शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत यांची प्रकृती बिघडली; रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचार सुरू
2
मुंबईत दीड कोटी अमराठी, त्यांच्याशी‌ बोलताना हिंदी हवी की नको; चंद्रकांत पाटील यांचं विधान
3
“उद्या दुपारी १२ वाजता या, अंतरवाली सराटीतील शेवटची बैठक”; जरांगेंचे मराठा समाजाला आवाहन
4
ENG W vs IND W : स्मृतीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा मोठा विजय; इंग्लंडवर ओढावली नामुष्की
5
"पृथ्वीवर कोणत्याही सीमा दिसत नाहीत, आपण सर्व एक आहोत"; पंतप्रधान मोदींनी साधला शुभांशू शुक्लांशी संवाद
6
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपाची तयारी सुरू; वॉर्डनिहाय आढावा घेणार, संचलन समितीची घोषणा
7
स्मृती मानधनानं पहिल्या टी-20I सेंच्युरीसह रचला इतिहास, असा पराक्रम करणारी ती पहिलीच
8
एअर इंडियाच्या विमानात बसला, दारू प्यायला अन् महिला कर्मचाऱ्यासोबत... ; लँडिंग होताच प्रवासी पोलिसांच्या ताब्यात!
9
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
10
भारताचा बांगलादेशला मोठा झटका, 'या' गोष्टीवर घातली बंदी! का घेतला मोठा निर्णय?
11
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
12
आता आणखी कोण? काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसायची चिन्हे
13
पैसे तयार ठेवा! लवकरच येणार Meesho चा IPO, काय आहे कंपनीचा प्लान? पाहा डिटेल्स 
14
मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार! काय आहे कारण? जाणून घ्या...
15
“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार
16
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका
17
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!
18
महायुती सरकारमध्ये मतभेद! पाचवीपर्यंत हिंदी नको, अजित पवार गटाने मांडली पक्षाची भूमिका
19
पाणी अंगावर उडाले म्हणून कोयता घेऊन धावला; छत्रपती संभाजीनगरात नशेखोराचा धुमाकूळ
20
Shefali Jariwala Funeral: शेफालीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, पती पराग त्यागीची रडून वाईट अवस्था, भावुक करणारा व्हिडिओ

पोटाची खळगी भरण्यासाठी माणवासीयांचे स्थलांतर

By admin | Updated: November 23, 2015 00:24 IST

जगण्यासाठी धडपड : मेंढपाळ व्यावसायिक, ऊसतोड मजूर, रंगकाम करणारे गाव सोडू लागले

कुकुडवाड : नुकतीच दिवाळी संपली अन् माण तालुक्यातील स्थलांतराने वेग घेतला आहे. पोटाची खळगी भरण्यासाठी माण तालुक्यातील जनता मोठ्या प्रमाणात धंदा अथवा व्यवसायानिमित्त तालुक्याबाहेर भिन्न ठिकाणी स्थलांतरित होताना दिसत आहे. मेंढपाळ, ऊसतोड कामगार, रंगकाम करणारे गाव सोडू लागले आहेत.माण तालुका हा दुष्काळी तालुका म्हणून ओळखला जातो. माणवासीय जनतेसाठी दुष्काळ हा पाचवीला पुजलेला. तालुक्याचे सरासरी पाऊसमान ४५० मिलीमीटर; मात्र यंदा फक्त ३५० मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे झालेल्या पावसाचे पाणी जमिनीत मुरले नाही. पर्यायाने जमिनीतील पाणीही पातळी वाढली नाही. अनेक ठिकाणी पावसाचे प्रमाण केवळ २५० मिलीमीटर इतकेच आहे.माण तालुक्यातील खरिपाची पिके पावसाअभावी वाया गेली, तर उशिरा झालेल्या अपुऱ्या पावसामुळे रब्बीची पिके हाती लागण्याची शक्यता कमी आहे. कांदा पिकामुळे काही शेतकऱ्यांना चांगले पैसे मिळाले; मात्र त्यासाठी शेतकऱ्यांना बऱ्याच ठिकाणी टँकरने पाणी घालावे लागले. दुसऱ्या बाजूला दराच्या पडझडीमुळे अनेक शेतकऱ्यांना कांदा पिकाने अक्षरश: रडविले. अशा विचित्र अवस्थेत दिवाळीचा सण बहुतांशी माणवासीय जनतेने ओढून-ताणून साजरा केला.दिवाळी झाली अन् माणवासीय जनता आपापल्या सोयीने पोटाची खळगी भरण्यासाठी स्थलांतराच्या तयारीत आहेत. काहीजण स्थलांतराच्या मार्गावर, तर अनेकजण व्यवसाय अथवा धंद्याच्या ठिकाणी पोहोचलेही आहेत. ऊसतोडणी, मेंढपाळ, व्यवसाय व मुंबई, वसई येथेल मातीकाम, रंगकाम हे येथील जनतेचे हक्काचे.पोटापाण्याचे व्यवसाय मेंढपाळ, शेळ्या-मेंढ्यांसह लातूर, बार्शी तसेच मराठवाड्यातील अनेक गावी जातात. जून महिन्यात पाऊस झाल्यानंतरही जनता परत आपल्या गावी येते. या कालावधीत मेंढपाळ करणाऱ्यांना अनेक अडीअडचणींना तोंड द्यावे लागते. प्रसंगी नुकसान ही सोसावे लागते. आपले पशुधन वाचविण्यासाठी येथील जनता गाव व आपले शिवार सोडून परप्रांतात जातात, ही वस्तुस्थिती आहे.ऊसतोडणीसाठी तर माण तालुक्यातील अनेक लोक कुटुंबासह सहा महिने बागायत क्षेत्रात स्थलांतरित होतात. म्हातारी माणसं घर राखण्यासाठी लहान मुलासह गावी राहतात. तर काही लहान मुले, शाळेला दांडी मारून आईबाबासोबत ऊसतोडीला जातात. वळई, बिदळी, पर्यंती, ढाकणी, जांभुळवाडी, कुरणेवाडी, वरकुटे, पानवन, दिवड, पळशी, धामणीसह अनेक गावांतील जनता ऊसतोडणीसाठी वारणा, सह्याद्री, वाळवा तसेच सांगली भागात स्थलांतरित होतात.म्हसवड परिसरातील वीरकरवाडी व इतर वाड्या-वस्त्यांवरील लोक मातीकामानिमित्त वसई (मुंबई) याठिकाणी जातात. तर हिंगणी, हावलदारवाडी, कारखेल, खडकी, संभूखेड परिसरातील अनेक लोक रंगकामानिमित्त मोठ्या प्रमाणात मुंबई येथे काही प्रमाणात बेंगलोर, हैद्राबाद येथे जातात. (वार्ताहर)पाणीप्रश्न सोडविण्याची गरजपोटासाठीव प्राप्त परिस्थितीवर मात करण्यासाठी माणदेशी जनता नोव्हेंबर ते मे महिन्याअखेर इतर प्रांतात स्थलांतरित होतात. या स्थलांतरामुळे प्रामुख्याने मुलांच्या शिक्षणावर विपरित परिणाम होत आहे. माण तालुक्याच्या स्थलांतराला थोपविण्यासाठी येथील जनतेला आपल्या गावात उद्योग व्यवसाय मिळविण्यासाठी माण तालुक्याचा पाणीप्रश्न सोडविणे हा एकमेव उपाय आहे. भविष्यात त्यादृष्टीने उपाययोजना होणे ही काळाची गरज आहे.