शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
3
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
4
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
5
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
6
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
7
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
8
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
9
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
10
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
11
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
12
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
13
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
14
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
15
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
16
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
17
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग
18
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
19
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
20
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  

देशातील ४३०० आमदारांचे मुंबईत संमेलन, रामराजे नाईक-निंबाळकर यांची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2023 21:14 IST

MIT तर्फे १५ जूनपासून ‘राष्ट्रीय विधायक संमेलन भारत’चे आयोजन

लोकमत न्यूज नेटवर्क, सातारा: इतिहासामध्ये प्रथमच देशातील ४३०० आमदार राष्ट्रीय विधायक संमेलनामध्ये एकत्रित येऊन एकाच व्यासपीठावर चर्चा करणार आहेत. पुणे येथील एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्मेंटतर्फे आयोजित ‘राष्ट्रीय विधायक संमेलन, भारत’ मुंबई येथील बीकेसी जिओ सेंटरमध्ये १५ ते १७ जून या काळात होत आहे, अशी माहिती विधान परिषद माजी अध्यक्ष रामराजे नाईक-निंबाळकर, एमआयटी माध्यम समन्वयक योगेश पाटील यांनी दिली. सातारा येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. कोल्हापूर समन्वयक रवी पाटील, माई साळुंखे, आरती जाधव यावेळी उपस्थित होते.

रामराजे पुढे म्हणाले, राज्यातील सर्व पक्षांतील आमदारांनी संमेलनात सहभागी होऊन लोकशाहीला अधिक सशक्त करण्यासाठी योगदान द्यावे. राष्ट्रनिर्माण, राष्ट्रीय एकात्मिकता व सर्वांगीण शाश्वत विकास या त्रिसूत्रीचा उद्देश ठेवून आयोजित केलेल्या या संमेलनाचे उद्घाटन १५ जून रोजी होणार आहे. १७ जून रोजी या संमेलनाचा समारोप होईल. याव्यतिरिक्त ४० समांतर सत्र आणि गोलमेज परिषद होणार आहे. भारताच्या लोकसभेच्या माजी सभापती सुमित्रा महाजन, डॉ. मीरा कुमार, शिवराज पाटील-चाकुरकर, मनोहर जोशी, लोकसभेचे सभापती ओम बिर्ला हे या संमेलनाचे मार्गदर्शक व संयोजक आहेत. एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्मेंटचे संस्थापक अध्यक्ष राहुल विश्वनाथ कराड यांच्या विचार चिंतनामधून ‘राष्ट्रीय विधायक संमेलन, भारत’ ही संकल्पना साकारली आहे. ते या संमेलनाचे प्रमुख संयोजक समन्वयक आहेत.संमेलनात सार्वजनिक जीवनातील तणाव व्यवस्थापन, शाश्वत विकासाची साधने आणि प्रभाव, कल्याणकारी योजना : शेवटच्या व्यक्तीचे उत्थान, आर्थिक कल्याणासाठी तंत्रज्ञानाचा स्वीकार आणि कौतुकास्पद विधानपद्धती या विषयांवर चर्चा होणार असल्याचे रामराजे यांनी सांगितले.

याशिवाय जीवन संतुलन, आपला मतदारसंघ विकसित करण्याची कला, विधिमंडळ कार्यप्रदर्शन, नोकरशहा आणि आमदार या विषयांवर चर्चा होणार आहे. गोलमेज परिषदेत ‘भारत २०४७ आमचे लक्ष्य’ या विषयावर सर्व राजकीय पक्षांच्या नेत्यांची चर्चा होणार आहे. राजकारणाचे आध्यात्मिकीकरण, व्यवसाय व उद्योग क्षेत्रातील मान्यवरांची चर्चा, विधिमंडळाचे कामकाज : आव्हाने आणि पुढील मार्ग यावर सर्व राज्य विधानमंडळांच्या सचिवांची चर्चा होणार आहे. ज्येष्ठ पत्रकार, कायदेशीर तज्ज्ञांची चर्चा होणार आहे. या विषयांवरील प्रत्येक सत्रामध्ये ५० आमदार चर्चा करणार आहेत. त्याचप्रमाणे प्रत्येक सत्राचे अध्यक्षपद विधानसभेचे सभापती, विधान परिषदेचे अध्यक्ष, संसदीय कार्यमंत्री आणि पक्षनेता भूषविणार आहेत. या राष्ट्रीय विधायक संमेलनात आतापर्यंत भारतातील सर्व राज्यांतील एकूण १८०० आमदारांनी उपस्थिती दर्शविली आहे. तसेच २५०० आमदार येण्याची अपेक्षा असल्याचे योगेश पाटील यांनी सांगितले.

टॅग्स :Ramraje Naik-Nimbalkarरामराजे नाईक-निंबाळकर