शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
4
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
5
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
6
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
7
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
8
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
9
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
10
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
11
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
12
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
13
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
14
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
15
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
16
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
17
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
18
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
19
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
20
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू

चाफळ विभागात पिकावर लष्करी अळीचा हल्ला!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2021 04:41 IST

चाफळ : चाफळसह विभागात हायब्रीड पिकांवर पाने खाणाऱ्या लष्करी अळीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण ...

चाफळ : चाफळसह विभागात हायब्रीड पिकांवर पाने खाणाऱ्या लष्करी अळीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. कृषी विभागाने पाहणी करून शेतकऱ्यांना मार्गदर्शन करावे, अशी मागणी चाफळसह परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, संपूर्ण चाफळ विभागातील चाफळसह गमेवाडी, माजगाव, डेरवण, वाघजाईवाडी, जाळगेवाडी, केळोली, शिंगणवाडी, नाणेगाव, खराडवाडी आदी ठिकाणी मोठ्या प्रमाणात हायब्रीडचे पीक घेतले जाते. यावर्षी विभागात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतीचे बांध फुटून शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तर काही ठिकाणी उगवण झालेले हायब्रीड पीक जोमात आले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त होत असतानाच पाने खाणाऱ्या लष्करी अळीचा प्रादुर्भाव जाणवू लागल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. कोळपणीसह भांगलणीचा एक हात मारल्याने व वेळेत पडणाऱ्या पावसामुळे विभागात यावर्षी काही ठिकाणी पिके जोमात आहेत. परंतु, नेहमीच निसर्गाची अवकृपा सहन करावी लागत आहे. सध्या बळीराजाच्या हायब्रीड पिकांवर लष्कर अळीने हल्ला चढवल्याने विभागातील बळीराजाच्या चिंतेत वाढ झाली आहे. कृषी विभागाने पाहणी करून शेतकऱ्यांना मार्गदर्शन करावे, अशी मागणी विभागातील शेतकऱ्यांमधून होत आहे.

कोट..

यावर्षी अतिवृष्टीतून पिके वाचल्यानंतर बळीराजा हळूहळू सावरू लागला आहे. यातच सध्या हायब्रीड पिकावर लष्करी अळीने हल्लाबोल केल्याने चिंता वाढली आहे. कृषी विभागाने पाहणी करून शेतकऱ्यांना मार्गदर्शन करावे.

- दादासो पवार, शेतकरी, शिंगणवाडी