शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

खासदार दिल्लीतून थेट साताऱ्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2021 04:39 IST

कऱ्हाड : लोकसभेच्या पावसाळी अधिवेशनासाठी दिल्ली येथे गेलेल्या खासदार श्रीनिवास पाटील यांनी शनिवारी पहाटेचे विमान पकडून सातारा गाठले. अतिवृष्टीमुळे ...

कऱ्हाड : लोकसभेच्या पावसाळी अधिवेशनासाठी दिल्ली येथे गेलेल्या खासदार श्रीनिवास पाटील यांनी शनिवारी पहाटेचे विमान पकडून सातारा गाठले. अतिवृष्टीमुळे जिल्ह्यात अभूतपूर्व परिस्थिती निर्माण झाली असल्याने त्यांनी महाबळेश्वर, वाई, कऱ्हाड तालुक्यांमधील बाधित ठिकाणी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली.

अतिवृष्टी व पूरस्थितीमुळे जिल्ह्यात मोठी हानी झाली आहे. काही ठिकाणी दरडी कोसळल्याने अनेकजण दगावले आहेत. शेतीसह रस्ते, पुलांचे मोठे नुकसान झाले आहे. या ओढवलेल्या परिस्थितीचे गंभीर स्वरूप पाहता खासदार श्रीनिवास पाटील हे दिल्लीहून थेट साताऱ्यात आले. सध्या लोकसभेचे पावसाळी अधिवेशन सुरू असून, खासदार पाटील हे दिल्ली येथे अधिवेशनाला उपस्थित राहिले होते. तेथून मुसळधार पावसामुळे साताऱ्यातील परिस्थिती पाहून ते जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्याशी संपर्क ठेवून परिस्थितीचा आढावा घेत होते. मात्र, नागरिकांवर ओढवलेल्या बिकट प्रसंगामुळे त्यांनी शनिवार, दि. २४ रोजी पहाटेचे विमान पकडून पुणेमार्गे सातारा गाठले. साताऱ्यात आल्यानंतर महाबळेश्वर, वाई, कऱ्हाड तालुक्यांमधील बाधित गावांना भेट दिली.

महाबळेश्वर येथे आमदार मकरंद पाटील यांनी बोलावलेल्या बैठकीला उपस्थित राहात तालुक्यातील जीवितहानी व मालमत्तेच्या झालेल्या नुकसानाचा त्यांनी आढावा घेतला. महाबळेश्वर तालुक्यातील बरेच रस्ते व पूल वाहून गेल्याने अनेक गावे संपर्कहीन झाली आहेत. हे रस्ते दुरुस्त करावेत, गावांशी लवकर संपर्क साधावा, लोकांपर्यंत पोहोचावे. वीज पुरवठा तातडीने सुरळीत करावा, आरोग्य सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, रेशनिंग व्यवस्था सुरळीत करावी, अशा सूचना यावेळी त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. यावेळी आमदार मकरंद पाटील, प्रांताधिकारी संगीता राजापूरकर, तहसीलदार सुषमा चौधरी, बाळासाहेब भिलारे, उपनगराध्यक्ष अफजल सुतार, राजूशेठ राजापुरे, प्रवीण भिलारे, किसन शिंदे, गटविकास अधिकारी घोलप आदी उपस्थित होते.

वाई तालुक्यातील कोंढावळे-देवरुखवाडी, मेणवली, आभेपुरी, जांभळी व कऱ्हाड तालुक्यातील पाली येथे भेट देऊन खासदार पाटील यांनी नुकसान झालेल्या परिसराची पाहणी केली. तसेच संकटात सापडलेल्या नागरिकांना मदतीचे आश्वासन देऊन पिकांचे व घराच्या झालेल्या नुकसानाचे पंचनामे करून शासनाकडून मदत मिळवून दिली जाईल, असे आश्वासन दिले.

फोटो : २६ केआरडी ०१

कॅप्शन : वाई तालुक्यातील नुकसानाची खासदार श्रीनिवास पाटील यांनी पाहणी करून अधिकाऱ्यांना सूचना दिल्या.