शहरं
Join us  
Trending Stories
1
'सर्वात मोठा शत्रू म्हणजे परावलंबन'; टॅरिफ वाद आणि H-1B व्हिसासंदर्भातील बदलानंतर, काय म्हणाले पंतप्रधान मोदी?
2
MSRTC: एसटी महामंडळात १७ हजारांहून अधिक पदांची भरती; चालक आणि सहाय्यक नेमणार, 'इतका' पगार!
3
हाफिज सईदने दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदचे नाव बदलले; आता 'अल-मुराबितुन' नावाने पैसे गोळा करणार
4
५०% सूट, ८०% सूट... कपडे आणि बुटांच्या दुकांनावर आता अशा ऑफर्स दिसणार नाहीत! GST कपातीशी संबंध काय?
5
शाहिद आफ्रिदीचं इरफान पठाणला आव्हान, म्हणाला, ‘’मर्द असशील तर…”, मिळालं असं प्रत्युत्तर
6
नागपूरमध्ये मनोज जायस्वाल यांना अटक, सीबीआयची हॉटेलमध्ये कारवाई; 4000 कोटींची केस काय?
7
मोलकरणीने मालकिणीच्या 'थप्पड'चा असा घेतला बदला, वाचून तुमच्याही भुवया उंचावतील!
8
'टॅरिफ'नंतर ट्रम्प यांचा नवा फतवा! भारतीयांसाठी 'अमेरिकन ड्रीम' महागणार! Visa साठी भरावे लागणार ₹८८ लाख
9
'शिंदे, पवार अन् भाजपचे ९०% आमदार मते चोरुन निवडून आले', संजय राऊतांचे टीकास्त्र
10
IND-Pak हँडशेकवरून लढत राहिले; तिकडे या संघाचा कप्तान भारतीय वंशाचा, अर्धे खेळाडू पाकिस्तानी वंशाचे निघाले
11
मारुतीनंतर महिंद्राचे GST रेट आले...! स्कॉर्पिओ एनपेक्षा XUV 700 स्वस्त झाली, बोलेरो निओ तर...
12
हृदयद्रावक! जुळ्या मुलांनी आईला मारलेली मिठी; ढिगाऱ्याखालील मृतदेह पाहून अख्खं गाव रडलं
13
VIRAL : सलाम तिच्या हिमतीला! 'मौत का कुआं'मध्ये बाईक चालवणाऱ्या तरुणीचा व्हिडीओ पाहून अंगावर काटा येईल
14
VIDEO: हार्दिक पांड्याने सीमारेषेवर धावत-पळत, कसरत करत घेतला भन्नाट झेल, पाहणारेही थक्क
15
भारत टेन्शन फ्री... ४ वर्षात जे झालं नव्हतं ते आता झालं, 'हा' कोणता साठा आता जमा झाला?
16
"त्या २४८ शेतकऱ्यांना तीन महिन्यांत कर्जमाफी द्या", उच्च न्यायालयाने राज्य सरकारला झापले, आदेश काय?
17
घरची गरिबी, टोमणे सहन केले, पण मानली नाही हार, बनली बॉक्सिंगमध्ये वर्ल्ड चॅम्पियन, कोण आहे मीनाक्षी हुड्डा
18
हसत हसतच पाण्याच उतरलेला, क्षणात होत्याचं नव्हतं झालं; जुबीन गर्गचा शेवटचा Video व्हायरल
19
Zero GST Product List: सोमवारपासून या वस्तू '0' जीएसटीत येणार, तुम्ही पाहिल्यात का? 
20
Akshay Kumar : सातवीत नापास झाला होता अभिनेता अक्षय कुमार; लहानपणी पाहिलेलं 'हे' स्वप्न

निरा-देवघरच्या पाण्यासाठी १० जुलैला प्रांत कार्यालयावर मोचार् : निंबाळकर

By admin | Updated: June 30, 2017 13:29 IST

पुढील आंदोलनाची दिशा ठरविण्यासाठी बोलविलेल्या बैठक

आॅनलाईन लोकमतफलटण , दि. ३0 : निरा-देवघरच्या पाण्यासाठी आता आरपारची लढाई करण्याची वेळ आली आहे. या अंतर्गत पहिल्या टप्प्यात १० जुलैला निरा देवघरच्या लाभ क्षेत्रातील ग्रामस्थांच्या वतीने प्रांत कार्यालयावर भव्य धडक मोर्चा काढला जाईल, असा इशारा माजी खासदार हिंदुराव नाईक-निंबाळकर यांनी दिला.निरा-देवघर धरणाच्या पाण्यासाठी व पुढील आंदोलनाची दिशा ठरविण्यासाठी बोलविण्यात आलेल्या बैठकीत ते बोलत होते यावेळी अ‍ॅड. बाळासाहेब बागवान, कृष्णा खोरे विकास महांमडळाचे माजी उपाध्यक्ष रणजितसिंह नाईक निंबाळकर, संघर्ष समितीचे अध्यक्ष अ‍ॅड. नरसिंह निकम, जयकुमार शिंदे, नानासाहेब राणे, अमोल खराडे, सिराज शेख, अमित रणवरे, राजेंद्र काकडे आदी मान्यवर उपस्थित होते.हिंदुराव नाईक-निंबाळकर पुढे म्हणाले, ज्या तालुक्यासाठी हे धरण झाले ते तालुके पाण्यापासून वंचीत आहेत. तर ज्याचा या पाण्याशी काही संबध नाही ते बारामतीकर आपल्या हक्काचे ६० टक्के पाणी वापरत आहेत. तालुक्यातील जनतेच्या मतांवर जे निवडूण आले त्या लोकप्रतिनिधींनी स्वत:च्या राजकीय स्वाथार्साठी तालुक्याचे पाणी पळविण्यास मदत केली. आपल्या हक्काच्या पाण्यासाठी आत्ता संघर्ष केला नाही तर हक्काचे पाणी सोडुन द्यावे लागेल. त्यामुळे सरकारवर दबागट निर्माण करून या धरणाचे पाणी आपल्या शिवारात आणण्यासाठी लाभक्षेत्रातील गावांनी आरपारच्या लढाईला सामोरे जाण्याची तयारी ठेवावी. त्यासाठी १० जुलैला फलटण प्रांत कार्यालयावर धडक मोर्चा काढणार असल्याचे हिंदुराव नाईक निंबाळकर यांनी यावेळी सांगितले.अ‍ॅड. नरसिंह निकम म्हणाले, निरा देवघर बाबत तालुक्यातील जनतेला जागे करण्याचे काम आम्ही केले आहे. आता ही लढाई तुमची झाली असुन पाणी शिवारात आणल्या शिवाय हे आंदोलन थांबणार नाही. यावेळी माळशिरस निरा देवघर संघर्ष समितीचे अध्यक्ष नानासाहेब राणे, अमोल खराडे, राजेंद्र काकडे, अमित रणवरे, विक्रम शिंदे, तुकाराम शिंदे, आत्माराम सस्ते, प्रल्हाद लावंड यांनी मनोगत व्यक्त केला.

त्यांचा रिमोट बारामतीकडे : बागवान

अ‍ॅड. बाळासाहेब बागवान म्हणाले, ज्या पाणी प्रश्नावर १९९५ साली रामराजे आमदार झाले ते आता या प्रश्नी काहीच बोलत नाहीत. कारण त्यांचा रिमोट बारामतीकडे आहे. निरा देवघरच्या कालव्यांच्या कामकाजाविरोधात कृष्णा खोरे विभागाकडे तक्रारी करणारे राष्ट्रवादीचेच बगलबच्चे असल्याचा आरोप यावेळी बागवान यांनी केला.

तोपर्यंत संघर्ष थांबणार नाही.. : निंबाळकर

रणजितसिंह नाईक-निंबाळकर म्हणाले, निरा देवघरच्या पाण्यासाठी संघर्ष सुरू झाला असुन पाणी आल्या शिवाय आता तो थांबणार नाही. संघर्ष समिती आदोलनांबाबत जो निर्णय घेईल त्या प्रमाणे आपल्याला आंदोलनात सहभागी व्हावे लागणार आहे. येणाऱ्या पिढीला पाणी देण्याची जबाबदारी आपली आहे. आता प्रत्यकाने या आंदोलनात निरा देवघरचा जलदुत म्हणुन सहभागी व्हावे.