शहरं
Join us  
Trending Stories
1
SA Won WTC Final 2025 : एडन मार्करमचे धमाकेदार शतक!! द. आफ्रिकेने रचला इतिहास; कांगारुंना हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी
2
Maharashtra Rain Alert: कोकणाला रेड अलर्ट! मुंबई-ठाण्यासह 'या' जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा
3
अमेरिका, रशिया, ब्रिटन अणि फ्रान्स...; इस्रायल-इराण युद्धात कोणता देश कुणाच्या बाजूने? समोर आली लिस्ट
4
Ahmedabad Plane Crash : कॅन्सरने आईला हिरावून नेलं, अपघातामुळे वडिलांचं छत्र हरपलं; १८ दिवसांत २ चिमुकल्या अनाथ
5
आम्ही असीम मुनीरला बोलावलेलेच नाही; अमेरिकेचा खुलासा, पाकिस्तान तोंडावर आपटला
6
काव्या मारन विवाहबंधनात अडकणार? हा प्रसिद्ध संगीतकार करतोय डेट, रजनीकांत बोलणी करायला... 
7
Video: वेदनने कळवळला, धावताना लंगडला... पण तरीही टेम्बा बवुमा ऑस्ट्रेलियन गोलंदाजांना नडला, ठोकलं झुंजार अर्धशतक
8
Ashadhi Wari 2025: आषाढी वारीसाठी निघणाऱ्या प्रत्येक दिंडीला सरकारकडून आर्थिक अनुदान जाहीर
9
अहमदाबाद विमान अपघात की अन्य काही?; उच्चस्तरीय समितीला तपासासाठी सरकारने दिली डेडलाईन
10
Ahmedabad Plane Crash : शेतकरी वडिलांनी कर्ज काढून लेकाला शिकवलं पण अपघातामुळे डॉक्टर होण्याआधीच सारं संपलं
11
हा कसला संयोग! २७ वर्षापूर्वी भीषण अपघातात '11 A' सीटमुळेच वाचला होता आणखी एकाचा जीव
12
"आम्ही बॅग आणि साड्यांमध्ये लोकांचे अवयव ठेवले"; अपघातानंतर मदत करणाऱ्याने सांगितली आपबिती
13
Coastal Road Tunnel Accident Video: रस्त्यावरून घसरली, कठड्यावर धडकली; कोस्टल रोड बोगद्यात भीषण अपघात
14
Ahmedabad Plane Crash : ते सरप्राईज ठरलं शेवटचं! विमान अपघातात मुलाचा आणि सुनेचा मृत्यू, वडिलांना आता एकच आशा
15
देशातील सर्वात मोठ्या सरकारी बँकेनं ग्राहकांना दिलं गिफ्ट, कमी केले कर्जाचे व्याजदर; पटापट पाहा लेटेस्ट दर
16
संकष्ट चतुर्थी 2025: असं करा गणपती पूजन; जाणून घ्या, शुभ मुहूर्त, पूजा विधी, मान्यता आणि चंद्रोदयाची वेळ
17
EXCLUSIVE: 'कोस्टल वॉकवे' मुंबईकरांच्या विरंगुळ्याचं नवं हक्काचं ठिकाण, आयुक्त भूषण गगराणींसोबत खास सफर
18
Bacchu Kadu Hunger Strike: अन्नत्याग आंदोलन स्थगित! बच्चू कडूंना महायुती सरकारने दिली तीन आश्वासने
19
इराण इस्रायल तणावामुळे भारताला किती नुकसान, कच्चं तेल आणि शेअर बाजारावर काय परिणाम होणार?
20
Sonam Raghuvanshi : सोनम रघुवंशी आणि बॉयफ्रेंड राज कुशवाहचा २ वर्षांपूर्वीचा फोटो, चेहऱ्यावर दिसतोय आनंद

जलसंधारणामुळे अनेक गावे पाणीदार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2017 23:24 IST

नवनाथ जगदाळे।लोकमत न्यूज नेटवर्कदहिवडी : माण तालुक्यातील अनेक ठिकाणी यावर्षी पावसाने वार्षिक सरासरी ओंलडली असून, जलसंधारणाची कामे झाल्याने काही गावे पाणीदार झाली आहेत. असे असलेतरी कुकुडवाड मंडलात मात्र, भीषण स्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. कारण, या मंडलात अत्यल्प पाऊस झाला आहे.माण तालुक्यातील सात मंडलांपैकी मलवडी मंडलात सर्वाधिक ४८१ मिलीमीटर पाऊस ...

नवनाथ जगदाळे।लोकमत न्यूज नेटवर्कदहिवडी : माण तालुक्यातील अनेक ठिकाणी यावर्षी पावसाने वार्षिक सरासरी ओंलडली असून, जलसंधारणाची कामे झाल्याने काही गावे पाणीदार झाली आहेत. असे असलेतरी कुकुडवाड मंडलात मात्र, भीषण स्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. कारण, या मंडलात अत्यल्प पाऊस झाला आहे.माण तालुक्यातील सात मंडलांपैकी मलवडी मंडलात सर्वाधिक ४८१ मिलीमीटर पाऊस झाला आहे. गोंदवले ३९४ मिलीमीटर तसेच दहिवडी मंडलामध्ये ४६७ मिलीमीटर पाऊस झाला आहे. या तिन्हीही मंडलांत पावसाने सरासरी ओलांडली असून, त्या खालोखाल मार्डी ३४४, म्हसवड मंडलात ३४२ मिलीमीटर पाऊस पडला आहे. शिंगणापूर १५१ तर कुकडवाडमध्ये अवघा ३५ मिलीमीटर पाऊस पडला आहे.यावर्षी पावसाने सुरुवातीला दडी मारली होती. परंतु या पितृपंधरवड्यामध्ये पावसाने दमदार हजेरी लावल्याने तालुक्यातील अनेक गावातील ओढे, नाले, पाझर तलाव, सिमेंट बंधारे वाहू लागले आहेत. तालुक्यात जलसंधारणाचे काम मोठ्या प्रमाणात झाले आहे. त्यामुळे पाण्याचा प्रत्येक थेंब अडविण्यात अनेक गावे यशस्वी झाली आहेत. आज तालुक्यातील बहुतांशी गावे पाणीदार झाली आहेत, असे असले तरी तालुक्यातील प्रमुख तलावापैकी तुपेवाडी, लोधवडे तलाव १०० टक्के भरला आहे.ढाकणी तलाव ४२ टक्के भरला आहे. बिदाल, दहिवडी, गोंदवलेचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न सोडविणाºया आंधळी तलावात ६५.३३ दशलक्ष घनमीटर पाणीसाठा झाला असून, उर्वरित तलावात अद्यापही मृतसाठा आहे. पाण्याची आवक सुरू असून, एखादा मोठा पाऊस झाल्यास हे सर्व तलाव भरतील, त्यामुळे मोठ्या प्रमाणावर पाणीप्रश्न मिटणार आहे, असा अंदाज वर्तविण्यात येत आहे.भूगर्भातील पाणीपातळीत वाढ...माण तालुक्यात अनेक ठिकाणी चांगला पाऊस झाला आहे. परंतु काही गावांत माथा ते पायथा असे जलसंधारणाचे काम झाल्याने मुख्य तलावात लवकर पाणी आले नाही, ही वस्तूस्थिती आहे. असे असले तरी भूगर्भातील पाणी पातळीत वाढ झाली आहे.