शहरं
Join us  
Trending Stories
1
युपीतील निवडणुकीत भाजपा ५ व्या क्रमांकावर, अपक्षांनाही जास्त मते; सपाचा दणदणीत विजय
2
“सरन्यायाधीश भूषण गवई यांना हात जोडून विनंती आहे की...”; उद्धव ठाकरेंचे साकडे, प्रकरण काय?
3
ICICI बँकेचा यु-टर्न; अकाऊंटमध्ये ५० हजार रुपये नाही तर 'इतकी' रक्कम ठेवावी लागणार
4
इन्फोसिसचा ऑस्ट्रेलियात मोठा व्यवहार! १३०० कोटी रुपयांमध्ये खरेदी केली 'ही' कंपनी
5
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये भारताची मिसाईल ताकद पाहून घाबरला पाकिस्तान; आता उचललं 'हे' मोठं पाऊल!
6
७९ वर्षांत असे दोन पंतप्रधान होऊन गेले, ज्यांच्या भाग्यात लाल किल्ल्यावरील स्वातंत्र्य दिन आलाच नाही...
7
नवाब मलिकांवर मोठी जबाबदारी; मुंबई महापालिका निवडणुकीबाबत अजित पवारांचा महत्त्वाचा निर्णय
8
Viral Video : काय म्हणावं यांना! लाबुबू डॉलची पूजा करू लागली महिला, म्हणाली "ही बाहुली नाही, तर..."
9
Stock Market Today: शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात; Nifty २४,६०० च्या वर, IT-फार्मा शेअर्समध्ये मोठी खरेदी
10
राष्ट्रवादीमध्ये नव्या 'दादां'चा उदय! रोहित पवार अजितदादांची पोकळी भरून काढत आहेत का?
11
'फुले' सिनेमाच्या अपयशावर प्रतीक गांधीने पहिल्यांदाच दिली प्रतिक्रिया; म्हणाला, "जितकी अपेक्षा..."
12
पाकिस्तानचं स्वातंत्र्यदिनी हे कसलं सेलिब्रेशन... हवेत गोळीबार, तिघांचा मृत्यू, ६० जखमी
13
मतदार यादी कायमसाठी एकसारखीच राहू शकत नाही, पुनरीक्षण आवश्यक; सर्वोच्च न्यायालयाचे निरीक्षण
14
शिल्पा शिरोडकरच्या कारला बसची धडक, अभिनेत्रीने केली तक्रार; तर बस मालकांनी केली अरेरावी
15
आजचे राशीभविष्य : गुरुवार १४ ऑगस्ट २०२५; या ४ राशीच्या लोकांना अचानक धनलाभ संभवतो, काहींना मित्रांकडूनही लाभ होतील
16
लंडनच्या भूमीत १८ ऑगस्टला होणार ऐतिहासिक 'लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन'
17
मंत्रालयामधील मोकळ्या जागेवर मंत्र्यांचेच अतिक्रमण; सामान्यांना बसण्यासाठीच्या जागा व्यापल्या
18
फडणवीस, शिंदे, ठाकरे आज एका व्यासपीठावर..?; बीडीडीवासीयांचे पाऊल आज नव्या घरात
19
वसई-विरारचे माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांना अटक; ४१ अवैध इमारती भोवल्या, ईडीची कारवाई
20
मुनीर यांचा बाष्कळ थयथयाट, भारताविषयी वक्तव्ये करण्याआधी 'आका'ची परवानगी घेतली का?

नांदोशी पूल बनलाय मृत्यूचा सापळा, अनेकजण जायबंदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2019 16:51 IST

औंध ते सातारा रहदारीच्या रस्त्यावरील नांदोशी पुलाची प्रचंड दुरवस्था झाली आहे. या पुलाच्या दुरवस्थेमुळे अनेकांनी आपले प्राण गमवाले आहेत. मागील अनेक वर्षांपासून पुलाच्या दुरुस्तीसाठी बांधकाम विभागाने कोणत्याही प्रकारची कारवाई के ली नसल्याने हा पूल मृत्यूचा सापळा बनलाय. नांदोशी पुलाच्या कामास केव्हा मुहूर्त लागणार? असा प्रश्न स्थानिकांसह वाहनधारकांना पडला आहे.

ठळक मुद्देकामास केव्हा मुहूर्त लागणार? पुलाची अवस्था बिकटलवकर काम करण्याची मागणी

औंध : औंध ते सातारा रहदारीच्या रस्त्यावरील नांदोशी पुलाची प्रचंड दुरवस्था झाली आहे. या पुलाच्या दुरवस्थेमुळे अनेकांनी आपले प्राण गमवाले आहेत. मागील अनेक वर्षांपासून पुलाच्या दुरुस्तीसाठी बांधकाम विभागाने कोणत्याही प्रकारची कारवाई के ली नसल्याने हा पूल मृत्यूचा सापळा बनलाय. नांदोशी पुलाच्या कामास केव्हा मुहूर्त लागणार? असा प्रश्न स्थानिकांसह वाहनधारकांना पडला आहे.रहदारीचा व वाहतुकीसाठी प्रमुख असणारा हा नांदोशी पूल औंध ते सातारा, कºहाड, सांगली, विटा या मार्गावरील वाहतुकीसाठी घाटमाथा हा महत्त्वाचा मार्ग आहे. मात्र, मागील अनेक वर्षांपासून नांदोशी येथील पूल प्रचंड रहदारी व वाहतुकीमुळे दोन्ही बाजूंनी खचला आहे. या पुलाची दगडे निसटू लागली आहेत. तसेच या पुलाला झाडाझुडपांचा विळखा बसला आहे. मागील पाच वर्षांत अपघातामुळे सुमारे सात ते आठजणांनी आपले प्राण गमवाले आहेत. तर शेकडोजण जायबंदी झाले आहेत.हा पूल म्हणजे मृत्यूचा सापळा असून, या पुलांवरून येणारी वाहने ही सुसाट येतात. याठिकाणी दोन्ही बाजूला टाकलेले स्पीडब्रेकर ही आता अवजड व सततच्या वाहतुकीमुळे खराब झाले आहेत. त्यामुळे पुन्हा हे क्षेत्र अपघात प्रवण क्षेत्र बनले आहे. नांदोशीसह या मार्गावरील आणखी दोन छोटे पूल ही डबघाईला आले आहेत. त्यामुळे वाहतुकीच्या दृष्टीने महत्त्वाचा असलेल्या या मार्गावरील पुलांचे रुंदीकरण करून उंची वाढवावी व वाहतुकीसाठी हा मार्ग सुलभ करावा. तसेच या मार्गावरील अन्य छोटे पूल ही नादुरुस्त झाले आहेत.औंध भागातील औंध ते फलटण, औंध ते कुरोली, वडूज, औंध ते गोपूज रस्त्याची कामे सुरू आहेत. तसेच या रस्त्यांंचा दर्जा ही बदलला आहे. मात्र, औंध ते घाटमाथा या प्रमुख रहदारीच्या पाच किलोमीटर मार्गाचे रुंदीकरण व डांबरीकरण व पुलाच्या दुरुस्तीचे काम करावे, अशी मागणी केली जात आहे.

सगळीकडे रस्त्याची, पुलाची कामे सुरू आहेत. अनेक निष्पाप लोकांचा बळी घेतलेल्या या पुलाचे काम नेमके कशात अडकले आहे. याचा शोध घेणे आवश्यक आहे. प्रशासनाने लोकांचा अंत पाहू नये. काम लवकरात लवकर सुरू करावे.- नवल थोरात 

टॅग्स :pwdसार्वजनिक बांधकाम विभागSatara areaसातारा परिसर