शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
4
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
5
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
6
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
7
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
8
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
9
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
10
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
11
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
12
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
13
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
14
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
15
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या
16
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
17
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
18
नाशिक: मुलासोबत ट्रेकिंगला गेले अन् पांडव लेणीच्या डोंगरावर अडकले; नंतर...
19
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
20
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!

खासदार, पंतप्रधान व्हा; पण वाटोळं करू नका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2018 22:55 IST

आदर्की : ‘आमचे आजोबा मालोजीराजे यांनी फलटण तालुक्यात ‘एक कालवा आणला मी एक पूर्ण करून दुसरा पूर्ण करण्याचा प्रयत्न करून विकासाचे राजकारण करणार आहे. सकाळी एकाकडे, दुपारी दुसरीकडे तर रात्री तिसरीकडे असलेल्यांच्या नादी लागत नाही. खासदारकी लढवायची असेल त्यांनी लढवावी, पंतप्रधान व्हा; पण विकास करा वाटोळे करू नका,’ असे टीका ...

आदर्की : ‘आमचे आजोबा मालोजीराजे यांनी फलटण तालुक्यात ‘एक कालवा आणला मी एक पूर्ण करून दुसरा पूर्ण करण्याचा प्रयत्न करून विकासाचे राजकारण करणार आहे. सकाळी एकाकडे, दुपारी दुसरीकडे तर रात्री तिसरीकडे असलेल्यांच्या नादी लागत नाही. खासदारकी लढवायची असेल त्यांनी लढवावी, पंतप्रधान व्हा; पण विकास करा वाटोळे करू नका,’ असे टीका विधान परिषद सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी खासदार उदयनराजे यांचे नाव न घेता केली.आळजापूर येथे संतकृपा उद्योग समूह व आळजापूर ग्रामस्थ यांच्या वतीने रामराजे नाईक-निंबाळकर यांचा सत्कार करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी आमदार दीपक चव्हाण होते. यावेळी पंचायत समितीच्या सभापती रेश्मा भोसले, जिल्हा परिषद सदस्य दत्ता उर्फ धैर्यशील अनपट, मंगेश धुमाळ, सुभाषराव धुमाळ, डी. के. पवार, संतकृपा उद्योग समूहाचे प्रमुख व राष्ट्रवादी फलटण तालुकाध्यक्ष विलासराव नलवडे, भैरवनाथ उदयोग समूहाचे प्रमुख बाळासाहेब कासार, पंचायत समिती सदस्य प्रतिभा धुमाळ, विश्वासराव धुमाळ, अप्पासाहेब नलवडे, पोलीस पाटील शंकरराव पाटील, सरपंच अनिता मसुगडे उपस्थित होत्या.रामराजे म्हणाले, ‘तालुक्यातील दुष्काळग्रस्त जनता सुखी व्हावी, म्हणून मी २५ वर्षे काम करीत आहे. गेल्या तीन वर्षांत शेती व दूध व्यवसाय मोडीत काढण्याचे काम सरकार करीत आहे. तालुक्यात धोम-बलकवडीचे पाणी आले; पण सर्वांनी उसाची लागण केली. त्याप्रमाणात साखर कारखाने वाढले. न्यू शुगर वर्क साखरवाडी कारखाना अडचणीत आला. तो बाहेर काढण्याचे काम करणार आहे. तालुक्यात शरयू, श्रीराम, न्यू फलटण कारखाने व त्याबरोबर उपळवे येथे कारखाना आहे; पण त्याला ऊस घातला तर पैसे मिळतात का, ते बघा विचार करून ऊस घाला.’समाजसेवक चंद्रकांत बोबडे, माजी सभापती शरद भोईटे, जितोबा भोईटे, सोसायटीचे उपाध्यक्ष अप्पासाहेब नलवडे, मारुती कुंभार, मारुती खुडे, बाळासाहेब नलवडे, नीलेश नलवडे, चांदभाई पठाण, उदय निंबाळकर, विलासराव धुमाळ, अनिल भोईटे, विशाल झणझणे, शुभम नलवडे, राजाराम पवार, अंकुश नलवडे, महेंद्र्र धुमाळ, दीपक कदम, मारुती रणदिवे, जयवंत केजळे, दादा खताळ उपस्थित होते. विलासराव नलवडे यांनी स्वागत केले. माजी उपसरपंच नितीन नलवडे यांनी प्रास्ताविक केले.यावेळी आदर्की, आळजापूर परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.