शहरं
Join us  
Trending Stories
1
सोनम वांगचुक यांनीच लोकांना भडकावले; लेहमधील हिंसाचारासाठी गृहमंत्रालयाने धरले जबाबदार
2
'तुमचेही फोटो लावा'; प्रताप सरनाईकांच्या पूरग्रस्तांच्या मदतीच्या किटवरुन अजितदादांनी विरोधकांना सुनावलं
3
"अक्खी दुनिया एक तरफ, मेरा बुमराह एक तरफ"; दुबईत बॉलिवूडकरांसमोर संजनाची डायलॉगबाजी (VIDEO)
4
"मुस्लिमांनी अयोध्या सोडावी, या मंदिरनगरीत मशिदीच्या बांधकामाला परवानगी दिली जाणार नाही..."; भाजप नेते विनय कटियार यांचं विधान
5
Asia Cup 2025: सलग पाचव्या विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल! आता बांगलादेश-पाक यांच्यात रंगणार सेमीफायनल
6
MBBS आणि वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी १० हजार जागा वाढवण्यास मान्यता; प्रत्येक जागोसाठी १.५० कोटींचा खर्च
7
"रशिया कागदी वाघ नाही, तर...!"; डोनाल्ड ट्रम्प म्हणाले होते 'कागदी वाघ', रशियानं केला पलटवार; म्हणाला...
8
Pahalgam Terror Attack : मोठं यश...! पहलगाम हल्ल्यात दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या मोहम्मद कटारियाला अटक; असा पकडला
9
अभिषेकनं साधला मोठा डाव! आधी हिटमॅन रोहितला ओव्हरटेक केलं, मग गुरबाझचा विक्रमही मोडला
10
३ दिवस भारताचे मंत्री, अधिकारी अमेरिकेत तळ ठोकून; ट्रेड डील, ट्रम्प टॅरिफ, H1B व्हिसावर चर्चा
11
पूरग्रस्तांच्या मदतीसाठी भाजपा खासदार, आमदारांचा मोठा निर्णय, एक महिन्याचे वेतन देणार!
12
IND vs BAN : बांगलादेशच्या नव्या कॅप्टननं नशीब काढलं, पण तो गडबडला! सूर्या म्हणाला, आमच्या मनासारखं झालं
13
एकीकडे डोनाल्ड ट्रम्प यांची 'बोंबाबोंब', दुसरीकडे रशियाने मात्र थेट इराणसोबत केला अणू करार
14
राज ठाकरेंचे CM फडणवीसांना पत्र; सरकारला ५ महत्त्वाच्या सूचना, मदत-जाहिरातबाजीवरून टोचले कान
15
“शेतकऱ्यांना सर्व प्रकारची मदत, ड्रोनने केलेले पंचनामे मान्य करणार”; CM फडणवीसांची ग्वाही
16
त्याला अजून फाशी का दिली नाही? मुख्यमंत्र्यांची हत्या करणाऱ्या आरोपीच्या याचिकेवर कोर्टाने सरकारला फटकारलं
17
सरकार शेतकऱ्यांचे आहे, चिंता करू नका! एकनाथ शिंदे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिला धीर
18
वायरल 'बाल्कनी' हिमनगाचे केवळ टोक? ९९८ कोटींचा इंडोरा–दिगोरी उड्डाणपूलामुळे प्रभावित मालमत्तांची यादी तयार करण्याचे आदेश
19
“पूरग्रस्त प्रत्येक कुटुंबाला १० किलो गहू-तांदूळ, केंद्राची मदत १०० टक्के येईल”: छगन भुजबळ
20
"प्रत्येकाला स्वाभिमान असतो, त्याने..."; शाहीन शाह आफ्रिदीकडून हॅरिस रौफच्या कृतीचे समर्थन

मोट गेली; विद्युत मोटर आली... (संडे स्पेशल)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2021 04:33 IST

भारत कृषिप्रधान देश आहे. देशातील ६० टक्क्यांहून अधिक जनता आजही शेतीवर अवलंबून आहे. शेतीक्षेत्रात सतत बदल होत असून, मागील ...

भारत कृषिप्रधान देश आहे. देशातील ६० टक्क्यांहून अधिक जनता आजही शेतीवर अवलंबून आहे. शेतीक्षेत्रात सतत बदल होत असून, मागील ३० ते ४० वर्षांचा विचार करता, पिकांना पाणी देण्यासाठी वापरण्यात येणारी मोट कायमची बंद होऊन तिची जागा विद्युत मोटरने घेतली. लाकडी औताची जागाही यंत्राने घेतली तर लाकडी बैलगाड्या कमी होऊन लोखंडी उपलब्ध झाल्या. असे अनेक बदल शेतीक्षेत्रात झाले आहेत.

कृषी क्षेत्रात सतत बदल होत आहेत. ४० वर्षांपूर्वीचा काळ आणि आताची स्थिती याचा विचार करता, शेती, शेतकरी आणि उत्पादन यामध्ये खूप मोठा बदल झालेला आहे. पूर्वीच्या काळी पिकांचे ठराविक वाण होते. पण, अलिकडे अनेक नवीन वाणे विकसित झाली आहेत. त्यामुळे छोट्याशा शेतीतही चांगले उत्पन्न घेता येत आहे. ज्वारी, गहू, मिरची असो किंवा ऊस, मका, सोयाबीन या पिकांमध्येही अधिक उत्पन्न मिळू लागलं आहे. पूर्वी मोटेने पिकाला पाणी द्यावं लागायचं. त्यासाठी चामडी मोट असायची. नंतर बदल होऊन पत्र्याची मोट आली. बैलाच्या सहाय्याने विहिरीतून पाणी काढले जायचे. पण, गेल्या ३० वर्षांत मोट बंद झाली. मोटेची जागा इंजिन आणि आता विद्युत मोटारीने घेतली आहे. विजेच्या सहाय्याने चालणारे हे पंप ३, ५, ७, १० अश्वशक्तीपेक्षाही मोठे असतात. त्यामुळे पाणी प्रेशरने खेचून नेता येते.

पूर्वीच्या काळी मोटेने काढलेले पाणी दंडाने पिकापर्यंत नेण्यात येत होते. त्यासाठी अनेक ठिकाणी वळणे घेत पाणी अर्धा, एक तासाने पोहोचत असे. पण, विद्युत मोटारीबरोबरच पाईप आल्यामुळे शेतकऱ्यांनी दंडाने पाणी न्यायचे बंद करुन पाईपलाईनद्वारे नेण्यास सुरूवात केली. त्यामुळे विजेवरील मोटारीचे बटन दाबले की काही सेकंदातच पाणी ओप्यात पोहोचते. त्यामुळे पाणी फुटून गेले का हे पाहण्यासाठी शेतकऱ्यांना कोठे जावे लागत नाही, असे अनेक क्रांतिकारी बदल शेतीत होत गेले. त्यामुळे काही प्रमाणात शेतकऱ्यांचे कष्टही कमी झाले आहेत.

चौकट :

घायपातचा कासरा कालबाह्य....

शेतीची मशागत करण्यासाठी पूर्वी लाकडी नांगर होते. नांगरणीसाठी त्यांचा वापर होत होता. कालांतराने लोखंडी नांगर आले. हे नांगर वजनाने हलके आहेत तर पेरणीसाठी तिफन होती. तीही लाकडाचा वापर करून बनवलेली असायची. आता मात्र तिफनला लोखंडी नळ्या आहेत. त्यामुळे चाड्यात टाकलेले बियाणे न अडकता जमिनीत पडत आहे. तर बैलाच्या साहाय्याने शेतीची कामे होत. मात्र, ट्रॅक्टर, हार्वेस्टर आल्यापासून बहुतांशी कामे या यंत्रांनीच होत आहेत. खळ्यावर बैलाच्या साहाय्याने मळणी संपली, आता यंत्रांनी मळणी केली जाते. गहू काढण्यासाठीही यंत्र आहे. पूर्वी केकत (घायपात)पासून शेतीसाठी लागणारे दोर, कासरा बनवला जायचा. परंतु, आता सुती, नायलॉनचे दोर उपलब्ध झाले आहेत. कालानुरुप असे अनेक बदल शेतीत झाले आहेत.

.........................................................................