शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिलीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
3
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
4
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
5
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
6
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
7
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
8
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
9
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
10
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
11
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
12
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
13
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
14
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
15
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
16
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
17
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
18
पाकिस्तानी एअरलाइन्स PIAचा नवा मालक कोण होणार? 'या' कंपनीने लावली तब्बल १० लाख कोटींची बोली
19
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
20
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
Daily Top 2Weekly Top 5

खरीपासाठी मान्सूनचे आगमन महत्वाचे-- सुनील बोरकर , चर्चेतील व्यक्तिशी थेट संवाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2019 22:00 IST

मान्सूनचा पाऊस महाराष्ट्रात साधारणपणे जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात हजेरी लावतो. या पवासावरच खरीप हंगामाचे चित्र अवलंबून असते. चांगल्या पावसाची आशा आहे. - सुनील बोरकर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, सातारा --संडे स्पेशल मुलाखत

ठळक मुद्दे कृषी विभागाची तयारी पूर्ण; शेतकऱ्यांना अडचण नाही...

नितीन काळेल ।महाराष्ट्रात दरवर्षी साधारणपणे जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मान्सूनचे आगमन होते. त्यापूर्वी वळवाचा व मान्सून पूर्व पाऊस होतो. मात्र, यंदा अद्यापही वळवाचा एकही पाऊस झालेला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांत चिंता निर्माण होऊ शकते. पण, मान्सून एकदा सुरू झाला की शेतकºयांची चिंता दूर होण्यास मदत होईल. कृषी विभागानेही खरीप हंगामाची पूर्ण तयारी केलीय. शेतकºयांना बी बियाणे, खते तसेच इतर कोठेही अडचण येणार नाही हे पाहिले आहे.

प्रश्न : जिल्ह्यातील खरीप हंगामाची स्थिती काय राहील ?उत्तर : जिल्ह्यात यावर्षी खरीप हंगामाचे सर्वसाधारण क्षेत्र ३ लाख ५२ हजार हेक्टर राहणार आहे. त्यासाठी कृषी विभागाने पूर्ण तयारी केली आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार यावर्षी मान्सूनचे आगमन काही दिवस लांबणार आहे. पण, शेतकºयांनी चिंता करण्याचे कारण नाही. पाऊस जवळपास १०० टक्के पडण्याची शक्यता आहे. मान्सून आठ-दहा दिवस लांबल्याने काही फरक पडणार नाही.

प्रश्न : बीयाणे आणि खतांचे नियोजन केले आहे का ?उत्तर : जिल्ह्यात खरीप हंगाम सर्वत्रच घेण्यात येतो. पूर्व भागात बाजरीची पेरणी अधिक होते. त्यासाठी बी- बियाण्यांची उपलब्धता आहे. ४८ हजार ५९२ क्विंटल बियाणे आणि १ लाख ३० हजार मेट्रीक टन खताची उपलब्धता लागणार आहे. बियाणे व खताचीही कमतरता भासणार नाही.

प्रश्न : खरीपासाठी विशेष काय उपाययोजना आहेत ?उत्तर : जिल्ह्यातील शेतकºयांच्यादृष्टीने खरीप हंगाम महत्वाचा असतो. शेती उत्पादन अधिक कसे वाढेल हे पाहिले जाईल. त्यासाठी कृषी विभाग सज्ज आहे.आढावा बैठकाखरीप हंगामाच्या दृष्टीने जिल्ह्यात आतापर्यंत अनेक ठिकाणी आढावा बैठका झाल्या आहेत. पालकमंत्र्यांच्या उपस्थिततही आढावा घेण्यात आलाय. कृषी सेवक केंद्र चालकांचीही कार्यशाळा घेण्यात आली आहे. त्यामुळे खरीप हंगामाच्यादृष्टीने पूर्णपणे नियोजन झालेले आहे. 

गुणवत्तापूर्ण बीखरीप हंगामात शेतकºयांना गुणवत्तापूर्ण बियाणे मिळतील याकडे कृषी विभागाचा कटाक्ष राहील. त्यासाठी भरारी पथके स्थापन करण्यात आली आहेत. ही पथके बियाण्यांची तपासणी करणार आहेत. 

सोयाबीन क्षेत्रजिल्ह्यात खरीप हंगामातील ज्वारीचे क्षेत्र कमी होत आहे. त्या तुलनेत सोयाबीनच्या क्षेत्रात वाढ होऊ लागलीय. सोयाबीन पीक शेतकºयांना परवडत असल्याचे दिसते.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरagricultureशेती