शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
2
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
3
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
4
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
5
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
6
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
7
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
8
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट
9
Aadhaar: आधार कार्डावरील एका चुकीमुळे मोफत राशन आणि पीएफचे पैसे मिळणार नाहीत!
10
इंस्टाग्रामवर फॉलोअर्स वाढवायचेत? 'या' टिप्स येतील कामी; धडाधड वाढतील व्ह्यूज, प्रोफाईलही दिसेल वेगळे 
11
Parth Pawar Land Scam Pune: नवी माहिती! पार्थ पवारांनी सहीचे अधिकार दिले होते दिग्विजय पाटलांना, ठराव समोर आल्यानं वेगळं वळण
12
'मै हूँ ना'मध्ये असती 'ही' अभिनेत्री, शूटिंगच्या दोन आठवड्यांपूर्वी सोडलेला सिनेमा; फराह खानचा खुलासा
13
संतापजनक! लहान मुलांना कागदाच्या तुकड्यांवर दिलं मध्यान्ह भोजन, Video पाहून बसेल धक्का
14
'सोन्याची आहे की चंद्रावरून आणलीत?'; प्राडाच्या सेफ्टी पिनचा सोशल मीडियावर धुमाकूळ! किंमत किती?
15
सेन्सेक्स-निफ्टी लाल रंगात बंद! 'या' सेक्टरमध्ये सर्वाधिक घसरण, पण PSU बँकांमध्ये मोठी तेजी!
16
आता घरबसल्या पाहा 'आरपार', ललित प्रभाकर-हृता दुर्गुळेचा रोमँटिक सिनेमा ओटीटीवर रिलीज
17
पार्थ पवारांना डेटा सेंटर म्हणून एवढी मोठी सूट मिळाली, पण...; पुण्यातील जमीन घोटाळ्यात मोठी माहिती समोर
18
'या' सरकारी बॉन्डने ८ वर्षांत दिला तब्बल ३१६% परतावा; मॅच्युरिटीवर मिळतोय 'टॅक्स फ्री' नफा!
19
अंपायरच्या लेकीसाठी ICC नं नियम बदलला? प्रतीकाच्या गळ्यात झळकला विश्वविजेतेपदाचा 'दागिना'
20
Smartphone Hacking : व्हॉट्सअ‍ॅपवर RTOचा मेसेज आला? चुकूनही त्यावर क्लिक करू नका! नाहीतर...

खरीपासाठी मान्सूनचे आगमन महत्वाचे-- सुनील बोरकर , चर्चेतील व्यक्तिशी थेट संवाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2019 22:00 IST

मान्सूनचा पाऊस महाराष्ट्रात साधारणपणे जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात हजेरी लावतो. या पवासावरच खरीप हंगामाचे चित्र अवलंबून असते. चांगल्या पावसाची आशा आहे. - सुनील बोरकर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, सातारा --संडे स्पेशल मुलाखत

ठळक मुद्दे कृषी विभागाची तयारी पूर्ण; शेतकऱ्यांना अडचण नाही...

नितीन काळेल ।महाराष्ट्रात दरवर्षी साधारणपणे जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मान्सूनचे आगमन होते. त्यापूर्वी वळवाचा व मान्सून पूर्व पाऊस होतो. मात्र, यंदा अद्यापही वळवाचा एकही पाऊस झालेला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांत चिंता निर्माण होऊ शकते. पण, मान्सून एकदा सुरू झाला की शेतकºयांची चिंता दूर होण्यास मदत होईल. कृषी विभागानेही खरीप हंगामाची पूर्ण तयारी केलीय. शेतकºयांना बी बियाणे, खते तसेच इतर कोठेही अडचण येणार नाही हे पाहिले आहे.

प्रश्न : जिल्ह्यातील खरीप हंगामाची स्थिती काय राहील ?उत्तर : जिल्ह्यात यावर्षी खरीप हंगामाचे सर्वसाधारण क्षेत्र ३ लाख ५२ हजार हेक्टर राहणार आहे. त्यासाठी कृषी विभागाने पूर्ण तयारी केली आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार यावर्षी मान्सूनचे आगमन काही दिवस लांबणार आहे. पण, शेतकºयांनी चिंता करण्याचे कारण नाही. पाऊस जवळपास १०० टक्के पडण्याची शक्यता आहे. मान्सून आठ-दहा दिवस लांबल्याने काही फरक पडणार नाही.

प्रश्न : बीयाणे आणि खतांचे नियोजन केले आहे का ?उत्तर : जिल्ह्यात खरीप हंगाम सर्वत्रच घेण्यात येतो. पूर्व भागात बाजरीची पेरणी अधिक होते. त्यासाठी बी- बियाण्यांची उपलब्धता आहे. ४८ हजार ५९२ क्विंटल बियाणे आणि १ लाख ३० हजार मेट्रीक टन खताची उपलब्धता लागणार आहे. बियाणे व खताचीही कमतरता भासणार नाही.

प्रश्न : खरीपासाठी विशेष काय उपाययोजना आहेत ?उत्तर : जिल्ह्यातील शेतकºयांच्यादृष्टीने खरीप हंगाम महत्वाचा असतो. शेती उत्पादन अधिक कसे वाढेल हे पाहिले जाईल. त्यासाठी कृषी विभाग सज्ज आहे.आढावा बैठकाखरीप हंगामाच्या दृष्टीने जिल्ह्यात आतापर्यंत अनेक ठिकाणी आढावा बैठका झाल्या आहेत. पालकमंत्र्यांच्या उपस्थिततही आढावा घेण्यात आलाय. कृषी सेवक केंद्र चालकांचीही कार्यशाळा घेण्यात आली आहे. त्यामुळे खरीप हंगामाच्यादृष्टीने पूर्णपणे नियोजन झालेले आहे. 

गुणवत्तापूर्ण बीखरीप हंगामात शेतकºयांना गुणवत्तापूर्ण बियाणे मिळतील याकडे कृषी विभागाचा कटाक्ष राहील. त्यासाठी भरारी पथके स्थापन करण्यात आली आहेत. ही पथके बियाण्यांची तपासणी करणार आहेत. 

सोयाबीन क्षेत्रजिल्ह्यात खरीप हंगामातील ज्वारीचे क्षेत्र कमी होत आहे. त्या तुलनेत सोयाबीनच्या क्षेत्रात वाढ होऊ लागलीय. सोयाबीन पीक शेतकºयांना परवडत असल्याचे दिसते.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरagricultureशेती