शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
2
हैदराबादच्या बेगमपेट विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर, शोधमोहिम सुरू
3
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७ दिवस शांत बसले अन् आता..; मोदी-ट्रम्प चर्चेवर काँग्रेसचा निशाणा
4
डोनाल्ड ट्रम्प यांनी विचारलं, कॅनडातून परतताना अमेरिकेत थांबू शकता? पंतप्रधान मोदींनी दिला नकार, म्हणाले...
5
'मम्मीने दरवाजा उघडला, काशी काका आता आले अन्...'; 9 वर्षाच्या मुलाने सांगितले कशी झाली बापाची हत्या?
6
'आता पुन्हा शरद पवारांकडे जायचे नाही, असं ठरवलंय'; पवारांचा निष्ठावंत दुखावला, बळीराम काका साठेंनी मन केलं मोकळं
7
Swami Samartha: 'भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे' हे स्वामींचे वचन; पण आहे 'ही' एक अट!
8
रोहित शर्माच्या पत्नीचा पाठलाग करत घरापर्यंत पोहोचला, फोटोही काढू लागला, पाहतात रितिकाचा राग अनावर, त्यानंतर...  
9
हिंदी सक्तीवरून राज ठाकरेंचं महाराष्ट्रातील शाळांच्या मुख्याध्यापकांना खुलं पत्र, वाचा जसच्या तसं...
10
Israel Iran War : 'मोसाद'ची नवीन खेळी!, इराण अलर्टवर, नागरिकांना मोबाईलमधून WhatsApp डिलिट करण्याचे आदेश
11
नाशिकचे बडगुजर अखेर भाजपमध्ये; बावनकुळे यांनी केले स्वागत!
12
दूधवाल्याची चूक अन् छत्रपती संभाजीनगरजवळ कारसह दोन बस एकमेकांवर धडकल्या
13
हिंदीची सक्ती महाराष्ट्रात होऊ देणार नाही; मनसे प्रमुख राज ठाकरेंचा सरकारला इशारा
14
कुंडलीत ‘या’ स्थानी राहु-केतु आहेत? अपार धनलाभ, भरघोस भरभराट; कुणी काही वाकडे करू शकणार नाही!
15
AI Farming: शेतकऱ्यांच्या मदतीला एआय गडी; नुकसान टाळेल, नफाही वाढवेल!
16
IND vs ENG: गौतम गंभीर कुठेच दिसेना... टीम इंडियासोबत 'कोच' म्हणून VVS लक्ष्मण इंग्लंडमध्ये, पण का?
17
Sonam Raghuvanshi : चक्की चालवणारे सोनमचे बाबा कसे झाले करोडपती? कमाई एवढी की नातेवाईकांच्या नावावर खाती
18
अहमदाबाद विमान अपघाताबाबत मोठा खुलासा; तीन महिन्यांपूर्वी बदलले होते विमानाचे इंजिन...
19
पती, सासरच्या लोकांवर निराधार लैंगिक आरोप करणे हे मानसिक क्रौर्य: उच्च न्यायालय
20
पाकिस्तानच्या सिंधमध्ये जाफर एक्सप्रेसवर हल्ला, रेल्वे ट्रॅकवर भीषण स्फोट; ट्रेन रुळावरून घसरली

मराठ्यांनो.. आरक्षण मिळेपर्यंत मुंबई न सोडण्याचा निर्धार करा

By admin | Updated: September 28, 2016 00:27 IST

नितेश राणे : दहिवडी येथील जाहीर सभेत आवाहन

दहिवडी : ‘प्रत्येक जिल्ह्यात लाखोंच्या संख्येने मराठा मोर्चा निघत आहेत. शेवटचा मोर्चा मुंबईत आहे. त्यावेळी प्रत्येकाने एकेरी तिकीट काढून यावे. मराठ्यांना आरक्षण मिळेपर्यंत मुंबई न सोडण्याचा निर्धार मराठ्यांनी करावा,’ असे आवाहन स्वाभिमान संघटनेचे अध्यक्ष आमदार नितेश राणे यांनी केले.दहिवडी येथे मराठा क्रांती महामोर्चाच्या निमित्ताने मंगळवारी जाहीर मेळावा आयोजित केला होता. यावेळी ते बोलत होते. यावेळी छावा संघटनेचे नानासाहेब जावळे-पाटील, इतिहास तज्ज्ञ इंद्रजित सावंत, मराठा महासंघाचे वसंतराव मुळीक, स्वाभिमानीचे कोल्हापूर अध्यक्ष सचिन तोडकर, जिल्हाध्यक्ष युवराज मगर-पाटील, उपसभापती अतुल जाधव, मनसेचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील पाटील उपस्थित होते. राणे म्हणाले, ‘आरक्षणाबद्दल संपूर्ण महराष्ट्रात फिरतो आहे. एक महिन्यापासून मराठ्यांना जागृत करण्याचे काम करत आहे. आरोपींना फाशी होत नाही, तोपर्यंत आपण कोपर्डीला जाणार नाही. ‘चर्चा करण्याची तयारी आहे,’ असे मुख्यमंत्री आज म्हणतात. चर्चा कसली करता. मागण्या समोर आहेत, निर्णय घेणार असाल तर चर्चेला बसा, अन्यथा हा मोर्चा सरकारची खुर्ची हलविण्यास कमी करणार नाही. मुख्यमंत्री फक्त हे करू, ते करू म्हणतात. म्हणून मी त्यांना ‘गोडबोले’ असे म्हणतो. अ‍ॅट्रॉसिटी कायदा रद्द व्हावा, अशी आमची अजिबात मागणी नसून त्यात बदल व्हावा, अशी आमची मागणी आहे.’ वसंतराव मुळीक म्हणाले, ‘आमच्या मुलांना नव्वद टक्के गुण मिळूनही आरक्षण मिळत नाही. नोकऱ्या मिळत नाहीत. ७० टक्के शेतकरी मराठा असून, त्यांची शेती धरण, तलाव, प्रकल्प, कालवे यामध्ये गेली आहे. काही गुंठे राहिली आहे. सहा कोटी मराठे असूनही आरक्षणासाठी झगडावे लागत आहे. नारायण राणे यांनी १८ लाख कुटुंबांचा सर्व्हे करून १६ टक्के आरक्षणाची मागणी केली; पण सरकारने कोणतेही पाऊल उचलले नाही.’यावेळी इंद्रजित सावंत, नानासाहेब जावळे यांची भाषणे झाली. अतुल जाधव यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)