शहरं
Join us  
Trending Stories
1
जगातील सर्वात आनंदी देश धोक्यात! रशियन सैन्याने घेरले; युरोपमध्ये खळबळ, युक्रेननंतर..
2
अचानक बसला आग लागली, ५ जणांचा मृत्यू, काच फोडून चालक पळून गेला
3
४ दिवसांच्या संघर्षात भारत ठरला वरचढ, पाकिस्तानला मोठं नुकसान; न्यूयॉर्क टाईम्सचा रिपोर्ट
4
भाजप-संघातील घटक नाराज; म्हणे, ‘ऑपरेशन सिंदूर’नंतरचा युद्धविराम ही तर चूक, शत्रुत्व थांबले
5
पाकिस्ताननंतर बांगलादेशनं IMF कडे पसरले हात, बुडत्या अर्थव्यवस्थेचं कारण देत 'इतक्या' पैशांची मागणी
6
आजचे राशीभविष्य १५ मे २०२५: आर्थिक लाभ संभवतात, दुपारनंंतर मात्र अनेकांचे नशीब बदलेल...
7
शूरवीरांचा देश आहे, असा संदेश पाकला देणे आवश्यक होते; RSSचे सुनील अंबेकर यांचे प्रतिपादन
8
कर्नल सोफियांवर टीका भोवली, मंत्री विजय शाहवर FIR; हायकोर्टाने फटकारले, रात्री गुन्हा दाखल
9
न्या. भूषण गवई देशाचे ५२वे सरन्यायाधीश; अनेक महत्त्वपूर्ण निर्णय देणाऱ्या पीठांमध्ये सहभाग
10
अनामिक भीती वाटते, अस्थिर मन शांत होत नाही? कळकळीने स्वामींना हाक मारा, ‘ही’ प्रार्थना कराच
11
ब्रह्मोस अण्वस्त्रांच्या डेपोवर आदळले असते तर काय झाले असते? किती मोठा स्फोट झाला असता?
12
महिला राफेल उडवू शकतात, तर लष्करात त्यांची संख्या मर्यादित का? सुप्रीम कोर्टाचा सरकारला सवाल
13
गरिबांच्या सेवेमुळे माझ्या मुलाला हे पद मिळाले; सरन्यायाधीश गवई यांच्या मातोश्री भावुक
14
२१ दिवसांत ३१ माओवादी यमसदनी; छत्तीसगड-तेलंगणा सीमेवर कारवाईला मोठे यश
15
पाकने २१ दिवसांनी BSF जवानाला भारताच्या ताब्यात दिले; वडील म्हणाले, मुलाची गळाभेट घ्यायची आहे
16
डोनाल्ड ट्रम्प यांचा पाचव्यांदा दावा; म्हणाले, “होय, भारत-पाकमधील युद्ध अमेरिकेनेच संपविले”
17
२०२७ पासून मेट्रोचा मार्ग वेगाने विस्तारेल: मुख्यमंत्री; काशीगाव-दहिसरदरम्यान तांत्रिक चाचणी
18
शरद पवार गटाच्या बैठकीत स्थानिक निवडणुकांवर चर्चा; नेमके काय घडले, कोणता निर्णय झाला?
19
‘लाडक्या बहिणी’च्या नावे खाती उघडून सायबर भामट्यांना ३० हजारांत विक्री; तिघे अटकेत
20
‘सोडूनी सारी लाज, क्यूआर कोडने घेतली लाच’; दोन पोलिस अन् एका खबऱ्याला अटक, नेमके प्रकरण काय?

खून, दरोडा, अत्याचाराने जिल्हा हादरला !

By admin | Updated: December 31, 2015 00:29 IST

मारामारीमुळे वाढला ‘क्राईम रेट’ : सोनसाखळी चोरीचे प्रकार आटोक्यात आणण्यात पोलिसांना यश

दत्ता यादव --सातारा -२०१५ मध्ये जिल्ह्यात अनेक नाट्यमय आणि जिल्ह्याला हादरून सोडणाऱ्या घटना घडल्या. त्यामध्ये खून, दरोडा, अत्याचार आणि अपहरण यासंह गुन्हेगारी टोळ्यांच्या मुसक्या आवळण्याचा चांगला प्रयत्न झाला.सरत्या वर्षाला निरोप देत असतानाच सदैव जिल्हा पोलीस दलाच्या पटलावर कायम असलेल्या सल्या चेप्या याच्या गुन्हेगारी क्षेत्राचा अंत झाला. मात्र २०१५ च्या सुरुवातील अनेक नाट्यमय घटना घडल्या. मुंबई येथे कार्यरत असलेला हवालदार धर्मराज काळोखे याला खंडाळा येथे ड्रग्ज प्रकरणात अटक केली. यामध्ये ड्रग्ज माफीया बेबी पाटणकर हिचेही नाव पुढे आले होते. बेबी पाटणकरला अटक झाल्यानंतर काही दिवसांतच तिची जामिनावर मुक्तताही झाली. मात्र धर्मराज काळोखे अद्यापही कारागृहाच्या काळोख्या कोठडीत आहे. सातारा शहरापासून जवळ असलेल्या खावली येथे सहाजणांनी दरोडा टाकून एका महिलेवर सामूहिक अत्याचार केला होता. जिल्ह्यात पहिल्यांदाच असा प्रकार घडल्याने संपूर्ण पोलीस दल अक्षरश: हादरून गेले होते. कसलाही पुरावा नसताना सातारा पोलिसांनी कौशल्याने हा दरोडा उघडकीस आणला. ज्या ठिकाणी घटना घडली. त्या ठिकाणावरील एका ढाब्यावरील कर्मचाऱ्यांचा या प्रकरणात समावेश असल्याचे अखेर निष्पन्न झाले. सातारा तालुक्यातील बोरगावजवळ कोल्हापूरहून मुंबईकडे निघालेल्या खासगी बसवर दरोडा टाकून कुरिअरच्या व्यक्तीला पिस्तुलाचा धाक दाखवून लूटले होते. हा गुन्हाही पोलिसांनी काही दिवसांतच उघडकीस आणला. जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकीची धामधूम सुरू होण्यापूर्वी चोरटे आल्याच्या व्हाट्सअ‍ॅपवरच्या अफवा सुरू झाल्या. ग्रामीण भागात नागरिकांकडून स्वत: गस्तीचे प्रमाण वाढले होते. परळी खोऱ्यातील एका गावात बॅटऱ्या दिसल्या म्हणून पोलिसांना बोलावून घेतले आणि काजवे निघाले. चोर समजून फिरस्त्या व्यक्तींना अनेकांना मारहाण झाली. हातावर पोट असणाऱ्यांची उपासमारीची वेळ आणि फिरत्या विक्रेत्यांना गावबंदीही झाली. त्यामध्ये परप्रांतियांनाही सोडले नाही. पोलिसांची डोकेदुखी वाढल्यामुळे अखेर पोलीस अधीक्षकांनाच यामध्ये लक्ष घालावे लागले. एखाद्याला मारहाण केली तर गुन्हे दाखल करू, अशी तंबी दिल्यामुळे काही अंशी हे प्रकार थांबले. मात्र ग्रामपंचायत निवडणूक संपल्यानंतर तर व्हाट्सअ‍ॅपवरच्या अफवा बंद झाल्या. कऱ्हाड तालुक्यातील उंडाळे येथील वडापचालक विजयसिंह पाटील याचा खून झाला. हा खून वडाप व्यवसायाच्या चढाओढीतून झाल्याने तपासात अखेर निष्पन्न झाले.महाबळेश्वर तालुक्यामध्ये एका युवतीवर दोघाजणांनी अत्याचार केला. संबंधित युवती आणि एक महिला चालत घरी जात असताना हा प्रकार घडला. अशा प्रकारे २०१५ वर्ष जिल्हा पोलीस दलासाठी डोकेदुखीचे ठरले. तेरा टोळ्या झाल्या तडीपार ! जिल्हा पोलीस दलाच्या इतिहासात पहिल्यांदाच एका वर्षात तब्बल तेरा टोळ्या तडीपार करण्याचा विक्रम आहे. पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी राबविलेल्या तडीपार सत्रामध्ये महाबळेश्वरचे नगरसेवक कुमार शिंदे आणि त्यांच्या भावाचाही समावेश आहे. कऱ्हाड, फलटण, सातारा या ठिकाणच्या टोळ्या तडीपार करण्यात आल्या. त्यामुळे गर्दी, मारामारीसारखे गुन्हेही आटोक्यात आले. कऱ्हाड आणि सातारा शहरात पिसीआर व्हॅन सुरू केल्यामुळे रात्रीत होणाऱ्या घरफोड्याही कमी झाल्या.कऱ्हाडध्ये टोळी युद्धातून दुहेरी खूनप्रकरणही घडले.सातारा आकाशवाणी झोपडपट्टीत एका महिलेचा खून झाला. मात्र या खुनाचे कारण अद्याप पोलिसांना उलगडता आले नाही. फलटण तालुक्यातील झिरपवाडी हॉटेल व्यावसायिक जोतीराम चव्हाण यांची सहाजणांनी गोळ्या घालून व तलवारीने वार करून निर्घृण हत्या केली. यानंतर संतप्त ग्रामस्थ व नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात न घेण्याची भूमिका घेतली होती. परंतु पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख हल्लेखोरांना पकडण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर जमाव शांत झाला. याप्रकरणी पाचजणांना अखेर अटक केली.