शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
3
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
4
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
5
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
6
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
7
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
8
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
9
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
10
T20 World Cup 2026: शुभमन गिलला का वगळलं? गंभीरला एअरपोर्टवर प्रश्न; काय मिळालं उत्तर?
11
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
12
वर्षाखेरीस IPO बाजारात 'धुमधडाका'! या आठवड्यात ११ नवीन कंपन्यांचे आगमन; गुंतवणुकीची मोठी संधी
13
चांदेकरवाडीत पाणंद रस्त्यावर लिंबू आणि बाहुली, अंधश्रद्धेचा प्रकार, ग्रामस्थांत भीतीची सावली
14
"मला मारताहेत, जबरदस्तीने काहीतरी खायला..."; विवाहितेचा ढसाढसा रडत आईला शेवटचा कॉल
15
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
16
Siddhi Vastre: अवघ्या २२ वर्षांची तरुणी भाजपवर पडली भारी; मोहोळमध्ये इतिहास घडवणारी सिद्धी वस्त्रे आहे तरी कोण?
17
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
18
Maharashtra Local Body Election Results 2025 : अख्खं मंत्रिमंडळ ईश्वरपुरात, तरीही जयंत पाटलांनी महायुतीला दिला धक्का; सांगली जिल्ह्यातील नगराध्यक्षांची यादी एका क्लिकवर
19
विमा घेताय? केवळ जाहिरातींवर जाऊ नका; 'या' ४ तांत्रिक गोष्टी तपासा, अन्यथा क्लेमवेळी होईल पश्चात्ताप!
20
उद्धवसेना-मनसे युतीची बोलणी संपली, संजय राऊतांनी दिली महत्त्वाची माहिती; "अजूनही ७२ तास..."
Daily Top 2Weekly Top 5

मोघल सरदार रणदुल्ला खानाचे ‘रणदुल्लाबाद’

By admin | Updated: March 22, 2015 00:14 IST

सोळाव्या शतकातील साक्षीदार: ऐतिहासिक परंपरेसह धार्मिक सलोखा जपणारे गाव

कमलाकर खराडे, पिंपोडे बुद्रुक : हरेश्वराच्या डोंगरापासून चवणेश्वर डोंगर रांगेतील मध्यावर डोंगर पायथ्याला रणदुल्लाबाद हे गाव वसलेले आहे. या गावाला ऐतिहासिक पार्श्वभूमी असून, अफजल खानाच्या स्वराज्यावरील मोहिमेचे साक्षीदार असलेले हे गाव आहे. अफजल खानासोबत रणदुल्ला खान हा दुसरा सरदारही होता. तो शिवरायांचा समर्थक म्हणून ओळखला जात होता. त्यामुळे अफजल खानाने त्याला संपवून याठिकाणी त्याची कबर बांधली. तेव्हापासून या गावाला रणदुल्लाबाद नाव मिळाले. सोळाव्या शतकात अफजल खानाने स्वराज्यावर केलेल्या आक्रमणावेळी हे गाव अस्तित्वात नव्हते. स्वराज्य रक्षणासाठी शिवाजी महाराजांच्या मावळ्यांनी अफजल खानाच्या सैन्याचा या ठिकाणी सामना केला. त्यावेळी माहूर, ता. पुरंदर येथील जगताप बंधू अन् वाईचे पिसाळ-देशमुख या मराठा शिलेदारांवर शिवाजी महाराजांनी जबाबदारी दिली होती. लढाईनंतर जगताप अन् पिसाळ-देशमुखांनी या ठिकाणी वास्तव्य केले. यातूनच ‘रणदुल्लाबाद’ गाव वसले. या गावात जगतापांची घरे अधिक आहेत. छत्रपतींचा समूळ नायनाट करण्यासाठी आदिलशाहीने अफझल खानावर मोठी जबाबदारी दिली होती. अफजल खानाबरोबर रणदुल्ला खान हा दुसरा सरदारही या मोहिमेत सहभागी होता. मात्र, तो शिवाजी महाराज समर्थक म्हणून ओळखला जात होता. आदिलशाहाच्या दरबारात छत्रपती शहाजीराजे यांच्याबरोबर रणदुल्ला खान होता. या दोघांमधील मैत्री आदिलशाहीसाठी डोकेदुखी होती. त्यामुळे रणदुल्ला खान या मोहिमेविषयी नाराज होते. हरेश्वर डोंगररांगेजवळ खानाची छावणी पडली होती. त्यावेळी ज्या छावणीत अन् जगताप-देशमुख या राजांच्या सैन्यात युद्ध झाले होते. याच ठिकाणी अफजल खानाने त्यांच्यावर विष प्रयोग करून रणदुल्ला खानला संपवून त्याची कबर बांधली. त्यानंतर अफजल खानाने पुढे वाईच्या दिशेने प्रयाण केले. मात्र माहूरचे जगताप आणि वाईचे पिसाळ-देशमुख यांनी येथेच वास्तव्य केले. रणदुल्ला खान यांच्या कबरीमुळे या गावाला ‘रणदुल्लाबाद’ नाव पडले असल्याचे ज्येष्ठ सांगतात. रणदुल्लाबाद येथे एकच मुस्लीम कुटुंब राहते. मात्र गावाचा सामाजिक व धार्मिक सलोखा निश्चितपणे वाखाण्ययाजोगा आहे. गावात एकही कूपनलिका नाही गावात हिंदू-मुस्लीम ऐक्य असून, मोहरम आणि ईद साजरी केली जाते. गावची लोकसंख्या सुमारे अडीच हजार आहे. पंधरा वर्षांत पाणलोट विकास कार्यक्रम राबवून गावाने उत्तर कोरेगाव तालुक्यात आदर्श निर्माण केला आहे. वीस वर्षांपासून गावात कूपनलिकांवर बंदी आहे. त्यामुळे एकही वैयक्तिक कूपनलिका नाही. याबाबत अशी बंदी घालणारे रणदुल्लाबाद हे जिल्ह्यातील एकमेव गाव आहे. रणदुल्ला खानाची गावात कबर रणदुल्लाबाद गावात मोघल सरदार रणदुल्ला खानाची कबर आहे. अफजल खानाने स्वराज्यावर स्वारी केली तेव्हा खानाबरोबर रणदुल्ला खानही होता. शिवाजी महाराज यांचा समर्थक असल्याचा संशय आल्यामुळे अफजल खानाने रणदुल्ला खानाला मारले आणि त्याची कबर बांधली.