शहरं
Join us  
Trending Stories
1
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
2
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
3
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
4
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
5
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
6
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
7
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
8
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
9
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
10
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
11
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
12
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
13
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
14
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
15
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
16
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
17
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
18
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
19
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
20
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर

कलगीतुऱ्यात अडकले अनेकांचे भविष्य!

By admin | Updated: September 14, 2014 00:00 IST

सभापतिपदासाठी अनेकांचे बाशिंग : कऱ्हाड, खंडाळ्याचा तिढा कसा सुटणार ?

प्रमोद सुकरे, कऱ्हाड : राज्यात काँग्रेस आघाडीचे सरकार असताना साताऱ्यात मात्र जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडीत ‘बिघाडी’च पाहायला मिळत आहे़ आता अडीच वर्षांचा पहिला अंक संपल्यानंतर रविवारी दुसरा अंक सुरू होतोय़ विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातही ‘राग’ आघाडीधर्म आळविला जाईल, असे वाटत आहे; पण गत दोन दिवसांत दोन्ही काँग्रेसमध्ये सुरू झालेल्या कलगीतुऱ्यामुळे अनेक इच्छुकांचे भविष्य टांगणीला लागले आहे़काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची राज्यात आघाडी आहे़ त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थेतही तशीच आघाडी राहील, अशी आशा काँग्रेसजनांना वाटत होती़ जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीचे संख्याबळ पुरेसे असतानाही काँग्रेसला एखादे सभापतिपद देऊन सत्तेत सहभागी करून घेतील, अशी अटकळही बांधली जात होती; पण कदाचित मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना त्यांच्याच जिल्ह्यात मोठेपणा द्यायचा नाही, या हेतूने तसं घडलं नसावं़ जिल्हा परिषदेचा विषय दूरच; पण मुख्यमंत्र्यांच्या कऱ्हाडात नगरपरिषदही काँग्रेसकडे राहणार नाही, याची दक्षता बारामतीच्या दादांनी प्रामाणिकपणे घेतली़ त्याहीपुढे जात कऱ्हाड पंचायत समितीत काँग्रेसचे संख्याबळ जास्त असताना राष्ट्रवादीचा झेंडा फडकविण्याचा करिष्मा स्थानिक नेत्यांनी केला़ खंडाळ्यात तर राष्ट्रवादीने चक्क सेनेशी हातमिळवणी करत काँग्रेसला सत्तेपासून दूर ठेवण्यातच धन्यता मानली़ या सर्व प्रकारामुळे राज्यात आघाडी सरकार असले तरी, जिल्ह्यात मात्र बिघाडीचेच वातावरण असल्याचे दिसते. नव्याने होणाऱ्या पंचायत समिती, जिल्हा परिषदेतील निवडीत भूतकाळातील घडामोडींना पूर्णविराम देऊन नवा अध्याय सुरू होईल काय? अशी चर्चा दोन्ही काँग्रेस कार्यकर्त्यांच्यात सुरू होती़ मात्र, गेले दोन दिवस दोन्ही काँग्रेस नेत्यांच्या आक्रमक वक्तव्यांमुळे वातावरण तणावपूर्ण बनले आहे़ रविवारी होणाऱ्या पंचायत समितीच्या निवडीसंदर्भात गुडघ्याला बाशिंग बांधलेल्या अनेकांचे भविष्य टांगणीला लागले आहे, हे मात्र नक्की!