शहरं
Join us  
Trending Stories
1
“आपला पक्ष मुंबईत सर्वांत जास्त बलवान आहे, यंदा महापालिकेत मनसेचीच सत्ता येणार”: राज ठाकरे
2
पंतप्रधान मोदींनंतर चार तासांनी अमित शाह राष्ट्रपतींना भेटले; ५ ऑगस्टला काहीतरी मोठे घडणार....
3
IND vs ENG :मियाँ मॅजिक! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये विकट; KL राहुलनं एक कॅच सोडला
4
१७,००० कोटींचा घोटाळा! अनिल अंबानींच्या डोकेदुखीत वाढ, ED आता 'या' लोकांची चौकशी करणार
5
Post Office ची ५० वर्ष जुनी सेवा होणार बंद, तुमच्यावर काय परिणाम होणार?
6
नव्या प्रभाग रचनेला आव्हान देणाऱ्या याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या; स्थानिक निवडणुकांना हिरवा कंदील
7
६ ऑगस्टला बच्चू कडू राज ठाकरेंची भेट घेण्याची शक्यता; शेतकरी आंदोलनाला मनसेचं पाठबळ मिळणार?
8
लॉटरी लागली! टाटांच्या 'या' शेअरचे होणार १० तुकडे, १०० शेअर्सचे थेट १००० होणार, रेकॉर्ड डेट कधी?
9
मैत्रिणीचा संसार मोडला, नंतर तिच्याच नवऱ्याशी केलं लग्न; आता ३ वर्षांतच अभिनेत्रीवर घटस्फोट घेण्याची वेळ
10
Nagpur: नागपुरात मद्यधुंद अवस्थेत कार चालवणाऱ्या जवानानं ३० जणांना उडवलं, व्हिडीओ व्हायरल!
11
बदल्याची आग! आईने वडिलांना फसवून दुसरं लग्न केलं, संतापलेल्या मुलाने तिला कारने चिरडलं
12
"मराठीच्या आधी हिंदी भाषेला राजभाषेचा दर्जा मिळाला, तेव्हा महाराष्ट्रही अस्तित्वात नव्हता"
13
कैदी नंबर १५,५२८, प्रज्वल रेवण्णाचा तुरुंगातील दिनक्रम आला समोर, दररोज करावं लागेल एवढं काम   
14
Putrada Ekadashi 2025: पुत्रदा एकादशीला 'हे' नियम पाळले तरच होतो संतानसुखाचा लाभ!
15
एकनाथ शिंदेंनी केला करेक्ट कार्यक्रम, बेळगावात पक्ष बळकट होणार; अनेक मठाधिपती शिवसेनेत
16
४० व्या वर्षीही करू शकता गुंतवणुकीचा श्रीगणेशा; रिटायरमेंटच्या वेळी होऊ शकता कोट्यधीश, महिन्याला किती कराल गुंतवणूक
17
'किमान माणसासारखी तरी वागणूक...' IT अभियंता तरुणीची पोस्ट व्हायरल, म्हणाले मॅनेजरसमोरच मी...
18
Mumbai: बलात्कारानंतर गर्भवती राहिलेल्या अल्पवयीन मेहुणीची घरीच प्रसूती; भाऊजींसह बहिणीलाही अटक
19
“हिंदूंना बदनाम करण्याच्या आव्हाडांच्या आरोपांशी उद्धव ठाकरे सहमत आहेत का?”; भाजपाचा सवाल

मराठ्यांनो.. आरक्षण मिळेपर्यंत मुंबई न सोडण्याचा निर्धार करा

By admin | Updated: September 28, 2016 00:27 IST

नितेश राणे : दहिवडी येथील जाहीर सभेत आवाहन

दहिवडी : ‘प्रत्येक जिल्ह्यात लाखोंच्या संख्येने मराठा मोर्चा निघत आहेत. शेवटचा मोर्चा मुंबईत आहे. त्यावेळी प्रत्येकाने एकेरी तिकीट काढून यावे. मराठ्यांना आरक्षण मिळेपर्यंत मुंबई न सोडण्याचा निर्धार मराठ्यांनी करावा,’ असे आवाहन स्वाभिमान संघटनेचे अध्यक्ष आमदार नितेश राणे यांनी केले.दहिवडी येथे मराठा क्रांती महामोर्चाच्या निमित्ताने मंगळवारी जाहीर मेळावा आयोजित केला होता. यावेळी ते बोलत होते. यावेळी छावा संघटनेचे नानासाहेब जावळे-पाटील, इतिहास तज्ज्ञ इंद्रजित सावंत, मराठा महासंघाचे वसंतराव मुळीक, स्वाभिमानीचे कोल्हापूर अध्यक्ष सचिन तोडकर, जिल्हाध्यक्ष युवराज मगर-पाटील, उपसभापती अतुल जाधव, मनसेचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील पाटील उपस्थित होते. राणे म्हणाले, ‘आरक्षणाबद्दल संपूर्ण महराष्ट्रात फिरतो आहे. एक महिन्यापासून मराठ्यांना जागृत करण्याचे काम करत आहे. आरोपींना फाशी होत नाही, तोपर्यंत आपण कोपर्डीला जाणार नाही. ‘चर्चा करण्याची तयारी आहे,’ असे मुख्यमंत्री आज म्हणतात. चर्चा कसली करता. मागण्या समोर आहेत, निर्णय घेणार असाल तर चर्चेला बसा, अन्यथा हा मोर्चा सरकारची खुर्ची हलविण्यास कमी करणार नाही. मुख्यमंत्री फक्त हे करू, ते करू म्हणतात. म्हणून मी त्यांना ‘गोडबोले’ असे म्हणतो. अ‍ॅट्रॉसिटी कायदा रद्द व्हावा, अशी आमची अजिबात मागणी नसून त्यात बदल व्हावा, अशी आमची मागणी आहे.’ वसंतराव मुळीक म्हणाले, ‘आमच्या मुलांना नव्वद टक्के गुण मिळूनही आरक्षण मिळत नाही. नोकऱ्या मिळत नाहीत. ७० टक्के शेतकरी मराठा असून, त्यांची शेती धरण, तलाव, प्रकल्प, कालवे यामध्ये गेली आहे. काही गुंठे राहिली आहे. सहा कोटी मराठे असूनही आरक्षणासाठी झगडावे लागत आहे. नारायण राणे यांनी १८ लाख कुटुंबांचा सर्व्हे करून १६ टक्के आरक्षणाची मागणी केली; पण सरकारने कोणतेही पाऊल उचलले नाही.’यावेळी इंद्रजित सावंत, नानासाहेब जावळे यांची भाषणे झाली. अतुल जाधव यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)