शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
3
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
4
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
5
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
6
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
7
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
8
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
9
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
10
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
11
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
12
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
13
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
14
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
15
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
16
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
17
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
18
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
19
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
20
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल

पोटाची खळगी भरण्यासाठी माणवासीयांचे स्थलांतर

By admin | Updated: November 23, 2015 00:24 IST

जगण्यासाठी धडपड : मेंढपाळ व्यावसायिक, ऊसतोड मजूर, रंगकाम करणारे गाव सोडू लागले

कुकुडवाड : नुकतीच दिवाळी संपली अन् माण तालुक्यातील स्थलांतराने वेग घेतला आहे. पोटाची खळगी भरण्यासाठी माण तालुक्यातील जनता मोठ्या प्रमाणात धंदा अथवा व्यवसायानिमित्त तालुक्याबाहेर भिन्न ठिकाणी स्थलांतरित होताना दिसत आहे. मेंढपाळ, ऊसतोड कामगार, रंगकाम करणारे गाव सोडू लागले आहेत.माण तालुका हा दुष्काळी तालुका म्हणून ओळखला जातो. माणवासीय जनतेसाठी दुष्काळ हा पाचवीला पुजलेला. तालुक्याचे सरासरी पाऊसमान ४५० मिलीमीटर; मात्र यंदा फक्त ३५० मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे झालेल्या पावसाचे पाणी जमिनीत मुरले नाही. पर्यायाने जमिनीतील पाणीही पातळी वाढली नाही. अनेक ठिकाणी पावसाचे प्रमाण केवळ २५० मिलीमीटर इतकेच आहे.माण तालुक्यातील खरिपाची पिके पावसाअभावी वाया गेली, तर उशिरा झालेल्या अपुऱ्या पावसामुळे रब्बीची पिके हाती लागण्याची शक्यता कमी आहे. कांदा पिकामुळे काही शेतकऱ्यांना चांगले पैसे मिळाले; मात्र त्यासाठी शेतकऱ्यांना बऱ्याच ठिकाणी टँकरने पाणी घालावे लागले. दुसऱ्या बाजूला दराच्या पडझडीमुळे अनेक शेतकऱ्यांना कांदा पिकाने अक्षरश: रडविले. अशा विचित्र अवस्थेत दिवाळीचा सण बहुतांशी माणवासीय जनतेने ओढून-ताणून साजरा केला.दिवाळी झाली अन् माणवासीय जनता आपापल्या सोयीने पोटाची खळगी भरण्यासाठी स्थलांतराच्या तयारीत आहेत. काहीजण स्थलांतराच्या मार्गावर, तर अनेकजण व्यवसाय अथवा धंद्याच्या ठिकाणी पोहोचलेही आहेत. ऊसतोडणी, मेंढपाळ, व्यवसाय व मुंबई, वसई येथेल मातीकाम, रंगकाम हे येथील जनतेचे हक्काचे.पोटापाण्याचे व्यवसाय मेंढपाळ, शेळ्या-मेंढ्यांसह लातूर, बार्शी तसेच मराठवाड्यातील अनेक गावी जातात. जून महिन्यात पाऊस झाल्यानंतरही जनता परत आपल्या गावी येते. या कालावधीत मेंढपाळ करणाऱ्यांना अनेक अडीअडचणींना तोंड द्यावे लागते. प्रसंगी नुकसान ही सोसावे लागते. आपले पशुधन वाचविण्यासाठी येथील जनता गाव व आपले शिवार सोडून परप्रांतात जातात, ही वस्तुस्थिती आहे.ऊसतोडणीसाठी तर माण तालुक्यातील अनेक लोक कुटुंबासह सहा महिने बागायत क्षेत्रात स्थलांतरित होतात. म्हातारी माणसं घर राखण्यासाठी लहान मुलासह गावी राहतात. तर काही लहान मुले, शाळेला दांडी मारून आईबाबासोबत ऊसतोडीला जातात. वळई, बिदळी, पर्यंती, ढाकणी, जांभुळवाडी, कुरणेवाडी, वरकुटे, पानवन, दिवड, पळशी, धामणीसह अनेक गावांतील जनता ऊसतोडणीसाठी वारणा, सह्याद्री, वाळवा तसेच सांगली भागात स्थलांतरित होतात.म्हसवड परिसरातील वीरकरवाडी व इतर वाड्या-वस्त्यांवरील लोक मातीकामानिमित्त वसई (मुंबई) याठिकाणी जातात. तर हिंगणी, हावलदारवाडी, कारखेल, खडकी, संभूखेड परिसरातील अनेक लोक रंगकामानिमित्त मोठ्या प्रमाणात मुंबई येथे काही प्रमाणात बेंगलोर, हैद्राबाद येथे जातात. (वार्ताहर)पाणीप्रश्न सोडविण्याची गरजपोटासाठीव प्राप्त परिस्थितीवर मात करण्यासाठी माणदेशी जनता नोव्हेंबर ते मे महिन्याअखेर इतर प्रांतात स्थलांतरित होतात. या स्थलांतरामुळे प्रामुख्याने मुलांच्या शिक्षणावर विपरित परिणाम होत आहे. माण तालुक्याच्या स्थलांतराला थोपविण्यासाठी येथील जनतेला आपल्या गावात उद्योग व्यवसाय मिळविण्यासाठी माण तालुक्याचा पाणीप्रश्न सोडविणे हा एकमेव उपाय आहे. भविष्यात त्यादृष्टीने उपाययोजना होणे ही काळाची गरज आहे.