शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon Update : आनंदाची बातमी! वेळेआधीच मान्सून दाखल होणार? हवामान विभागाने दिली अपडेट
2
CBSE बोर्डाचा १०वीचा निकाल जाहीर! गेल्या वर्षींपेक्षा जास्त विद्यार्थी उत्तीर्ण, मुली मुलांपेक्षा वरचढ
3
एका झटक्यात चांदी २२५५ रुपयांनी महागली, सोन्याच्या दरातही मोठी तेजी; खरेदीपूर्वी नवे दर
4
सुरक्षा दलाची मोठी कारवाई; जम्मू-काश्मीरमध्ये लष्कर-ए-तैयबाचे 3 दहशतवादी ठार
5
'ऑपरेशन सिंदूर'नंतर रशियाची भारताला मोठी ऑफर; पाकिस्तानसह अमेरिकेचीही झोप उडवणार
6
Viral Video : प्रियकराचं लागत होतं लग्न, ऐन मुहूर्तावर झाली प्रेयसीची एंट्री; पुढं काय झालं बघाच!
7
पाकिस्तानला पाठिंबा देणाऱ्या तुर्कस्थानचा बहिष्कार? भारत कोणत्या वस्तू आयात करतो?
8
सर्वोच्च न्यायलयाने फेटाळला दिल्लीतील व्यावसायिकाचा जामीन अर्ज,ड्रग्ज आणि लष्कर-ए-तोयबाशी आहे कनेक्शन!
9
बारावी नापास डॉक्टर! रुग्णांच्या जीवाशी खेळ; क्लिनिक उघडून मोठे आजार बरे करण्याचा दावा
10
पंतप्रधान मोदींनी आदमपूर एअरबेस का निवडला? एकाच झटक्यात पाकिस्तानची खोट्याची ८ मिसाईल पाडली...
11
डिफेन्समध्ये का आहे तेजी? घसरत्या बाजारातही HAL आणि BEL मध्ये खरेदीदारांची रांग; कारण आहे खास
12
'भूत बंगला'मध्ये अक्षय कुमारसोबत स्क्रीन शेअर करणार 'हा' अभिनेता, फोटो पोस्ट करत म्हणाला...
13
चिनी क्षेपणास्त्रांनी आधी मैदानात मार खाल्ला, आता शेअर बाजारातही लाज निघाली
14
शत्रुला शांतपणे झोप का लागत नाही? पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 'त्या' फोटोद्वारे दिला थेट संदेश...
15
Rambabu Singh : अवघ्या ४ महिन्यांपूर्वी लग्न झालेले जवान रामबाबू सिंह शहीद; पत्नीला अजून सांगितलंच नाही...
16
१० तारखेला वाढदिवस साजरा केला अन् दुसऱ्याच दिवशी...; आईसह २ मुलांचा दुर्दैवी अंत
17
धक्कादायक! अचानक तोल गेला अन् खासदार अजय मंडल पडले खाली; पायाला झालं फ्रॅक्चर
18
₹२३९२ चा 'हा' शेअर आपटून आला ₹५१ वर; सोमवारी दोन मोठे राजीनामे, गुंतवणूकदारांना झटका
19
पाकिस्तानने केलेला एअरबेस उडवल्याचा दावा; PM मोदी तिथेच पोहोचले, जवानांशी साधला संवाद
20
Astro Tips: गाडीच्या डॅशबोर्डवर कोणत्या देवतेची मूर्ती ठेवणे ठरते अधिक लाभदायी?

जुन्यांचा मेळ...नव्यांची जुळणी, अन्यथा मतदारसंघाची फाळणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2021 04:37 IST

(ग्रामपंचायतींनी घडविला सत्ताबदल की मतदारांनी घडविला सत्ताबदल ?????????) लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : ग्रामपंचायत निवडणूक म्हटले की नेतेमंडळी फारसे ...

(ग्रामपंचायतींनी घडविला सत्ताबदल की मतदारांनी घडविला सत्ताबदल ?????????)

लोकमत न्यूज नेटवर्क

सातारा : ग्रामपंचायत निवडणूक म्हटले की नेतेमंडळी फारसे लक्ष देत नाहीत. एकाच ग्रामपंचायतीत नेत्यांचेच दोन गट असतात. त्यामुळे सुरुवातीला ग्रामपंचायत बिनविरोध करण्यासाठी नेत्यांच्या प्रयत्न असतो; पण नाही झाली तर पुन्हा दोन्ही कार्यकर्ते आपलेच असल्याने त्यांनी दुखाविण्याचा प्रयत्न होत नाही. यावेळी मात्र नेत्यांनी ग्रामपंचायत निवडणुकीत चांगलेच लक्ष घातले. अनेकांना ग्रामपंचायतीत फटका बसला, काहींनी ग्रामपंचायती आपल्याकडेच राखल्या तर काहींनी गमावल्या; पण, ग्रामपंचायतींना कमी लेखून चालणार नाही हे आता नेत्यांच्या चांगलेच लक्षात आले आहे.

नेत्यांनी जुन्यांच्या मेळ घालत नव्यांचीही मोट बांधली त्या ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या. पण ज्या ठिकाणी हे शक्य झाले नाही त्या ठिकाणी निवडून येईल तो आपलाच म्हणत निवडणूक लागली. निवडणूक झाली, पॅनल निवडून आले; पण आता विरोधी पॅनलमधील निवडून आलेले उमेदवार नेत्यांकडे जाण्याच्या मानसिकतेत नाहीत. ते आपला सवता सुभा करण्याच्या तयारीत आहेत. नेत्यांनी अधिक लक्ष दिले असते तर निवडणूक बिनविरोध झाली असती असे त्यांचे मत आहे. ज्या आमदारांनी ग्रामपंचायतीमध्ये लक्ष घातले त्या ठिकाणी त्यांना अपेक्षित यशही मिळाले. कोरेगावमध्ये हा प्रकार प्रकर्षाने जाणवला. आमदार महेश शिंदे यांनी ग्रामस्थांना ताकद देऊन, काही ठिकाणी तडजोडी करून, विकासकामांचे आश्वासन देऊन ग्रामपंचायती बिनविरोध केल्या. तर ज्या ठिकाणी बिनविरोध करणे शक्य नव्हते. अशा ठिकाणी पॅनल टाकून आपलाच प्रभाव कसा अधिक आहे हे दाखवून दिले. या ठिकाणी शशिकांत शिंदे ग्रामपंचायत पातळीवर उतरले नाहीत. तशी त्यांच्याकडून अपेक्षाही नव्हती. कारण, आत्तापर्यंत सर्वच नेते ग्रामपंचायतींना गृहीत धरत आले आहेत. पण, यापुढे असे होणार नाही. स्थानिक लोकप्रतिनिधींनी लक्ष घातले नाही तर पुढील काळात एक एक ग्रामपंचायत हातातून जाण्याची शक्यता अधिक आहे. त्याबरोबरच विरोधी गट सबळ होण्याचाही धोका आहे. त्यामुळे पुढील काळात होणाऱ्या पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये गावे सांभाळताना दोन पिढ्यांमध्येही समन्वय साधण्याचे काम करावे लागणार आहे. अन्यथा होणारी फाटाफूट नेत्यांना अडचणीची ठरण्याची मोठी शक्यता आहे.

ग्रामपंचायत निवडणुकीच्या माध्यमातून दुसरा एक प्रकार समोर आला आहे. तो म्हणजे ज्या ग्रामपंचायतींवर आत्तापर्यंत प्रस्थापितांची सत्ता होती. त्यांना लोकांनी बाजूला केले आहे. आता हे काही कालावधीसाठी बाजूला केलेले आहे की कायमचे हे येणारी पुढील परिस्थितीच ठरवेल. पाटण तालुक्यातील पाल ग्रामपंचायतीमध्ये धक्कादायक सत्तांतर झाले. अनेक वर्षे गावाला विकासाच्या प्रवाहात ठेवणाऱ्या देवराज पाटील यांना पराभवाला सामोरे जावे लागले. मनोज घोरपडे यांचा या गटातील प्रवेश हा पुढील पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेची बांधणी आहे. त्यामुळे हे नक्कीच चिंताजनक आहे.

मंत्री बाळासाहेब पाटील, शंभूराज देसाई, आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, आमदार मकरंद पाटील, जयकुमार गोरे, विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी आपल्या ताब्यातील ग्रामपंचायती आपल्याकडेच राखण्यात यश मिळविले. तर नव्याने महेश शिंदे, डॉ. अतुल भोसले, मनोज घोरपडे, प्रभाकर देशमुख यांनी नव्याने बांधणी करत ग्रामपंचायतीमध्ये वेगळी व्यूहरचना केली आहे. त्यामध्ये त्यांना काही प्रमाणात यशही आले आहे.

चौकट

ग्रामपंचायती भविष्यातील सत्ताकेंद्र

ग्रामपंचायती या भविष्यातील सत्ताकेंद्रे ठरणार आहेत. याबाबतची जाणीव ठेवून सर्वांनी त्याकडे लक्ष देण्याची आवश्यकता आहे. नवीन नेतृत्वही याच ठिकाणाहून तयार होणार आहे. ते प्रस्थापितांच्या सोबत जाणार की विरोधात बसणार यावरच नेत्यांचीही गणिते अवलंबून असणार आहेत. त्यामुळे नेत्यांना काही प्रमाणात काळजी घ्यावी लागेल. केवळ ग्रामपंचायतीतील दोन्ही गट आपले असे म्हणून चालणार नाही. कारण आता हे दोन्ही गट एकमेकांच्या विरोधात जाण्याच्या तयारीत आहेत. भविष्यात विधानसभेला महाविकास आघाडी झाली तरी ग्रामपंचायतीत तुटलेली मने सांधता येत नाहीत. त्यांच्यातील वाद हे खूप काळ चालू राहतात. यासाठी आता नेत्यांनाही ग्रामपंचायत सहज घेऊन चालणार नाही.