शहरं
Join us  
Trending Stories
1
घातपात की आणखी काही? योगी आदित्यनाथांच्या दौऱ्यापूर्वी ५०० किलो स्फोटके सापडली; 20 किमीपर्यंत पेरली...
2
गोव्यात चाललेय काय? आरोग्य मंत्र्यांकडून सीएमओचे काल निलंबन, आज मुख्यमंत्र्यांनी केले रद्द
3
उद्धव ठाकरेंना जोरदार धक्का! ज्याच्यासाठी लोकसभेला काँग्रेसला नडले, त्यानेच साथ सोडली; चंद्रहार पाटलांचा रामराम  
4
Maharashtra Politics : "भाजप आणि निवडणूक आयोगाची मॅच फिक्सिंग...", नाना पटोलेंचा देवेंद्र फडणवीसांवर पलटवार
5
पाकिस्तान पुन्हा उघडा पडला! सॅटेलाईट फोटो सोबत छेडछाड केली, खोटे दावे केले
6
बीएसएनएलने आणला ऑपरेशन सिंदूर प्लॅन! रिचार्जची काही रक्कम सैन्याला देणार; ग्राहकांनाही डिस्काऊंट मिळणार...
7
जळगाव: लग्नाच्या वाढदिवसासाठी माहेरावरून आली अन् घरात पाय ठेवताच दिसला पतीचा मृतदेह
8
चांदीचा भाव विक्रमी उच्चांकावर; आठवड्यात ८,४०० रुपयांची वाढ; ३ टक्के जीएसटीसह १,०९,२८३ रुपये
9
Bhushi Dam Incident: पोहण्याच्या मोहाने घेतला जीव, भुशी डॅममध्ये बुडून दोन तरुणांचा मृत्यू
10
इंजिनिअरिंगच्या 'त्या' विद्यार्थिनीचा खून प्रेम प्रकरणातून, पोस्टमार्टेम रिपोर्टमध्ये काय? मित्राविरुद्ध गुन्हा दाखल
11
सासू-सासरे अन् पतीसह तिनं मुलांनाही सोडलं नाही! कुटुंबाला 'स्लो पॉयझन' देणाऱ्या महिलेची 'अशी' झाली पोलखोल
12
पहलगाम हल्ला : मेजर विनय नरवाल यांच्या पत्नीचा अश्लील AI व्हिडीओ व्हायरल; पिता-पूत्र ताब्यात
13
अंडरवर्ल्डमधून मोठी बातमी! लॉरेन्स गँग फुटली; गोल्डी ब्रार, रोहित गोदारा लॉरेन्सपासून वेगळे झाले
14
मुंबई: मेट्रोमोनियल साईटवर भेट, लग्नाचं स्वप्न दाखवून बलात्कार, पैसेही उकळले; आरोपीला न्यायालयाने काय दिली शिक्षा?
15
"कोरोनापेक्षाही वाईट परिस्थिती येईल...", चीनबद्दल डोनाल्ड ट्रम्प यांना तज्ज्ञांचा मोठा इशारा
16
IND vs ENG : इंग्लंडमध्ये पोहचताच टीम इंडियाचा कसून सराव; २२ वर्षांनी हा चेहरा पुन्हा संघासोबत दिसला
17
Viral Video : चोरी करायला गेला अन् पाय घसरून पडला! चोराची फजिती सीसीटीव्हीत झाली कैद
18
बिहार निवडणुकीपूर्वीच एनडीएत बंडखोरी! चिराग पासवान यांची घोषणा, सर्व २४३ जागांवर लढणार...
19
हिंसाचार, बलात्कार, स्थलांतर...मणिपूर मुद्द्यावरुन प्रियंका गांधींचा मोदी सरकारवर निशाणा

मोघल सरदार रणदुल्ला खानाचे ‘रणदुल्लाबाद’

By admin | Updated: March 22, 2015 00:14 IST

सोळाव्या शतकातील साक्षीदार: ऐतिहासिक परंपरेसह धार्मिक सलोखा जपणारे गाव

कमलाकर खराडे, पिंपोडे बुद्रुक : हरेश्वराच्या डोंगरापासून चवणेश्वर डोंगर रांगेतील मध्यावर डोंगर पायथ्याला रणदुल्लाबाद हे गाव वसलेले आहे. या गावाला ऐतिहासिक पार्श्वभूमी असून, अफजल खानाच्या स्वराज्यावरील मोहिमेचे साक्षीदार असलेले हे गाव आहे. अफजल खानासोबत रणदुल्ला खान हा दुसरा सरदारही होता. तो शिवरायांचा समर्थक म्हणून ओळखला जात होता. त्यामुळे अफजल खानाने त्याला संपवून याठिकाणी त्याची कबर बांधली. तेव्हापासून या गावाला रणदुल्लाबाद नाव मिळाले. सोळाव्या शतकात अफजल खानाने स्वराज्यावर केलेल्या आक्रमणावेळी हे गाव अस्तित्वात नव्हते. स्वराज्य रक्षणासाठी शिवाजी महाराजांच्या मावळ्यांनी अफजल खानाच्या सैन्याचा या ठिकाणी सामना केला. त्यावेळी माहूर, ता. पुरंदर येथील जगताप बंधू अन् वाईचे पिसाळ-देशमुख या मराठा शिलेदारांवर शिवाजी महाराजांनी जबाबदारी दिली होती. लढाईनंतर जगताप अन् पिसाळ-देशमुखांनी या ठिकाणी वास्तव्य केले. यातूनच ‘रणदुल्लाबाद’ गाव वसले. या गावात जगतापांची घरे अधिक आहेत. छत्रपतींचा समूळ नायनाट करण्यासाठी आदिलशाहीने अफझल खानावर मोठी जबाबदारी दिली होती. अफजल खानाबरोबर रणदुल्ला खान हा दुसरा सरदारही या मोहिमेत सहभागी होता. मात्र, तो शिवाजी महाराज समर्थक म्हणून ओळखला जात होता. आदिलशाहाच्या दरबारात छत्रपती शहाजीराजे यांच्याबरोबर रणदुल्ला खान होता. या दोघांमधील मैत्री आदिलशाहीसाठी डोकेदुखी होती. त्यामुळे रणदुल्ला खान या मोहिमेविषयी नाराज होते. हरेश्वर डोंगररांगेजवळ खानाची छावणी पडली होती. त्यावेळी ज्या छावणीत अन् जगताप-देशमुख या राजांच्या सैन्यात युद्ध झाले होते. याच ठिकाणी अफजल खानाने त्यांच्यावर विष प्रयोग करून रणदुल्ला खानला संपवून त्याची कबर बांधली. त्यानंतर अफजल खानाने पुढे वाईच्या दिशेने प्रयाण केले. मात्र माहूरचे जगताप आणि वाईचे पिसाळ-देशमुख यांनी येथेच वास्तव्य केले. रणदुल्ला खान यांच्या कबरीमुळे या गावाला ‘रणदुल्लाबाद’ नाव पडले असल्याचे ज्येष्ठ सांगतात. रणदुल्लाबाद येथे एकच मुस्लीम कुटुंब राहते. मात्र गावाचा सामाजिक व धार्मिक सलोखा निश्चितपणे वाखाण्ययाजोगा आहे. गावात एकही कूपनलिका नाही गावात हिंदू-मुस्लीम ऐक्य असून, मोहरम आणि ईद साजरी केली जाते. गावची लोकसंख्या सुमारे अडीच हजार आहे. पंधरा वर्षांत पाणलोट विकास कार्यक्रम राबवून गावाने उत्तर कोरेगाव तालुक्यात आदर्श निर्माण केला आहे. वीस वर्षांपासून गावात कूपनलिकांवर बंदी आहे. त्यामुळे एकही वैयक्तिक कूपनलिका नाही. याबाबत अशी बंदी घालणारे रणदुल्लाबाद हे जिल्ह्यातील एकमेव गाव आहे. रणदुल्ला खानाची गावात कबर रणदुल्लाबाद गावात मोघल सरदार रणदुल्ला खानाची कबर आहे. अफजल खानाने स्वराज्यावर स्वारी केली तेव्हा खानाबरोबर रणदुल्ला खानही होता. शिवाजी महाराज यांचा समर्थक असल्याचा संशय आल्यामुळे अफजल खानाने रणदुल्ला खानाला मारले आणि त्याची कबर बांधली.