शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू-काश्मीर पोलिसांची मोठी कारवाई, मुफ्ती इरफानला शोपियानमधून अटक; मोठे टेरर नेटवर्क उद्ध्वस्त
2
"ही पाकची जुनी खोड..."; इस्लामाबादच्या स्फोटाचं खापर भारतावर फोडणाऱ्या पाकिस्तानला मिळालं चोख उत्तर! 
3
न्यायालयाचा दणका! महिलांना मारहाण व शिवीगाळ केल्याप्रकरणी पुणे पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश
4
लाल किल्ला स्फोटात मोठा खुलासा! सुरक्षा यंत्रणांच्या जोरदार कारवाईमुळे मोठा धोका टळला
5
शेख हसीनानंतर आता युनूस सरकारविरोधात विद्यार्थी रस्त्यावर; बांगलादेशात पुन्हा चळवळ सक्रिय
6
बिहारमध्ये प्रशांत किशोर यांची जनसुराज्य खाते उघडणार? ८ एक्झिट पोलमध्ये तेजस्वी यादवांचे गणित बिघडले
7
लग्नाला नऊ वर्षे पूर्ण झाली, पतीने आपल्याच मित्रासोबत पत्नीचे लग्न लावून दिले; धक्कादायक कारण आले समोर
8
बिहारमध्ये काँग्रेसला मोठा धक्का! दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक संपताच मोठ्या नेत्याने दिला राजीनामा
9
Bihar Exit Poll : बिहारमध्ये उत्सुकता शिगेला! पहिला एक्झिट पोल आला, नितीश की तेजस्वी?
10
'तो शांत होता, त्याचे जास्त मित्र नव्हते'; दिल्ली बॉम्बस्फोटातील संशयित डॉक्टरच्या कुटुंबीयांची प्रतिक्रिया
11
राहुल द्रविडच्या लेकाची भारतीय U19 संघात वर्णी ; वैभव सूर्यवंशीचं नाव 'गायब' कारण...
12
छत्तीसगडच्या बीजापूरमध्ये मोठी चकमक, 6 नक्षलवादी ठार; मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त...
13
बॉसनं नोकरीवरून काढलं, पठ्ठ्यानं असं काही केलं की आता कंपनीला बसणार मोठा दंड!
14
फरीदाबाद मॉड्यूलचा खरा मास्टरमाईंड आला समोर; डॉक्टरांना कट्टरपंथी बनवणारा मौलवी इरफान अहमद कोण?
15
Travel : भारताशी कनेक्शन, 'या' देशात जाताच करोडपती व्हाल! परदेशवारीचा प्लॅन करताय तर नक्की विचार करा
16
ती चूक यामाहा नाही करणार...! पहिली वहिली इलेक्ट्रीक स्कूटर आली!  Aerox लूक; इतकी रेंज देणार की...
17
Delhi Red Fort Blast : जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्याचे कॉल डिटेल्स उघड; दिल्ली स्फोटाचं रहस्य उलगडलं, उमरने ‘तारिक’ नावाने घेतलं सिम कार्ड
18
Yamaha ची नव्या जमान्याची RX100...! स्टायलिश बाईक लाँच; किंमत फक्त ₹ १.** लाख!
19
IND vs SA : ईडन गार्डन्सच्या खेळपट्टीवर गंभीर नाराज; गांगुलीनं असं दिलं उत्तर
20
संत्र्याच्या साली कचरा समजून फेकून देता, थोडं थांबा... त्वचेसह घरालाही होईल मोठा फायदा

पहाडी मावळ्यांची पुन्हा ‘स्वराज्या’ची शपथ!

By admin | Updated: October 26, 2014 23:28 IST

वन-जन जोडो अभियान : सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या झालर क्षेत्रात आकार घेऊ पाहतेय ‘वनग्राम’ संकल्पना--सह्याद्रिपुत्रांचा एल्गार : एक

राजीव मुळ्ये ल्ल सातारा -धरण झालं. वीज आली. महाराष्ट्र झगमगला.... ‘तो’ मात्र होता तिथंच राहिला. आता सह्याद्रीच्या कडेकपाऱ्यात वाघोबांची डरकाळी घुमावी म्हणून पुन्हा आपला आवाज दाबला जाणार की काय, या भीतीनं ‘त्याची’ गाळण उडालेली. संख्येनं अत्यल्प असल्यामुळं ‘मतदार’ म्हणूनही ‘तो’ तसा दुर्लक्षितच... पण अनवाणी पावलांनी डोंगर तुडवणाऱ्या ‘त्याच्या’ टणक पायांना आता लाभेल बळ. ‘त्याच्या’ही खिशात खुळखुळतील चार पैसे. म्हणूनच प्रदीर्घ उपेक्षेनं आलेलं खचलेपण झुगारून ‘त्यानं’ कसलीय कंबर... ‘वन-जन जोडो’ अभियान यशस्वी करण्यासाठी!विकासाच्या प्रत्येक टप्प्यावर दुर्लक्षित राहिलेला ‘तो’ म्हणजे कोयना अभयारण्यातला पहाडी माणूस. मुक्त वातावरणानं ज्याला पहाडाएवढं आयुष्य दिलं, रोजच्या जगण्याच्या लढाईनं ज्याला पहाडाएवढी हिंमत दिली तो पहाडी मावळा. वयाची नव्वदी ओलांडणं ही ‘किरकोळ’ बाब मानणारा, त्याही वयात पन्नाशीतली कामं करणारा, कमाईची साधनं नसल्यामुळं स्थलांतर करणारा हा पहाडी माणूस आपल्याच गावात स्थिरस्थावर व्हावा, त्यानं जंगल जपावं आणि जंगलानं त्याला जपावं म्हणून आता वनखात्यानं पुढाकार घेतलाय.... आदर्श ‘वनग्राम’ साकारण्यासाठी!वन अधिकाऱ्यांची खाकी वर्दी पाहिली की पहाडी माणसाच्या पोटात गोळा उठतो; कारण ही मंडळी नियम आणि निर्बंधांखेरीज काही देऊ शकत नाहीत, ही धारणा... आणि अनुभवही! पण खरं तर वनखात्याच्या वन्यजीव विभागाचे सतत जंगलात फिरणारे अधिकारी ‘माणूस’ बघायला नेहमीच आतुर. ‘कोयना धरण झाल्यापासून वन्यजीव विभागाशिवाय इतर कोणत्या विभागांचे अधिकारी इथं आले होते का,’ या प्रश्नाला पहाडी माणसाकडे ‘नाही’ हेच उत्तर. जमिनींचं फेरवाटप असो किंवा नवे खातेउतारे देणं असो, महसूल विभाग इकडे कधी फिरकलाच नाही. मूलभूत सुविधांची चौकशी करायला सार्वजनिक बांधकाम विभाग आला नाही, शेतीची परिस्थिती पाहायला कृषी विभाग आला नाही, की महाराष्ट्राला वीज देणाऱ्या या मंडळींच्या घरातला अंधार पाहायला वीज कंपनीचे अधिकारी आले नाहीत. आता सगळेच विभाग दऱ्या-डोंगरांकडे येऊ लागलेत, ते वन्यजीव विभागाच्या या नव्या अभियानामुळं. ‘ड्रोंगो’ या स्वयंसेवी संस्थेच्या सक्रिय सहभागातून हे अभियान आकार घेतंय. पाहणी आणि ग्रामस्थांशी सुसंवाद साधण्याचा पहिला टप्पा नुकताच पूर्ण झाला असून, ‘वनग्राम’ संकल्पना या भागात साकारण्याच्या वाटा खुल्या होत आहेत. सुसंवाद दौऱ्यात वन अधिकारी आणि ‘ड्रोंगो’च्या कार्यकर्त्यांव्यतिरिक्त कृषी अधिकारी, जलसंपदा विभागाचे अधिकारी सहभागी झाले होते. ग्रामस्थ कोणत्या परिस्थितीत जगतात, त्यांच्या अडीअडचणी, तक्रारी काय आहेत, हे पहिल्या टप्प्यात जाणून घेण्यात आलं. येऊ घातलेल्या योजनांमुळं त्यांचे काय फायदे होतील, त्यांना कोणकोणत्या पातळ्यांवर सहकार्य मिळेल, कोणत्या नव्या सुविधा मिळतील हे सांगितलं गेलं. ग्रामस्थांनी कष्टाची तयारी दर्शविली आणि आता ते वाट पाहू लागलेत पुढच्या टप्प्याची! असा झाला संकल्पनेचा प्रवास...सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या स्थानिक सल्लागार समितीची बैठक आॅगस्टमध्ये झाली. सातारा, सांगली, कोल्हापूर आणि रत्नागिरी जिल्ह्यातील संबंधित आमदार, विभागीय आयुक्त, चारही जिल्ह्यांतील मानद वन्यजीवरक्षक, मुख्य वनसंरक्षक (प्रादेशिक आणि वन्यजीव), चार जिल्ह्यांचे उपवनसंरक्षक, नगररचना विभागाचे अधिकारी यांसह अनेक उच्चपदस्थ बैठकीला उपस्थित होते. नगररचना विभागाने बफर झोनसाठी तयार केलेल्या नियमावलीवर चर्चा झाली; मात्र तीत काही त्रुटी असल्याने तातडीने मंजुरी देऊ नये, असा आग्रह झाला. पर्यटनवृद्धीच्या काही सरधोपट कल्पना यावेळी मांडण्यात आल्या; तथापि त्या पर्यावरणपूरक नसल्याने त्यांना विरोध झाला. चर्चा सुरू असतानाच बफर झोनमधील गावांचा विकास कसा करावा, स्थानिकांच्या उन्नतीसाठी काय करता येईल, याबाबत मानद वन्यजीवरक्षक सुनील भोईटे यांनी सादरीकरण केले. त्यातील मुद्दे सर्वांनाच भावले आणि सरधोपट संकल्पना मागे घेण्यात आल्या. भोईटे यांच्या सादरीकरणाला अनुसरून ‘वन-जन जोडो’ अभियान सुरू करण्याचे ठरले. केंद्र सरकारच्या ‘वनग्राम’ संकल्पनेप्रमाणेच ही संकल्पना असून, ती यशस्वी ठरल्यास केंद्र आणि राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाचेही (एनटीसीए) सहकार्य लाभू शकते.वनग्राम संकल्पना : एक दृष्टिक्षेपअधिवासाला अनुकूल रोजगार उपलब्ध करून स्वयंपूर्ण खेड्याची निर्मितीस्थानिक हवामानाला अनुसरून पीकपद्धतीत सुधारणा; नव्या अनुकूल, फायदेशीर पिकांची लागवडखासगी जमिनीत वनौषधींची लागवड, घरगुती प्रक्रिया केंद्रेउत्पादित शेतीमाल, औषधी यांसाठी बाजारपेठेची उपलब्धतामत्स्योत्पादन, मत्स्यशेतीला प्रोत्साहनशेती आणि मत्स्योत्पादनासाठी शेततळ्यांची निर्मितीदळणवळण, शिक्षण, आरोग्य यांसह २१ मूलभूत सुविधा उपलब्ध करून देणेनिसर्गपूरक पर्यटनाचा थेट लाभ स्थानिकांना मिळवून देणे. वाटाडे, न्याहरी-निवास योजना यांद्वारे स्थानिकांना रोजगारवनाधारित ग्रामोद्योगांना, हस्तोद्योगांना प्रोत्साहन व बाजारपेठेची हमीवनशेतीच्या दिशेने आश्वासक पावले टाकून अखेरीस स्थलांतर रोखणेनिसर्गाच्या डोळ्यातही कारुण्य : कांदाटी खोऱ्यात अरव गावाजवळच्या डोंगराचा हा ‘डोळा’ स्थानिकांची हालाखी वर्षानुवर्षे पाहतोय. या ‘निसर्गाच्या डोळ्या’तही कारुण्य दिसल्यावाचून राहत नाही.