शहरं
Join us  
Trending Stories
1
"सात भारतीय विमानं पाडली...!"; संयुक्त राष्ट्रांच्या मंचावर खोटारड्या शाहबाज शरीफ यांची नुसती 'फेका-फेक'
2
फुल-ऑन ड्रामा! संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत नेतन्याहू भाषणाला येताच अनेक देशांचं 'वॉकआउट'
3
अभिषेक शर्माचा महारेकॉर्ड! T20 आशिया कप स्पर्धेत ३०९ धावांसह पाकच्या रिझवानला दिली 'धोबीपछाड'
4
आशिया कप फायनल आधी ICC कडून सूर्यकुमार यादव याच्यावर कारवाई; PCB नं केली होती तक्रार
5
"त्या डोंगरेला निलंबित करा, माझं नाव खराब करता"; वाहतूक कोंडीवरुन एकनाथ शिंदे अधिकाऱ्यांवर संतापले
6
अग्निशमन दलाचे जवान घरात घुसताच सिलिंडरचा स्फोट; फ्लॅटमध्ये लागलेल्या आगीत मुलाचा मृत्यू, ५ जण जखमी
7
ठरलं, ८-९ ऑक्टोबरला PM मोदी महाराष्ट्रात येणार; CM फडणवीस म्हणाले, “नवी मुंबई विमानतळ...”
8
“राऊतांनी खासदारकीचा एक महिन्याचा पगार दिला असता तर आभार मानले असते”; कुणी केली खोचक टीका?
9
"रशियन सैन्यात जावू नका, तुमच्या जीवाला धोका"; सरकारने दिला इशारा, म्हणाले, "२७ भारतीय..."
10
या एसयूव्हीचं फक्त नावच काफी...! विक्रीच्या बाबतीत पुन्हा ठरली नंबर-1; 38% मार्केट केला एकटीनं 'कॅप्चर'
11
भारताच्या दिग्गज डिफेंस कंपनीला थेट इस्रायलमधून मिळाली मोठी ऑर्डर, अशी आहे शअरची स्थिती
12
VIDEO: बापरे... चिमुरड्याने बसल्या बैठकीला कचाकचा खाल्ल्या हिरव्या मिरच्या, नेटकरीही थक्क
13
कोण आहेत अरुणाचल प्रदेशात पंतप्रधान मोदींचं स्वागत करणाऱ्या या 'डॅशिंग' IAS अधिकारी? सोशल मीडियावर होतायत व्हायरल!
14
“६०० कोटींचा फंड, लोक मरत होते, पण एक पैसा खर्च केला नाही”; CM फडणवीसांचा ठाकरेंवर हल्लाबोल
15
MPSC Exam 2025: विद्यार्थ्यांच्या मागणीला यश, एमपीएससी परीक्षा पुढे ढकलली! आयोगाकडून नवीन तारीख जाहीर
16
IND vs PAK : भारत-पाक लढाई अन् 'गन' सेलिब्रेशनचा वाद! पाकिस्तानी फलंदाजानं घेतलं धोनी-कोहलीचं नाव
17
'मोदी-पुतीन यांच्यात चर्चा नाही, नाटो प्रमुख खोटं बोलताहेत'; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटलं, "बोलताना जरा..."
18
सोयाबीन शेतकऱ्यांना प्रतिहेक्टरी ५० हजार मदत द्या; विजय वडेट्टीवारांचे कृषिमंत्र्यांना पत्र
19
"मंत्र्यांच्या दौऱ्यामुळे सरकारचे पंचनाम्याऐवजी राजशिष्टाचाराकडे लक्ष"; शरद पवारांनी शासनाला दिला सल्ला
20
VIDEO: पाकिस्तानच्या मंत्र्यांची 'आंतरराष्ट्रीय' फजिती, AI वर भाषण देताना अनेक उच्चार चुकले

आपत्ती मोदी निर्मित!

By admin | Updated: December 26, 2016 23:52 IST

पृथ्वीराज चव्हाण : नोटाबंदीच्या विरोधात साताऱ्यात काँग्रेसची निदर्शने

सातारा : ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटाबंदीचा निर्णय घेतल्यानंतर तो सर्व विचार करूनच घेतला असेल, अशी अपेक्षा ठेवून काँगे्रसने या निर्णयाला पाठिंबा दिला होता, पण सरकारने नोटाबंदी करताना कोणतीच पूर्वतयारी केली नव्हती, हे आता स्पष्ट झाले असून, ४८ दिवसांपासून संपूर्ण भारतीय जनतेला मोदींनी वेठीस धरल्याचे पुढे आले आहे. नोटाबंदी ही मोदी निर्मित आपत्ती आहे,’ अशी टीका माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत केली. आ. चव्हाण म्हणाले, ‘८ नोव्हेंबर रोजी पंतप्रधानांनी नोटाबंदीची घोषणा केली. पाकिस्तानातून येणाऱ्या बनावट नोटा रोखायच्या, आतंकवाद संपवायचा, काळा पैसा बाहेर काढायचा, भ्रष्टाचारविरोधातील व्यापक मोहीम पुढे न्यायची, असे पंतप्रधानांनी या निर्णयाचे स्पष्टीकरण करताना सांगितले होते. देशाचे व्यापक हीत लक्षात घेऊन काँगे्रसने त्यांच्या निर्णयाला ९ नोव्हेंबर रोजी पाठिंबा दर्शविला. मात्र, सरकारचा हेतू साफ नसल्याचे पुढे आल्याने काँगे्रसने सरकारचा निषेध करणे सुरू केले आहे.’ सरकारने पाचशे, हजारांच्या नोटा चलनातून बाद ठरविल्या. त्याचवेळी ८६.४ टक्के चलन बाद झाले. मात्र, ते बाद ठरवित असताना कोणतीही पूर्वतयारी केली नाही. रिझर्व्ह बँकेचे तत्कालीन गव्हर्नर रघुराम राजन यांनी पाचशे रुपयांचे चलन बंद करण्याला विरोध दर्शविला होता, त्यामुळे त्यांना बाजूला करून ऊर्जित पटेल यांना मोदी सरकारने आणून बसविले. डायनिंग टेबलचे पाच पाय काढून एका पायावर त्याला उभे करावे, अशी अवस्था मोदींनी हटवादीपणे देशाच्या अर्थव्यवस्थेची करून ठेवली. शरीरातलं ८६ टक्के रक्त काढल्यानंतर जे होते, तीच परिस्थिती सध्या अर्थव्यवस्थेची होऊन बसली आहे,’अशी टीकाही आ. चव्हाण यांनी यावेळी केली. काँग्रेसने पूर्ण पुराव्यानिशी सहारा, बिर्ला गु्रपने मोदी यांना कोट्यवधी रुपये दिल्याचा आरोप केला होता; पण यापैकी एकाही आरोपाचे खंडण मोदींनी केले नाही. अर्थमंत्री अरुण जेटली यांनाही नोटाबंदीचा निर्णय होणार आहे, याची सूतराम कल्पना नव्हती, एखाद्या हुकूमशहाप्रमाणे मोदींनी हा निर्णय जाहीर करून टाकला. एटीएमवर रात्री अपरात्रीपर्यंत पैसे काढण्यासाठी लोकांना ताटकळत ठेवले. अहमदाबाद जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या खात्यात पाचशे कोटी रुपये जमा झाले. या बँकेचे भाजप अध्यक्ष अमित शहा संचालक आहेत. ज्या लोकांकडे नव्या नोटा सापडल्या तेही भाजपशी संबंधित लोक आहेत. या निर्णयाचे गौडबंगाल जनतेपुढे येण्यासाठी संसदीय समिती नेमून त्यामार्फत चौकशी करण्यात यावी. दोषींवर कठोर कारवाई झाली पाहिजे. दरम्यान, मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक येथील मेट्रोला मी मुख्यमंत्री असताना ११ फेब्रुवारी २०१४ रोजी एकाच दिवशी मान्यता दिली होती. त्यानंतर लोकसभा व विधानसभा निवडणूक लागली. आमचे सरकार सत्तेपासून दूर गेले. मात्र, मे २०१४ पासून या प्रकल्पाचे भूमिपूजन भाजपने जाणीवपूर्वक रखडवले. पुणे महानगरपालिकेची निवडणूक डोळ्यापुढे ठेवून भूमिपूजनाचा सरकार खटाटोप करत असल्यानेच मी स्वत: काँगे्रसच्या वतीने या प्रकल्पाचे भूमिपूजन केले, असेही आ. चव्हाण यांनी स्पष्ट केले. मोदींच्या निर्णयानंतर शेतकऱ्यांसह सर्वसामान्य जनतेची अक्षरश: होरपळ सुरू आहे. साधा धनादेश लिहिता येत नाही, असे असंख्य लोक भारतात आहेत. नोटाबंदीचा निर्णय अंगलट येत असल्याचे लक्षात आल्यावर मोदींनी कॅशलेस व्यवहार करण्याचा सल्ला देणे सुरू केले आहे. यावेळी काँगे्रसचे जिल्हाध्यक्ष आनंदराव पाटील, पक्षनिरीक्षक अभय छाजेड, तोफिक मुलाणी, शहराध्यक्ष रवींद्र झुटिंग यांची उपस्थिती होती. लोकांना शॉक देण्याचा मोदींचा हेतू ‘तत्कालीन गव्हर्नर रघुराम जी राजन यांनी पाचशे रुपयांचे चलन न बंद करण्याचे सांगितले होते; पण पाचशेच्या नोटेला हात घालून लोकांना शॉक द्यायचा आहे, असे स्पष्टीकरण मोदी यांनी त्यावेळी केले होते,’ असेही आ. चव्हाण यांनी सांगितले. मोदींविरोधात निदर्शने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटाबंदीचा घेतलेला निर्णय अत्यंत चुकीचा असून सामान्य जनतेला वेठीस धरण्यात आल्याचा आरोप करत आ.पृथ्वीराज चव्हाण, आ. आनंदराव पाटील, राहुल घाडगे, रवींद्र झुटिंग यांच्यासह इतर पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी काँगे्रस कमिटीबाहेर निदर्शने केली. शिंदे खोटे बोलतात साताऱ्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तुम्ही होऊ दिले नाही, असा आरोप आमदार शशिकांत शिंदे यांनी केला आहे, या प्रश्नावर बोलताना आमदार पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, ‘साताऱ्यासह राज्यातील इतर जिल्ह्यांतील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांच्या प्रस्तावाला मी मंजुरी दिली होती. मी खावली, ता. सातारा येथील शासनाची जागा या महाविद्यालयासाठी निवडली होती. परंतु कृष्णानगर येथील पाटबंधारे विभागाची जागा उपलब्ध करुन देता येईल, असे तत्कालीन जलसंपदा मंत्री आमदार शशिकांत शिंदे यांनी वचन दिले. मात्र, वैद्यकीय महाविद्यालयाचा प्रस्ताव मंजूर झाला होता. त्यात जलसंपदा खात्याला इमारत बांधून देण्याचे प्रस्तावित नव्हते. तो खर्च करावा, अशी त्यांची मागणी होती. त्यांच्यामुळेच हा प्रस्ताव थांबला, मात्र शिंदे सरसरळ खोटे बोलत आहे,’ अशी टीका आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी केली.