शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; कोण मारणार बाजी?
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
4
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
5
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
6
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
7
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
8
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
9
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
10
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
11
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
12
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
13
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
14
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
15
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
16
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
17
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
18
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
19
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
20
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
Daily Top 2Weekly Top 5

बहुतांश उमेदवारांचा थेट निधीवर डोळा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 05:42 IST

परळी : सध्या गावोगावी निवडणुकीची धामधूम सुरू आहे. कोणी खुशीने, कोणी जबरदस्तीने, कोणी नेत्यासाठी, कोणी गावाची गरज म्हणून तर ...

परळी : सध्या गावोगावी निवडणुकीची धामधूम सुरू आहे. कोणी खुशीने, कोणी जबरदस्तीने, कोणी नेत्यासाठी, कोणी गावाची गरज म्हणून तर कोणी सहजच मजा म्हणूनही सहभागी झाले आहेत. प्रत्येकाच्या तोंडात विकासाचा जप सुरू असला तरी राज्य व केंद्र सरकारकडून ग्रामपंचायतींना मिळत असलेल्या थेट निधीला संभाव्य उमेदवार भुलत आहेत. त्यामुळे तुलनेने मोठे पद असलेल्या; पण निधीची वानवा असलेल्या पंचायत समिती किंवा जिल्हा परिषद सदस्य होण्यापेक्षा गावची ग्रामपंचायतच बरी, असे प्रत्येकजण म्हणत निवडणुकीला उभा राहिला आहे.

गेल्या काही वर्षांपासून ग्रामपंचायतींना केंद्र व राज्याकडून विविध योजनांचा निधी थेट मिळत आहे. गावच्या लोकसंख्येनुसार हा मिळणारा निधी हा छोट्या ग्रामपंचायतींना काही लाखांच्या घरात तर मोठ्या ग्रामपंचायतींना कोटींच्या घरात येतो. हा निधी खर्च करण्यासाठी ग्रामपंचायतींना कोणत्याही वरिष्ठ कार्यालयाच्या परवानगीची गरज भासत नाही. हा निधी खर्च करण्याची जबाबदारी संपूर्णपणे ग्रामसभेद्वारे ग्रामपंचायतीला मिळते. त्यामुळे ग्रामपंचायतीच्या प्रत्येक सदस्याला त्याच्या निवडून आलेल्या प्रभागासाठी मोठ्या प्रमाणात निधी न मागता उपलब्ध होत असतो. त्यातच ग्रामपंचायत निवडणूक लढविण्यासाठी खर्चही कमी येतो.

मात्र, पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकांसाठी गावांची संख्या मोठी असते. त्यातच निवडणुकीसाठी खर्च ही मोठ्या प्रमाणात होत असतो आणि निवडून आल्यावर प्रत्येक गावासाठी तालुका अथवा जिल्हा स्तरावर निधी उपलब्ध करून देणे या सदस्यांसाठी जिकिरीचे ठरते. त्यामुळे अनेकवेळा या सदस्यांना भागातील लोकांच्या रोषासही सामोरे जावे लागते. त्यामुळेच सध्या पंचायत समिती, जिल्हा परिषद सदस्य होण्यापेक्षा गावच्या ग्रामपंचायतीचे सदस्य अथवा सरपंच होणेच बरे, अशी काहीशी मानसिकता गाव नेत्यांची होताना दिसत आहे.