शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपा पदाधिकाऱ्याची पत्नीसह ३ ठिकाणी मतदारयादीत नावे, एका दुकानावर २५ नावे- काँग्रेसचा आरोप
2
भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार पती-पत्नी जागीच ठार; कोहमारा-वडसा मार्गावरील घटना
3
'या' दिवसापर्यंत गपचूप ट्रॉफी भारताला द्या नाहीतर...; BCCIचे मोहसीन नक्वी यांना 'अल्टीमेटम'
4
दहिसर टोलनाका वाहतूककोंडी दूर करण्यासाठी मंत्री प्रताप सरनाईक यांनी सुचवल्या उपाययोजना
5
१०० वर्षांनी हंस महालक्ष्मी योग: ८ राशींचे कल्याण, कल्पनेपलीकडे लाभ; अपार यश, भरघोस भरभराट!
6
“शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान, भरीव मदत सरकार देईल, उद्या मंत्रिमंडळ बैठकीत...”: संजय शिरसाट
7
"दुसऱ्याच महिन्यात रंगेहाथ पकडलं...!" धनश्री वर्माचा खळबळजनक खुलासा, युजवेंद्र चहलनं लग्नाच्या पहिल्याच वर्षात दिला होता धोका?
8
अंधेरी क्रीडा संकुल महापालिकेने स्वतः उभारावे; गोपाळ शेट्टी यांची पालिका आयुक्तांकडे मागणी
9
"ही सगळी नाटकं, पाकिस्तानसोबत खेळायलाच नको होतं"; भारत-पाक सामन्यावरुन आदित्य ठाकरेंनी सुनावलं
10
भाजप कार्यालय आमच्यासाठी इमारत नाही, मंदिर आहे; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केल्या भावना...
11
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय! आता 'या' उद्योगावर लादला १००% कर; भारताला सर्वाधिक फटका...
12
“दसरा मेळाव्याबाबत सदसद्विवेकबुद्धीला स्मरून निर्णय घ्यावा”; अजित पवारांचा रोख कुणाकडे?
13
१० वर्षांपासून सत्ता असलेल्या राज्यात भाजपाला जबर धक्का, निवडणुकीत मिळाल्या ४० पैकी केवळ ५ जागा   
14
कुठलाही क्रिकेट सामना हे सत्य बदलू शकत नाही; PM मोदींच्या ट्विटवर मोहसीन नक्वींची दर्पोक्ती
15
विघ्नहर्ता बाप्पा संकटात धावला! श्री सिद्धीविनायक मंदिर अतिवृष्टीबाधितांसाठी १० कोटी देणार
16
IND vs PAK Final : "ते स्वतः स्ट्राइकवर येऊन..." PM मोदींसंदर्भात नेमकं काय म्हणाला सूर्यकुमार यादव?
17
ठाकरे बंधू अधिकृतपणे एकत्र येण्याआधीच ठाकरे गट-मनसेत महापौर पदावरून रस्सीखेच? नेत्यांचे दावे
18
“देवाभाऊ जाहिरातींचा खर्च पूरग्रस्तांना द्यायला हवा होता”; ठाकरे गटाचा भाजपावर पलटवार
19
मॅगी बनवण्यापेक्षाही लागणार कमी वेळ; चीनच्या सर्वात उंच पुलामुळे २ तासांचा प्रवास काही मिनिटांत
20
Video - गरबा खेळताना हार्टअटॅक! नवऱ्यासोबत नाचताना पडली अन्...; ४ महिन्यांपूर्वी झालेलं लग्न

नांदोशी पूल बनलाय मृत्यूचा सापळा, अनेकजण जायबंदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2019 16:51 IST

औंध ते सातारा रहदारीच्या रस्त्यावरील नांदोशी पुलाची प्रचंड दुरवस्था झाली आहे. या पुलाच्या दुरवस्थेमुळे अनेकांनी आपले प्राण गमवाले आहेत. मागील अनेक वर्षांपासून पुलाच्या दुरुस्तीसाठी बांधकाम विभागाने कोणत्याही प्रकारची कारवाई के ली नसल्याने हा पूल मृत्यूचा सापळा बनलाय. नांदोशी पुलाच्या कामास केव्हा मुहूर्त लागणार? असा प्रश्न स्थानिकांसह वाहनधारकांना पडला आहे.

ठळक मुद्देकामास केव्हा मुहूर्त लागणार? पुलाची अवस्था बिकटलवकर काम करण्याची मागणी

औंध : औंध ते सातारा रहदारीच्या रस्त्यावरील नांदोशी पुलाची प्रचंड दुरवस्था झाली आहे. या पुलाच्या दुरवस्थेमुळे अनेकांनी आपले प्राण गमवाले आहेत. मागील अनेक वर्षांपासून पुलाच्या दुरुस्तीसाठी बांधकाम विभागाने कोणत्याही प्रकारची कारवाई के ली नसल्याने हा पूल मृत्यूचा सापळा बनलाय. नांदोशी पुलाच्या कामास केव्हा मुहूर्त लागणार? असा प्रश्न स्थानिकांसह वाहनधारकांना पडला आहे.रहदारीचा व वाहतुकीसाठी प्रमुख असणारा हा नांदोशी पूल औंध ते सातारा, कºहाड, सांगली, विटा या मार्गावरील वाहतुकीसाठी घाटमाथा हा महत्त्वाचा मार्ग आहे. मात्र, मागील अनेक वर्षांपासून नांदोशी येथील पूल प्रचंड रहदारी व वाहतुकीमुळे दोन्ही बाजूंनी खचला आहे. या पुलाची दगडे निसटू लागली आहेत. तसेच या पुलाला झाडाझुडपांचा विळखा बसला आहे. मागील पाच वर्षांत अपघातामुळे सुमारे सात ते आठजणांनी आपले प्राण गमवाले आहेत. तर शेकडोजण जायबंदी झाले आहेत.हा पूल म्हणजे मृत्यूचा सापळा असून, या पुलांवरून येणारी वाहने ही सुसाट येतात. याठिकाणी दोन्ही बाजूला टाकलेले स्पीडब्रेकर ही आता अवजड व सततच्या वाहतुकीमुळे खराब झाले आहेत. त्यामुळे पुन्हा हे क्षेत्र अपघात प्रवण क्षेत्र बनले आहे. नांदोशीसह या मार्गावरील आणखी दोन छोटे पूल ही डबघाईला आले आहेत. त्यामुळे वाहतुकीच्या दृष्टीने महत्त्वाचा असलेल्या या मार्गावरील पुलांचे रुंदीकरण करून उंची वाढवावी व वाहतुकीसाठी हा मार्ग सुलभ करावा. तसेच या मार्गावरील अन्य छोटे पूल ही नादुरुस्त झाले आहेत.औंध भागातील औंध ते फलटण, औंध ते कुरोली, वडूज, औंध ते गोपूज रस्त्याची कामे सुरू आहेत. तसेच या रस्त्यांंचा दर्जा ही बदलला आहे. मात्र, औंध ते घाटमाथा या प्रमुख रहदारीच्या पाच किलोमीटर मार्गाचे रुंदीकरण व डांबरीकरण व पुलाच्या दुरुस्तीचे काम करावे, अशी मागणी केली जात आहे.

सगळीकडे रस्त्याची, पुलाची कामे सुरू आहेत. अनेक निष्पाप लोकांचा बळी घेतलेल्या या पुलाचे काम नेमके कशात अडकले आहे. याचा शोध घेणे आवश्यक आहे. प्रशासनाने लोकांचा अंत पाहू नये. काम लवकरात लवकर सुरू करावे.- नवल थोरात 

टॅग्स :pwdसार्वजनिक बांधकाम विभागSatara areaसातारा परिसर