शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

मोट गेली; विद्युत मोटर आली... (संडे स्पेशल)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2021 04:33 IST

भारत कृषिप्रधान देश आहे. देशातील ६० टक्क्यांहून अधिक जनता आजही शेतीवर अवलंबून आहे. शेतीक्षेत्रात सतत बदल होत असून, मागील ...

भारत कृषिप्रधान देश आहे. देशातील ६० टक्क्यांहून अधिक जनता आजही शेतीवर अवलंबून आहे. शेतीक्षेत्रात सतत बदल होत असून, मागील ३० ते ४० वर्षांचा विचार करता, पिकांना पाणी देण्यासाठी वापरण्यात येणारी मोट कायमची बंद होऊन तिची जागा विद्युत मोटरने घेतली. लाकडी औताची जागाही यंत्राने घेतली तर लाकडी बैलगाड्या कमी होऊन लोखंडी उपलब्ध झाल्या. असे अनेक बदल शेतीक्षेत्रात झाले आहेत.

कृषी क्षेत्रात सतत बदल होत आहेत. ४० वर्षांपूर्वीचा काळ आणि आताची स्थिती याचा विचार करता, शेती, शेतकरी आणि उत्पादन यामध्ये खूप मोठा बदल झालेला आहे. पूर्वीच्या काळी पिकांचे ठराविक वाण होते. पण, अलिकडे अनेक नवीन वाणे विकसित झाली आहेत. त्यामुळे छोट्याशा शेतीतही चांगले उत्पन्न घेता येत आहे. ज्वारी, गहू, मिरची असो किंवा ऊस, मका, सोयाबीन या पिकांमध्येही अधिक उत्पन्न मिळू लागलं आहे. पूर्वी मोटेने पिकाला पाणी द्यावं लागायचं. त्यासाठी चामडी मोट असायची. नंतर बदल होऊन पत्र्याची मोट आली. बैलाच्या सहाय्याने विहिरीतून पाणी काढले जायचे. पण, गेल्या ३० वर्षांत मोट बंद झाली. मोटेची जागा इंजिन आणि आता विद्युत मोटारीने घेतली आहे. विजेच्या सहाय्याने चालणारे हे पंप ३, ५, ७, १० अश्वशक्तीपेक्षाही मोठे असतात. त्यामुळे पाणी प्रेशरने खेचून नेता येते.

पूर्वीच्या काळी मोटेने काढलेले पाणी दंडाने पिकापर्यंत नेण्यात येत होते. त्यासाठी अनेक ठिकाणी वळणे घेत पाणी अर्धा, एक तासाने पोहोचत असे. पण, विद्युत मोटारीबरोबरच पाईप आल्यामुळे शेतकऱ्यांनी दंडाने पाणी न्यायचे बंद करुन पाईपलाईनद्वारे नेण्यास सुरूवात केली. त्यामुळे विजेवरील मोटारीचे बटन दाबले की काही सेकंदातच पाणी ओप्यात पोहोचते. त्यामुळे पाणी फुटून गेले का हे पाहण्यासाठी शेतकऱ्यांना कोठे जावे लागत नाही, असे अनेक क्रांतिकारी बदल शेतीत होत गेले. त्यामुळे काही प्रमाणात शेतकऱ्यांचे कष्टही कमी झाले आहेत.

चौकट :

घायपातचा कासरा कालबाह्य....

शेतीची मशागत करण्यासाठी पूर्वी लाकडी नांगर होते. नांगरणीसाठी त्यांचा वापर होत होता. कालांतराने लोखंडी नांगर आले. हे नांगर वजनाने हलके आहेत तर पेरणीसाठी तिफन होती. तीही लाकडाचा वापर करून बनवलेली असायची. आता मात्र तिफनला लोखंडी नळ्या आहेत. त्यामुळे चाड्यात टाकलेले बियाणे न अडकता जमिनीत पडत आहे. तर बैलाच्या साहाय्याने शेतीची कामे होत. मात्र, ट्रॅक्टर, हार्वेस्टर आल्यापासून बहुतांशी कामे या यंत्रांनीच होत आहेत. खळ्यावर बैलाच्या साहाय्याने मळणी संपली, आता यंत्रांनी मळणी केली जाते. गहू काढण्यासाठीही यंत्र आहे. पूर्वी केकत (घायपात)पासून शेतीसाठी लागणारे दोर, कासरा बनवला जायचा. परंतु, आता सुती, नायलॉनचे दोर उपलब्ध झाले आहेत. कालानुरुप असे अनेक बदल शेतीत झाले आहेत.

.........................................................................