शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
2
कुंडमळा पूल दुर्घटनेनंतर सुप्रिया सुळे घटनास्थळी; जखमींना दिला धीर, मदतीचे निर्देश
3
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
4
१५ वर्ष भारतीय सेनेत देशसेवा केली, केदारनाथ हेलिकॉप्टर दुर्घटनेत आला मृत्यू; कोण होते पायलट राजवीर सिंह?
5
कुंडमळा येथे क्षणात कोसळला पूल..! रांजणखळग्यांमुळे शोध मोहिमेत अडथळे
6
राजकोट किल्ल्यावरील शिवरायांच्या पुतळ्याला पुन्हा धोका?; चबुतऱ्याजवळील माती खचली
7
Pune Bridge Collapse: पूल दुर्घटनेत २ मृत्यू, ३२ जखमी, ६ जणांना वाचवले, मात्र आणखी काही...; CM देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
8
Bridge Collapse: कुंडमाळ्याजवळील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला; अनेक पर्यटक बुडाल्याची भीती
9
Pune Bridge Collapse: दोन महिन्यांपूर्वी इंद्रायणी नदीवरील पूल बंद झाला होता, बचाव मोहिम सुरू, व्हिडीओ आला समोर
10
नवरी जोमात, नवरा कोमात! लग्नानंतर १० दिवसांनी शॉपिंगच्या नावाने पत्नी फरार, पती पाहतोय वाट
11
एका दिवसात किती भाविक हेलिकॉप्टरने केदारनाथला जातात? किती वेळ लागतो? जाणून घ्या...
12
कुंडमळा दुर्घटनेत पहिला बळी..! बचाव कार्यादरम्यान महिलेचा मृतदेह सापडला
13
शिवसेना फुटीमागे कोण होतं जबाबदार?; मंत्री भरत गोगावले यांचा खळबळजनक दावा
14
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "मला बाबांशी बोलायचंय..."; विमान अपघातात ८ वर्षांच्या मुलाने गमावले वडील
15
तुमचा EMI कमी होणार! RBI च्या निर्णयानंतर 'या' बँका देतायत सर्वात स्वस्त कर्ज, पाहा संपूर्ण यादी!
16
पाठवणी होताच झालं नवरीचं अपहरण; शोधाशोध करताच समोर आलं धक्कादायक सत्य! नवराही शॉक
17
"तो काहीच खात नाही, सुन्न झालाय"; अहमदाबाद घटनेचा व्हिडीओ काढणाऱ्या मुलाला बसलाय धक्का!
18
"महेश सापडेल अशी आशा..!" अहमदाबाद विमान दुर्घटनेत लोकप्रिय संगीतकार बेपत्ता, शेवटचं लोकेशन सापडलं, पण...
19
Neha Marda : 'बालिका वधू'मधील 'गेहना' कुठे झाली गायब? अभिनेत्री बनली बिझनेसवुमन, आता करणार कमबॅक
20
नशिबाचा खेळ! केदारनाथ हेलिकॉप्टर अपघातात आई-वडील, चिमुकलीचा मृत्यू; मुलगा वाचला

आंबा बागायतदार चिंताग्रस्त

By admin | Updated: October 26, 2014 23:24 IST

पावसामुळे धोका : हंगाम लांबण्याची शक्यता

रत्नागिरी : आॅक्टोबर हीट बरोबर आता परतीचा पाऊस धुमाकूळ घालत आहे. गेले दोन दिवस सतत पाऊस कोसळत असल्याने आंब्याची मोहोर प्रक्रिया लांबण्याची शक्यता निर्माण झाली आहे. बहुतांश झाडांना पालवी आली असून शेतकरी थंडीच्या प्रतिक्षेत आहेत.यावर्षी दिवाळीत आॅक्टोबर हीट मोठ्या प्रमाणावर होती. दुपारी १२ ते ४ वाजेपर्यत उन्हाचे चटके असह्य होत होते. परंतु अमावस्येनंतर पुन्हा पावसाने हजेरी लावली आहे. परतीचा पाऊस सायंकाळी हजेरी लावत असे परंतु गेले दोन दिवस रात्री तसेच दिवसाही कोसळत आहे. त्यामुळे काही ठिकाणी मोहोर येण्याची प्रक्रिया सुरू झाली असली तरी पावसामुळे कुजण्याची भिती निर्माण झाली आहे.थंडीचा पत्ता नसल्यामुळे आंब्याची मोहोर प्रक्रिया लांबण्याची शक्यता निर्माण झाली आहे. नोव्हेंबरमध्ये थंडी पडू लागल्यावर मोहोर प्रक्रिया सुरू होते. पालवीचे प्रमाण अधिक असून पालवीवर तुडतुडा, चिकट्या रोगाचा (बुरशीसदृश्य) प्रादूर्भाव दिसून येत आहे. काही बागायदारांनी पालवीवर प्रतिबंधात्मक औषध फवारणी केली आहे. परंतु पाऊस सुरू झाल्याने औषध फवारणीचा खर्च वाया गेला आहे. पालवी आलेल्या कलमांना मोहोर येण्यासाठी अजून अवधी आहे. पालवी जून होण्यास साधारणत: एक ते दीड महिन्याचा कालावधी लोटण्याची शक्यता आहे. त्यामुळे यावर्षी आंबा पिक लांबण्याची शक्यता निर्माण झाली आहे. शिवाय एकाचवेळी रत्नागिरी व देवगड हापूस बाजारात दाखल झाल्यास दर गडगडण्याची भिती आहे. हवामानातील वारंवार होणाऱ्या बदलामुळे जिल्ह्याच्या अर्थकारणावर परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सध्या जिल्ह्यात अधूनमधून बरसणारा पाऊस हे आंबा हंगामासाठी मोठी धोक्याची घंटा ठरण्याची शक्यता असून त्यामुळे पाऊस कधी जाणार? याच्या प्रतिक्षेत बागायतदार असल्याचे दिसून येते. लांबलेला पाऊस हे आंबा हंगाम लांबणीवर जाण्यासाठी पुरेसे कारण असल्याचे बागायतदारांनी सांगितले. (प्रतिनिधी)झाडांना आली पालवीबहुतांश हापूसच्या झाडांना पालवी.शेतकरी अद्यापही थंडीच्या प्रतिक्षेत.हवामानातील वारंवार होणाऱ्या बदलामुळे जिल्ह्याच्या अर्थकारणावर परिणाम होण्याची शक्यता.अवचित बरसणारा पाऊस ही आंबा हंगामासाठी धोक्याची घंटा?