शहरं
Join us  
Trending Stories
1
उफराटा...! ट्रम्प अमेरिकेत आयकर रद्द करणार, टेरिफ मधून आलेल्या पैशांवर भागवणार; घोडं काय, भाडं काय...
2
Cyclone Ditva: 'दितवाह' चक्रीवादळ भारताच्या दिशेने; श्रीलंकेत ४६ जणांचा बळी, 'या' राज्यांमध्ये सतर्कतेचा इशारा!
3
पैसा तिप्पट करणारी गुंतवणूक! 'या' ५ म्युच्युअल फंडांनी ३ वर्षांत दिले ३१% पेक्षा जास्त रिटर्न!
4
धक्कादायक! अंत्यसंस्कारासाठी जात असताना डंपर कारवर उलटला, एकाच कुटुंबातील सात जणांचा मृत्यू
5
पाकिस्तानात जोरदार राडा! खैबर-पख्तूनख्वाच्या मुख्यमंत्र्यांना पोलिसांनी लाथा-बुक्क्यांनी मारले; इम्रान खान मृत्यू प्रकरण...
6
पुतिन यांच्या भारत दौऱ्याची तारीख ठरली; पीएम मोदींशी ऊर्जा, संरक्षण, व्यापारावर होणार चर्चा
7
Mumbai Rape Case: जाग आली तेव्हा बाजूला बसलेले होते दोन पुरूष, विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्कार; स्ट्रगलिंग मॉडेलला अटक
8
Jara Hatke: चित्ता, बिबट्या आणि जग्वार; तिघांची प्रजाती एकच, पण 'असा' ओळखा फरक 
9
हर्बालाइफचा नवा 'लिफ्ट ऑफ' – शून्य साखर असलेलं, ऊर्जा देणारं इफर्व्हेसंट ड्रिंक, तुमचा दिवस बनवा अधिक जोमदार 
10
दत्त जयंती २०२५: ७ दिवस शक्य नाही, मग ३ दिवसांत गुरुचरित्र पारायण करता येते; कसे? पाहा, नियम
11
स्मृति मानधना आणि पलाश मुच्छल यांचे लग्न कधी होणार? आई अमिता मुच्छल यांनी दिली मोठी अपडेट
12
दमदार कमाईची संधी! ५४२१ कोटींचा IPO ३ डिसेंबरला उघडणार; जीएमपी-प्राइस बँडसह तपशील जाणून घ्या
13
वैभव सूर्यवंशी पुन्हा एकदा टीम इंडियाकडून खेळणार, संघाचे नेतृत्व 'मराठी मुलगा' करणार !
14
रिलायन्स इंडस्ट्रीजला ५६.४४ कोटी रुपयांची जीएसटी नोटीस, पाहा काय आहे प्रकरण?
15
Maharashtra Crime: प्रचार करत असतानाच भाजप उमेदवारावर जीवघेणा हल्ला; अनिकेत नाकाडेंसोबत काय घडलं?
16
AI च्या मदतीने बनवला एसी लोकल पास, अंबरनाथमधील इंजिनिअर पती- उच्चशिक्षित पत्नीला अटक; दोघे कसे अडकले?
17
Elephant Attack: स्कूटरवरून खेचलं, सोंडेनं उचलून जमिनीवर आपटलं, मग...; हत्तीच्या हल्ल्यात मुलगा ठार
18
संतापजनक! १५ एप्रिल रोजी कोर्ट मॅरेज,२२ नोव्हेंबरला पत्नीची हत्या; नेमके प्रकरण काय?
19
नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुका ठरलेल्या वेळेनुसार होणार, स्थगिती नाही: सुप्रीम कोर्ट
20
फायरिंगचा शौक! कपिल शर्मा कॅफे गोळीबार प्रकरणात अटक केलेला बंधू मान सिंह आहे तरी कोण?
Daily Top 2Weekly Top 5

इच्छुक ‘मंगळा’च्या कक्षेत!

By admin | Updated: September 25, 2014 00:23 IST

पितृपक्ष संपला : मुहूर्ताची शोधाशोध सुरू; गुरुवार-शुक्रवारवर डोळा

राजीव मुळ्ये - सातारा  ‘इस्रो’चे यान आणि इच्छुक उमेदवार एकाच वेळी ‘मंगळा’च्या कक्षेत पोहोचले आहेत. उमेदवारी अर्ज भरण्यासाठी मंगल मुहूर्ताची शोधाशोध सुरू झाली असून, येत्या गुरुवार-शुक्रवारचा मुहूर्त अनेकांकडून पकडला जाईल, अशी शक्यता आहे. पक्ष असो वा अपक्ष, पितृपक्ष संपल्याने प्रतिपक्षाला आपल्या शक्तीच्या कक्षा दाखवण्यास सगळेच दक्ष झाले आहेत.महायुती आणि आघाडीतील वरिष्ठ पातळीवरची रस्सीखेच पितृपक्षाबरोबरच संपुष्टात येऊन तडजोडीचे ‘घट’ नवरात्रारंभी बसविले जातील, अशी अटकळ अनेकांनी बांधली होती. युती अभंग राहिली; पण महायुती तुटली. त्यामुळे जिल्ह्यात शेतकरी संघटना आणि राष्ट्रीय समाज पक्षाकडून इच्छुक असलेले उमेदवार रिंगणात असणारच, असे चित्र आहे. आता भाजप आणि शिवसेना यांंच्यात जिल्ह्यातील जागांची विभागणी कशी होते, यावर बंडखोरांची संख्या ठरणार आहे. परंतु उमेदवारांची संख्या सर्वच मतदारसंघांत वाढणार हे आता स्पष्ट झाले आहे. पितृपक्ष सुरू असतानाच अनेक इच्छुकांनी अर्ज भरण्यासाठीचा मुहूर्त जाणकारांना विचारण्यास सुरुवात केली होती. ज्योतिषशास्त्रातील तज्ज्ञांंचे उंबरठे झिजवून अनेकांनी योग्य दिवस आणि वेळ शोधून आणली आहे. प्राप्त माहितीनुसार, येत्या गुरुवारी आणि शुक्रवारी (दि. २५ आणि २६) उत्तम मुहूर्त असल्याचे ज्योतिषांनी इच्छुकांना सांगितले आहे. शनिवारी (दि. २७) मात्र ‘वैध्रती’ योग असून, तो अशुभ असल्याचे या क्षेत्रातील तज्ज्ञांकडून सांगितले जाते. त्यामुळे शनिवारी अर्ज भरले जाणार नाहीत, असे अनेक इच्छुकांच्या गोटातून सांगितले गेले.ज्योतिषशास्त्रातील तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, विवाह, साखरपुडा अशा कौटुंबिक समारंभांबरोबरच अनेक चांगल्या कामांसाठी मुहूर्त पाहिला जातो. दक्षिणेतील राज्यांत तर अधिकारीही पदग्रहण करताना ‘राहूकाळ’ पाहतात म्हणे! पितृपक्षात उमेदवारी अर्ज भरण्याचे साहस सहसा कुणीच करत नाही. यावर्षी अंधश्रद्धा निर्मूलन समितीने तसे आव्हान देऊनही कुणी अर्ज दाखल केला नाही. तथापि, वरिष्ठ पातळीवरून आघाड्या-बिघाड्यांचा लंबक सतत हलत राहिल्यानेही पितृपक्षात अर्ज दाखल करणे कुणाला शक्य झाले नाही. त्यामुळे उरल्यासुरल्या अवधीत मुहूर्त पाळणे कुणाकुणाला जमणार आणि कोण-कोण मुहूर्त न पाहता अर्ज दाखल करणार, हेही पाहावे लागणार आहे.भारताचे यान मंगळाच्या कक्षेत पोहोचले असतानाच अर्ज भरण्यासाठी मुहूर्त शोधणारे नेते फुले, शाहू, आंबेडकर आणि प्रबोधनकार ठाकरेंचा वारसा सांगतात. या चौघांनीही शुभ-अशुभाच्या पलीकडे जाऊन समाजाचा विचार केला. उमेदवारही त्यांचे विचार आणि कामाच्या जोरावरच विजयी होणार आहेत. त्यामुळे त्यांनी शुभ-अशुभांच्या चौकटी भेदाव्यात, अशी त्यांना आमची कळकळीची विनंती आहे.- डॉ. हमीद दाभोलकर, अंधश्रद्धा निर्मूलन समिती