शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
2
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
3
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
4
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
5
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
6
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
7
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
8
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
9
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
10
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
11
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
12
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
13
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
14
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
15
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
16
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
17
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
18
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
19
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
20
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  

रहदारीच्या रस्त्यावर माॅर्निंग वाॅक..आयुष्याचे ठरेल शेवटचे टोक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 09:20 IST

सातारा: आजकाल ताण तणावामुळे शरीरासाठी व्यायाम अत्यंत गरजेचा आहे. याचे महत्व साऱ्यांनाच पटू लागल्यामुळे अनेकजण आपल्या परीने वेळ काढून ...

सातारा: आजकाल ताण तणावामुळे शरीरासाठी व्यायाम अत्यंत गरजेचा आहे. याचे महत्व साऱ्यांनाच पटू लागल्यामुळे अनेकजण आपल्या परीने वेळ काढून माॅर्निंग वाॅक करत आहेत. पण हेच माॅर्निंग वाॅक अलीकडे अनेकांसाठी जीवघेणे ठरत असून, स्वत:चा निष्काळजीपणा अन् वाहनचालकांचा बेदरकारपणा याला कारणीभूत ठरत आहे. यासाठी केवळ सतर्कता हीच महत्वाची असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.

लोणंद येथे गुरुवारी माॅर्निंग वाॅकला गेलेल्या सासू, सासरे आणि सुनेचा भरधाव कारने जीव घेतला. या दुर्दैवी घटनेनंतर समाजमन अक्षरश: हेलावून गेले. तसं पाहिलं तर माॅर्निंग वाॅक करताना यापूर्वीही अशा प्रकारच्या घटना घडल्या आहेत. मात्र, तरीही यातून कोणी बोध घेत नाही. अशा प्रकारच्या घटना वारंवार का घडत आहेत, याचा विचार होणे गरजेचे आहे. फलटण तालुक्यामध्ये तीन वर्षांपूर्वी पहाटे रस्त्यावर व्यायाम करणाऱ्या दोन युवकांचा भरधाव टेम्पोने जीव घेतला होता. त्यानंतर अशाच प्रकारची घटना वाई तालुक्यातही घडली होती. एका युवकाला माॅर्निंग वाॅक करताना अज्ञात वाहनाने उडवले होते. तसेच कऱ्हाडमध्येही एका युवतीला सकाळच्या सुमारास व्यायाम करताना धडक दिल्याने तिचा मृत्यू झाला होता.अशा प्रकारचे अपघात का घडत असतात, याचा महामार्ग पोलिसांनी निष्कर्ष काढला, त्यावेळी अनेक बाबी समोर आल्या.

पहाटेच्या सुमारास वाहन चालकांना डुलकी लागत असते. त्यामुळे असे अपघात घडत असतात. हे अपघात टाळण्यासाठी माॅर्निंग वाॅकला जाणाऱ्या लोकांनी प्रचंड सतर्कता बाळगणे गरजेचे आहे. अशा प्रकारचे अपघातात शक्यतो माॅर्निंग वाॅक करणाऱ्यांना पाठीमागून वाहनाने धडक दिली आहे. त्यामुळे जी वाहने समोरून येतात. त्याच बाजूने रस्त्याच्या कडेने चालणे योग्य ठरेल. शक्यतो रहदारी असलेल्या रस्त्याच्या कडेने माॅर्निंग वाॅक करूच नये. आजूबाजूची मैदाने किंवा गावातील शाळेच्या पटांगणात चालण्याचा व्यायाम करावा. रहदारीच्या रस्त्यावर माॅर्निंग वाॅकला जाणे म्हणजे मृत्यूच्या दाढेत ओढावून घेतल्यासारखा प्रकार आहे. त्यामुळे माॅर्निंग वाॅकला जाताना सतर्कता हीच आपल्या आयुष्याला तारू शकेल, असे एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याचे म्हणणे आहे.