शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
4
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
5
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
6
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
7
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
8
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
9
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
10
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
11
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
12
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
13
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
14
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
15
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
16
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
17
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
18
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
19
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
20
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
Daily Top 2Weekly Top 5

लग्नसराईच्या शुभ मुहूर्तावर खरेदीसाठी बाजारपेठा सज्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2021 04:18 IST

वाई-महाबळेश्वर-खंडाळा तालुक्यांत औद्योगिकीकरण, पर्यटन, शेती उद्योग, कारखानदारी यामुळे झपाट्याने विकास होऊन बाजारपेठ मोठी होत आहे. तसेच हा परिसर शेतीसंपन्न ...

वाई-महाबळेश्वर-खंडाळा तालुक्यांत औद्योगिकीकरण, पर्यटन, शेती उद्योग, कारखानदारी यामुळे झपाट्याने विकास होऊन बाजारपेठ मोठी होत आहे. तसेच हा परिसर शेतीसंपन्न पट्टा म्हणूनही ओळखला जातो. तालुक्यातील बाजारपेठांमधील व्यावसायिक व ग्रामीण व शहरातील ग्राहक यांचे पिढ्यानपिढ्यांचे जिव्हाळ्याचे नाते निर्माण झालेले आहे. यामुळे व्यावसायिकही ग्राहकांविषयी नेहमी सहकार्याची भूमिका ठेवून त्यांना सहकार्य करीत असतात. यामुळे सणारंभात मोठ्या उत्साहात स्थानिक बाजारपेठेत ग्राहक खरेदी करीत असतात.

वाई तालुक्याचा पूर्व भाग बागायतीचा असून, पश्चिम भागात सातारा जिल्ह्यातील सांगली जिल्ह्याची भाग्यरेषा ठरलेले धोम धरण आहे. कृष्णा नदी तीरावर वसलेल्या वाई नगरीला सांस्कृतिक, ऐतिहासिक महत्त्व आहे. येथे राज्यात प्रसिद्ध असे महागणपती मंदिर आहे. कृष्णा नदीवर सात घाट व त्यावर असलेली शेकडो मंदिरे ही भाविकांसह पर्यटकांसाठी आकर्षणाचा विषय आहे. याबरोबर मांढरदेवी काळुबाई, तीर्थक्षेत्र धोम, मेणवली घाट व नाना फडणवीसांचा वाडा, रायरेश्वर, कमळगड, केंजळगड, पांडवगड, वैराटगड, धोम-बलकवडी धरण हे पर्यटकांना आकर्षित करत असल्याने दरवर्षी लाखो पर्यटकांसह भाविक या परिसराला भेट देत असतात.

तसेच वाई तालुका निसर्ग संपन्न असल्यामुळे अनेक हिंदी, मराठी चित्रपटांचे चित्रीकरण या परिसरात होत असते. वाईच्या औद्योगिक वसाहतीमध्ये कंपन्यामध्ये हजारो कामगारांमुळे बाजारपेठेमध्ये मोठ्या प्रमाणावर आर्थिक उलाढाल होत आहे. सणारंभात ग्राहक मोठ्या उत्साहात खरेदी करीत असतात. नववर्ष व लग्नाच्या शुभ मुहूर्तावर खरेदी करण्याची शेकडो वर्षांची परंपरा आहे. सहाजिकच याचा फायदा शहरातील विविध प्रकारच्या व्यावसायिकांना होत असतो. तसेच वाई, पाचवड, भुईंज बाजारपेठेत शहरासह तालुक्यातील शेकडो गावातील नागरिक खरेदीसाठी येत असतात.

महाबळेश्वर तालुक्यात पाचगणी व महाबळेश्वर ही जागतिक दर्जाची पर्यटनस्थळे आहेत. येथे देशासह जगभरातून लाखाे पर्यटक दरवर्षी भेट देत असतात. ग्रामीण भागात स्ट्राॅबेरीसह विविध प्रकारची पिके घेतली जातात. पाचगणीला विद्यानगरी म्हणूनही संबोधले जाते. येथे देशभरातून विद्यार्थी शिक्षणासाठी येत असतात. साहजिकच बाजारपेठेत पाचगणी, महाबळेश्वर शहर व ग्रामीण भागासह पर्यटकांची रेलचेल मोठ्या प्रमाणावर असते. ग्रामीण भागातील नागरिक आठवडा बाजारात खरेदीसाठी प्रामुख्याने येत असतात.

वाई, खंडाळा तालुक्यांतून राष्ट्रीय महामार्ग गेला आहेत तसेच खंडाळा, शिरवळ, लोणंद परिसरात मोठ्या प्रमाणावर औद्योगिीकरण झाल्याने व खंडाळ्याला तालुक्याची भाग्यरेषा ठरलेला धोम-बलकवडीचा कालवा गेल्याने तालुक्याचा दुष्काळाचा शिक्का पुसून पाण्याचा प्रश्न बऱ्याअंशी मिटला आहे. औद्योगिक वसाहतीमध्ये मोठ्या-मोठ्या कंपन्या आल्यामुळे तालुक्यासह मोठ्या प्रमाणावर रोजगारनिर्मिती होऊन परिसरातील व्यावसायिकांना याचा मोठ्या प्रमाणावर फायदा होताना दिसत आहे. खंडाळा, शिरवळ, लोणंद बाजारपेठांचा विकास झपाट्याने होताना दिसत आहे. याठिकाणी शहरासह ग्रामीण भागातून येणाऱ्या ग्राहकांची संख्या ही लक्षणीय आहे.

एकंदरीत स्थानिक ग्राहकांच्या आवडी-निवडी, त्यांच्या समस्यांची खरी जाण स्थानिक व्यावसायिकांना खऱ्या अर्थाने असल्याने ग्राहकांची कोणत्याही प्रकारची फसवणूक होण्याची शक्यता नसते, विक्री पश्चात तत्पर सेवा ग्राहकांना मिळते. ग्राहकांना हवी असणारी वस्तू प्रत्यक्ष पाहावयास मिळत असल्याने चुकीची वस्तू ग्राहकांच्या माथी मारली जात नाही. यामुळे व्यावसायिक व ग्राहक यांच्यामधील विश्वासाचे नाते दिवसेंदिवस वृद्धिंगत होत आहे.

-पांडुरंग भिलारे, वाई प्रतिनिधी