शहरं
Join us  
Trending Stories
1
"मलाही वाटतं मी मुख्यमंत्री व्हावं, पण..."; अजित पवार यांना असं का म्हणावंसं वाटलं? नेमका विषय काय?
2
गिल ने जीता दिल! गुजरातचं धडाकेबाज 'कमबॅक', काव्या मारनचा SRH संघ स्पर्धेतून जवळपास OUT!
3
विराट कोहलीने अवनीत कौरच्या 'त्या' फोटोला केलं Like, ट्रोल झाल्यावर स्पष्टीकरण देत म्हणाला...
4
Video: भरमैदानात तुफान राडा.... शुबमन गिलचा संयम सुटला, पंचांच्या अंगावर ओरडला अन् मग...
5
"संसदेत विधेयक आणा, कोण रोखतय?"; असदुद्दीन ओवेसी यांचा मोदी सरकारवर निशाणा 
6
सातवीच्या निकालाचे ‘टेन्शन’! विद्यार्थिनीने ४ वर्षांच्या बहिणीसह सोडले घर, पोलिसांनी घेतला शोध
7
‘लोकमत’चा दणका: सामूहिक कॉपी करणं भोवलं; भंडाऱ्यातील कांद्रीचे परीक्षा केंद्र तीन वर्षांकरिता रद्द
8
दक्षिण अमेरिकेत ७.४ रिश्टर स्केलचा भूकंप! चिली, अर्जेंटिना हादरले; घरातून बाहेर पडले लोक; त्सुनामीचा इशारा
9
बेजबाबदार RTI कार्यकर्ते खोट्या तक्रारींद्वारे त्रास देण्याचा 'व्यवसाय' चालवतात- गोपाळ शेट्टी
10
Video: पाहुणचाराचा 'गोडवा'! श्रद्धा कपूरने घरच्या पुरणपोळीने केलं इन्स्टाग्रामच्या CEOचं स्वागत
11
'दोन महिन्यांचे राशन साठवून ठेवा', भारताच्या कारवाईने घाबरेल्या पाकिस्तानचे जनतेला आवाहन
12
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
13
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
14
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
15
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
16
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
17
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
18
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
19
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
20
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 

माणदेशी आंबा निघाला दुबईला...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2021 04:37 IST

म्हसवड - माण तालुका अन् दुष्काळ हे जणू समीकरणच बनले आहे. त्यामुळे येथील शेतीला नेहमीच दुष्काळाचे तर शेतकऱ्यांना उन्हाचे ...

म्हसवड - माण तालुका अन् दुष्काळ हे जणू समीकरणच बनले आहे. त्यामुळे येथील शेतीला नेहमीच दुष्काळाचे तर शेतकऱ्यांना उन्हाचे चटके सोसावे लागले आहेत. निसर्गाची कायम अवकृपा अशी परिस्थिती असतानादेखील म्हसवड येथील हरिभाऊ वेदपाठक या शेतकऱ्याने खडकातून चक्क सोनं पिकवलं आहे. त्यांनी लावलेल्या आंब्याला थेट सातासमुद्रापलीकडून मागणी होऊ लागल्याने त्यांच्या शेतात पिकलेला आंबा आता थेट दुबईला निघाला आहे.

म्हसवड परिसरातील खडकी हे छोटेसे गाव. या गावाच्या हद्दीत म्हसवड येथील हरिभाऊ वेदपाठक यांची ४ एकर माळरान जमीन, ही जमीन पाहिल्यावर या जमिनीत कुसळेसुद्धा नीट उगवणार नाहीत, अशी नाबर जमीन. मात्र, अपार कष्ट व मेहनतीच्या जोरावर या कुटुंबाने कृषी विभागाच्या साह्याने आंब्याची बाग फुलवली आहे. नुसती फुलवलेलीच नाही तर त्या बागेतील आंब्याला आता चक्क दुबईतून मागणी होऊ लागली आहे.

गत १० वर्षांपासून अगदी तळहाताच्या फोडाप्रमाणे या कुटुंबाने या बागेचे संगोपन केल्याचे हे फळ असल्याचे वेदपाठक कुटुंबीय सांगतात. या कुटुंबाने जेव्हा या बागेसाठी मेहनत घेण्यास सुरुवात केली, तेव्हा त्यांना जमीन पाहून अनेकांनी अक्षरश: वेड्यात काढले. मात्र, वाळूचे कण रगडता तेलही गळे या म्हणीप्रमाणे वेदपाठक कुटुंबाने अपार मेहनतीच्या जोरावर ही किमया घडवली. त्यांच्या आंब्याची छाटणी होताच तो निर्यातीसाठी मुंबईला रवाना करण्यात आला आहे. प्रतिकिलो १५० रुपये हा दर सध्या त्यांना मिळणार असल्याचे या कुटुंबाने सांगितले. या बागेचे संगोपन करताना वेदपाठक कुटुंबीयांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला असून अनेकदा ही बाग वाचवण्यासाठी त्यांनी टँकरने पाणी या बागेला दिले ‌आहे. शेतातच त्यांनी कृषी विभागाच्या साह्याने ३४ बाय ३४ चे शेततळे उभारून त्यातील पाण्यावर या बागेचे संगोपन केले आहे. आज वेदपाठक यांच्या या आंब्याच्या शेतात जवळपास ४०० हून अधिक झाडे असून प्रत्येक झाडाला ७० ते ८० आंबे लागलेले आहेत. आंब्याचा दर्जा हा उच्च असल्यानेच त्यांनी हा आंबा परदेशात पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या तरी दुबईसारख्या श्रीमंत देशात वेदपाठक यांच्या शेतातील आंब्याला मागणी होऊ लागली आहे. त्यांच्या या आंब्याची चव सातासमुद्रापलीकडे चाखली जाणार असल्याने वेदपाठक कुटुंबीय सध्या खूश आहे.

खरेतर, माणच्या मातीत सोनं उगवण्याची क्षमता आहे. पण, ते उगवण्यासाठी कष्ट उपसण्याची तयारीसुद्धा तेवढीच महत्त्वाची आहे. माणदेशी शेतकऱ्यांच्या अंगात एवढी धमक आहे की, तो कमी क्षेत्रात व कमी पाण्यावरही उत्तम शेती करून चांगले उत्पन्न घेतो आहे. यापूर्वीही येथील शेतकऱ्यांना अनेकदा निसर्गाच्या अवकृपेचा सामना करावा लागला आहे. कधी दुष्काळ, अवकाळी, कधी वादळी तर कधी अतिवृष्टी अशा विविध परिस्थितीचा सामना करीत येथील शेतकऱ्यांनी आपल्या शेतीत सोने पिकवून दाखवले आहे.

कोट

कृषी विद्यापीठाच्या शिफारशींनुसार बाग व्यवस्थापन करून निर्यातक्षम आंबा पीक घेतले आहे. विद्यापीठाच्या शिफारशींनुसार शेतकऱ्यांनी तंतोतंत पीक व फळबाग लागवड केली तर निश्चितच यश मिळेल.

हरिभाऊ वेदपाठक, शेतकरी म्हसवड

फोटो ओळी - वेदपाठक यांच्या शेतात पिकलेला आंबा.