शहरं
Join us  
Trending Stories
1
Ganesh Kale Shot Dead: गणेशची हत्या करून फरार झालेले चार आरोपी सापडले; दोघांना अटक, नावे आली समोर
2
IND vs SA Women's World Cup 2025 Final Live Streaming: फायनलमध्ये 'ही' गोष्ट ठरेल भारतासाठी जमेची बाजू
3
"वर्गात एक विद्यार्थी असेल तरी मराठीची तुकडी चालली पाहिजे", विश्वास पाटील यांची स्पष्ट भूमिका
4
Ganesh Kale: मानेत, छातीत व पोटात घुसल्या गोळ्या, पळण्याआधीच चौघांनी गणेशला संपवले; आरोपींची नावे काय?
5
IND vs AUS 3rd T20I Live Streaming : हा सामना जिंका नाहीतर मालिका विसरा! टीम इंडियाकडे शेवटची संधी
6
Satara: फलटणमध्ये आणखी एका तरुणीने संपवले आयुष्य, आंचलच्या मृत्युसाठी आईवडिलच ठरले कारण
7
निर्भिड आणि बेधडक पत्रकारितेची आज गरज; केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे मत
8
Pune Crime: नाशिकच्या तरुणीवर हिंजवडीत कोयत्याने हल्ला! प्रेमप्रकरणातून तरुणाने केला जीव घेण्याचा प्रयत्न
9
Phaltan Doctor Death: डॉक्टर तरुणी मृत्यू प्रकरणाचा IPS तेजस्विनी सातपुते करणार तपास, एसआयटी स्थापन
10
Ganesh Kale Pune: आधी चार गोळ्या झाडल्या, नंतर डोक्यात कोयत्याने वार; काळेच्या हत्येचा पोलिसांनी सांगितला थरार
11
अमेरिका 'या' देशावर स्ट्राईक करण्याच्या तयारीत, ट्रम्प यांनी दिला आदेश?; रिपोर्टमधून खुलासा
12
चीनसोबत मिळून रशियानं दिला भारताला दगा?; ताजिकिस्तानात रचलं षडयंत्र, वाचा इनसाईड स्टोरी
13
परदेशातील भारताचा एकमेव सैन्य तळ हटवावा लागला, २ वर्षांनी मोठा खुलासा; किती मोठा झटका?
14
Pune Crime: पुण्यात पुन्हा गँगवार! कोंढव्यात गणेश काळेची गोळ्या घालून हत्या, कोयत्यानेही केले वार
15
आजचा मोर्चा संयुक्त महाराष्ट्र चळवळीची आठवण करून देणारा; शरद पवारांनी जागवल्या आठवणी
16
IND vs SA: वनडेत द. आफ्रिकेच्या पोरींचा भारतासमोर नाही चालत जोर; पण वर्ल्डकपमध्ये समोर येतात तेव्हा...
17
"बदतमीजों का...!"; राहुल गांधींसंदर्भात आचार्य प्रमोद कृष्णम यांचं वादग्रस्त विधान, RSS संदर्भातही बोलले
18
"मल्लिकार्जून खरगेंनी इतिहासातून धडा घ्यावा", आरएसएसचे दत्तात्रय होसबळे काँग्रेसच्या अध्यक्षांवर भडकले
19
चीनचा एक निर्णय अन् जागतिक बाजारात सोन्याच्या दराचं गणित बदलणार; भारतावर काय परिणाम होणार?
20
निवडणूक आयोगाकडे माझ्या नावाने अर्ज गेला, मोबाईल नंबर...; उद्धव ठाकरेंचा मोठा गौप्यस्फोट

Satara Politics- घडतंय बिघडतंय: उत्तर कऱ्हाडमध्ये 'मनो-धैर्य' पुन्हा एकवटतयं ?

By प्रमोद सुकरे | Updated: August 1, 2025 12:07 IST

आमदार मनोज घोरपडे, धैर्यशील कदम अन् रामकृष्ण वेताळांचीही मांडीला मांडी 

प्रमोद सुकरे कऱ्हाड : सह्याद्री सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत भाजप अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला होता. भाजपचे आमदार मनोज घोरपडे, भाजपचे तत्कालीन जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम यांनी सत्ताधाऱ्यांच्या विरोधात स्वतंत्र २ पॅनेल उभी  केली. त्यामुळे व्हायचं तेच झालं. पण आता आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्यासमोर असताना हे 'मनो-धैर्य' पुन्हा एकवटताना दिसत आहे. कारण मतदारसंघातील अनेक कार्यक्रमाला मनोज घोरपडे, धैर्यशील कदम अन् रामकृष्ण वेताळ आता मांडीला मांडी लावून बसल्याचे पाहायला मिळत आहे.खरंतर कराड उत्तर विधानसभा मतदारसंघात कराडसह सातारा,खटाव व कोरेगाव तालुक्यातील गावांचा समावेश आहे.त्यामुळे येथील राजकीय समीकरणेही इतर मतदारसंघापेक्षा निश्चितच वेगळी आहेत. या मतदारसंघात यापूर्वी अनेकदा तिरंगी लढती झाल्या आणि त्याचा फायदा नेहमीच सत्ताधारी आमदारांना झाला. पण गत विधानसभा निवडणुकीत यापूर्वी एकमेकांविरोधात लढलेल्या मनोज घोरपडे व धैर्यशील कदम यांचे 'मनो-धैर्य' भाजप नेत्यांनी एकवटले.त्यामुळे मतदार संघात परिवर्तनाचे 'कमळ' फुलले.पण विधानसभा निवडणुकीनंतर लगेचच सह्याद्री सहकारी साखर कारखान्याची निवडणूक जाहीर झाली.माजी आमदार बाळासाहेब पाटील यांच्या ताब्यात असलेल्या या कारखान्याची निवडणूकही भाजप ताकतीने लढेल असे बोलले जात होते.तशी तयारीही सुरू दिसत होती. मात्र या निवडणुकीत 'मनो-धैर्य' पुन्हा विस्कटले. प्रत्यक्षात मैदानात ३ पॅनेल उतरली अन सत्ताधाऱ्यांचा विजयाचा मार्ग सुकर झाला.पण त्यामुळे भाजप अंतर्गत नेत्यांच्यात राजकीय तणाव वाढला. पण तो आता निवळत चाललेला पाहायला मिळतोय.नुकताच कराड तालुक्यातील बनवडी येथे माजी जिल्हा परिषद सदस्य सागर शिवदास यांनी विकास कामांच्या उद्घाटनाचा कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमाला आमदार मनोज घोरपडे, भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम व किसान मोर्चाचे रामकृष्ण वेताळ ही मंडळी एकाच व्यासपीठावर मांडीला मांडी लावून बसलेली दिसली.त्यानंतर शामगाव व पुसेसावळी येथील कार्यक्रमात सुध्दा हे सगळे एकाच व्यासपीठावर एकत्रित दिसले. त्यामुळे भाजप कार्यकर्त्यांच्यात याबाबत चर्चा सुरू झालेल्या आहेत.

एकमेकांवर केली होती टोकाची टीका ..सह्याद्री सहकारी साखर कारखाना निवडणुक प्रचारात मुख्य विरोधकांच्या ऐवजी या भाजपच्या दोन्ही पॅनेलच्या  नेत्यांनीच एकमेकांवर टोकाची टीका केली होती. त्यानंतर अनेक कार्यक्रमात या नेत्यांचा अबोला कायम दिसला.त्यामुळे हे अंतर आता वाढत जाईल असे बोलले जात होते. पण सध्या तरी या कार्यक्रमातून हे चित्र बदलताना दिसत आहे .

राजकारणात कोणच कायमचा मित्र अथवा शत्रू नसतो  राजकारणात कोणीच कोणाचा कायमचा मित्र अथवा शत्रू नसतो. त्यामुळे 'सह्याद्रीच्या निवडणुकीत भाजप अंतर्गत बदलले असले चित्र तरी ते होणारच नाहीत पुन्हा एकमेकांचे मित्र' असे म्हणता येणार नाही.आता तर जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका निवडणूका समोर आहेत.त्यामुळे ही राजकीय गरज म्हणून ते एकत्रित दिसतात की हे चित्र वरवरचे आहे हे येणार्या काळात स्पष्ट होईलच.