शहरं
Join us  
Trending Stories
1
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
2
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
3
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
4
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
5
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
6
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
7
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
8
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
9
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
10
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
11
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
12
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
13
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
14
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले
15
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?
16
"संविधान न्याय देण्यात अपयशी, राजेशाही..."; नेपाळच्या गोंधळावर मनीषा कोईरालाचे रोखठोक मत
17
विरोधकांची इच्छा पूर्ण होणार...? NDA मध्ये फुट पडणार...? "15 जागा मिळाल्या नाही तर..."; 'या' पक्षानं केली मोदींचं टेन्शन वाढवणारी 'मागणी'
18
'माझ्याकडे पैशांची कमतरता नाही; महिन्याला २०० कोटी कमवण्याची बुद्धी...', नितीन गडकरींचे वक्तव्य
19
IND vs PAK: टॉस अन् मॅचच्या निकालाचा संबंध काय..? जाणून घ्या 'या' मैदानावरचं खास कनेक्शन
20
“ह्याच जागेतून इतिहास घडविला गेला”; हर्षवर्धन सपकाळ यांची लंडन येथील आंबेडकर हाऊसला भेट

खंडू चव्हाण खूनप्रकरणी ‘अ‍ॅट्रॉसिटी’ही दाखल

By admin | Updated: August 27, 2015 22:55 IST

तिघांना पोलीस कोठडी : मारहाणीत मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अहवालात स्पष्ट

फलटण : ‘आज सहकार क्षेत्राला सरकारकडून वेगळी वागणूक दिली जात आहे. शेतकरी वर्ग संकटात सापडला असून, साखर कारखानदारी अडचणीत आली आहे. अशा परिस्थतीत राज्य व केंद्र सरकारने शेतकऱ्यांना मदत करावी, अशी अपेक्षा व्यक्त करताना तुम्ही योजना किंवा मंत्रालयांचे नावे बदलण्याचा फंडा करा; पण शेतकऱ्यांच्या पोटाकडेही बघा,’ असा टोला राज्य विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी लगावला. यावेळी तालुक्यातील विरोधकांनाही रामराजेंनी जोरदार फटकारले.श्रीराम-जवाहर साखर कारखान्यांच्या रोलरपूजनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी आ. दीपक चव्हाण, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष माणिकराव सोनवलकर, कारखान्याचे अध्यक्ष डॉ. बाळासाहेब शेंडे, उपाध्यक्ष नितीन भोसले, कारखान्याचे सर्व संचालक उपस्थित होते.‘श्रीराम सहकारी साखर कारखाना आजच्या परिस्थितीत स्पर्धेत टिकला पाहिजे. यासाठी कोणत्याही परिस्थितीत या कारखान्याचे गाळप त्वरित व वेळेवर सुरू करण्याचे गरजेचे आहे. तालुक्यात या हंगामात आपल्याबरोबरच इतर तीन त्यामध्ये नवीन दोन खासगी कारखानेही सुरू होणार आहेत. आज एफआरपी एवढा दर देण्यातही अनेक कारखाने अपयशी ठरले आहेत. साखरेचे दर कोसळल्याने व सरकारच्या दुर्लक्षामुळे साखर कारखान्यांचा व्यवसाय धोक्यात आला आहे. चालू हंगामात बरेच कारखाने बंद राहणार असून, कामगारांवरही टांगती तलवार आहे. कारखानदारीची बिकट परिस्थती बघता सरकारी बँका कर्ज देण्यास तयार नाही. ही परिस्थती किती वर्षे राहील, हे सांगता येत नाही. या सर्व आव्हानांचा सामना करीत श्रीराम कारखाना चालवावा लागणार आहे. याचे भान सर्वांनी ठेवणे गरजेचे आहे,’ असे रामराजेंनी स्पष्ट केले.आज राज्यात व केंद्रात सत्ताबदल झालाय. ज्यावेळी दोन्ही काँग्रेसकडे सत्ता होती, त्यावेळी ज्यादा ऊसदर देता येत नसल्याचे खापर शरद पवारांवर त्यावेळचे विरोधक फोडत होते. स्वाभिमानी शेतकरी संघटना ऊस हंगामाच्या वेळेस तर कारखान्यांच्या विरोधात ऊसदरासाठी आंदोलन करून एवढाच दर पाहिजे, तेवढाच दर पाहिजे, अशा मागण्या करायचे. साखरधंद्याची परिस्थिती व पुढील गणिते त्यांनी जाणून न घेता अवास्तव दर जबरदस्तीने पदरात पाडून घेतल्याने साखर कारखाने अडचणीत आल्याचा आरोप रामराजेंनी करताना आज स्वाभिमानीची लोक सत्तेत आहेत. मात्र, कमी ऊसदर मिळतोय, याविषयी बोलायला व आंदोलन करायला ते तयार नाहीत. निव्वळ शरद पवारांवरील द्वेषापायी व सत्तेसाठी त्यांनी साखर कारखानदारी अडचणीत आणल्याचे रामराजेंनी सांगितले. (प्रतिनिधी) तालुक्यातील विरोधकांनी कामगारात फूट पाडू नयेविरोधकांनी त्यांचा कारखाना चालावा म्हणून श्रीराम कारखान्यातील कामगारांमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. मात्र, त्यांचा हा प्रयत्न त्यांच्या अंगलट येईल. वेळप्रसंगी तुमच्या कामगारात आम्हाला फूट पाडावी लागेल, असा इशारा विरोधकांना देतानाच विरोधकांचे अस्तित्व राहिलेले नाही. त्यांनाही जनतेच्या प्रश्नावर काही करावयाचे वाटत नाही. स्वत:ची कामे करून घेण्यात ते मश्गुल असल्याचा टोला रामराजेंनी लगावला.शेट्टी-खोत जोडगोळी गप्प का?साखर कारखान्यांचा हंगाम सुरू झाला की साखरधंद्याचा कोणताही अभ्यास न करता एवढा दर पाहिजे, तेवढा दर पाहिजे, अशी दराची अवास्तव मागणी करून कारखानदारांना अडचणीत आणणारे स्वाभिमानीचे खासदार राजू शेट्टी व सदाभाऊ खोत ही जोडगळी कमी ऊसदरावर गप्प आहेत. त्यांच्या तोंडातून आता सत्तेवर आल्यावर शरद शब्द फुटेनासा झाला आहे. शरद पवारांवर ठासून आरोप करणारे आज सत्ता आल्यावर मौनव्रत धारण करून बसले आहेत. कोठे गेली आता तुमची गणिते व आकडेवारी, असा सवाल रामराजेंनी केला.