शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
2
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
3
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
4
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
5
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
6
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
7
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
8
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
9
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
10
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
11
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
12
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
13
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
14
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
15
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
16
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
17
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
18
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
19
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
20
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले

जिल्ह्यात बहुरंगी लढती

By admin | Updated: February 13, 2017 22:56 IST

८१७ उमेदवार रिंगणात : जि. प., पं. स. निवडणुकीत शेवटच्या क्षणी नाट्यमय घडामोडी

सातारा : जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत अर्ज मागे घेण्याच्या दिवशी सोमवारी शेवटच्या क्षणी नाट्यमय घडामोडी घडत अनेक बंडोबा थंडोबा झाले, तर काही ठिकाणी बंडाळीचा वणवा कायम राहिला. सातारा जिल्ह्याच्या निवडणूक रणांगणात एकूण ८१७ उमेदवारांचं मैदान-ए-जंग पाहण्यास मिळणार आहे. बहुतांशी ठिकाणी बहुरंगी लढती होत आहेत.खासदार उदयनराजे भोसले यांनी सातारा तालुक्यात १०४ जणांनी माघार घेतली. त्यांनी भाजपशी केलेली युतीही उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अंतिम दिवशी समोर आली. काँगे्रस व भाजप या दोन टोकांच्या पक्षांना सोबत घेऊन खासदार उदयनराजे भोसले यांनी तयार केलेले ‘राजकीय रसायन’ अनेकांना विस्मित करणारे ठरले आहे. खंडाळा तालुक्यातील राजकीय आखाड्यात पक्षनेतृत्वाच्या आदेशाला वाटाण्याच्या अक्षता लावीत पक्षाविरोधात अनेकांनी दंड थोपाटले आहेत. राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडली असून, काँग्रेसने तर लोटांगण घालीत अपक्ष आघाडीच्या तंबूचा आसरा घेतला आहे. त्यामुळे राजकीय पक्षांच्या चिंधड्या करीत बंडोबांनी अपक्षांचा झेंडा उभारला आहे. जिल्हा परिषदेच्या ३५ तर पंचायत समितीच्या ५६ जणांनी अर्ज मागे घेतले. त्यामुळे तालुक्यातील तीन गटांसाठी २० तर सहा गणांसाठी ३१ उमेदवार रिंगणात उतरले आहेत.कोरेगाव तालुक्यातील पाच गटांतील २७ जणांनी माघार घेतली. त्यामुळे २२ उमेदवार निवडणूक रिंगणात राहिले आहेत. दहा गणांसाठी ७६ उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. त्यापैकी ४० जणांनी माघार घेतल्याने आता ३६ जण आपले नशीब आजमावत आहेत. नाट्यमय घडामोडीनंतर काँग्रेसचे किन्हई पंचायत समिती गणातील उमेदवार तुकाराम वाघ यांनी अनपेक्षितरीत्या माघार घेतली, त्यानंतर काँग्रेसने लागोलाग अपक्ष म्हणून निवडणूक रिंगणात असलेल्या अ‍ॅड. अमोल राशीनकर यांचा पक्ष प्रवेश घडवित त्यांची उमेदवारी पुरस्कृत केली आहे.फलटण तालुक्यात उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवशी गटातील ३९, तर गणातील ६७ अशा एकूण १०६ उमेदवारांनी तलवारी म्यान केल्या. गटाच्या ७ जागांसाठी ३३ तर गणाच्या १४ जागांसाठी ५४ उमेदवारांनी निवडणूक रिंगणात एकमेकांसमोर आव्हान उभे केले आहे. ही निवडणूक चौरंगी होत असून, निवडणुकीत काँग्रेस, स्वाभिमानी पक्ष व भाजप, रासप असे नवे समीकरण जुळले आहे. महाबळेश्वर तालुक्यातून सर्वांत कमी अर्ज मागे घेतले गेले. दोन गटांतून पाच, तर चार गणांतून पाच उमेदवारांनी अर्ज मागे घेतले. तळदेव गटातील शिवसेनेच्या प्रमुख उमेदवार अर्चना सचिन शेटे यांनी सोमवारी अनपेक्षितपणे अर्ज मागे घेतल्याने सर्वांनाच धक्का बसला. निवडणुकीच्या मैदानात दोन गटांत पाच तर चार गणांतून दहा असे तालुक्यातून पंधरा उमेदवार उरले आहेत.जावळी तालुक्यात ९६ उमेदवारांनी भरलेल्या ११८ अर्जांपैकी ८० अर्ज माघारी घेतल्याने तालुक्यातील तीन गटांसाठी १२ उमेदवार तर सहा गणांसाठी २६ उमेदवार रिंगणात राहिले आहेत. तालुक्यात प्रथमच भाजपाने सर्वच्या सर्व जागांवर उमेदवार उभे केले आहेत. सत्ताधारी राष्ट्रवादीला आता शिवसेनेबरोबरच भाजपाशीही सामना करावा लागणार आहे.वाई तालुक्यात गटासाठी १३ तर गणासाठी ३४ उमेदवार रिंगणात उरले असून, बंडोबांना थंड करण्यात पक्षश्रेष्ठींना अपयश आल्याचे समोर आले आहे.पाटण तालुक्यात गटातून २४ तर गणांतून ३८ जणांनी माघार घेतली. शिवसेना, भाजपा, राष्ट्रवादी व इतर पक्ष असा मुख्यत्वे चौरंगी लढतीचा महासंग्राम पाहावयास मिळणार आहे. फायनल देसाई-पाटणकर गटातच होणार असे दिसते. काळगाव गणातील अपक्ष उमेदवार पांडुरंग कुंभार हे उमेदवारी अर्ज बाद झाल्याच्या कारणावरून न्यायालयात गेल्यामुळे त्या गणातील अर्ज माघारीची प्रक्रिया १५ फेबु्रवारी रोजी होणार आहे, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी श्रीरंग तांबे यांनी दिली. माण तालुक्यात गटाच्या २३ तर गणातील ३२ उमेदवारांनी अर्ज मागे घेतले. आता गटाच्या पाच जागांसाठी २४ तर गणाच्या १० जागांसाठी ४९ उमेदवार असे एकूण ७३ उमेदवार रिंगणात उरले आहेत.खटाव तालुक्यातील सहा गट व बारा गणांसाठी एकूण ९५ अर्ज दाखल झाले होते. त्यातून जिल्हा परिषदेच्या २१ तर पंचायत समितीच्या ४२ उमेदवारांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले. गटासाठी २७ तर गणासाठी ५३ उमेदवार आपले नशीब आजमावणार आहेत.