शहरं
Join us  
Trending Stories
1
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
2
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
3
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
4
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
5
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
6
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
7
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
8
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
9
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
10
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
11
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
12
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
13
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
14
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
15
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
16
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
17
iPhone 16: पहिल्यांदाच आयफोन १६ च्या खरेदीवर एवढी मोठी सूट!
18
भारत रशियाला युक्रेनविरुद्ध युद्धासाठी अप्रत्यक्षपणे निधी पुरवतोय, अमेरिकेचा आरोप!
19
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
20
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित

खासदार, पंतप्रधान व्हा; पण वाटोळं करू नका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2018 22:55 IST

आदर्की : ‘आमचे आजोबा मालोजीराजे यांनी फलटण तालुक्यात ‘एक कालवा आणला मी एक पूर्ण करून दुसरा पूर्ण करण्याचा प्रयत्न करून विकासाचे राजकारण करणार आहे. सकाळी एकाकडे, दुपारी दुसरीकडे तर रात्री तिसरीकडे असलेल्यांच्या नादी लागत नाही. खासदारकी लढवायची असेल त्यांनी लढवावी, पंतप्रधान व्हा; पण विकास करा वाटोळे करू नका,’ असे टीका ...

आदर्की : ‘आमचे आजोबा मालोजीराजे यांनी फलटण तालुक्यात ‘एक कालवा आणला मी एक पूर्ण करून दुसरा पूर्ण करण्याचा प्रयत्न करून विकासाचे राजकारण करणार आहे. सकाळी एकाकडे, दुपारी दुसरीकडे तर रात्री तिसरीकडे असलेल्यांच्या नादी लागत नाही. खासदारकी लढवायची असेल त्यांनी लढवावी, पंतप्रधान व्हा; पण विकास करा वाटोळे करू नका,’ असे टीका विधान परिषद सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी खासदार उदयनराजे यांचे नाव न घेता केली.आळजापूर येथे संतकृपा उद्योग समूह व आळजापूर ग्रामस्थ यांच्या वतीने रामराजे नाईक-निंबाळकर यांचा सत्कार करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी आमदार दीपक चव्हाण होते. यावेळी पंचायत समितीच्या सभापती रेश्मा भोसले, जिल्हा परिषद सदस्य दत्ता उर्फ धैर्यशील अनपट, मंगेश धुमाळ, सुभाषराव धुमाळ, डी. के. पवार, संतकृपा उद्योग समूहाचे प्रमुख व राष्ट्रवादी फलटण तालुकाध्यक्ष विलासराव नलवडे, भैरवनाथ उदयोग समूहाचे प्रमुख बाळासाहेब कासार, पंचायत समिती सदस्य प्रतिभा धुमाळ, विश्वासराव धुमाळ, अप्पासाहेब नलवडे, पोलीस पाटील शंकरराव पाटील, सरपंच अनिता मसुगडे उपस्थित होत्या.रामराजे म्हणाले, ‘तालुक्यातील दुष्काळग्रस्त जनता सुखी व्हावी, म्हणून मी २५ वर्षे काम करीत आहे. गेल्या तीन वर्षांत शेती व दूध व्यवसाय मोडीत काढण्याचे काम सरकार करीत आहे. तालुक्यात धोम-बलकवडीचे पाणी आले; पण सर्वांनी उसाची लागण केली. त्याप्रमाणात साखर कारखाने वाढले. न्यू शुगर वर्क साखरवाडी कारखाना अडचणीत आला. तो बाहेर काढण्याचे काम करणार आहे. तालुक्यात शरयू, श्रीराम, न्यू फलटण कारखाने व त्याबरोबर उपळवे येथे कारखाना आहे; पण त्याला ऊस घातला तर पैसे मिळतात का, ते बघा विचार करून ऊस घाला.’समाजसेवक चंद्रकांत बोबडे, माजी सभापती शरद भोईटे, जितोबा भोईटे, सोसायटीचे उपाध्यक्ष अप्पासाहेब नलवडे, मारुती कुंभार, मारुती खुडे, बाळासाहेब नलवडे, नीलेश नलवडे, चांदभाई पठाण, उदय निंबाळकर, विलासराव धुमाळ, अनिल भोईटे, विशाल झणझणे, शुभम नलवडे, राजाराम पवार, अंकुश नलवडे, महेंद्र्र धुमाळ, दीपक कदम, मारुती रणदिवे, जयवंत केजळे, दादा खताळ उपस्थित होते. विलासराव नलवडे यांनी स्वागत केले. माजी उपसरपंच नितीन नलवडे यांनी प्रास्ताविक केले.यावेळी आदर्की, आळजापूर परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.