शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: SC
2
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
3
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
4
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
7
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
8
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
9
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
10
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
11
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
12
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
13
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
14
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
15
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
16
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
17
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
18
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
19
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
20
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?

आंबा बागायतदार चिंताग्रस्त

By admin | Updated: October 26, 2014 23:24 IST

पावसामुळे धोका : हंगाम लांबण्याची शक्यता

रत्नागिरी : आॅक्टोबर हीट बरोबर आता परतीचा पाऊस धुमाकूळ घालत आहे. गेले दोन दिवस सतत पाऊस कोसळत असल्याने आंब्याची मोहोर प्रक्रिया लांबण्याची शक्यता निर्माण झाली आहे. बहुतांश झाडांना पालवी आली असून शेतकरी थंडीच्या प्रतिक्षेत आहेत.यावर्षी दिवाळीत आॅक्टोबर हीट मोठ्या प्रमाणावर होती. दुपारी १२ ते ४ वाजेपर्यत उन्हाचे चटके असह्य होत होते. परंतु अमावस्येनंतर पुन्हा पावसाने हजेरी लावली आहे. परतीचा पाऊस सायंकाळी हजेरी लावत असे परंतु गेले दोन दिवस रात्री तसेच दिवसाही कोसळत आहे. त्यामुळे काही ठिकाणी मोहोर येण्याची प्रक्रिया सुरू झाली असली तरी पावसामुळे कुजण्याची भिती निर्माण झाली आहे.थंडीचा पत्ता नसल्यामुळे आंब्याची मोहोर प्रक्रिया लांबण्याची शक्यता निर्माण झाली आहे. नोव्हेंबरमध्ये थंडी पडू लागल्यावर मोहोर प्रक्रिया सुरू होते. पालवीचे प्रमाण अधिक असून पालवीवर तुडतुडा, चिकट्या रोगाचा (बुरशीसदृश्य) प्रादूर्भाव दिसून येत आहे. काही बागायदारांनी पालवीवर प्रतिबंधात्मक औषध फवारणी केली आहे. परंतु पाऊस सुरू झाल्याने औषध फवारणीचा खर्च वाया गेला आहे. पालवी आलेल्या कलमांना मोहोर येण्यासाठी अजून अवधी आहे. पालवी जून होण्यास साधारणत: एक ते दीड महिन्याचा कालावधी लोटण्याची शक्यता आहे. त्यामुळे यावर्षी आंबा पिक लांबण्याची शक्यता निर्माण झाली आहे. शिवाय एकाचवेळी रत्नागिरी व देवगड हापूस बाजारात दाखल झाल्यास दर गडगडण्याची भिती आहे. हवामानातील वारंवार होणाऱ्या बदलामुळे जिल्ह्याच्या अर्थकारणावर परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सध्या जिल्ह्यात अधूनमधून बरसणारा पाऊस हे आंबा हंगामासाठी मोठी धोक्याची घंटा ठरण्याची शक्यता असून त्यामुळे पाऊस कधी जाणार? याच्या प्रतिक्षेत बागायतदार असल्याचे दिसून येते. लांबलेला पाऊस हे आंबा हंगाम लांबणीवर जाण्यासाठी पुरेसे कारण असल्याचे बागायतदारांनी सांगितले. (प्रतिनिधी)झाडांना आली पालवीबहुतांश हापूसच्या झाडांना पालवी.शेतकरी अद्यापही थंडीच्या प्रतिक्षेत.हवामानातील वारंवार होणाऱ्या बदलामुळे जिल्ह्याच्या अर्थकारणावर परिणाम होण्याची शक्यता.अवचित बरसणारा पाऊस ही आंबा हंगामासाठी धोक्याची घंटा?