
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
12
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
13
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
14
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
15
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
16
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
17
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
18
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
19
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
20
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
Daily Top 2Weekly Top 5

अज्ञानाच्या वणव्यात निसर्गाची होरपळ...!

By admin | Updated: April 21, 2017 22:29 IST

सर्व स्तरामधून संतप्त प्रतिक्रिया : अटकाव करण्यासाठी वन विभागाकडून प्रबोधन आणि दंडाची तरतूद करणे आवश्यक

सातारा : उन्हाळा सुरू झाला की डोंगरांमध्ये वणवे लावण्याची विकृती अलीकडे जोर धरू लागली आहे. वणवे लावण्याने होणारे नुकसान कधीच न भरून येणारं आहे. अनेकदा पर्यटनासाठी म्हणून जंगलात फिरायला जाणारे आणि हातात स्मार्ट फोन घेऊन स्वत:ला खूपच हायटेक म्हणवणारेही वणवे लावण्यात आघाडीवर आहेत. उन्हाळ्यात आठवड्यातून किमान एकदा अजिंक्यतारा होरपळताना पाहून अनेक सातारकरांच्या कडा आजही ओल्या होतात. कारण अज्ञानामुळे लावण्यात आलेल्या या वणव्यांमुळे वन्यजीव मृत्युमुखी पडत आहेत.अजिंक्यतारा किल्ल्याच्या खडकावर वनप्रेमींनी कष्टाने फुलविलेली झाडेही त्यात होरपळून जात आहेत. उन्हाळ्याबरोबर वणव्यांचे प्रमाण वाढते आणि या वणव्यात निसर्गाची अपरिमित हानी होते. वणव्यांबाबत वनविभाग बऱ्यापैकी प्रबोधन करतो; पण त्याचा परिणाम फारसा होताना दिसत नाही. आजही वणव्याचे प्रमाण वाढलेलेच आहे. रोज कोठेना कोठे वणव्यात निसर्ग संपत्ती भरडून जात आहे. वणव्याच्या दृश्य परिणामांपेक्षा त्याचे न दिसणारे परिणाम भयानक असतात. त्यात कधीही भरून न येणारी हानी होत असते म्हणूनच आता आपण काडीपेटी टाकून निसर्गाच्या संवर्धनाची कास धरायला हवी.वाळलेल्या गवतातून वाऱ्याद्वारे उडून पडणारे बी सर्वत्र पसरलेले असते. ते बी पावसाला सुरुवात होताच जमिनीत रुजून गवत वाढीची क्रिया होत असते. मात्र, वणवे लावण्यामुळे जमिनीवर पसरलेले गवताचे बी जळून जाण्याने गवत चांगले कशाच्या साह्याने वाढणार, हे समजत नाही. संपूर्ण गवत जाळण्यासाठी वणवे लावण्यामुळे किडे, मुंग्या, पाली, सरडे, पक्षी, साप व इतर सरपटणारे प्राणी असे असंख्य जीव वणव्याच्या आगीत होरपळून मरतात. त्यामुळे वणवे विनाशकारी ठरत आहेत. वणवे लावले जाऊ नयेत, यासाठी वन विभागाने केवळ जनतेला आवाहन करणारे फलक लावून आपली जबाबदारी झटकण्यापेक्षा गावागावांत वणवाविरोधी पथके तयार करणे, त्याद्वारे जनतेची जागृती करणे, एखाद्या ठिकाणी वणवा लागला असल्यास या पथकाच्या साह्याने तो तत्काळ विझविणे, त्यासाठी या पथकांना प्रशिक्षण देणे, वणवा लावणाऱ्यांचा शोध घेऊन त्यांना कडक शिक्षा केल्यास त्यामुळे शिक्षेची भीती निर्माण होऊन वणवा लावणाऱ्यांना धाक निर्माण होईल. (प्रतिनिधी) गैरसमज दूर करण्याची गरज...!वणवा हा काही आपोआप लागत नसतो, तो कोणीतरी लावल्याशिवाय लागत नाही. हा वणवा लावण्यापाठीमागे अनेक अंधश्रद्धा आहेत. गवत जाळले की पुन्हा पुढील वर्षी तेथे जोमाने गवत येते असा समज आहे. त्या गैरसमजातून दरवर्षी डोंगर पेटविले जातात. या वणव्याने त्यांच्या समजुतीप्रमाणे रान चांगले भाजले जाते; पण त्या वणव्यात जमिनीचा पोत सुधारणारे कितीतरी जीवजंतू जळून खाक होतात. जमिनीतील वरच्या थरातील सेंद्रिय पदार्थही जळून जातात. वाढलेल्या, वाढीच्या अवस्थेतील वनस्पती, लहान पक्षी, प्राणी, त्यांची घरटी सारेकाही जळून जाते. वणवे लावले जाऊ नयेत, यासाठी वन विभागाच्या वतीने विविध प्रयत्न केले जातात. नागरिकांचे प्रबोधन केले जाते. त्याशिवाय कायद्याचाही धाक दाखविला जातो. वणवा लागलाच तर तो फारसा पसरू नये, यासाठी अग्निरेखाही खोदल्या जातात. मात्र, तरीही दरवर्षी वणवे लागतातच.