शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा आंदोलनानंतर आता ओबीसींचा मोर्चा मुंबईत धडकणार; तारीख ठरली
2
Nepal Crisis : नेपाळच्या लष्करप्रमुखांनी राष्ट्राला संबोधले, मागे हिंदू राजांचा फोटो, नेमके राजकारण काय?
3
फ्रान्समध्ये सरकारविरोधात लाखो लोक रस्त्यावर का उतरले? चार कारणे समजून घ्या
4
Asia Cup 2025: भारत-पाकिस्तान सामना रद्द होणार? सुप्रीम कोर्टात याचिका दाखल, जाणून घ्या A टू Z माहिती
5
भारतातून पळालेल्या झाकीर नाईकला झाला एड्स? आता मलेशियामधून समोर आली अशी माहिती
6
IND vs UAE: अभिषेक शर्माची रेकॉर्ड बूकमध्ये नोंद, 'अशी' कामगिरी करणारा चौथा भारतीय
7
हृदयद्रावक! शाळेत खेळता खेळता श्वास थांबला; ११ वर्षांच्या मुलीचा कार्डिएक अरेस्टने मृत्यू
8
मंगळावर खरंच जीवसृष्टी होती? NASA रोव्हरने शोधून काढली अशी गोष्ट, तुम्हीही व्हाल अवाक्
9
दोन iPhone 17 च्या किंमतीत मिळू शकते एक कार, इतक्या पैशांत सामान्य व्यक्ती काय काय खरेदी करू शकते?
10
लॅरी एलिसन यांनी मस्क यांना टाकलं मागे! बनले जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती; काय करतात व्यवसाय?
11
कोण आहेत अबिदुर चौधरी? ज्यांनी डिझाईन केला Apple चा सर्वात स्लीम iPhone 17 Air
12
नेपाळचे नवे सत्ताधीश कोण? जेन झी ठरविणार, सुशीला कार्की, बालेंद्र शाह, कुलमान घिसिंग चर्चेत
13
"२.४६ कोटी घ्यायचेत"; बँकेच्या बाथरुममध्ये बिझनेसमनने स्वत:वर झाडल्या गोळ्या, कारण...
14
मानेत गोळी लागताच रक्ताची धार अन्...; चार्ली कर्कच्या हत्येचा VIDEO समोर, १८० मीटरवर होता शूटर
15
मुंबई, पुणे, कोल्हापूर, लातूरचे १०० जण अडकले नेपाळमध्ये; प्रवास टाळा, राज्यातील पर्यटकांना सरकारच्या सूचना 
16
आम्ही नेपाळमध्ये सुरक्षित; कुठलीही गैरसोय नाही; ठाणे जिल्ह्यातील पर्यटकांनी सांगितली परिस्थिती
17
पेट्रोल-डिझेल जीएसटी अंतर्गत येऊ शकतात का? सीबीआयसी अध्यक्षांनी सांगितली आतली बातमी
18
नेपाळचं नेतृत्व करण्यास सज्ज झालेल्या सुशीला कार्की यांनी नरेंद्र मोदी आणि भारताबाबत केलं मोठं विधान, म्हणाल्या... 
19
सर्वसामान्यांमध्ये मोठी क्रेझ असणाऱ्या 'Hero Passion+' दुचाकीची GST कपातीनंतर नवीन किंमत काय?
20
भयंकर! ज्या प्रियकराच्या मदतीनं पतीच्या हत्येचा रचला कट; त्याचाच मृतेदह झाडाला लटकलेला आढळला

मुंबई-सातारा प्रवास तब्बल पंधरा तासांनी संपला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 1, 2019 23:39 IST

सातारा : खासगी प्रवासी वाहतुकीशी स्पर्धा करत असताना प्रवाशांना अत्याधुनिक सुविधा देण्याच्या उद्देशाने शिवशाही गाड्या एसटीच्या ताफ्यात दाखल केल्या. ...

सातारा : खासगी प्रवासी वाहतुकीशी स्पर्धा करत असताना प्रवाशांना अत्याधुनिक सुविधा देण्याच्या उद्देशाने शिवशाही गाड्या एसटीच्या ताफ्यात दाखल केल्या. या गाडीमुळे सुविधा होण्याऐवजी गैरसोयच जास्त होत असल्याचे अनुभवास मिळत आहे. मुंबईहून साताऱ्याला येण्यासाठीपाच तास लागतात; पण शनिवारी तब्बल पंधरा तासांचा प्रवास घडला. त्यामुळे प्रवाशांची चांगलीच गैरसोय झाली.याबाबत माहिती अशी की, मुंबई सेंट्रल ते सातारा ही शिवशाही गाडी (एमएच ०४ एचवाय ५२६१) मुंबईतून ४१ प्रवाशांना घेऊन साताºयाच्या दिशेने मार्गस्थ झाली. दिवसभर मुंबईत काम करून थकल्याने सर्वजण काही वेळेतच झोपे गेले. दिवस उगवायला पहाटे पाचला साताºयात पोहोचण्याची शक्यता असल्याने अनेकांनी नातेवाइकांना फोन करून तसं सांगूनही ठेवलं.पहाटे साडेचारच्या सुमारास गाडी तळेगाव टोलनाक्याजवळ आली अन् गाडी बंद पडली. गाडीतील बिघाड लक्षात आल्यावर चालक-वाहकांनी वरिष्ठांना फोन करून लवकरात लवकर मॅकॅनिक पाठविण्याची विनंती केली. प्रवाशांना वाटले अर्धा-पाऊण तासात गाडी पुन्हा निघेल; पण एक दीड तास झाला तरी कारागीर आलाच नाही. कंटाळून काही प्रवासी खाली उतरले.जवळच्या आगारात मदतीसाठी विनवणी केल्या; पण काही उपयोग झाला नाही. त्यांनी महामंडळाच्या अन्य गाड्या थांबविण्याचा प्रयत्न केला; पण त्या भरून येत असल्याने तसेच बसण्यास जागाच नसल्याने काही करता आले नाही. खासगी कारागिराने एक तासात होईल म्हणता म्हणता चार ते पाच तासांनी गाडी सुरू केली. त्यानंतर गाडी साताºयाकडे मार्गस्थ झाली. शेवटी सायंकाळी साडेचारला गाडी साताºयात आली. संतप्त काही प्रवाशांनी याबाबत लेखी तक्रार केली आहे. याबाबत प्रशासन काय भूमीका घेणार, याकडे लक्ष लागून राहिले आहे.