शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

खून, दरोडा, अत्याचाराने जिल्हा हादरला !

By admin | Updated: December 31, 2015 00:29 IST

मारामारीमुळे वाढला ‘क्राईम रेट’ : सोनसाखळी चोरीचे प्रकार आटोक्यात आणण्यात पोलिसांना यश

दत्ता यादव --सातारा -२०१५ मध्ये जिल्ह्यात अनेक नाट्यमय आणि जिल्ह्याला हादरून सोडणाऱ्या घटना घडल्या. त्यामध्ये खून, दरोडा, अत्याचार आणि अपहरण यासंह गुन्हेगारी टोळ्यांच्या मुसक्या आवळण्याचा चांगला प्रयत्न झाला.सरत्या वर्षाला निरोप देत असतानाच सदैव जिल्हा पोलीस दलाच्या पटलावर कायम असलेल्या सल्या चेप्या याच्या गुन्हेगारी क्षेत्राचा अंत झाला. मात्र २०१५ च्या सुरुवातील अनेक नाट्यमय घटना घडल्या. मुंबई येथे कार्यरत असलेला हवालदार धर्मराज काळोखे याला खंडाळा येथे ड्रग्ज प्रकरणात अटक केली. यामध्ये ड्रग्ज माफीया बेबी पाटणकर हिचेही नाव पुढे आले होते. बेबी पाटणकरला अटक झाल्यानंतर काही दिवसांतच तिची जामिनावर मुक्तताही झाली. मात्र धर्मराज काळोखे अद्यापही कारागृहाच्या काळोख्या कोठडीत आहे. सातारा शहरापासून जवळ असलेल्या खावली येथे सहाजणांनी दरोडा टाकून एका महिलेवर सामूहिक अत्याचार केला होता. जिल्ह्यात पहिल्यांदाच असा प्रकार घडल्याने संपूर्ण पोलीस दल अक्षरश: हादरून गेले होते. कसलाही पुरावा नसताना सातारा पोलिसांनी कौशल्याने हा दरोडा उघडकीस आणला. ज्या ठिकाणी घटना घडली. त्या ठिकाणावरील एका ढाब्यावरील कर्मचाऱ्यांचा या प्रकरणात समावेश असल्याचे अखेर निष्पन्न झाले. सातारा तालुक्यातील बोरगावजवळ कोल्हापूरहून मुंबईकडे निघालेल्या खासगी बसवर दरोडा टाकून कुरिअरच्या व्यक्तीला पिस्तुलाचा धाक दाखवून लूटले होते. हा गुन्हाही पोलिसांनी काही दिवसांतच उघडकीस आणला. जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकीची धामधूम सुरू होण्यापूर्वी चोरटे आल्याच्या व्हाट्सअ‍ॅपवरच्या अफवा सुरू झाल्या. ग्रामीण भागात नागरिकांकडून स्वत: गस्तीचे प्रमाण वाढले होते. परळी खोऱ्यातील एका गावात बॅटऱ्या दिसल्या म्हणून पोलिसांना बोलावून घेतले आणि काजवे निघाले. चोर समजून फिरस्त्या व्यक्तींना अनेकांना मारहाण झाली. हातावर पोट असणाऱ्यांची उपासमारीची वेळ आणि फिरत्या विक्रेत्यांना गावबंदीही झाली. त्यामध्ये परप्रांतियांनाही सोडले नाही. पोलिसांची डोकेदुखी वाढल्यामुळे अखेर पोलीस अधीक्षकांनाच यामध्ये लक्ष घालावे लागले. एखाद्याला मारहाण केली तर गुन्हे दाखल करू, अशी तंबी दिल्यामुळे काही अंशी हे प्रकार थांबले. मात्र ग्रामपंचायत निवडणूक संपल्यानंतर तर व्हाट्सअ‍ॅपवरच्या अफवा बंद झाल्या. कऱ्हाड तालुक्यातील उंडाळे येथील वडापचालक विजयसिंह पाटील याचा खून झाला. हा खून वडाप व्यवसायाच्या चढाओढीतून झाल्याने तपासात अखेर निष्पन्न झाले.महाबळेश्वर तालुक्यामध्ये एका युवतीवर दोघाजणांनी अत्याचार केला. संबंधित युवती आणि एक महिला चालत घरी जात असताना हा प्रकार घडला. अशा प्रकारे २०१५ वर्ष जिल्हा पोलीस दलासाठी डोकेदुखीचे ठरले. तेरा टोळ्या झाल्या तडीपार ! जिल्हा पोलीस दलाच्या इतिहासात पहिल्यांदाच एका वर्षात तब्बल तेरा टोळ्या तडीपार करण्याचा विक्रम आहे. पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी राबविलेल्या तडीपार सत्रामध्ये महाबळेश्वरचे नगरसेवक कुमार शिंदे आणि त्यांच्या भावाचाही समावेश आहे. कऱ्हाड, फलटण, सातारा या ठिकाणच्या टोळ्या तडीपार करण्यात आल्या. त्यामुळे गर्दी, मारामारीसारखे गुन्हेही आटोक्यात आले. कऱ्हाड आणि सातारा शहरात पिसीआर व्हॅन सुरू केल्यामुळे रात्रीत होणाऱ्या घरफोड्याही कमी झाल्या.कऱ्हाडध्ये टोळी युद्धातून दुहेरी खूनप्रकरणही घडले.सातारा आकाशवाणी झोपडपट्टीत एका महिलेचा खून झाला. मात्र या खुनाचे कारण अद्याप पोलिसांना उलगडता आले नाही. फलटण तालुक्यातील झिरपवाडी हॉटेल व्यावसायिक जोतीराम चव्हाण यांची सहाजणांनी गोळ्या घालून व तलवारीने वार करून निर्घृण हत्या केली. यानंतर संतप्त ग्रामस्थ व नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात न घेण्याची भूमिका घेतली होती. परंतु पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख हल्लेखोरांना पकडण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर जमाव शांत झाला. याप्रकरणी पाचजणांना अखेर अटक केली.