शहरं
Join us  
Trending Stories
1
Ashish Shelar: गणेशोत्सव बंद होऊ देणार नाही, आशिष शेलार यांची ग्वाही; कोर्टात ३० जूनपर्यंत बाजू मांडणार!
2
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
3
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
4
तुलाच पत्नी बनवेन! तरुणाने मृत प्रेयसीसोबत लग्न करून पूर्ण केलं वचन, नातेवाईक भावूक  
5
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
6
आजचे राशीभविष्य - १६ जून २०२५, लाभदायी दिवस, व्यापार, व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता
7
इस्रायल आणि इराणचे एकमेकांवरील हल्ले सुरूच, आतापर्यंत दोन्ही देशांचे किती नुकसान? जाणून घ्या
8
Kedarnath helicopter crash: पत्नीच्या ‘बर्थडे’साठी गेलेले यवतमाळचे कुटुंब केदारनाथला हेलिकॉप्टर अपघातात ठार
9
घ्या पैसे, करा पेरणी; राज्याचा कृषी कर्ज टक्का वाढला!
10
Pune Maval bridge collapses: कुंडमळाचा ३५ वर्षे जुना पूल कोसळला, इंद्रायणीत अनेक पर्यटक वाहून गेले, ५२ जणांना वाचविले 
11
विशेष लेख: महापालिकेचा कारभारही हायकोर्टानेच करायचा का..?
12
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
13
विशेष लेख: अकरावी प्रवेशात शिक्षण विभाग नापास!
14
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
15
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
16
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
17
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
18
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
19
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
20
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!

बहुतांश उमेदवारांचा थेट निधीवर डोळा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 05:42 IST

परळी : सध्या गावोगावी निवडणुकीची धामधूम सुरू आहे. कोणी खुशीने, कोणी जबरदस्तीने, कोणी नेत्यासाठी, कोणी गावाची गरज म्हणून तर ...

परळी : सध्या गावोगावी निवडणुकीची धामधूम सुरू आहे. कोणी खुशीने, कोणी जबरदस्तीने, कोणी नेत्यासाठी, कोणी गावाची गरज म्हणून तर कोणी सहजच मजा म्हणूनही सहभागी झाले आहेत. प्रत्येकाच्या तोंडात विकासाचा जप सुरू असला तरी राज्य व केंद्र सरकारकडून ग्रामपंचायतींना मिळत असलेल्या थेट निधीला संभाव्य उमेदवार भुलत आहेत. त्यामुळे तुलनेने मोठे पद असलेल्या; पण निधीची वानवा असलेल्या पंचायत समिती किंवा जिल्हा परिषद सदस्य होण्यापेक्षा गावची ग्रामपंचायतच बरी, असे प्रत्येकजण म्हणत निवडणुकीला उभा राहिला आहे.

गेल्या काही वर्षांपासून ग्रामपंचायतींना केंद्र व राज्याकडून विविध योजनांचा निधी थेट मिळत आहे. गावच्या लोकसंख्येनुसार हा मिळणारा निधी हा छोट्या ग्रामपंचायतींना काही लाखांच्या घरात तर मोठ्या ग्रामपंचायतींना कोटींच्या घरात येतो. हा निधी खर्च करण्यासाठी ग्रामपंचायतींना कोणत्याही वरिष्ठ कार्यालयाच्या परवानगीची गरज भासत नाही. हा निधी खर्च करण्याची जबाबदारी संपूर्णपणे ग्रामसभेद्वारे ग्रामपंचायतीला मिळते. त्यामुळे ग्रामपंचायतीच्या प्रत्येक सदस्याला त्याच्या निवडून आलेल्या प्रभागासाठी मोठ्या प्रमाणात निधी न मागता उपलब्ध होत असतो. त्यातच ग्रामपंचायत निवडणूक लढविण्यासाठी खर्चही कमी येतो.

मात्र, पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकांसाठी गावांची संख्या मोठी असते. त्यातच निवडणुकीसाठी खर्च ही मोठ्या प्रमाणात होत असतो आणि निवडून आल्यावर प्रत्येक गावासाठी तालुका अथवा जिल्हा स्तरावर निधी उपलब्ध करून देणे या सदस्यांसाठी जिकिरीचे ठरते. त्यामुळे अनेकवेळा या सदस्यांना भागातील लोकांच्या रोषासही सामोरे जावे लागते. त्यामुळेच सध्या पंचायत समिती, जिल्हा परिषद सदस्य होण्यापेक्षा गावच्या ग्रामपंचायतीचे सदस्य अथवा सरपंच होणेच बरे, अशी काहीशी मानसिकता गाव नेत्यांची होताना दिसत आहे.