शहरं
Join us  
Trending Stories
1
Coronavirus: देशातील अनेक राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; महाराष्ट्रात ८६ नवीन रुग्ण आढळले
2
राजासोबत 'ते' तिघे कोण होते, ज्यांच्या मागून सोनम चालत होती; स्थानिक गाईडचा खुलासा
3
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
4
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
5
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला
6
बिहार विधानसभा निवडणूक 2025 : NDA चा फॉर्म्युला ठरला! जाणून घ्या, कुणाच्या वाट्याला किती जागा येणार?
7
पोलीस नोकरी सोडली अन् बनला Youtuber; भारतीय क्रिएटर्सला अडकवलं, हेरगिरीसाठी पाकचा नवा डाव
8
सोनिया गांधी रूटीन चेकअपसाठी शिमला येथील IGMC हॉस्पिटलला दाखल; उपचारानंतर घरी सोडले
9
राज ठाकरेंसोबतच्या संबंधावर सोनाली बेंद्रेने मौन सोडलं; पहिल्यांदाच उघडपणे केला खुलासा
10
'या' कंपनीला रिलायन्सकडून मिळाली 700 कोटींची ऑर्डर; आता सोमवारी फोकसमध्ये राहणार शेअर?
11
स्वत:चं नग्न छायाचित्र दाखवलं संसदेत, खासदार लॉरा मॅकक्लूर यांनी सगळ्यांना दिला धोक्याचा इशारा
12
राहुल गांधींच्या 'महाराष्ट्र निवडणूक फिक्सिंग' लेखावरून राजकारण तापलं, काँग्रेस का हारते? जेपी नड्डा यांनी स्पष्टच सांगितलं!
13
"बापरे..., आम्ही एवढं घाबरलोय की...!"; राज-उद्धव युतीच्या चर्चेवर नितेश राणेंनी उडवली खिल्ली
14
IPL २०२६ मध्ये यंदाच्या विजेत्या RCB टीमवर बंदी आणणार?; बीसीसीआय का घेऊ शकतं मोठा निर्णय?
15
पोलिसांनी घेरताच आरोपी शूटर AK47 ने दिली इमारतीवरून उडी मारण्याची धमकी, नंतर...
16
नको त्या अवस्थेत दुसऱ्यासोबत पाहिले; संतापलेल्या पतीने बायकोचे मुंडके उडविले अन् थेट...
17
Viral Video: लग्नात नवरदेवाच्या मित्रांनी दिलं 'असं' गिफ्ट; पाहून वधूही लाजली, व्हिडीओ व्हायरल!
18
'टीव्ही बंद करून अभ्यास करायला बस' आईचं बोलणं जिव्हारी, दहावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या!
19
अरेरे! ६ महिन्यांपूर्वीच लग्न करुन घरी आणली पण 'ती' दिरासोबत पळाली, गावात असं काय घडलं?
20
Diabetes Sign: डायबिटीस होण्याआधी शरीरात दिसू लागतात 'हे' पाच बदल; वेळीच सावध व्हा!

ठिय्या आंदोलनात ‘भारुड, भजन अन् कीर्तन’ फलटणमध्ये मराठा बांधव एकत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2018 23:41 IST

मलटण : मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे, या मागणीसाठी राज्यभर आंदोलन सुरू आहेत. सुरुवातीला अतिशय शांत आणि संयमी मोर्चे काढणारा मराठा समाज आता आरपारच्या लढाईसाठी सज्ज झाला आहे. काही ठिकाणी तो आक्रमकही झाला आहे. यासाठी वाट्टेल ते करण्याची तयारी या तरुणांची आहे. त्याचाच प्रत्यय फलटण येथे मराठा बांधवांनी रात्र जागून ...

ठळक मुद्दे: शिस्तप्रिय ठिय्या ; मागणीसाठी शेतकरी, विविध पक्षांतील नेत्यांची उपस्थिती

मलटण : मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे, या मागणीसाठी राज्यभर आंदोलन सुरू आहेत. सुरुवातीला अतिशय शांत आणि संयमी मोर्चे काढणारा मराठा समाज आता आरपारच्या लढाईसाठी सज्ज झाला आहे. काही ठिकाणी तो आक्रमकही झाला आहे. यासाठी वाट्टेल ते करण्याची तयारी या तरुणांची आहे. त्याचाच प्रत्यय फलटण येथे मराठा बांधवांनी रात्र जागून ठिय्या आंदोलन सुरू करण्यात आले आहे.

फलटण येथील ठिय्या आंदोलन करून सरकारची झोप उडवणाऱ्या आंदोलकांनाही झोप नाही. ‘रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग,’ या तुकारामाच्या ओवीप्रमाणे आरक्षण मिळावे, या एकाच मागणी आहे. या मागणीसाठी सर्व फलटण शांत झोपले असताना तहसील कार्यालयाच्या समोरील रस्त्यावर हे तरुण अंधाºया ढगाळ रात्री बोचºया थंडीत ठामपणे बसले आहेत. काहीही झाले तरी मागे हटणार नाही, असा इशाराच देताना ते दिसतात. अतिशय नियोजन बद्ध आणि शिस्तप्रिय आंदोलनाची आखणी या युवकांनी केलेली दिसते.

सर्वांचा सहभाग नोंदवला जावा, या उद्देशाने या आंदोलनात सर्व गावांचा समावेश एक वेळापत्रक तयार करून आंदोलनाचा फलटण तालुक्यातील विस्तार वाढविला आहे. प्रत्येक गावातील तरुणांना या आंदोलनात काही गावांना यात सहभागी करून घेतले जाणार आहे.दिवसन्रात्र ठिय्या देऊन उत्स्फूर्त सहभाग नोंदवणाºया मराठा बांधवांनी फलटणमध्ये तरी संयम पाळला आहे. पण लवकर काही निर्णय न झाल्यास आंदोलकांच्या भावनांचा बांध केव्हाही फुटू शकतो. समाजातील सामान्य शेतकरी ते विविध पक्षांतील कार्यकर्ते यांच्याबरोबर पक्षीय नेते रात्रीही उपस्थित आहेत. मराठा समाजाच्या विविध संघटना एकत्रित आल्या आहेत. ठिय्या आंदोलनात जेवणाची व्यवस्था करण्यात आले आहे.हक्काचा लढा पोहोचविण्यात यशस्वी..रात्रभर जागून आपल्या हक्काची लढाई लढताना आंदोलक पुढची रणनीती ठरवत होते. आंदोलन करत असताना सामान्य नागरिकांना याचा कोणताही त्रास होऊ नये, अशी भूमिका मराठा समाजबांधवांची आहे. यावेळी मराठा बांधवांनी भजन, कीर्तन केले. यामुळे रात्र कशी निघून गेली, हे समजलेच नाही. भारुडाच्या माध्यमातून समाजापर्यंत आपल्या हक्काचा लढा पोहोचवण्यात मराठा बांधव यशस्वी झाले आहे.सर्व संघटना एकत्र

मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे. या हक्कासाठी फलटण तालुक्यातील सर्व संघटना एकत्र आल्या आहेत. त्यामध्ये सकल मराठा समाज, संभाजी ब्रिगेड, मराठा सेवा संघ आदींचा समावेश आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरMaratha Kranti Morchaमराठा क्रांती मोर्चा