शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
2
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
3
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
4
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी
5
बुलढाण्यात जळका भडंग नजिक एसटी बस उलटली; दिवसभरात किरकोळ अपघातांची मालिका सुरूच
6
जातनिहाय जनगणनेनंतर आता काँग्रेसचा आणखी मोठा डाव, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली अशी मागणी
7
केवळ युद्धाच्या नावानेच पाकिस्तानला भरलीय धडकी, बंद केले पीओकेतील 1000 हून अधिक मदरसे!
8
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...
9
भारतासाठी गुड न्यूज...! सीमेवर तणावाची स्थिती असतानाच मोठी मदत करणार अमेरिका; पाकिस्तानचं टेन्शन वाढणार!
10
"मुस्लिम आणि काश्मिरींविरोधात द्वेष पसरवू नका’’, पहलगाममध्ये हत्या झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीचं आवाहन
11
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
12
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...
13
सरकार जात विचारणार, पण एखाद्याने जात सांगितली नाही तर? याबाबत कायदा काय सांगतो  
14
RR vs MI : एक सेकंद बाकी असताना DRS घेतल्यामुळे वाचला; मग रोहितनं फिफ्टीसह नवा इतिहास रचला
15
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
16
IPL 2025: राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का! स्टार गोलंदाज दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर
17
Mumbai RTO: महिलेकडून आरटीओ कर्मचाऱ्याला मारहाण, कार्यालयातही तोडफोड; मुंबईतील घटना
18
"शरद पवारांना हिंदू धर्मालाच शरण यावं लागलं, स्वत:ची मुंज झाल्याचंही दाखवतील"; प्रकाश महाजन यांचा टोला
19
आईला डॉक्टरकडे नेण्यासाठी येणाऱ्या ड्रायव्हरच्या पडली प्रेमात, त्यानंतर घडलं भयानक... 
20
ट्रॉफी नसेल तर ६००-७०० धावा करुन उपयोग काय? रोहित शर्मानं विराटला टोमणा मारल्याची चर्चा, पण...

खासदार श्रीनिवास पाटील चचेगावातील शेतकऱ्यांच्या बांधावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2021 04:42 IST

नुकसानग्रस्त केळीच्या बागांची पाहणी पंचनामे करण्याचे अधिकाऱ्यांना आदेश लोकमत न्यूज नेटवर्क मलकापूर : चचेगावसह परिसरात चक्रीवादळासह पावसाने चांगलेच थैमान ...

नुकसानग्रस्त केळीच्या बागांची पाहणी

पंचनामे करण्याचे अधिकाऱ्यांना आदेश

लोकमत न्यूज नेटवर्क

मलकापूर : चचेगावसह परिसरात चक्रीवादळासह पावसाने चांगलेच थैमान घातले होते. हातातोंडाशी आलेल्या केळीच्या बागा भुईसपाट झाल्याने तीन शेतकऱ्यांचे सुमारे वीस लाखांवर नुकसान झाले आहे. या नुकसानग्रस्त बागांची खासदार श्रीनिवास पाटील आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी केली. यावेळी तातडीने पंचनामे करून जास्तीत जास्त नुकसान भरपाई देण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिले.

रविवारी जोरदार चक्रीवादळासह संततधार पावसाने हजेरी लावली होती. यावेळी आलेल्या सोसाट्याच्या वाऱ्यामुळे चचेगावातील केळीच्या बागांना चांगलाच फटका बसला होता. येथील विलास भीमराव पवार, साहेबराव नाना पवार, हनुमंत दाजी हुलवान यांची सात एकरमध्ये केळीची बाग आहे. पंधरा ते वीस दिवसांत ती केळी विक्रीयोग्य होणार होती. मात्र, रविवारच्या वादळी वाऱ्याने या केळीच्या बागांचे मोठे नुकसान केले आहे. हातातोंडाशी आलेल्या बागेतील केळीची झाडे वादळी वाऱ्याने मोडून पडली आहेत. या बागा उद्ध्वस्त झाल्यामुळे किमान २० लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. या नुकसानग्रस्त बागांची बुधवारी खासदार श्रीनिवास पाटील यांनी थेट शेतकऱ्यांच्या बांधावर हजेरी लावत, केळीच्या पडलेल्या बागेत जाऊन पाहणी केली. शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे पाहून तातडीने पंचनामे करून जास्तीत जास्त नुकसान भरपाई देण्याचे आदेश अधिकाऱ्यांना खासदार पाटील यांनी दिले. यावेळी पंचायत समिती सदस्य उत्तमराव पाटोल, तहसीलदार अमरदीप वाकडे, मंडल अधिकारी पंडित पाटील, तलाठी महादू राऊत, यांच्यासह अधिकारी व शेतकरी उपस्थित होते.

चौकट

खतांसह कीटकनाशकांच्या वाढत्या किमती चिंतेची बाब

खते, बी-बियाणे, कीटकनाशकांसह शेतीसाठी लागणाऱ्या कच्च्या मालाच्या किमती वाढल्यामुळे शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च वाढून उत्पन्नात घट होते. उत्पादनवाढीसाठी मोकळ्या हाताने कमी किमतीत खते व कीटकनाशके द्यावीत. शीतगृह उभारावीत. शेतकऱ्यांच्या मालाचा उठाव होईल अशा योग्य बाजारपेठा उपलब्ध कराव्यात. योग्य साधने उपलब्ध झाल्यास शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढेल, असे मत खासदार पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले.

कोट

शेतकरी हीच एक मोठी बाजारपेठ आणि शेतकरीच सर्वांत मोठा ग्राहक आहे. अशी दुहेरी भूमिका बजावणाऱ्यांच्या खिशात पैसा आला तरच इतर सर्व उद्योग व्यवसाय चालतात आणि अर्थव्यवस्था हालती राहते. शेतकऱ्यांचे नुकसान झाले की बाजारपेठेचेही नुकसान होते. त्यामुळे शेतकऱ्यांना तातडीने नुकसानभरपाई देण्याची गरज आहे.

श्रीनिवास पाटील

खासदार, सातारा

===Photopath===

190521\img-20210519-wa0030.jpg

===Caption===

फोटो कॕप्शन

चचेगांव ता. कराड येथील नुकसानग्रस्त केळीच्या बांगाची खासदार श्रीनिवास पाटील यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पहाणी केली. ( छाया- माणिक डोंगरे)

फोटो कॕप्शन

चचेगांव ता. कराड येथील नुकसानग्रस्त केळीच्या बांगाची खासदार श्रीनिवास पाटील यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पहाणी केली. ( छाया- माणिक डोंगरे)