शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: कलमा पढायला सांगितलं, पँट काढली अन्...! पहलगाममध्ये दहशतवाद्यांचा उन्माद; धर्म विचारून २७ जणांची हत्या
2
हा देशाच्या एकता व अखंडतेवर हल्ला, पहलगाम हल्ल्याचा संघाकडून निषेध
3
हॉस्टेलच्या रूममध्येच 'ती'ने संपविले जीवन; सोलापुरातील धक्कादायक घटना
4
लग्नानंतर सातव्या दिवशीच नौदलाच्या अधिकाऱ्याची दहशतवाद्यांकडून हत्या; हनिमूनसाठी गेले होते विनय नरवाल
5
अमरनाथ यात्रेपूर्वी जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; TRF च्या टेरर मॉड्यूलने चिंता वाढली
6
चोरीच्या आरोपातून दोन तरूणांना बैलबंडीला जुंपले; व्हीडिओ व्हायरल, १० जणांवर गुन्हा दाखल
7
IPL 2025 LSG vs DC : लखनौच्या संघासमोर केएल राहुलचा रुबाब; सिक्सर मारत संपवली मॅच
8
पहलगाम मध्ये तुमच्या ओळखीचे कुणी अडकले असेल तर 'या' तीन क्रमांकावर साधू शकता संपर्क
9
Rishabh Pant : पंतनं हिंमत दाखवली नाही की, तो किंमत शून्य झालाय? एक निर्णय अन् अनेक प्रश्न
10
महाराष्ट्रातल्या दोन पर्यटकांचा पहलगाम हल्ल्यात मृत्यू; पर्यटक जखमी असल्याची CM फडणवीसांची माहिती
11
"तुला मारणार नाही, जा आणि मोदींना सांग"; पतीची डोळ्यांसमोर हत्या केल्यानंतर दहशतवाद्यांनी पत्नीला धमकावलं
12
दररोज फक्त ₹7 ची बचत करा अन् दरमहा ₹5000 मिळवा; जाणून घ्या सरकारी योजनेचे फायदे...
13
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; नाव विचारुन झाडल्या गोळ्या, 27 जणांच्या मृत्यूची भीती
14
मराठी मुलीच्या वडिलांना, काकांना दहशतवाद्यांनी नाव विचारून डोळ्यांदेखत गोळ्या घातल्या- एकनाथ शिंदे
15
"सरकारला धन्यवाद, पण पुन्हा एकदा सांगतो..."; हिंदी सक्तीच्या माघारीनंतर राज ठाकरेंचे ट्विट
16
पहलगाममध्ये टीआरएफने घडवला नरसंहार; दहशतवादी संघटनेने पत्र जारी करुन सांगितले कारण
17
'दोषींना सोडणार नाही, कठोर शिक्षा...', पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर PM मोदींची तीव्र प्रतिक्रिया
18
‘यूपीएससी’त प्रज्ञाचक्षू विद्यार्थ्यांमध्ये मनू गर्ग देशात अव्वल
19
बजाजच्या या शेअरनं दिला 22000% हून अधिकचा परतावा, गुंतवणूकदारांना केलं मालामाल; आता...!
20
पहलगाम हल्ल्यानंतर पंतप्रधान मोदींचा गृहमंत्र्यांना फोन; अमित शाहांना जम्मू-काश्मीरला जाण्याची सूचना

आई, तुम्हाला पुन्हा कधीही भेटणार नाही

By admin | Updated: November 5, 2014 23:30 IST

‘केबीपी’च्या विद्यार्थिनीची वसतिगृहात आत्महत्या शिवांजलीचा शेवटचा संवाद : आत्महत्येने जीवघेण्या स्पर्धेची समस्या स्पष्ट

सातारा : येथील कर्मवीर भाऊराव पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाची स्थापत्यशास्त्र विभागाची विद्यार्थिनी शिवांजली भोसले हिने बुधवारी सकाळी साडेपाचच्या सुमारास वसतिगृहातच पंख्याला ओढणी बांधून गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येचे कारण अजूनही स्पष्ट झाले नसले तरी अभ्यासाच्या तणावामुळे आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज आहे.याबाबतची अधिक माहिती अशी की, शिवांजली संभाजी भोसले (वय १८, रा. मडिलगे बुद्रुक, ता. भुदरगड, जि. कोल्हापूर) ही रयत शिक्षण संस्थेच्या सातारा येथील कर्मवीर भाऊराव पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या स्थापत्यशास्त्र विभागात दुसऱ्या वर्षात शिकत आहे. ‘केबीपी’चे मुलींचे वसतिगृह शिवाजी कॉलेज परिसरात असून, शिवांजली वसतिगृहात खोली क्रमांक सतरामध्ये राहत होती. तिची मैत्रीण गावी गेल्यामुळे शिवांजली एकटीच होती. काल, मंगळवारी ती शेजारील खोलीत अभ्यासासाठी गेली होती. त्यानंतर, सकाळी तिने आईला फोनवरून आत्महत्येचा निर्णय सांगितला. आपल्या मुलीच्या अचानकपणे आलेल्या फोनमुळे घाबरलेल्या आई-वडिलांनी तत्काळ वसतिगृह अधीक्षक मंगल ढमाळ यांना संपर्क साधला आणि संभाषणाची कल्पना दिली. ढमाळ यांनी शिवांजलीच्या खोलीकडे धाव घेतली. शिवांजलीला हाक मारल्यानंतर आतून प्रतिसाद दिला नाही. आतून दरवाजाला कडी लावली होती. ढमाळ यांनी दरवाजालगतच्या एका छिद्रातून कडी काढली आणि आत खोलीत प्रवेश केला, तर शिवांजलीने आपली ओढणी पंख्याला बांधून गळफास घेतला होता. या घटनेनंतर शिवांजलीला तत्काळ रिक्षातून क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा रुग्णालयात दाखल केले. येथे तिचा मृत्यू झाल्याचे घोषित करण्यात आले. (प्रतिनिधी)आई, तुम्हाला पुन्हा कधीही भेटणार नाहीशिवांजलीचा शेवटचा संवाद : आत्महत्येने जीवघेण्या स्पर्धेची समस्या स्पष्टगारगोटी : ‘आई माझी वाट बघू नका, मी आता तुम्हाला पुन्हा कधीही भेटणार नाही. मला अभ्यासाचा ताण सहन होत नाही.’ सकाळी पहाटे सहा वाजता हे आई व मुलीचे फोनवरील संभाषण. आई घाबरून वसतिगृहाच्या रेक्टरला फोन करते. रेक्टर खोलीकडे धावते, तर दार बंद. खिडकीतून पाहते तर मुलगीने गळफास घेतलेला असतो. एखाद्या चित्रपटाचा कथानक शोभेल, अशी घटना घडली आहे मडिलगे बुद्रुक (ता. भुदरगड) येथील शिवांजली संभाजी भोसले या युवतीच्या जीवनात.शिवांजली ही लहानपणापासूनच हुशार, चुणचुणीत, देखणी. वडील माध्यमिक शाळेत शिपाई. आई-वडिलांची लहानपणापासूनच तिला इंजिनिअर करायचे या ध्येयाने प्रेरित झालेले. दहावीत ९४ टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकाविला. मोठा भाऊ इंजिनिअरिंगला होता. तिचेही इंजिनिअर व्हायचे निश्चित झाले आणि गारगोटी येथील डिप्लोमा कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. तेथे सिव्हील विभागात डिस्टिंक्शन मिळवून तिने डिप्लोमा प्राप्त केला. त्यानंतर तिने बी.ई.करिता सातारा येथील कर्मवीर भाऊराव पाटील इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. इतर मुलींप्रमाणे तिचे शिक्षण सुरू झाले. मुलींच्या वसतिगृहात ती राहू लागली. दीपावलीची सुटी संपवून ती दोन दिवसांपूर्वी सबमिशनसाठी गेली होती.आज पहाटे सहाला घरातल्या फोनची रिंग वाजली. एवढ्या सकाळी कोणाचा फोन आला? असा विचार करीत आईने फोन उचलला, तर पलीकडून शिवांजलीचा आवाज आला. गदगदीत आवाजात शिवांजली म्हणाली, ‘आई आता माझी वाट बघू नका! मी काय पुन्हा तुम्हाला दिसणार नाही. मला अभ्यासाचा ताण सहन होत नाही.’ एवढे बोलून तिने फोन ठेवला. आई गडबडली त्यांनी लगेच वसतिगृहाच्या रेक्टरला फोन केला व सांगितले शिवांजलीच्या खोलीकडे जा आणि ती असे का बोलत आहे बघा जरा. अधीक्षक खोलीकडे गेल्या, तर खोलीचा दरवाजा बंद. खिडकीतून आत डोकावले असता शिवांजलीने ओढणीने गळफास लावून घेतला होता. शरीर निपचित लटकत होते. त्यांनी लगेच घरीही कल्पना दिली. हे वृत्त ऐकताच आईने हंबरडा फोडला, शिवांजलीच्या पश्चात आई-वडील, भाऊ, दोन चुलते, चुलती असा परिवार आहे. मुलीच्या या आत्महत्येने आई मात्र एकाकी पडली आहे. या घटनेने पालक धास्तावलेशिवांजलीच्या आत्महत्येने पुन्हा एकदा प्रश्न निर्माण झाला आहे की, शिक्षणाने मुले घडत आहेत की जीवघेण्या स्पर्धेने बिघडत आहेत? जीवनयात्रा ऐन तारुण्यात संपविताना आई-वडिलांचा विचार नाही की, या परीक्षापलीकडे जीवनाची अनेक क्षितिजांची कल्पना नाही? एवढ्या कठीणप्रसंगी एखाद्या मैत्रिणीजवळ अथवा घरी कल्पना दिली असती तर शिवांजलीचे जीवन वाचले असते. परीक्षेच्या कारणाने आत्महत्येने अनेक पालक धास्तावले आहेत.