शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
2
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
3
IPL 2025 : रोहित शर्माचा बॉल बॉयसोबतचा व्हिडिओ होतोय व्हायरल; नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
5
...अन् हिटमॅन रोहितनं युवा बॅटर वैभवला पुन्हा हिमतीनं मैदानात उतरण्यासाठी दिलं बळ
6
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी
7
जे रोहित-विराटलाही नाही जमलं ते सूर्या भाऊनं करून दाखवलं; मोडला ११ वर्षांपूर्वीचा विक्रम
8
बुलढाण्यात जळका भडंग नजिक एसटी बस उलटली; दिवसभरात किरकोळ अपघातांची मालिका सुरूच
9
जातनिहाय जनगणनेनंतर आता काँग्रेसचा आणखी मोठा डाव, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली अशी मागणी
10
केवळ युद्धाच्या नावानेच पाकिस्तानला भरलीय धडकी, बंद केले पीओकेतील 1000 हून अधिक मदरसे!
11
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...
12
भारतासाठी गुड न्यूज...! सीमेवर तणावाची स्थिती असतानाच मोठी मदत करणार अमेरिका; पाकिस्तानचं टेन्शन वाढणार!
13
"मुस्लिम आणि काश्मिरींविरोधात द्वेष पसरवू नका’’, पहलगाममध्ये हत्या झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीचं आवाहन
14
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
15
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...
16
सरकार जात विचारणार, पण एखाद्याने जात सांगितली नाही तर? याबाबत कायदा काय सांगतो  
17
RR vs MI : एक सेकंद बाकी असताना DRS घेतल्यामुळे वाचला; मग रोहितनं फिफ्टीसह नवा इतिहास रचला
18
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
19
IPL 2025: राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का! स्टार गोलंदाज दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर
20
Mumbai RTO: महिलेकडून आरटीओ कर्मचाऱ्याला मारहाण, कार्यालयातही तोडफोड; मुंबईतील घटना

मनोमीलनाचा बंध तुटला, सत्तांतराचा नारळ फुटला!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2021 04:39 IST

कोपर्डे हवेली : राष्ट्रवादी काँग्रेसचे समर्थक शंकरराव खापे यांनी बनवडीमध्ये विविध शासकीय योजना राबवत विकासकामे केली. अनेक पुरस्कार ...

कोपर्डे हवेली : राष्ट्रवादी काँग्रेसचे समर्थक शंकरराव खापे यांनी बनवडीमध्ये विविध शासकीय योजना राबवत विकासकामे केली. अनेक पुरस्कार प्राप्त करून राज्यात नव्हे राज्याबाहेर नावलौकिक मिळवला. ग्रामपंचायत निवडणुकीत शंकरराव खापेंचे वर्चस्व कायम राहील, अशीच भागात चर्चा होती; पण अखेर ग्रामपंचायतीत सत्तांतर झाले. वीस वर्षांनंतर खापे गटाला सत्तेपासून दूर रहावे लागले.

बनवडी ग्रामपंचायतीत शंकरराव खापे यांच्या गटाला साठे गटाने गत वीस वर्षांपासून साथ दिली होती. मात्र, या निवडणुकीत खापे गट आणि साठे गट यांचे मनोमीलन झाले नाही. साठे गटाने खापे गटाशी फारकत घेत पारंपरिक विरोधकांची मोट बांधली. त्यामुळे खापे गटाच्या जनसेवा पॅनलला धक्कादायक पराभवाला सामोरे जावे लागले. सर्वपक्षीय जनशक्ती पॅनलला दहा, तर राष्ट्रवादी गटाच्या जनसेवा पॅनलला तीन जागांवर समाधान मानावे लागले.

बनवडी कॉलनी विभागावर साठे गटाचा कायमच प्रभाव राहिला आहे. गत वीस वर्षे साठे गट आणि खापे गट एकत्र येऊन सत्तास्थापन करत होते. यामध्ये बनवडी कॉलनीवर साठे गटाचा प्रभाव असल्याने या गटाची महत्त्वाची भूमिका होती. मात्र, गत पाच वर्षामध्ये साठे गटातील सदस्यांना विश्वासात न घेता मनमानी कारभार सुरू होता, असा आरोप साठे गटाने केला आहे. याचे शल्य मनात ठेवून सत्ता उलटून लावण्यासाठी सर्व गटतट विसरून सर्वपक्षीय विरोधकांची मोट बांधण्याचे काम साठे गटाचे सर्वेसर्वा शंकरराव साठे यांनी केले. एकमेकांचे हेवेदावे विसरून पारंपरिक विरोधक आणि साठे गट एकत्रित आले. जिल्हा परिषद सदस्य सागर शिवदास, भाऊसाहेब घाडगे, विकास करांडे, प्रा. मिलिंद गायकवाड, पांडुरंग कोठावळे, माजी उपसरपंच हरुण नाईक, राजू आतार, अभिजित मोरे, प्रदीप चंदनशिवे यांनी एकत्र येऊन मतदारांसमोर सर्वपक्षीय जनशक्ती पॅनलच्या माध्यमातून प्रचार केला.

विकासकामे केली असल्याने मतदार आपणालाच विजयी करतील, असा गाफीलपणा सत्ताधारी गटाला नडला. त्याचप्रमाणे विकासाचे मॉडेल तयार झाले असले तरी सत्तेच्या सारिपाटातील अंतर्गत धुसफूस सत्ताधाऱ्यांच्या पराभवास कारणीभूत ठरली.

- चौकट

जनतेला गृहीत धरणे ठरू शकते धोक्याचे...

देश पातळीवर बनवडीचे नाव पोहोचले असताना बनवडीमध्ये राष्ट्रवादीचे वर्चस्व कायम राहील, असे सर्वांना वाटत होते. सत्ताधारीही त्याच भ्रमात होते. मात्र, १८ जानेवारीला बनवडीचा धक्कादायक निकाल ऐकून सर्वांनाच आश्चर्य वाटले. जनतेला गृहीत धरून ग्रामपंचायतीचा कारभार करणाऱ्या कारभाऱ्यांना त्यामुळे मोठी चपराक बसली आहे.

- चौकट

सत्ताधाऱ्यांवर विरोधकांचे टीकास्र

जवळच्यांना उमेदवारी देणे, सोयीनुसार केलेली प्रभागरचना, विकासकामात केलेला पक्षपात, एकाधिकारशाहीने केलेला कारभार असे आरोप विरोधकांनी सत्तांधाऱ्यांवर केले. खापे गटाला शह देण्यासाठी साठे कुटुंबाने स्वत:च्या घरातील उमेदवारी मागे घेऊन सागर शिवदास यांच्या पत्नीला उमेदवारी दिली. ही त्यागाची भूमिका मतदारांसमोर प्रभावी ठरली. तसेच येत्या पाच वर्षात विकासकामे करताना सर्वांना विश्वासात घेऊन करणार, असा प्रचार केला होता.