शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
2
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
3
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
4
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल
5
अमेरिकेचा डबल गेम! आधी इराणवर हल्ला, निर्बंध लादले; आता करणार ३० बिलियन डॉलर्सची मदत
6
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
7
जामीन मिळाल्यानंतरही तरुंगातच राहिला आरोपी; आता सरकार देणार 'इतकी' नुकसान भरपाई!
8
ठाकरे बंधूंसोबत मराठी भाषिकांच्या मोर्चात शरद पवारांची राष्ट्रवादीही सहभागी होणार
9
पाकिस्तानने अखेर लायकी दाखवली; भारतीय सीमेजवळ पुन्हा उभारतोय दहशतवादी छावण्या
10
३४५ राजकीय पक्षांवर टांगती तलवार, निवडणूक आयोग नोंदणी रद्द करणार; वाचा सविस्तर
11
समुद्री महामार्गावर भीषण अपघात! मर्सिडीजने तीनवेळी पलटी मारली; नाशिकच्या उद्योजगाचा मृत्यू
12
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
13
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
14
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
15
T20I Powerplay New Rule : आता असा ठरवण्यात येणार 'पॉवर प्ले'चा खेळ! जाणून घ्या नवा नियम
16
Astrology: जूनचा शेवट 'या' पाच राशींसाठी तापदायक; वाढणार समस्या, होणार आर्थिक नुकसान!
17
"तिला परत त्या असुरक्षित वातावरणात ढकललंच नाही पाहिजे...", हुंडाबळी प्रकरणावर नेहा शितोळे स्पष्टच बोलली
18
'राजा रघुवंशी याचे आणखी एक प्रेमसंबंध होते'; महिलेने केला मोठा दावा, हत्या प्रकरणी नवा ट्विस्ट
19
हा माणूस आहे की पैसे छपाईची मशिन...२ हजार कोटी पगार, ५2८ कोटी बोनस; रोनाल्डोला काय काय मिळणार?
20
Video: पाकिस्तानच्या नदीला अचानक पूर आला; फिरायला गेलेले एकाच कुटुंबातील १८ जण वाहून गेले

मिरगाव टँकरमुक्तीच्या वाटेवर!

By admin | Updated: February 3, 2015 23:53 IST

जिल्हाधिकारी : जिल्ह्यातील २0३ गावांसाठी ४९२.७२ कोटींचा आराखडा

सातारा : फलटण तालुक्यातील मिरगाव अवघ्या १५ दिवसांत टँकरमुक्तीच्या दिशेने वाटचाल करीत आहे. त्याच धर्तीवर लोकप्रतिनिधींना विश्वासात घेऊन तलावांच्या दुरुस्तीसाठी प्राधान्यक्रम ठरवा, अशा सूचना जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी दिल्या आहेत.जलयुक्त शिवार अभियानांतर्गत जिल्हास्तरीय समितीची बैठक सोमवारी (दि. २ फेब्रुवारी) जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. यावेळी ते बोलत होते. या बैठकीला मुख्य कार्यकारी अधिकारी जी. श्रीकांत, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी तानाजी कोहिनकर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी जितेंद्र शिंदे, रोजगार हमी योजनेचे उपजिल्हाधिकारी पराग सोमण, डॉ. अविनाश पोळ आदी उपस्थित होते. या बैठकीत जिल्ह्यातील २0३ गावांसाठी ४९२.७२ कोटींच्या आराखड्यास मंजुरी देण्यात आली. जिल्हाधिकारी म्हणाले, ‘फलटण तालुक्यातील मिरगाव हे पारंपरिक टंचाईग्रस्त गाव होते. या गावामध्ये लोकसहभागातून बंंधारा बांधण्यात आला. या बंधाऱ्यामध्ये धोम-बलकवडी कॅनॉलचे पाणी सोडण्यात आले. त्यामुळे गावातील पाणीपुरवठा करणारी विहिरीचे पुनर्भरण झाले. या विहिरीतील पाण्याच्या पातळीत ४ मीटरने वाढ झाली. त्याचबरोबर आजूबाजूची विंधन विहिरीचेही पुनर्भरण झाले. याच धर्तीवर पहिल्या टप्प्यामध्ये यांत्रिकी विभागाच्या मदतीने १00 पाझर तलावांचे गाळ काढणे व दुरुस्ती व उर्वरित १00 पाझर तलाव लोकसहभागातून दुरुस्ती व गाळ काढणे, अशी कामे करायची आहेत. यासाठी लोकप्रतिनिधींना विश्वासात घेऊन प्राधान्यक्रम ठरवावा.’ हा विशेष कार्यक्रम आपल्याला हाती घ्यायचा आहे. विविध कॅनॉलच्या परिसरात असणाऱ्या सामाजिक संस्था, उद्योजकांना पत्र पाठवून कॅनॉलच्या दुरुस्तीबाबत, गाळ काढण्याबाबत त्यांचा सक्रीय सहभाग नोंदविण्याबाबत आवाहन करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. प्रत्येक ग्रामसभेच्या अजेंड्यावर जल अंदाजपत्रक असावे. तसेच जलयुक्त शिवार अभियानाचा आराखडा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात यावा, अशी सूचना मुख्य कार्यकारी अधिकारी जी. श्रीकांत यांनी मांडली. जलयुक्त शिवार समितीतील इतर सदस्यांनीही यावेळी आपली मते मांडली. (प्रतिनिधी)जिल्हा प्रशासनाने कंबर कसलीदर महिन्याला जलयुक्त शिवार अभियानाची माहिती देणारे बातमीपत्र जिल्हा परिषदेच्या माध्यमातून प्रकाशित करण्यात येईल. यामध्ये या अभियानाबाबत असणारे शासन निर्णय, लोकसहभागातून झालेली कामे, झालेल्या कामांची माहिती, यशोगाथा, विविध वर्तमानपत्रांतून प्रसिध्द झालेल्या बातम्यांबाबत लेख, शेतकरी, सरपंच यांची मनोगते आणि उद्दिष्ट दिलेल्या २१५ गावांची यादी यांचा समावेश यामध्ये असेल, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, जलयुक्त शिवार अभियानासाठी जिल्हा प्रशासनाने कंबर कसली आहे. यासाठी शेतकऱ्यांच्या सहभागाची आवश्यकता आहे. सामाजिक संघटनानाही यात सहभाग घेऊ शकतात.