शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
2
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
3
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
4
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
5
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
6
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
7
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
8
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
9
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
10
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
11
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
12
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
13
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
14
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
15
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
16
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
17
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
18
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
19
650 KM रेंज, 15 मिनिटात चार्ज अन्...BYD ने लॉन्च केली नवीन सील Seal EV
20
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...

वणव्यांमुळे डोंगररांगा होरपळल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2021 04:35 IST

सातारा : वणव्यांमध्ये वनसंपदा जळून खाक होत असून, पशु-पक्ष्यांचे अधिवास नष्ट होत आहेत. त्यामुळे हिंस्र प्राण्यांचा मानवी वस्तीत वावर ...

सातारा : वणव्यांमध्ये वनसंपदा जळून खाक होत असून, पशु-पक्ष्यांचे अधिवास नष्ट होत आहेत. त्यामुळे हिंस्र प्राण्यांचा मानवी वस्तीत वावर वाढला आहे.

जिल्ह्याला सह्याद्री डोंगररांगांचे काेंदण लाभले आहे. परंतु सध्या वणव्यांमुळे या डोंगररांगा होरपळल्या जात आहेत. जंगली पशूंचे अधिवास नष्ट झाल्याने हे प्राणी सैरभैर झाले आहेत. निवाऱ्याबरोबरच त्यांच्या अन्न-पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. असे भरकटलेले प्राणी अन्न-पाण्याच्या शोधात मानवी वस्तीत घुसू लागले आहेत. मानवी वस्तीतील वन्यप्राण्यांच्या वावरामुळे नागरिक मात्र धास्तावले आहेत. या प्राण्यांच्या बंदोबस्ताची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

दरम्यान, जे कोणी वणवे लावत आहेत, त्यांच्यावर कडक कारवाई केली पाहिजे. तरच हे वणवे थांबतील. अन्यथा शहराच्या आजुबाजूची आणि ग्रामीण भागातील शिल्लक राहिलेली जंगलेही नष्ट होतील, अशीही भीती पर्यावरणप्रेमींकडून व्यक्त केली जात आहे.