शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
2
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
3
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
4
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
5
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
6
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
7
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
8
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
9
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
10
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
11
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
12
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
13
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
14
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
15
आई-वडिलांचा केला खून, मृतदेहांचे तुकडे करून गोणीत भरले, अन् नदीत फेकले, मुलाचं धक्कादायक कृत्य 
16
‘महाराष्ट्रात येणाऱ्या सर्व विमानांमध्ये मराठी भाषेत उद्घोषणा करा’, नाना पटोले यांची मागणी 
17
हृदयद्रावक! 'तो' सेल्फी ठरला अखेरचा; लग्नाच्या वाढदिवशी पतीसमोर पत्नीचा पाय घसरला अन्...
18
कसा आहे 'अवतार: फायर अँड ॲश'? सर्वात आधी चित्रपट पाहून राजामौली म्हणाले "थिएटरमध्ये बसलेल्या लहान मु
19
मोठी बातमी! कबड्डी खेळाडू राणा बलाचौरिया यांच्या हत्येतील आरोपी चकमकीत ठार; दोन पोलिस जखमी
20
टोल नाके दुसरीकडे हलवा...; प्रदूषण कमी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या प्रशासनाला सूचना
Daily Top 2Weekly Top 5

Satara Politics- घडतंय बिघडतंय: उत्तर कऱ्हाडमध्ये 'मनो-धैर्य' पुन्हा एकवटतयं ?

By प्रमोद सुकरे | Updated: August 1, 2025 12:07 IST

आमदार मनोज घोरपडे, धैर्यशील कदम अन् रामकृष्ण वेताळांचीही मांडीला मांडी 

प्रमोद सुकरे कऱ्हाड : सह्याद्री सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत भाजप अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला होता. भाजपचे आमदार मनोज घोरपडे, भाजपचे तत्कालीन जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम यांनी सत्ताधाऱ्यांच्या विरोधात स्वतंत्र २ पॅनेल उभी  केली. त्यामुळे व्हायचं तेच झालं. पण आता आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्यासमोर असताना हे 'मनो-धैर्य' पुन्हा एकवटताना दिसत आहे. कारण मतदारसंघातील अनेक कार्यक्रमाला मनोज घोरपडे, धैर्यशील कदम अन् रामकृष्ण वेताळ आता मांडीला मांडी लावून बसल्याचे पाहायला मिळत आहे.खरंतर कराड उत्तर विधानसभा मतदारसंघात कराडसह सातारा,खटाव व कोरेगाव तालुक्यातील गावांचा समावेश आहे.त्यामुळे येथील राजकीय समीकरणेही इतर मतदारसंघापेक्षा निश्चितच वेगळी आहेत. या मतदारसंघात यापूर्वी अनेकदा तिरंगी लढती झाल्या आणि त्याचा फायदा नेहमीच सत्ताधारी आमदारांना झाला. पण गत विधानसभा निवडणुकीत यापूर्वी एकमेकांविरोधात लढलेल्या मनोज घोरपडे व धैर्यशील कदम यांचे 'मनो-धैर्य' भाजप नेत्यांनी एकवटले.त्यामुळे मतदार संघात परिवर्तनाचे 'कमळ' फुलले.पण विधानसभा निवडणुकीनंतर लगेचच सह्याद्री सहकारी साखर कारखान्याची निवडणूक जाहीर झाली.माजी आमदार बाळासाहेब पाटील यांच्या ताब्यात असलेल्या या कारखान्याची निवडणूकही भाजप ताकतीने लढेल असे बोलले जात होते.तशी तयारीही सुरू दिसत होती. मात्र या निवडणुकीत 'मनो-धैर्य' पुन्हा विस्कटले. प्रत्यक्षात मैदानात ३ पॅनेल उतरली अन सत्ताधाऱ्यांचा विजयाचा मार्ग सुकर झाला.पण त्यामुळे भाजप अंतर्गत नेत्यांच्यात राजकीय तणाव वाढला. पण तो आता निवळत चाललेला पाहायला मिळतोय.नुकताच कराड तालुक्यातील बनवडी येथे माजी जिल्हा परिषद सदस्य सागर शिवदास यांनी विकास कामांच्या उद्घाटनाचा कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमाला आमदार मनोज घोरपडे, भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम व किसान मोर्चाचे रामकृष्ण वेताळ ही मंडळी एकाच व्यासपीठावर मांडीला मांडी लावून बसलेली दिसली.त्यानंतर शामगाव व पुसेसावळी येथील कार्यक्रमात सुध्दा हे सगळे एकाच व्यासपीठावर एकत्रित दिसले. त्यामुळे भाजप कार्यकर्त्यांच्यात याबाबत चर्चा सुरू झालेल्या आहेत.

एकमेकांवर केली होती टोकाची टीका ..सह्याद्री सहकारी साखर कारखाना निवडणुक प्रचारात मुख्य विरोधकांच्या ऐवजी या भाजपच्या दोन्ही पॅनेलच्या  नेत्यांनीच एकमेकांवर टोकाची टीका केली होती. त्यानंतर अनेक कार्यक्रमात या नेत्यांचा अबोला कायम दिसला.त्यामुळे हे अंतर आता वाढत जाईल असे बोलले जात होते. पण सध्या तरी या कार्यक्रमातून हे चित्र बदलताना दिसत आहे .

राजकारणात कोणच कायमचा मित्र अथवा शत्रू नसतो  राजकारणात कोणीच कोणाचा कायमचा मित्र अथवा शत्रू नसतो. त्यामुळे 'सह्याद्रीच्या निवडणुकीत भाजप अंतर्गत बदलले असले चित्र तरी ते होणारच नाहीत पुन्हा एकमेकांचे मित्र' असे म्हणता येणार नाही.आता तर जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका निवडणूका समोर आहेत.त्यामुळे ही राजकीय गरज म्हणून ते एकत्रित दिसतात की हे चित्र वरवरचे आहे हे येणार्या काळात स्पष्ट होईलच.