शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
2
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
3
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
4
T20 World Cup 2026: शुभमन गिलला का वगळलं? गंभीरला एअरपोर्टवर प्रश्न; काय मिळालं उत्तर?
5
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
6
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
7
वर्षाखेरीस IPO बाजारात 'धुमधडाका'! या आठवड्यात ११ नवीन कंपन्यांचे आगमन; गुंतवणुकीची मोठी संधी
8
चांदेकरवाडीत पाणंद रस्त्यावर लिंबू आणि बाहुली, अंधश्रद्धेचा प्रकार, ग्रामस्थांत भीतीची सावली
9
"मला मारताहेत, जबरदस्तीने काहीतरी खायला..."; विवाहितेचा ढसाढसा रडत आईला शेवटचा कॉल
10
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
11
Siddhi Vastre: अवघ्या २२ वर्षांची तरुणी भाजपवर पडली भारी; मोहोळमध्ये इतिहास घडवणारी सिद्धी वस्त्रे आहे तरी कोण?
12
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
13
Maharashtra Local Body Election Results 2025 : अख्खं मंत्रिमंडळ ईश्वरपुरात, तरीही जयंत पाटलांनी महायुतीला दिला धक्का; सांगली जिल्ह्यातील नगराध्यक्षांची यादी एका क्लिकवर
14
विमा घेताय? केवळ जाहिरातींवर जाऊ नका; 'या' ४ तांत्रिक गोष्टी तपासा, अन्यथा क्लेमवेळी होईल पश्चात्ताप!
15
उद्धवसेना-मनसे युतीची बोलणी संपली, संजय राऊतांनी दिली महत्त्वाची माहिती; "अजूनही ७२ तास..."
16
"म्हणून पुन्हा एकदा सांगतो, शून्य अधिक शून्य...", निकाल लागताच भाजपचा उद्धव ठाकरेंवर पहिला प्रहार
17
Shrivardhan Nagar Parishad Election Result 2025: रायगडमध्ये मोठा ट्विस्ट! श्रीवर्धनमधील ठाकरे गटाचा विजयी नगराध्यक्ष शिंदेसेनेत प्रवेश करणार?
18
Maharashtra Nagaradhyaksha Winners List: महाराष्ट्रातील नगरपरिषद, नगरपंचायतींमध्ये कोण झालं नगराध्यक्ष? वाचा, पक्षनिहाय यादी
19
Muktainagar Nagar Panchayat Election Result 2025: “रक्षा खडसे भाजपात एकाकी पडल्या”; मुक्ताईनगरातील शिंदेसेनेच्या विजयानंतर एकनाथ खडसेंचा दावा
20
"पैसे भरा, मृतदेह न्या", पोटच्या पोरासाठी बापाने मागितली भीक; घर गहाण ठेवलं, कर्ज काढलं, पण...
Daily Top 2Weekly Top 5

खंडू चव्हाण खूनप्रकरणी ‘अ‍ॅट्रॉसिटी’ही दाखल

By admin | Updated: August 27, 2015 22:55 IST

तिघांना पोलीस कोठडी : मारहाणीत मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अहवालात स्पष्ट

फलटण : ‘आज सहकार क्षेत्राला सरकारकडून वेगळी वागणूक दिली जात आहे. शेतकरी वर्ग संकटात सापडला असून, साखर कारखानदारी अडचणीत आली आहे. अशा परिस्थतीत राज्य व केंद्र सरकारने शेतकऱ्यांना मदत करावी, अशी अपेक्षा व्यक्त करताना तुम्ही योजना किंवा मंत्रालयांचे नावे बदलण्याचा फंडा करा; पण शेतकऱ्यांच्या पोटाकडेही बघा,’ असा टोला राज्य विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी लगावला. यावेळी तालुक्यातील विरोधकांनाही रामराजेंनी जोरदार फटकारले.श्रीराम-जवाहर साखर कारखान्यांच्या रोलरपूजनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी आ. दीपक चव्हाण, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष माणिकराव सोनवलकर, कारखान्याचे अध्यक्ष डॉ. बाळासाहेब शेंडे, उपाध्यक्ष नितीन भोसले, कारखान्याचे सर्व संचालक उपस्थित होते.‘श्रीराम सहकारी साखर कारखाना आजच्या परिस्थितीत स्पर्धेत टिकला पाहिजे. यासाठी कोणत्याही परिस्थितीत या कारखान्याचे गाळप त्वरित व वेळेवर सुरू करण्याचे गरजेचे आहे. तालुक्यात या हंगामात आपल्याबरोबरच इतर तीन त्यामध्ये नवीन दोन खासगी कारखानेही सुरू होणार आहेत. आज एफआरपी एवढा दर देण्यातही अनेक कारखाने अपयशी ठरले आहेत. साखरेचे दर कोसळल्याने व सरकारच्या दुर्लक्षामुळे साखर कारखान्यांचा व्यवसाय धोक्यात आला आहे. चालू हंगामात बरेच कारखाने बंद राहणार असून, कामगारांवरही टांगती तलवार आहे. कारखानदारीची बिकट परिस्थती बघता सरकारी बँका कर्ज देण्यास तयार नाही. ही परिस्थती किती वर्षे राहील, हे सांगता येत नाही. या सर्व आव्हानांचा सामना करीत श्रीराम कारखाना चालवावा लागणार आहे. याचे भान सर्वांनी ठेवणे गरजेचे आहे,’ असे रामराजेंनी स्पष्ट केले.आज राज्यात व केंद्रात सत्ताबदल झालाय. ज्यावेळी दोन्ही काँग्रेसकडे सत्ता होती, त्यावेळी ज्यादा ऊसदर देता येत नसल्याचे खापर शरद पवारांवर त्यावेळचे विरोधक फोडत होते. स्वाभिमानी शेतकरी संघटना ऊस हंगामाच्या वेळेस तर कारखान्यांच्या विरोधात ऊसदरासाठी आंदोलन करून एवढाच दर पाहिजे, तेवढाच दर पाहिजे, अशा मागण्या करायचे. साखरधंद्याची परिस्थिती व पुढील गणिते त्यांनी जाणून न घेता अवास्तव दर जबरदस्तीने पदरात पाडून घेतल्याने साखर कारखाने अडचणीत आल्याचा आरोप रामराजेंनी करताना आज स्वाभिमानीची लोक सत्तेत आहेत. मात्र, कमी ऊसदर मिळतोय, याविषयी बोलायला व आंदोलन करायला ते तयार नाहीत. निव्वळ शरद पवारांवरील द्वेषापायी व सत्तेसाठी त्यांनी साखर कारखानदारी अडचणीत आणल्याचे रामराजेंनी सांगितले. (प्रतिनिधी) तालुक्यातील विरोधकांनी कामगारात फूट पाडू नयेविरोधकांनी त्यांचा कारखाना चालावा म्हणून श्रीराम कारखान्यातील कामगारांमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. मात्र, त्यांचा हा प्रयत्न त्यांच्या अंगलट येईल. वेळप्रसंगी तुमच्या कामगारात आम्हाला फूट पाडावी लागेल, असा इशारा विरोधकांना देतानाच विरोधकांचे अस्तित्व राहिलेले नाही. त्यांनाही जनतेच्या प्रश्नावर काही करावयाचे वाटत नाही. स्वत:ची कामे करून घेण्यात ते मश्गुल असल्याचा टोला रामराजेंनी लगावला.शेट्टी-खोत जोडगोळी गप्प का?साखर कारखान्यांचा हंगाम सुरू झाला की साखरधंद्याचा कोणताही अभ्यास न करता एवढा दर पाहिजे, तेवढा दर पाहिजे, अशी दराची अवास्तव मागणी करून कारखानदारांना अडचणीत आणणारे स्वाभिमानीचे खासदार राजू शेट्टी व सदाभाऊ खोत ही जोडगळी कमी ऊसदरावर गप्प आहेत. त्यांच्या तोंडातून आता सत्तेवर आल्यावर शरद शब्द फुटेनासा झाला आहे. शरद पवारांवर ठासून आरोप करणारे आज सत्ता आल्यावर मौनव्रत धारण करून बसले आहेत. कोठे गेली आता तुमची गणिते व आकडेवारी, असा सवाल रामराजेंनी केला.