शहरं
Join us  
Trending Stories
1
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
2
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
3
१ तास सीबीआयला चकवा दिला, पैशांनी भरलेली बॅग कचराकुंडीत फेकली; नवी मुंबईत फिल्मी स्टाईल 'थरार'
4
"केंद्रातील मोदी सरकार व्हेंटिलेटवर…’’, सबळ कारणं देत इंडिया आघाडीच्या नेत्याचा मोठा दावा
5
IND vs ENG : सिराज-प्रसिद्ध कृष्णाचा जलवा! टीम इंडियानं रचला इतिहास; पहिल्यांदाच असं घडलं
6
मंत्रिपद जाऊनही धनंजय मुंडेंनी सरकारी बंगला का सोडला नाही? भरावा लागणार दंड
7
MSRTC Recruitment: एसटी महामंडळात नोकरीची संधी, जाणून घ्या पात्रता आणि अर्ज करण्याची पद्धत!
8
IND vs ENG 5th Test : टीम इंडियानं हातून निसटलेली मॅच जिंकून दाखवली! मालिकेत बरोबरी
9
'बिग बॉस १९'साठी 'तारक मेहता'लाच ऑफर? मेकर्सने केली विचारणा; अभिनेत्याच्या होकाराची प्रतीक्षा
10
Mangalagauri 2025: पूजा होईपर्यंत बोलायचे नाही, असा मंगळागौरीच्या पूजेचा नियम का?
11
"हे बंद करा"; परिणय फुकेंच्या विधानावर बोलताना CM फडणवीसांनी माध्यमांचे टोचले कान, काय म्हणाले?
12
मुंबई घडवण्यात हिंदी भाषिकांचं मोठं योगदान, मराठी केवळ ३० टक्के...: निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचलं
13
बाजारात जोरदार 'कमबॅक'! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी वाढ, हिरो मोटर्ससह 'या' शेअर्सचा बंपर परतावा
14
एका शेअरवर १५६ रुपयांचा डिविडंड देणार ही कंपनी, रेकॉर्ड डेट १५ ऑगस्टपूर्वीच, तुमच्याकडे आहे का?
15
“आपला पक्ष मुंबईत सर्वांत जास्त बलवान आहे, यंदा महापालिकेत मनसेचीच सत्ता येणार”: राज ठाकरे
16
एक दिवस एमजी टाटाला मागे टाकणार? जुलैमध्ये एवढ्या विकल्या इलेक्ट्रीक कार... ह्युंदाई क्रेटा...
17
Viral Video: पाठीमागून आला अन् मिठी मारली, छातीलाही केला स्पर्श; भररस्त्यात महिलेसोबत घाणेरडं कृत्य!
18
भारतातील एकमेव रेल्वे स्टेशन, ज्याला नावच नाही, तरीही थांबते ट्रेन, लोक करतात प्रवास
19
पंतप्रधान मोदींनंतर चार तासांनी अमित शाह राष्ट्रपतींना भेटले; ५ ऑगस्टला काहीतरी मोठे घडणार....
20
IND vs ENG :मियाँ मॅजिक! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये विकेट; KL राहुलनं एक कॅच सोडला

प्रस्थापितांविरोधात ‘मनोधैर्य’ एकवटणार !

By admin | Updated: February 13, 2015 22:57 IST

कार्यकर्त्यांचे नेत्यांनाच साकडे : म्हणे, एकास एकच उमेदवार द्या

प्रमोद सुकरे- कऱ्हाड-- विधानसभा निवडणुकीत मतविभाजनाचाच प्रस्थापितांना फायदा झाला. तो फायदा कारखाना निवडणुकीत प्रस्थापितांना होऊ नये म्हणून आता विरोधी कार्यकर्त्यांनीच एक पाऊल पुढे-मागे घ्यायचा पवित्रा घेतलाय. एकास एक उमेदवार देण्याचा आग्रह आपापल्या नेत्याकडे धरलाय. त्यामुळे विधानसभेत विस्कटलेले ‘मनोधैर्य’ सह्याद्रीत एकवटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सह्याद्री सहकारी साखर कारखान्याचा बिगुल नुकताच वाजला आहे. १७ मार्च रोजी मतदान होणार आहे. पण अर्ज दाखल करण्याची मुदत १६ फेब्रुवारी असल्याने राजकीय वातावरण ढवळून निघालंय. पडद्यामागच्या हालचाली गतिमान झाल्यात. कोण कोणता निर्णय घेणार, या निवडणुकीचे नक्की चित्र काय असणार अन् निकाल काय लागणार, याबाबत अंदाज बांधण्यातच सर्वजण व्यस्त आहेत. यशवंतनगर, ता. कऱ्हाड येथील सह्याद्री सहकारी साखर कारखाना कऱ्हाड तालुक्यात असला तरी त्याचे कार्यक्षेत्र अन् सभासद पाच तालुक्यांत आहे. कऱ्हाडसह कोरेगाव, सातारा, खटाव अन् कडेगाव या ठिकाणी त्याचे मतदार विखुरलेले आहेत. त्यांची संख्या ३५ हजार ७८७ एवढी आहे. त्यामुळे या पाच तालुक्यांतील राजकीय परिस्थितीचा प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष या निवडणुकीवर परिणाम होणार हे नक्कीच. फक्त विद्यमान अध्यक्ष बाळासाहेब पाटील यांचा कऱ्हाड ‘उत्तरे’तील सभासद मतदारांशी असणारा थेट संपर्क ही त्यांची जमेची बाजू आहे. खरंतर विधानसभेची निवडणूक वेगळी अन् कारखान्याची वेगळी; पण बाळासाहेबांनी या दोन्ही निवडणुकींवर पकड ठेवण्याचा प्रयत्न केलाय; म्हणून तर कारखाना दोनवेळा बिनविरोध करण्याचे अन् विधानसभेत विजयाची हॅट्ट्रिक मारण्याचे कसब त्यांनी दाखविले आहे. पण, नुकतीच झालेली विधानसभा निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून कारखान्याच्या माध्यमातून मतदारसंघातील सभासद शेतकऱ्यांवर त्यांनी आतीव प्रेम केल्याचा विरोधकांचा आरोप आहे. त्यामुळे कऱ्हाड उत्तर मतदार संघाबाहेरील सभासद शेतकऱ्यांना आपलंसं करीत, आपल्याला मिळालेल्या दुजाभावाचं ‘उत्तर’ देण्याची हीच वेळ आहे; असे विरोधक पटवून देऊ लागले आहेत. त्यामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. ‘स्वाभिमानी’चे मनोज घोरपडे अन् ‘काँग्रेस’चे धैर्यशील कदम हे सध्या बाळासाहेब पाटलांचे मुख्य विरोधक मानले जातात. या दोघांनीही विधानसभे पाठोपाठ सह्याद्रीत उतरण्याचे संकेत दिलेत. कार्यकर्त्यांचे मेळावे घेऊन दिशाही ठरविण्याचा प्रयत्न केलाय; पण या दोघांच्याही मेळाव्यात कार्यकर्त्यांनीच आता मतविभाजन नको, विधानसभेची चूक पुन्हा नको, असे नेत्यांकडे स्पष्ट मत मांडले अन् एकास एक उमेदवार द्या, असे जणू साकडेच घातले. कार्यकर्त्यांच्या भावनांचा आदर करीत या नेत्यांनीही परस्परांशी चर्चा करू, असा कार्यकर्त्यांना मेळाव्यात शब्द दिलाय. त्यामुळे प्रस्थापितांविरोधात सह्याद्रीत ‘मनोधैर्य’ एकवटल्यास आश्चर्य वाटायला नको.शनिवार अन् सोमवारकडे लक्ष ‘सह्याद्री’च्या निवडणुकीसाठी आतापर्यंत ३२ इच्छुकांसाठी ४९ अर्जांची विक्री झाली आहे खरी; मात्र शुक्रवार अखेर एकही उमेदवारी अर्ज दाखल झालेला नाही. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी शनिवार आणि सोमवार हे दोनच दिवस उरल्याने आता साऱ्यांचे लक्ष शनिवार अन् सोमवारकडे लागले आहे. कोण-कोण उमेदवारी अर्ज दाखल करणार याची चर्चा मात्र सभासदांमध्ये रंगू लागली आहे. ‘भीम’गर्जनेकडे लक्ष...‘भीम’गर्जनेकडे लक्ष...‘सह्याद्री’च्या कार्यक्षेत्रात कोरेगावचे भीमराव पाटील, सातारचे भीमराव घोरपडे अन् कऱ्हाड-खटावच्या सीमेवरील भीमराव डांगे हे तिन्ही स्थानिक नेते येतात. ‘सह्याद्री’च्या निवडणुकीबाबत ते काय गर्जना करणार याबाबत सभासदांच्यात उत्सुकता आहे.