शहरं
Join us  
Trending Stories
1
मोहसीन नक्वी यांनी अखेर टीम इंडियापुढे गुडघे टेकले... भारताचा मोठा विजय! बैठकीत काय घडलं?
2
'मला मंगळसूत्र चोर म्हणता, कितव्या बायकोचं मंगळसूत्र चोरलं ते सांगा'; पडळकरांची जयंत पाटील यांच्यावर टीका
3
ऑक्टोबर महिन्यात पाऊस आणखी झोडपणार, हवामान खात्याने दिली धडकी भरवणारी माहिती 
4
‘राहुल गांधींना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्यास कठोर शिक्षा करा, त्यांच्या सुरक्षेत वाढ करा’, काँग्रेसचं लोकसभा अध्यक्षांना पत्र  
5
ट्रम्प यांच्या निर्णयाचा भारताला फायदा; अमेरिकन कंपन्या भारतात शिफ्ट होण्याच्या तयारीत
6
ठाकरे बंधूंच्या युतीसंदर्भात संजय राऊतांचं सूचक विधान, दसऱ्याला...! स्पष्टच बोलले
7
पहलगाम हल्ल्यानंतर १६० दिवसांनी काश्मीरमधील 'ही' १२ पर्यटनस्थळे पुन्हा पर्यटकांसाठी खुली
8
सचिन तेंडुलकरसारखी मॅचविनर खेळी करून रायगड जिल्हयात पक्षाला बळ देऊ- सुनिल तटकरे
9
नागपूरमधील प्रकल्प इतर राज्यांकडे वळण्याच्या प्रयत्नात ? ८८४४ कोटींचे प्रकल्प जमिनीअभावी अडकले !
10
Maharashtra Flood: "ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होतेय, पण..."; CM फडणवीसांनी सांगितली निर्णय घेण्यातील अडचण
11
फायदाच फायदा...! गाजाच्या निर्मितीत भारताला मोठी संधी! पार पाडू शकतो महत्वाची भूमिका, असा आहे इस्रायलचा संपूर्ण प्लॅन?
12
भरधाव कारचा भीषण अपघातात! अनेक वेळा उलटल्यानं चुराडा, तरुणीही दूर फेकली गेली; बघा VIDEO
13
Omega Seiki: जगातील पहिली ड्रायव्हरलेस रिक्षा भारतात लॉन्च, एका चार्जवर १२० किमी धावणार!
14
महात्मा गांधींना शरण जाणे हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा वैचारिक पराभव; काँग्रेसचा खोचक टोला
15
पाकिस्तानात गेलं की ISI एजंट बनतं का? सोनम वांगचुक यांच्या पत्नीने हिंसाचारासाठी CRPF ला धरलं जबाबदार
16
गावात वास्तव्य, सायकलवरून प्रवास आणि..., असं आहे Arattaiचे संस्थापक श्रीधर वेंबू यांचं साधं राहणीमान
17
"आजकाल मुलांना वाढवणं कठीण...", मृण्मयी देशपांडेने व्यक्त केलं मत, पालकांबद्दल म्हणाली...
18
मोठी बातमी! दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात मदत पोहचणार; पुढच्या आठवड्यात घोषणा करू - CM देवेंद्र फडणवीस
19
Colab Platforms Stock Price: ७३ दिवसांपासून शेअरला लागतंय अपर सर्किट, वर्षभरात ८४२% ची वाढ; गुंतवणूकदार मालामाल
20
Motorola G35 5G: डॉल्बी साउंड असलेला मोटोरोलाचा 5G फोन ८,९९९ रुपयांत लॉन्च! 

मोघल सरदार रणदुल्ला खानाचे ‘रणदुल्लाबाद’

By admin | Updated: March 22, 2015 00:14 IST

सोळाव्या शतकातील साक्षीदार: ऐतिहासिक परंपरेसह धार्मिक सलोखा जपणारे गाव

कमलाकर खराडे, पिंपोडे बुद्रुक : हरेश्वराच्या डोंगरापासून चवणेश्वर डोंगर रांगेतील मध्यावर डोंगर पायथ्याला रणदुल्लाबाद हे गाव वसलेले आहे. या गावाला ऐतिहासिक पार्श्वभूमी असून, अफजल खानाच्या स्वराज्यावरील मोहिमेचे साक्षीदार असलेले हे गाव आहे. अफजल खानासोबत रणदुल्ला खान हा दुसरा सरदारही होता. तो शिवरायांचा समर्थक म्हणून ओळखला जात होता. त्यामुळे अफजल खानाने त्याला संपवून याठिकाणी त्याची कबर बांधली. तेव्हापासून या गावाला रणदुल्लाबाद नाव मिळाले. सोळाव्या शतकात अफजल खानाने स्वराज्यावर केलेल्या आक्रमणावेळी हे गाव अस्तित्वात नव्हते. स्वराज्य रक्षणासाठी शिवाजी महाराजांच्या मावळ्यांनी अफजल खानाच्या सैन्याचा या ठिकाणी सामना केला. त्यावेळी माहूर, ता. पुरंदर येथील जगताप बंधू अन् वाईचे पिसाळ-देशमुख या मराठा शिलेदारांवर शिवाजी महाराजांनी जबाबदारी दिली होती. लढाईनंतर जगताप अन् पिसाळ-देशमुखांनी या ठिकाणी वास्तव्य केले. यातूनच ‘रणदुल्लाबाद’ गाव वसले. या गावात जगतापांची घरे अधिक आहेत. छत्रपतींचा समूळ नायनाट करण्यासाठी आदिलशाहीने अफझल खानावर मोठी जबाबदारी दिली होती. अफजल खानाबरोबर रणदुल्ला खान हा दुसरा सरदारही या मोहिमेत सहभागी होता. मात्र, तो शिवाजी महाराज समर्थक म्हणून ओळखला जात होता. आदिलशाहाच्या दरबारात छत्रपती शहाजीराजे यांच्याबरोबर रणदुल्ला खान होता. या दोघांमधील मैत्री आदिलशाहीसाठी डोकेदुखी होती. त्यामुळे रणदुल्ला खान या मोहिमेविषयी नाराज होते. हरेश्वर डोंगररांगेजवळ खानाची छावणी पडली होती. त्यावेळी ज्या छावणीत अन् जगताप-देशमुख या राजांच्या सैन्यात युद्ध झाले होते. याच ठिकाणी अफजल खानाने त्यांच्यावर विष प्रयोग करून रणदुल्ला खानला संपवून त्याची कबर बांधली. त्यानंतर अफजल खानाने पुढे वाईच्या दिशेने प्रयाण केले. मात्र माहूरचे जगताप आणि वाईचे पिसाळ-देशमुख यांनी येथेच वास्तव्य केले. रणदुल्ला खान यांच्या कबरीमुळे या गावाला ‘रणदुल्लाबाद’ नाव पडले असल्याचे ज्येष्ठ सांगतात. रणदुल्लाबाद येथे एकच मुस्लीम कुटुंब राहते. मात्र गावाचा सामाजिक व धार्मिक सलोखा निश्चितपणे वाखाण्ययाजोगा आहे. गावात एकही कूपनलिका नाही गावात हिंदू-मुस्लीम ऐक्य असून, मोहरम आणि ईद साजरी केली जाते. गावची लोकसंख्या सुमारे अडीच हजार आहे. पंधरा वर्षांत पाणलोट विकास कार्यक्रम राबवून गावाने उत्तर कोरेगाव तालुक्यात आदर्श निर्माण केला आहे. वीस वर्षांपासून गावात कूपनलिकांवर बंदी आहे. त्यामुळे एकही वैयक्तिक कूपनलिका नाही. याबाबत अशी बंदी घालणारे रणदुल्लाबाद हे जिल्ह्यातील एकमेव गाव आहे. रणदुल्ला खानाची गावात कबर रणदुल्लाबाद गावात मोघल सरदार रणदुल्ला खानाची कबर आहे. अफजल खानाने स्वराज्यावर स्वारी केली तेव्हा खानाबरोबर रणदुल्ला खानही होता. शिवाजी महाराज यांचा समर्थक असल्याचा संशय आल्यामुळे अफजल खानाने रणदुल्ला खानाला मारले आणि त्याची कबर बांधली.