शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर, ट्रम्प टॅरिफ मुद्द्यांवर विरोधक आक्रमक, आजपासून संसद अधिवेशन; सर्व मुद्द्यांवर चर्चेस सरकार तयार
2
उड्डाण करताच डाव्या बाजूचं इंजिन पेटलं; आगीमुळे बोईंगचे इमर्जन्सी लँडिंग
3
Latur: मारहाणीनंतर ‘छावा’चे कार्यकर्ते रात्री उशिरा रस्त्यावर; राष्ट्रवादीचे बॅनर फाडले
4
योगींचा दिल्ली दौरा अन् प्रदेशाध्यक्ष निवडीची चर्चा; ओबीसी चेहरा किंवा महिला नेत्याची होऊ शकते निवड
5
प्रचंड उष्म्यामुळे विद्यार्थ्यांच्या शालेय शिक्षणावर होतोय परिणाम, दीड वर्षांपर्यंत होऊ शकते घट
6
जगातील कोणीही भारताला आदेश देऊ शकत नाही, ट्रम्प यांचा दावा अन् उपरराष्ट्रपतींचे खडेबोल
7
इस्रायल की सशस्त्र टोळ्यांचा हल्ला? गाझामध्ये मदतीची प्रतीक्षा करणाऱ्यांवरच गोळीबार, ७३ जण ठार
8
तरुणांना भाषणबाजी नको, रोजगार हवा! राहुल गांधी यांनी व्यक्त केली चिंता
9
कोकाटेंचा राजीनामा मागितला, तटकरेंना निवेदन देत पत्ते फेकले, छावा आणि अजितदादांच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा
10
"आमच्या निवेदनाला लाथाबुक्क्यांनी उत्तर देत असाल तर…’’, विजय घाडगे यांची संतप्त प्रतिक्रिया 
11
ऑपरेशन सिंदूरवेळी जीव धोक्यात घालून केली जवानांना मदत, आता लष्कराने १० वर्षांच्या मुलाला दिलं मोठं बक्षीस
12
"माणिकराव कोकाटे यांचा 'तो' व्हिडीओ AIच्या मदतीनं, मी स्वतः..."; भाजप आमदाराचा दावा
13
राजस्थानात मुसळधार पाऊस, अजमेरमध्ये तरुण वाहून जाता-जाता बचावला; असा वाचला जीव, बघा VIDEO
14
प्रवेश करताच लिफ्ट बंद, प्रवीण दरेकरांसह १७ जण अडकले, १० मिनिटं चालला थरार, अखेर दरवाजा तोडून केली सुटका
15
मांत्रिकाकडून पूजा केली, खड्डा खणला, तेवढ्यात आले पोलीस, गुप्तधन शोधताना पाच जणांना अटक
16
416%नं वाढला कंपनीचा नफा, आता शेअर खरेदीसाठी लोकांची झुंबड; ₹40 पेक्षाही कमी आहे किंमत!
17
हरीण बिथरले, महामार्गावरून सैरावैरा पळत सुटले, पुलावरून मारली उडी, झाला करुण अंत
18
असंवेदनशिल कृषीमंत्री कोकाटेंचा राजीनामा घ्या; विधान परिषदेतील विरोधीपक्षनेते अंबादास दानवे यांची मागणी
19
जम्मू-काश्मीरच्या किश्तवाडमध्ये चकमक, जैश-ए-मोहम्मदचे दहशतवादी लपल्याचा संशय
20
इंडोनेशियात प्रवासी बोटीला भीषण आग; प्रवाशांनी समुद्रात मारल्या उड्या...

खासदार श्रीनिवास पाटील चचेगावातील शेतकऱ्यांच्या बांधावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2021 04:42 IST

नुकसानग्रस्त केळीच्या बागांची पाहणी पंचनामे करण्याचे अधिकाऱ्यांना आदेश लोकमत न्यूज नेटवर्क मलकापूर : चचेगावसह परिसरात चक्रीवादळासह पावसाने चांगलेच थैमान ...

नुकसानग्रस्त केळीच्या बागांची पाहणी

पंचनामे करण्याचे अधिकाऱ्यांना आदेश

लोकमत न्यूज नेटवर्क

मलकापूर : चचेगावसह परिसरात चक्रीवादळासह पावसाने चांगलेच थैमान घातले होते. हातातोंडाशी आलेल्या केळीच्या बागा भुईसपाट झाल्याने तीन शेतकऱ्यांचे सुमारे वीस लाखांवर नुकसान झाले आहे. या नुकसानग्रस्त बागांची खासदार श्रीनिवास पाटील आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी केली. यावेळी तातडीने पंचनामे करून जास्तीत जास्त नुकसान भरपाई देण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिले.

रविवारी जोरदार चक्रीवादळासह संततधार पावसाने हजेरी लावली होती. यावेळी आलेल्या सोसाट्याच्या वाऱ्यामुळे चचेगावातील केळीच्या बागांना चांगलाच फटका बसला होता. येथील विलास भीमराव पवार, साहेबराव नाना पवार, हनुमंत दाजी हुलवान यांची सात एकरमध्ये केळीची बाग आहे. पंधरा ते वीस दिवसांत ती केळी विक्रीयोग्य होणार होती. मात्र, रविवारच्या वादळी वाऱ्याने या केळीच्या बागांचे मोठे नुकसान केले आहे. हातातोंडाशी आलेल्या बागेतील केळीची झाडे वादळी वाऱ्याने मोडून पडली आहेत. या बागा उद्ध्वस्त झाल्यामुळे किमान २० लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. या नुकसानग्रस्त बागांची बुधवारी खासदार श्रीनिवास पाटील यांनी थेट शेतकऱ्यांच्या बांधावर हजेरी लावत, केळीच्या पडलेल्या बागेत जाऊन पाहणी केली. शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे पाहून तातडीने पंचनामे करून जास्तीत जास्त नुकसान भरपाई देण्याचे आदेश अधिकाऱ्यांना खासदार पाटील यांनी दिले. यावेळी पंचायत समिती सदस्य उत्तमराव पाटोल, तहसीलदार अमरदीप वाकडे, मंडल अधिकारी पंडित पाटील, तलाठी महादू राऊत, यांच्यासह अधिकारी व शेतकरी उपस्थित होते.

चौकट

खतांसह कीटकनाशकांच्या वाढत्या किमती चिंतेची बाब

खते, बी-बियाणे, कीटकनाशकांसह शेतीसाठी लागणाऱ्या कच्च्या मालाच्या किमती वाढल्यामुळे शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च वाढून उत्पन्नात घट होते. उत्पादनवाढीसाठी मोकळ्या हाताने कमी किमतीत खते व कीटकनाशके द्यावीत. शीतगृह उभारावीत. शेतकऱ्यांच्या मालाचा उठाव होईल अशा योग्य बाजारपेठा उपलब्ध कराव्यात. योग्य साधने उपलब्ध झाल्यास शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढेल, असे मत खासदार पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले.

कोट

शेतकरी हीच एक मोठी बाजारपेठ आणि शेतकरीच सर्वांत मोठा ग्राहक आहे. अशी दुहेरी भूमिका बजावणाऱ्यांच्या खिशात पैसा आला तरच इतर सर्व उद्योग व्यवसाय चालतात आणि अर्थव्यवस्था हालती राहते. शेतकऱ्यांचे नुकसान झाले की बाजारपेठेचेही नुकसान होते. त्यामुळे शेतकऱ्यांना तातडीने नुकसानभरपाई देण्याची गरज आहे.

श्रीनिवास पाटील

खासदार, सातारा

===Photopath===

190521\img-20210519-wa0030.jpg

===Caption===

फोटो कॕप्शन

चचेगांव ता. कराड येथील नुकसानग्रस्त केळीच्या बांगाची खासदार श्रीनिवास पाटील यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पहाणी केली. ( छाया- माणिक डोंगरे)

फोटो कॕप्शन

चचेगांव ता. कराड येथील नुकसानग्रस्त केळीच्या बांगाची खासदार श्रीनिवास पाटील यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पहाणी केली. ( छाया- माणिक डोंगरे)