शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
2
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधुबद्दलही बरंच बोलले
3
"माझाही फोटो आहे, सर्वांचेच...!"; एपस्टीन फाइल्सवर ट्रम्प स्पष्टच बोलले, बिल क्लिंटन यांच्यासंदर्भात काय म्हणाले?
4
WhatsApp: नव्या पद्धतीने हॅक जात आहे व्हॉट्सॲप, सरकारने दिला काळजी घेण्याचा सल्ला
5
बांगलादेशमधील दीपूच्या मृत्यूप्रकरणी दिल्लीत VHP चे निदर्शने; बांगलादेश परराष्ट्र मंत्रालयाने भारतीय उच्चायुक्तांना बोलावले
6
अखेर चीनने आयडिया चोरलीच! भारताच्या UPI सोबत स्पर्धा करण्यासाठी ॲप लाँच केले... 'Nihao China'
7
Video - हृदयद्रावक! डीजेवर नाचताना आक्रित घडलं, २३ वर्षीय तरुण खाली कोसळला अन्...
8
"तिथं मी बुलेटप्रूफ कारशिवाय बाहेर पडू शकत नाही!"; कारण... अफगाणिस्तान स्टार क्रिकेटर राशीद खानचा खुलासा
9
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
10
“काँग्रेसचा विषय नक्कीच संपलेला आहे, पण निकालानंतर गरज लागली तर…”; संजय राऊतांचे मोठे विधान
11
ठाकरे बंधुंमधील दादर, शिवडीचा तिढा अखेर सुटला, मोठ्या भावासाठी धाकट्याने घेतले झुकते माप
12
महापालिका निवडणूक २०२६ : प्रस्तावच नाही; काँग्रेस-'वंचित'ची युती होणार की नाही? गोंधळ कायम 
13
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
14
खळबळजनक! सकाळी एन्काऊंटर, संध्याकाळी फरार; पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळाला आरोपी
15
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
16
पहाटे ५ ची वेळ, उर्फी जावेद घाबरलेल्या अवस्थेत पोलिस स्टेशनमध्ये पोहोचली; नक्की काय घडलं?
17
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
18
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
19
आठ कोटी, बारा पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
20
८ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळवा ३,२८,००० रुपये फिक्स व्याज! ज्येष्ठ नागरिकांसाठी पोस्टाची 'खास' भेट
Daily Top 2Weekly Top 5

अवकाळी पावसातही भरतात माणचे बंधारे

By admin | Updated: July 10, 2014 00:27 IST

पृथ्वीराज चव्हाण : मलकापुरच्या सोहळ्यात घेतला सिंचन योजनांचा आढावा

मलकापूर : औद्योगिक, शैक्षणिक व दरडोई उत्पन्नात महाराष्ट्र देशात पहिल्या क्रमांकावर आहे. मात्र, केवळ १८ टक्के क्षेत्र सिंचनाखाली असल्यामुळे हा चिंतेचा विषय आहे. त्यासाठी साखळी पद्धतीचे बंधारे बांधून संपूर्ण राज्यात सिंचन क्षेत्र वाढविण्याचा मानस आहे. हा प्रयोग खटाव, माण तालुक्यांत यशस्वी झाला; पण पावसाने ओढ दिल्यामुळे बंधाऱ्यात पाणीसाठा झालेला नाही. भविष्यात वळवाचा मोठा पाऊस पडला तरीही सर्व बंधाऱ्यात पुरेसा पाणीसाठा होईल. अशी माहिती मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली. मलकापूर येथे प्रेमलाताई चव्हाण कन्या सुरक्षा अभियान वर्षपूर्ती सोहळा, कन्यारत्न योजनेअंतर्गत ठेवपावती वितरण, महिला बचत गटांना भांडवल वाटप, रमाई घरकुलसह सोलर सिटी योजनेअंतर्गत अनुदान वाटपाचा संयुक्त कार्यक्रम मुख्यमंत्री चव्हाण यांच्या उपस्थितीत घेण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. परिवहन मंत्री मधुकरराव चव्हाण, ज्येष्ठ पत्रकार अनंत दीक्षित, गृहराज्यमंत्री सतेज पाटील, माजी आमदार भास्करराव शिंदे, आमदार आनंदराव पाटील, आमदार जयकुमार गोरे, व्यवस्थापकीय संचालक संजय खंदारे, मदनराव मोहिते, अर्बन कुटुंबप्रमुख सुभाषराव जोशी, भारती विद्यापीठाचे उपाध्यक्ष इंद्रजित मोहिते, माजी आमदार मदनराव भोसले, रजनी पवार, सोनहिरा कारखान्याचे संचालक रघुनाथ कदम, जिल्हाधिकारी डॉ. रामास्वामी एन., नगराध्यक्षा शारदा खिलारे, नियोजन सभापती शंकरराव चांदे, बांधकाम सभापती राजेंद्र यादव, महिला व बालकल्याण सभापती यमुना घाडगे, मुख्याधिकारी हेमंत निकम आदींची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. मुख्यमंत्री चव्हाण म्हणाले, ‘राज्यात रमाई घरकुल योजनेअंतर्गत काँग्रेसच्या माध्यमातून ग्रामीण भागातील लाभार्थ्यांना ७० हजार रुपये अनुदान दिले जात होते. त्यामध्ये वाढ करून अनुदान एक लाख रुपये करण्यात आले आहे, तर नगरपंचायत हद्दीतील लाभार्थ्यांना एक लाखाऐवजी दीड लाख तर महानगरपालिका अंतर्गत येणाऱ्या लाभार्थ्यांना दीडऐवजी दोन लाख रुपये अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याचपद्धतीने दारिद्र्यरेषेखालील सर्वसाधारण व्यक्तींसाठी राजीव गांधी योजनेअंतर्गत घर बांधणीसाठी अनुदान देण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला आहे. गत तीन वर्षांमध्ये राज्यात दुष्काळसदृश परिस्थिती असून, २८ जिल्ह्यात ५५० टँकरद्वारे पाणीपुरवठा तर विविध ठिकाणच्या चारा छावण्यांद्वारे दहा लाख जनावरे जगविण्याचे काम राज्य शासनाने काटेकोरपणे केले आहे. दुष्काळसदृश परिस्थिती व गारपीटसारख्या आपत्तींमध्ये ४२ हजार कोटींची मदत शासनाने दिली आहे. देशाच्या इतिहासात एवढ्या मोठ्या प्रमाणात मदत देणारे महाराष्ट्रा व्यतिरिक्त दुसरे कोणतेही राज्य नाही. परिवहन मंत्री मधुकरराव चव्हाण म्हणाले, ‘शासनाच्या विविध योजना आहेत. त्या सर्व योजनांची अंमलबजावणी मलकापूर शहराने केली असल्याचा प्रत्यय आला. त्यामुळे मलकापूर सर्व सोयींनियुक्त आदर्श गाव निर्माण झाले आहे. लोकसभेत पराभव झाला असला तरी मंत्रिमंडळातील क्रांतिकारी निर्णयाच्या जोरावर विधानसभेत महाराष्ट्रात चांगले यश मिळेल,’ असा विश्वासही मंत्री चव्हाण यांनी व्यक्त केला. यावेळी अनंत दीक्षित, आमदार आनंदराव पाटील यांचेही भाषण झाले. उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे यांनी प्रास्ताविक केले. बांधकाम सभापती राजेंद्र यादव यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)मार्केट यार्ड ते नांदलापूर रस्त्याच्या दुतर्फा, कऱ्हाड-ढेबेवाडी मार्गावर महिला उद्योगपर्यंत दुतर्फा गटार, ढेबेवाडी मार्ग ते पाणीपुरवठा जॅकवेल रस्त्याचे खडीकरण-डांबरीकरण व झोपडपट्टी संरक्षक भिंत बांधणी अशा विविध कामांसाठी साडेदहा कोटींचा निधी मंजूर करण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री चव्हाण यांनी यावेळी दिली.‘एलबीटी’ऐवजी ‘वॅट’करावर अधिभार :‘मंत्रिमंडळात सध्या धडाडीचे व क्रांतिकारी निर्णय घेतले जात आहेत. जनतेचा शहरीकरणाकडे कल वाढला असून, शहरीकरणाला बळकटी देण्याचे काम स्थानिक स्वराज्य संस्थांना करावे लागते. स्थानिक स्वराज्य संस्थांची स्वायत्तता अबाधित ठेवून ‘एलबीटी’ऐवजी ‘वॅट’करावर अधिभार लावण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या विचाराधीन आहे,’