शहरं
Join us  
Trending Stories
1
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
2
"आता टॅरिफ माझा 5वा आवडता शब्द...!"; असं का म्हणाले डोनाल्ड ट्रम्प? अमेरिकेसाठी केली मोठी घोषणा
3
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
4
Google नं पहिल्यांदाच आणलं क्रेडिट कार्ड, लगेच मिळणार कॅशबॅक आणि रिवॉर्ड; काय आहे खास?
5
Mumbai Crime: शीतपेयातून गुंगीचा पदार्थ, मुंबईत अल्पवयीन मुलींवर ४५ वर्षाच्या व्यक्तीने...; व्हिडीओही बनवला
6
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
7
Tarot Card: 'ऐकावे जनाचे, करावे मनाचे' याची प्रचिती देणारा आठवडा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य 
8
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
9
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
10
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
11
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
12
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
13
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
14
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
15
"पहिल्यांदाच लेकाला सोडून शहराबाहेर आलोय..." विकी कौशलची भावुक प्रतिक्रिया
16
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
17
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
18
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
19
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
20
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

मिरगाव टँकरमुक्तीच्या वाटेवर!

By admin | Updated: February 3, 2015 23:53 IST

जिल्हाधिकारी : जिल्ह्यातील २0३ गावांसाठी ४९२.७२ कोटींचा आराखडा

सातारा : फलटण तालुक्यातील मिरगाव अवघ्या १५ दिवसांत टँकरमुक्तीच्या दिशेने वाटचाल करीत आहे. त्याच धर्तीवर लोकप्रतिनिधींना विश्वासात घेऊन तलावांच्या दुरुस्तीसाठी प्राधान्यक्रम ठरवा, अशा सूचना जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी दिल्या आहेत.जलयुक्त शिवार अभियानांतर्गत जिल्हास्तरीय समितीची बैठक सोमवारी (दि. २ फेब्रुवारी) जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. यावेळी ते बोलत होते. या बैठकीला मुख्य कार्यकारी अधिकारी जी. श्रीकांत, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी तानाजी कोहिनकर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी जितेंद्र शिंदे, रोजगार हमी योजनेचे उपजिल्हाधिकारी पराग सोमण, डॉ. अविनाश पोळ आदी उपस्थित होते. या बैठकीत जिल्ह्यातील २0३ गावांसाठी ४९२.७२ कोटींच्या आराखड्यास मंजुरी देण्यात आली. जिल्हाधिकारी म्हणाले, ‘फलटण तालुक्यातील मिरगाव हे पारंपरिक टंचाईग्रस्त गाव होते. या गावामध्ये लोकसहभागातून बंंधारा बांधण्यात आला. या बंधाऱ्यामध्ये धोम-बलकवडी कॅनॉलचे पाणी सोडण्यात आले. त्यामुळे गावातील पाणीपुरवठा करणारी विहिरीचे पुनर्भरण झाले. या विहिरीतील पाण्याच्या पातळीत ४ मीटरने वाढ झाली. त्याचबरोबर आजूबाजूची विंधन विहिरीचेही पुनर्भरण झाले. याच धर्तीवर पहिल्या टप्प्यामध्ये यांत्रिकी विभागाच्या मदतीने १00 पाझर तलावांचे गाळ काढणे व दुरुस्ती व उर्वरित १00 पाझर तलाव लोकसहभागातून दुरुस्ती व गाळ काढणे, अशी कामे करायची आहेत. यासाठी लोकप्रतिनिधींना विश्वासात घेऊन प्राधान्यक्रम ठरवावा.’ हा विशेष कार्यक्रम आपल्याला हाती घ्यायचा आहे. विविध कॅनॉलच्या परिसरात असणाऱ्या सामाजिक संस्था, उद्योजकांना पत्र पाठवून कॅनॉलच्या दुरुस्तीबाबत, गाळ काढण्याबाबत त्यांचा सक्रीय सहभाग नोंदविण्याबाबत आवाहन करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. प्रत्येक ग्रामसभेच्या अजेंड्यावर जल अंदाजपत्रक असावे. तसेच जलयुक्त शिवार अभियानाचा आराखडा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात यावा, अशी सूचना मुख्य कार्यकारी अधिकारी जी. श्रीकांत यांनी मांडली. जलयुक्त शिवार समितीतील इतर सदस्यांनीही यावेळी आपली मते मांडली. (प्रतिनिधी)जिल्हा प्रशासनाने कंबर कसलीदर महिन्याला जलयुक्त शिवार अभियानाची माहिती देणारे बातमीपत्र जिल्हा परिषदेच्या माध्यमातून प्रकाशित करण्यात येईल. यामध्ये या अभियानाबाबत असणारे शासन निर्णय, लोकसहभागातून झालेली कामे, झालेल्या कामांची माहिती, यशोगाथा, विविध वर्तमानपत्रांतून प्रसिध्द झालेल्या बातम्यांबाबत लेख, शेतकरी, सरपंच यांची मनोगते आणि उद्दिष्ट दिलेल्या २१५ गावांची यादी यांचा समावेश यामध्ये असेल, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, जलयुक्त शिवार अभियानासाठी जिल्हा प्रशासनाने कंबर कसली आहे. यासाठी शेतकऱ्यांच्या सहभागाची आवश्यकता आहे. सामाजिक संघटनानाही यात सहभाग घेऊ शकतात.