शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा अनर्थ टळला! AK 47 ते ३०० किलो RDX जप्त; डॉक्टरच्या मुखवट्यात लपला होता क्रूर दहशतवादी
2
पार्थ पवार ते ७० हजार कोटी; दोन मोठ्या आरोपांवर अजितदादांचे उत्तर; म्हणाले, "सकाळी कामाला लागतो ते..."
3
"कुराणची शपथ घेऊन सांगतो, भाजप...!" मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांचा मोठा दावा, राजकारण तापलं
4
“टॅरिफला विरोध करणारे मूर्ख, आम्ही अमेरिकेला श्रीमंत केले, इथे महागाई नाही”: डोनाल्ड ट्रम्प
5
पार्थच्या व्यवहाराचे ४२ कोटी कोण भरणार? मुंढव्यातील वादग्रस्त व्यवहार आज रद्द होणार?
6
जडेजा-सॅमसनच्या 'डील'मध्ये डेवाल्ड ब्रेव्हिसचा अडथळा, आयपीएलमध्ये चेन्नई, राजस्थान यांच्यात खेळाडूंची अदलाबदली होण्याची शक्यता
7
Kalbhairav Jayanti 2025: बुधवार १२ नोव्हेंबर कालभैरव जयंती; शिवाचे हे उग्ररूप कशासाठी?
8
बिहारमध्ये योगी आदित्यनाथ यांचा झंझावात, १० दिवसांत ३१ रॅली; काँग्रेस आणि RJD वर घणाघात
9
'नीट'च्या दोन मार्कलिस्ट अन् विद्यार्थिनीला धक्का, पालकही चिंताग्रस्त; कुटुंब निराशेच्या गर्तेत
10
विद्यापीठात पॉलिमर केमिस्ट्री प्रयोगशाळा; संशोधकांना मिळेल प्रेरणा, विकासात योगदान
11
आजचा अग्रलेख: भारतीयांची क्षमता जोखा, साखर नको!
12
परराज्यातील मुलांना एमबीबीएसला प्रवेश घेण्याची मुभा द्या, पालघरच्या कॉलेजने घेतली उच्च न्यायालयात धाव
13
कपड्यांवरुन होणाऱ्या ट्रोलिंगवर पहिल्यांदाच बोलल्या अमृता फडणवीस, म्हणाल्या- "मला वाईट वाटतं, पण..."
14
आजचे राशीभविष्य,१० नोव्हेंबर २०२५: दुपार नंतर समस्या कमी होऊ लागतील; सामाजिक प्रतिष्ठेत वाढ होईल
15
तीन शहरांत रेकी, विषही तयार; अतिरेक्यांचा मोठा कट उधळला, गुजरात एटीएसने पकडले ३ अतिरेकी
16
एक दिवस CM बनवलं तर काय कराल? अमृता फडणवीस म्हणाल्या- "मी देवेंद्रजींना..."
17
१२ वर्षांनी शतांक गजकेसरी योग: ८ राशींना लॉटरी, इच्छापूर्ती; नवीन नोकरी, अकल्पनीय पैसा-लाभ!
18
महाराष्ट्र्रात १३ हजार बोगस कंपन्यांना टाळे; जीएसटीविरोधीत मोहीम
19
मराठी अभिनेता दुसऱ्यांदा होणार बाबा, पार पडलं पत्नीचं बेबी शॉवर; अरुण गवळीच्या मुलीसोबत थाटलाय संसार
20
मुस्लिम आणि ख्रिश्चन RSS चे सदस्य होऊ शकतात का? मोहन भागवत म्हणाले, "शाखेत येऊ शकतात, पण..."

माणदेशी आंबा निघाला दुबईला...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2021 04:37 IST

म्हसवड - माण तालुका अन् दुष्काळ हे जणू समीकरणच बनले आहे. त्यामुळे येथील शेतीला नेहमीच दुष्काळाचे तर शेतकऱ्यांना उन्हाचे ...

म्हसवड - माण तालुका अन् दुष्काळ हे जणू समीकरणच बनले आहे. त्यामुळे येथील शेतीला नेहमीच दुष्काळाचे तर शेतकऱ्यांना उन्हाचे चटके सोसावे लागले आहेत. निसर्गाची कायम अवकृपा अशी परिस्थिती असतानादेखील म्हसवड येथील हरिभाऊ वेदपाठक या शेतकऱ्याने खडकातून चक्क सोनं पिकवलं आहे. त्यांनी लावलेल्या आंब्याला थेट सातासमुद्रापलीकडून मागणी होऊ लागल्याने त्यांच्या शेतात पिकलेला आंबा आता थेट दुबईला निघाला आहे.

म्हसवड परिसरातील खडकी हे छोटेसे गाव. या गावाच्या हद्दीत म्हसवड येथील हरिभाऊ वेदपाठक यांची ४ एकर माळरान जमीन, ही जमीन पाहिल्यावर या जमिनीत कुसळेसुद्धा नीट उगवणार नाहीत, अशी नाबर जमीन. मात्र, अपार कष्ट व मेहनतीच्या जोरावर या कुटुंबाने कृषी विभागाच्या साह्याने आंब्याची बाग फुलवली आहे. नुसती फुलवलेलीच नाही तर त्या बागेतील आंब्याला आता चक्क दुबईतून मागणी होऊ लागली आहे.

गत १० वर्षांपासून अगदी तळहाताच्या फोडाप्रमाणे या कुटुंबाने या बागेचे संगोपन केल्याचे हे फळ असल्याचे वेदपाठक कुटुंबीय सांगतात. या कुटुंबाने जेव्हा या बागेसाठी मेहनत घेण्यास सुरुवात केली, तेव्हा त्यांना जमीन पाहून अनेकांनी अक्षरश: वेड्यात काढले. मात्र, वाळूचे कण रगडता तेलही गळे या म्हणीप्रमाणे वेदपाठक कुटुंबाने अपार मेहनतीच्या जोरावर ही किमया घडवली. त्यांच्या आंब्याची छाटणी होताच तो निर्यातीसाठी मुंबईला रवाना करण्यात आला आहे. प्रतिकिलो १५० रुपये हा दर सध्या त्यांना मिळणार असल्याचे या कुटुंबाने सांगितले. या बागेचे संगोपन करताना वेदपाठक कुटुंबीयांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला असून अनेकदा ही बाग वाचवण्यासाठी त्यांनी टँकरने पाणी या बागेला दिले ‌आहे. शेतातच त्यांनी कृषी विभागाच्या साह्याने ३४ बाय ३४ चे शेततळे उभारून त्यातील पाण्यावर या बागेचे संगोपन केले आहे. आज वेदपाठक यांच्या या आंब्याच्या शेतात जवळपास ४०० हून अधिक झाडे असून प्रत्येक झाडाला ७० ते ८० आंबे लागलेले आहेत. आंब्याचा दर्जा हा उच्च असल्यानेच त्यांनी हा आंबा परदेशात पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या तरी दुबईसारख्या श्रीमंत देशात वेदपाठक यांच्या शेतातील आंब्याला मागणी होऊ लागली आहे. त्यांच्या या आंब्याची चव सातासमुद्रापलीकडे चाखली जाणार असल्याने वेदपाठक कुटुंबीय सध्या खूश आहे.

खरेतर, माणच्या मातीत सोनं उगवण्याची क्षमता आहे. पण, ते उगवण्यासाठी कष्ट उपसण्याची तयारीसुद्धा तेवढीच महत्त्वाची आहे. माणदेशी शेतकऱ्यांच्या अंगात एवढी धमक आहे की, तो कमी क्षेत्रात व कमी पाण्यावरही उत्तम शेती करून चांगले उत्पन्न घेतो आहे. यापूर्वीही येथील शेतकऱ्यांना अनेकदा निसर्गाच्या अवकृपेचा सामना करावा लागला आहे. कधी दुष्काळ, अवकाळी, कधी वादळी तर कधी अतिवृष्टी अशा विविध परिस्थितीचा सामना करीत येथील शेतकऱ्यांनी आपल्या शेतीत सोने पिकवून दाखवले आहे.

कोट

कृषी विद्यापीठाच्या शिफारशींनुसार बाग व्यवस्थापन करून निर्यातक्षम आंबा पीक घेतले आहे. विद्यापीठाच्या शिफारशींनुसार शेतकऱ्यांनी तंतोतंत पीक व फळबाग लागवड केली तर निश्चितच यश मिळेल.

हरिभाऊ वेदपाठक, शेतकरी म्हसवड

फोटो ओळी - वेदपाठक यांच्या शेतात पिकलेला आंबा.