शहरं
Join us  
Trending Stories
1
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
2
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
3
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
4
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
5
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
6
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
7
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
8
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
9
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
10
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
11
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
12
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
13
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
14
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
15
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
16
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
17
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
18
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
19
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
20
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन

तांबवे परिसरातील सभासदांना ‘विठ्ठला’ची साद

By admin | Updated: March 12, 2015 00:10 IST

विठ्ठलराव जाधव : तुमची गरज नाही म्हणणाऱ्या अध्यक्षांना धडा शिकवा

तांबवे : ‘तांबवे भागात सभासदांची संख्या मोठी आहे. कारखान्याच्या उभारणीतही या भागाने मोठे योगदान दिले आहे. त्यावेळी इतर कारखान्याच्या तुलनेत ऊसदर कमी मिळत असतानाही सभासदांनी त्याचा विचारही केला नाही. आता मात्र मला तांबवे भागातील सभासदांची गरज नाही असे म्हणणाऱ्या विद्यमान अध्यक्षाला मतपेटीतून धडा शिकवा,’ असे अवाहन कऱ्हाड पंचायत समितीचे उपसभापती विठ्ठलराव जाधव यांनी केले. तांबवे, ता. कऱ्हाड येथे यशवंतराव चव्हाण सह्याद्री शेतकरी पॅनेलच्या प्रचार सभेत ते बोलत होते. यावेळी पॅनेलचे प्रमुख लालासाहेब यादव, युवा नेते धैर्यशील कदम, स्वाभिमानीचे मनोज घोरपडे, बाळासाहेब जाधव, निवासराव पाटील आदींची प्रमुख उपस्थिती होती. जाधव म्हणाले, ‘तांबवे येथील एका उमेदवाराने आम्हाला फसवले. खरेतर माझ्या घरात येवूनच आमच्या पॅनेलमधूनच अर्ज भरला होता. पण त्यांना दुर्बुध्दी सुचली आज ते खुलासा करत असले तरी सुबुध्दी असणारे मतदार त्यांच्या भूलथापांना बळी पडणार नाहीत. या भागाला गेल्या काही वर्षांपासून ऊसतोडणी टोळी देण्याच्या नियोजनता सापत्न वागणूक मिळत आहे. त्यामुळे हे कृत्य करणाऱ्या सत्ताधाऱ्यांच्या टोळीला सभासद चोख उत्तर दिल्याशिवाय राहणार नाहीत.’ धैर्यशील कदम म्हणाले, ‘सह्याद्री कारखान्याचा अध्यक्ष आणि सचिवही घरचाच. ही परिस्थिती आता बदलायला पाहिजे. पंधरा वर्षांत कारखान्यात विस्तारीकरणाच्या नावाखाली शेतकऱ्यांना मोठा आर्थिक भूर्दंड सहन करावा लागला आहे. साधनसामुग्री खरेदीत मोठा घोटाळा आहे. अम्ही सत्तेवर येताच हे घोटाळे बाहेर काढल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही.’मनोज घोरपडे यांनी आमदार फंडातून भागवार ऊस वजन काटे बसवणार असल्याचे अध्यक्ष सांगतायेत असे सांगून त्यांनी काट्यासाठी फंड दिला तर आम्ही त्यांना जागा उपलब्ध करून देवू असा चिमटा काढला. तसेच आम्ही सत्तेवर येताच कारखाना वाहनतळावर शेतकऱ्यांच्या नियंत्रणामध्ये असणारा ऊस वजनकाटा बसविणार असल्याचे जाहीर केले. (वार्ताहर)