शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
2
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
3
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
4
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
5
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
6
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
7
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
8
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
9
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
10
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
11
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
12
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?
13
Air India Plane Crash: ज्या आगीत जिवंत माणसांची झाली राख, त्यात एकच मानवी अवयव वाचला
14
दिवसभर खुर्चीवर बसून वाढतंय वजन? ३०-३०-३० नियमाची जादू, लठ्ठपणाला कराल बाय-बाय
15
अ‍ॅमेझॉनवर १६ जूनला अवघ्या १६ रुपयांना स्मार्टवॉच वाटली जाणार; कुपन कोड अन् वेळ लक्षात ठेवा...
16
"जर इस्त्रायलची साथ दिली तर..."; संतापलेल्या इराणचा पाश्चात्य देशांना मोठा इशारा
17
ऐन पेरणीत शेतकरी कुटुंबांवर संकट! वीज कोसळून दोन सख्ख्या भावांसह चार शेतकऱ्यांचा मृत्यू
18
अहमदाबाद प्लेन क्रॅशसंदर्भात बाबा रामदेव यांना वेगळाच संशय, स्पष्टच बोलले! केली मोठी मागणी
19
Maharashtra Rain Alert: कोकणाला रेड अलर्ट! मुंबई-ठाण्यासह 'या' जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा
20
Tarot Card: कष्ट करावे लागतील, तडकाफडकी कोणतेही निर्णय घेऊ नका; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य!

खासदार, पंतप्रधान व्हा; पण वाटोळं करू नका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2018 22:55 IST

आदर्की : ‘आमचे आजोबा मालोजीराजे यांनी फलटण तालुक्यात ‘एक कालवा आणला मी एक पूर्ण करून दुसरा पूर्ण करण्याचा प्रयत्न करून विकासाचे राजकारण करणार आहे. सकाळी एकाकडे, दुपारी दुसरीकडे तर रात्री तिसरीकडे असलेल्यांच्या नादी लागत नाही. खासदारकी लढवायची असेल त्यांनी लढवावी, पंतप्रधान व्हा; पण विकास करा वाटोळे करू नका,’ असे टीका ...

आदर्की : ‘आमचे आजोबा मालोजीराजे यांनी फलटण तालुक्यात ‘एक कालवा आणला मी एक पूर्ण करून दुसरा पूर्ण करण्याचा प्रयत्न करून विकासाचे राजकारण करणार आहे. सकाळी एकाकडे, दुपारी दुसरीकडे तर रात्री तिसरीकडे असलेल्यांच्या नादी लागत नाही. खासदारकी लढवायची असेल त्यांनी लढवावी, पंतप्रधान व्हा; पण विकास करा वाटोळे करू नका,’ असे टीका विधान परिषद सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी खासदार उदयनराजे यांचे नाव न घेता केली.आळजापूर येथे संतकृपा उद्योग समूह व आळजापूर ग्रामस्थ यांच्या वतीने रामराजे नाईक-निंबाळकर यांचा सत्कार करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी आमदार दीपक चव्हाण होते. यावेळी पंचायत समितीच्या सभापती रेश्मा भोसले, जिल्हा परिषद सदस्य दत्ता उर्फ धैर्यशील अनपट, मंगेश धुमाळ, सुभाषराव धुमाळ, डी. के. पवार, संतकृपा उद्योग समूहाचे प्रमुख व राष्ट्रवादी फलटण तालुकाध्यक्ष विलासराव नलवडे, भैरवनाथ उदयोग समूहाचे प्रमुख बाळासाहेब कासार, पंचायत समिती सदस्य प्रतिभा धुमाळ, विश्वासराव धुमाळ, अप्पासाहेब नलवडे, पोलीस पाटील शंकरराव पाटील, सरपंच अनिता मसुगडे उपस्थित होत्या.रामराजे म्हणाले, ‘तालुक्यातील दुष्काळग्रस्त जनता सुखी व्हावी, म्हणून मी २५ वर्षे काम करीत आहे. गेल्या तीन वर्षांत शेती व दूध व्यवसाय मोडीत काढण्याचे काम सरकार करीत आहे. तालुक्यात धोम-बलकवडीचे पाणी आले; पण सर्वांनी उसाची लागण केली. त्याप्रमाणात साखर कारखाने वाढले. न्यू शुगर वर्क साखरवाडी कारखाना अडचणीत आला. तो बाहेर काढण्याचे काम करणार आहे. तालुक्यात शरयू, श्रीराम, न्यू फलटण कारखाने व त्याबरोबर उपळवे येथे कारखाना आहे; पण त्याला ऊस घातला तर पैसे मिळतात का, ते बघा विचार करून ऊस घाला.’समाजसेवक चंद्रकांत बोबडे, माजी सभापती शरद भोईटे, जितोबा भोईटे, सोसायटीचे उपाध्यक्ष अप्पासाहेब नलवडे, मारुती कुंभार, मारुती खुडे, बाळासाहेब नलवडे, नीलेश नलवडे, चांदभाई पठाण, उदय निंबाळकर, विलासराव धुमाळ, अनिल भोईटे, विशाल झणझणे, शुभम नलवडे, राजाराम पवार, अंकुश नलवडे, महेंद्र्र धुमाळ, दीपक कदम, मारुती रणदिवे, जयवंत केजळे, दादा खताळ उपस्थित होते. विलासराव नलवडे यांनी स्वागत केले. माजी उपसरपंच नितीन नलवडे यांनी प्रास्ताविक केले.यावेळी आदर्की, आळजापूर परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.