शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला पोहोचला असतानाच अमेरिकेतून आली 'गुड न्यूज'! ट्रम्प म्हणाले, भारतासोबत होऊ शकतो करार
3
Gold Price on Akshay Tritiya : अक्षय्य तृतीयेला 'इतक्या' रुपयांनी स्वस्त झालं सोनं, काय आहे १४ ते २४ कॅरेट सोन्याचे नवे दर
4
PM मोदींच्या कॅबिनेट सुरक्षा समितीच्या बैठकीत मोठा निर्णय; माजी रॉ प्रमुखांकडे सोपवली महत्त्वाची जबाबदारी
5
पाकिस्तानचा खोटारडेपणा, हुतात्मा जवानाच्या आईला भारताने हाकलल्याची पसरवली बातमी, आता समोर आलं सत्य
6
'मुस्लीम रुग्णांवर उपचार करणार नाही' पहलगाम हल्ल्यानंतर इंदूरच्या डॉक्टरची पोस्ट व्हायरल
7
१ मेपासून देशातील १५ बँका होणार बंद; महाराष्ट्रातील बँकांचाही समावेश? खातेदारांच्या पैशाचं काय होणार?
8
"लहानपणापासून मी कित्येक पूजा केल्यात, काही लोकांना आज उत्तर मिळाले असेल"; शरद पवारांचा टोला
9
क्रिकेटसोबत कमाईतही नंबर वन आहे Rohit Sharma, वर्षाला कोट्यवधींची कमाई; कशी आहे लक्झरी लाईफस्टाईल?
10
निर्लज्ज पाकिस्तान! संसदेत, परराष्ट्रमंत्र्यांनी टीआरएफला वाचवल्याची कबुली दिली, म्हणाले, आम्ही त्यांचे नाव यूएनएससीच्या निवेदनातून...
11
ऐश्वर्या-अविनाश नारकर यांचे भन्नाट रील्स; लेकाची काय असते प्रतिक्रिया? म्हणाले, "तो कधीच..."
12
जगातील टॉप १० सर्वात महागडी शहरे; इथे एक दिवसांचा खर्च म्हणजे महिन्याचा पगार
13
वॉरेन बफेंनी १९८८ मध्ये खरेदी केलेले Coca-Cola चे शेअर्स, माहितीये त्यांच्या १ हजार डॉलर्सचं आज मूल्य काय आहे?
14
'माझा मुलगा फक्त १० वर्षांचा आहे आणि...' वैभव सूर्यवंशीबाबत एबी डिव्हिलियर्सचं मोठं वक्तव्य
15
पती सौदीला कमवायला गेला, इथं पत्नीचे जुळले शेजाऱ्याशी अनैतिक संबंध; पती परतला अन् शेवट झाला
16
नवऱ्याची दाढी आवडली नाही, कापण्यास नकार देताच बायको क्लीन शेव असलेल्या दिरासोबत पसार
17
Akshaya Tritiya 2025: यंदाची अक्षय्य तृतीया 'या' पाच राशींसाठी ठरणार खास; धनसंपत्तीची पूर्ण होणार आस!
18
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
19
रणबीर कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये होती अमिषा पटेल? खुलासा करत म्हणाली, "आम्ही रोमँटिक..."
20
"पहलगामच्या हल्ल्यात धर्म आणायची गरज नाही, तो देशावरचा हल्ला"; 'त्या' विधानावर शरद पवारांचे स्पष्टीकरण

निरा-देवघरच्या पाण्यासाठी १० जुलैला प्रांत कार्यालयावर मोचार् : निंबाळकर

By admin | Updated: June 30, 2017 13:29 IST

पुढील आंदोलनाची दिशा ठरविण्यासाठी बोलविलेल्या बैठक

आॅनलाईन लोकमतफलटण , दि. ३0 : निरा-देवघरच्या पाण्यासाठी आता आरपारची लढाई करण्याची वेळ आली आहे. या अंतर्गत पहिल्या टप्प्यात १० जुलैला निरा देवघरच्या लाभ क्षेत्रातील ग्रामस्थांच्या वतीने प्रांत कार्यालयावर भव्य धडक मोर्चा काढला जाईल, असा इशारा माजी खासदार हिंदुराव नाईक-निंबाळकर यांनी दिला.निरा-देवघर धरणाच्या पाण्यासाठी व पुढील आंदोलनाची दिशा ठरविण्यासाठी बोलविण्यात आलेल्या बैठकीत ते बोलत होते यावेळी अ‍ॅड. बाळासाहेब बागवान, कृष्णा खोरे विकास महांमडळाचे माजी उपाध्यक्ष रणजितसिंह नाईक निंबाळकर, संघर्ष समितीचे अध्यक्ष अ‍ॅड. नरसिंह निकम, जयकुमार शिंदे, नानासाहेब राणे, अमोल खराडे, सिराज शेख, अमित रणवरे, राजेंद्र काकडे आदी मान्यवर उपस्थित होते.हिंदुराव नाईक-निंबाळकर पुढे म्हणाले, ज्या तालुक्यासाठी हे धरण झाले ते तालुके पाण्यापासून वंचीत आहेत. तर ज्याचा या पाण्याशी काही संबध नाही ते बारामतीकर आपल्या हक्काचे ६० टक्के पाणी वापरत आहेत. तालुक्यातील जनतेच्या मतांवर जे निवडूण आले त्या लोकप्रतिनिधींनी स्वत:च्या राजकीय स्वाथार्साठी तालुक्याचे पाणी पळविण्यास मदत केली. आपल्या हक्काच्या पाण्यासाठी आत्ता संघर्ष केला नाही तर हक्काचे पाणी सोडुन द्यावे लागेल. त्यामुळे सरकारवर दबागट निर्माण करून या धरणाचे पाणी आपल्या शिवारात आणण्यासाठी लाभक्षेत्रातील गावांनी आरपारच्या लढाईला सामोरे जाण्याची तयारी ठेवावी. त्यासाठी १० जुलैला फलटण प्रांत कार्यालयावर धडक मोर्चा काढणार असल्याचे हिंदुराव नाईक निंबाळकर यांनी यावेळी सांगितले.अ‍ॅड. नरसिंह निकम म्हणाले, निरा देवघर बाबत तालुक्यातील जनतेला जागे करण्याचे काम आम्ही केले आहे. आता ही लढाई तुमची झाली असुन पाणी शिवारात आणल्या शिवाय हे आंदोलन थांबणार नाही. यावेळी माळशिरस निरा देवघर संघर्ष समितीचे अध्यक्ष नानासाहेब राणे, अमोल खराडे, राजेंद्र काकडे, अमित रणवरे, विक्रम शिंदे, तुकाराम शिंदे, आत्माराम सस्ते, प्रल्हाद लावंड यांनी मनोगत व्यक्त केला.

त्यांचा रिमोट बारामतीकडे : बागवान

अ‍ॅड. बाळासाहेब बागवान म्हणाले, ज्या पाणी प्रश्नावर १९९५ साली रामराजे आमदार झाले ते आता या प्रश्नी काहीच बोलत नाहीत. कारण त्यांचा रिमोट बारामतीकडे आहे. निरा देवघरच्या कालव्यांच्या कामकाजाविरोधात कृष्णा खोरे विभागाकडे तक्रारी करणारे राष्ट्रवादीचेच बगलबच्चे असल्याचा आरोप यावेळी बागवान यांनी केला.

तोपर्यंत संघर्ष थांबणार नाही.. : निंबाळकर

रणजितसिंह नाईक-निंबाळकर म्हणाले, निरा देवघरच्या पाण्यासाठी संघर्ष सुरू झाला असुन पाणी आल्या शिवाय आता तो थांबणार नाही. संघर्ष समिती आदोलनांबाबत जो निर्णय घेईल त्या प्रमाणे आपल्याला आंदोलनात सहभागी व्हावे लागणार आहे. येणाऱ्या पिढीला पाणी देण्याची जबाबदारी आपली आहे. आता प्रत्यकाने या आंदोलनात निरा देवघरचा जलदुत म्हणुन सहभागी व्हावे.