शहरं
Join us  
Trending Stories
1
शिवसेना पक्ष, चिन्हाचा खटला पुन्हा लांबणीवर; अंतिम सुनावणीसाठी पुढील तारीख, कोर्टात आज काय घडलं?
2
भारत डिजिटल तंत्रज्ञानाचा 'पॉवरहाऊस', ‘Make in India’ची खिल्ली उडवणाऱ्यांना PM मोदींचे उत्तर
3
Google भारतात करणार ८८,७०० कोटींची गुंतवणूक, 'या' राज्यात उभं राहणार आशियातील सर्वात मोठं डेटा सेंटर
4
म्यानमारमध्ये धार्मिक कार्यक्रमादरम्यान पॅराग्लायडरने बॉम्ब हल्ला; २४ जणांचा मृत्यू, ४७ जखमी
5
Nashik Crime: कंटाळलो होतो म्हणून आईची हत्या केली, पोटच्या मुलानेच घेतला जीव; पोलिसही हादरले
6
अक्कलकोट हेच गाणगापूर! स्वामी देतात नृसिंह सरस्वती स्वरुपात दर्शन, पुजारी होतात नतमस्तक
7
सैफ अली खानची एक्स पत्नी अमृता सिंहसोबत कसं होतं नातं? बहीण सोहा म्हणाली, "आम्ही दोघी..."
8
भारत-पाकिस्तान यांच्यात पुन्हा युद्धाचे सावट?; पाक संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांची पोकळ धमकी
9
८४ वर्षांनी नवपंचम नीचभंग राजयोग: ८ राशींचे कल्याण, सरकारी लाभ; पद-पैसा-प्रतिष्ठा, शुभ-मंगल!
10
धक्कादायक! राजस्थानमध्ये प्राणघातक गोळ्या! नमुने फेल झाले होते तरीही हजारो गोळ्या विकल्या
11
सोने-चांदीच्या किमतीचा फुगा फुटणार? भाव ₹१.२२ लाखांवरून थेट ₹७७,७०० पर्यंत कोसळणार? कोणी दिला इशारा
12
टाटा कॅपिटल आणि एलजी इलेक्ट्रॉनिक्सच्या IPO मध्ये चढाओढ; कोणाची किती मागणी, तुम्ही गुंतवणूक केलीये का?
13
वस्ताद द्रविडचं नाव घेत रोहित शर्मानं ठोकला गंभीरविरोधात शड्डू! शेअर केली यशामागची खरी गोष्ट
14
भारतात येणासाठी फ्लाइटमध्ये प्रवेश करताच ब्रिटिश PM स्टार्मर म्हणाले, 'मी तुमचा पंतप्रधान बोलतोय...!'; जाणून घ्या नेमकं काय घडलं
15
VIRAL : ७ वर्षांपूर्वी झोमॅटोवर किती रुपयांना मिळायचा पनीर टिक्का? बील होतंय व्हायरल; आकडा पाहून विश्वासच बसणार नाही!
16
"नवरा मेल्याचा पश्चाताप नाही, ४ मुलांच्या मृत्यूचं दुःख"; काय म्हणाली बॉयफ्रेंडसोबत पळालेली महिला?
17
मुंबईत दाऊदच्या जवळच्या माणसाभोवती ईडीने फास आवळला, सलीम डोलाच्या ८ ठिकाणांवर धाडी
18
आता चष्म्याद्वारेही UPI पेमेंट करता येणार; मोबाईल फोनची गरजच भासणार नाही, पाहा डिटेल्स
19
'खेलने का बहुत शॉक था उसे, फिर मैने भी सिखा दिया...!' निक्की तांबोळीचा धनश्री वर्मावर निशाणा
20
Cough Syrup : पालकांनो अलर्ट! लहान मुलांना कधी, कसं, किती द्यावं कफ सिरप? AIIMS च्या डॉक्टरांचा मोलाचा सल्ला

खासदार दिल्लीतून थेट साताऱ्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2021 04:39 IST

कऱ्हाड : लोकसभेच्या पावसाळी अधिवेशनासाठी दिल्ली येथे गेलेल्या खासदार श्रीनिवास पाटील यांनी शनिवारी पहाटेचे विमान पकडून सातारा गाठले. अतिवृष्टीमुळे ...

कऱ्हाड : लोकसभेच्या पावसाळी अधिवेशनासाठी दिल्ली येथे गेलेल्या खासदार श्रीनिवास पाटील यांनी शनिवारी पहाटेचे विमान पकडून सातारा गाठले. अतिवृष्टीमुळे जिल्ह्यात अभूतपूर्व परिस्थिती निर्माण झाली असल्याने त्यांनी महाबळेश्वर, वाई, कऱ्हाड तालुक्यांमधील बाधित ठिकाणी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली.

अतिवृष्टी व पूरस्थितीमुळे जिल्ह्यात मोठी हानी झाली आहे. काही ठिकाणी दरडी कोसळल्याने अनेकजण दगावले आहेत. शेतीसह रस्ते, पुलांचे मोठे नुकसान झाले आहे. या ओढवलेल्या परिस्थितीचे गंभीर स्वरूप पाहता खासदार श्रीनिवास पाटील हे दिल्लीहून थेट साताऱ्यात आले. सध्या लोकसभेचे पावसाळी अधिवेशन सुरू असून, खासदार पाटील हे दिल्ली येथे अधिवेशनाला उपस्थित राहिले होते. तेथून मुसळधार पावसामुळे साताऱ्यातील परिस्थिती पाहून ते जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्याशी संपर्क ठेवून परिस्थितीचा आढावा घेत होते. मात्र, नागरिकांवर ओढवलेल्या बिकट प्रसंगामुळे त्यांनी शनिवार, दि. २४ रोजी पहाटेचे विमान पकडून पुणेमार्गे सातारा गाठले. साताऱ्यात आल्यानंतर महाबळेश्वर, वाई, कऱ्हाड तालुक्यांमधील बाधित गावांना भेट दिली.

महाबळेश्वर येथे आमदार मकरंद पाटील यांनी बोलावलेल्या बैठकीला उपस्थित राहात तालुक्यातील जीवितहानी व मालमत्तेच्या झालेल्या नुकसानाचा त्यांनी आढावा घेतला. महाबळेश्वर तालुक्यातील बरेच रस्ते व पूल वाहून गेल्याने अनेक गावे संपर्कहीन झाली आहेत. हे रस्ते दुरुस्त करावेत, गावांशी लवकर संपर्क साधावा, लोकांपर्यंत पोहोचावे. वीज पुरवठा तातडीने सुरळीत करावा, आरोग्य सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, रेशनिंग व्यवस्था सुरळीत करावी, अशा सूचना यावेळी त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. यावेळी आमदार मकरंद पाटील, प्रांताधिकारी संगीता राजापूरकर, तहसीलदार सुषमा चौधरी, बाळासाहेब भिलारे, उपनगराध्यक्ष अफजल सुतार, राजूशेठ राजापुरे, प्रवीण भिलारे, किसन शिंदे, गटविकास अधिकारी घोलप आदी उपस्थित होते.

वाई तालुक्यातील कोंढावळे-देवरुखवाडी, मेणवली, आभेपुरी, जांभळी व कऱ्हाड तालुक्यातील पाली येथे भेट देऊन खासदार पाटील यांनी नुकसान झालेल्या परिसराची पाहणी केली. तसेच संकटात सापडलेल्या नागरिकांना मदतीचे आश्वासन देऊन पिकांचे व घराच्या झालेल्या नुकसानाचे पंचनामे करून शासनाकडून मदत मिळवून दिली जाईल, असे आश्वासन दिले.

फोटो : २६ केआरडी ०१

कॅप्शन : वाई तालुक्यातील नुकसानाची खासदार श्रीनिवास पाटील यांनी पाहणी करून अधिकाऱ्यांना सूचना दिल्या.