शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुतीत एकनाथ शिंदेंची कोंडी; मुंबईत भाजपानं शिंदेसेनेला केवळ ५२ जागांचा दिला प्रस्ताव?
2
अमेरिकेत पॅलेस्टिनींसह इतर ७ देशांवर प्रवास बंदी; डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय
3
'१२ लाख सैनिकांची गरज काय? त्यांना दुसरे काम लावा'; पृथ्वीराज चव्हाण यांनी स्पष्टच सांगितलं
4
आई मंदिराबाहेर फुले विकायची...! आयपीएलने मुलाला बनविले 'करोडपती', वडील मैदानावर...
5
LIC ची कोणत्या कंपनीत किती गुंतवणूक? सरकारनं दिली महत्त्वाची माहिती; टाटा, रिलायन्स, अदानीसह कोणत्या कंपन्या?
6
अंबरनाथमध्ये भाजपाचे उमेदवार पवन वाळेकर यांच्या कार्यालयावर गोळीबार; घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद
7
मुंबई-दिल्ली एक्स्प्रेसवेवर भीषण अपघात! धडक होताच उडाला भडका, तीन जणांचा आगीत झाला कोळसा
8
कॅरेबियन समुद्रात अमेरिकन युद्धनौकांनी 'या' देशाला घेरले; ट्रम्प यांनी दिला थेट युद्धाचा इशारा
9
'बिग बॉस मराठी ६'मध्ये दिसणार गौतमी पाटील? म्हणाली, "शो खूप छान आहे पण..."
10
ब्रिटनमध्ये 'नो एन्ट्री' : व्हिसाचे नियम कडक; ६७ टक्क्यांची मोठी कपात, आयटी, हेल्थ प्रोफेशनल्सना मोठा झटका!
11
प्रदूषणावरून संसदेत राजकीय 'युद्धबंदी'! जगातील सर्वाधिक प्रदूषित शहरांमध्ये भारताचा वरचा क्रमांक
12
'धुरंधर'च्या यशात अक्षय खन्ना कुठे गायब? अलिबागच्या घराची केली वास्तुशांती; व्हिडीओ व्हायरल
13
अग्निवीर आणि अन्य जवान यांच्यामध्ये भेदभाव का होतो?; मुंबई उच्च न्यायालयात याचिका; केंद्र सरकारला हायकोर्टाची नोटीस
14
ठाकरे बंधू जाहीरनामा, युती एकाच दिवशी जाहीर करणार? शिवाजी पार्क येथे प्रचाराची सांगता सभाही एकत्रित..?
15
१५ दिवसांत १४ हत्या, १७ अल्पवयीन आरोपींचा समावेश; राजधानी दिल्ली वाढत्या गुन्हेगारीनं हादरली
16
दोस्ती कुणाची? कुस्ती कुणाशी? महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीचा बिगुल
17
कोवळ्या वयात मित्राला संपवण्याची मानसिकता येते कुठून? मुलांच्या मानसिक आरोग्यावर तातडीने लक्ष देण्याची गरज
18
आजचे राशीभविष्य, १७ डिसेंबर २०२५: चांगली बातमी मिळेल,शक्यतो आज वाद टाळावेत
19
ममता बॅनर्जी यांच्या मतदारसंघातून तब्बल ४५ हजार मतदार हटवले; सत्ताधारी TMC राबवणार मोहीम
20
मुंबईत दोन मोठे विमानतळ, मात्र स्टेट हँगरच नाही; सरकारलाही भाड्याने घ्यावे लागते हँगर!
Daily Top 2Weekly Top 5

माणला मिळणार आज वॉटर कप स्पर्धेत ‘मान’ ! जिल्ह्याचे लक्ष लागून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2018 23:26 IST

राज्यात एप्रिल-मे महिन्यांत झालेल्या तिसऱ्या वॉटर कप स्पर्धेचा बक्षीस समारंभ रविवार, दि. १२ रोजी पुण्याच्या बालेवाडीत होत असून, माण तालुक्यातील भांडवली आणि टाकेवाडी ही दोनच गावे जिल्ह्यातून राज्यस्तरावर पोहोचली आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील वॉटर कप स्पर्धेत सहभागी १६० गावांचे या स्पर्धेच्या बक्षीस वितरणाकडे लक्ष लागले आहे.

ठळक मुद्देपुण्यात बक्षीस वितरण समारंभ; माण, खटाव, कोरेगावमधून शेकडो जण जाणार

सातारा/म्हसवड : राज्यात एप्रिल-मे महिन्यांत झालेल्या तिसऱ्या वॉटर कप स्पर्धेचा बक्षीस समारंभ रविवार, दि. १२ रोजी पुण्याच्या बालेवाडीत होत असून, माण तालुक्यातील भांडवली आणि टाकेवाडी ही दोनच गावे जिल्ह्यातून राज्यस्तरावर पोहोचली आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील वॉटर कप स्पर्धेत सहभागी १६० गावांचे या स्पर्धेच्या बक्षीस वितरणाकडे लक्ष लागले आहे.

राज्यात गेल्या तीन वर्षांपासून अभिनेता आमिर खान यांच्या पाणी फाउंडेशनच्या वतीने वॉटर कप स्पर्धा सुरू आहे. पहिल्यावर्षी या स्पर्धेला प्रतिसाद अल्पसा लाभला; पण या स्पर्धेमुळे लोकांना पाण्याचे महत्त्व समजून आले. पहिल्यावर्षी सातारा जिल्ह्यातील वेळू गावाने राज्यात प्रथम क्रमांक मिळविला. त्यामुळे जिल्ह्याचा डंका सर्वत्र वाजला. वेळूचा आदर्श घेत जिल्ह्यातील इतर अनेक गावांनी दुसºया वर्षीच्या स्पर्धेत सहभाग घेतला. त्यामधून डीपसीसीटी, नालाबांध, ओढ्यातील गाळ काढणे अशी कामे झाली. दुसºया वर्षीही जिल्ह्यातील अनेक गावांनी स्पर्धेत क्रमांक मिळविला.

यावर्षी तिसºया स्पर्धेतही जिल्ह्यातील माण, खटाव आणि कोरेगाव या तालुक्यांतील दीडशेहून अधिक गावे सहभागी होती. ८ एप्रिलपासून संबंधित गावात श्रमदानाचं तुफान आलं होतं. २२ मे रोजी मध्यरात्री १२ वाजताच हे तुफान थांबलं; पण या ४५ दिवसांच्या कामात लोकांनी जलसंधारणाचे मोठे काम केले होते. आता या वॉटर कप स्पर्धेचा निकाल रविवारी लागणार आहे.वॉटर कप स्पर्धेत सहभागी झालेल्या गावांची दोन टीमने पाहणी केली. त्यानंतर राज्यस्तरावर १५ गावे पोहोचली होती. त्यामध्ये सातारा जिल्ह्यातून माण तालुक्यातील भांडवली आणि टाकेवाडी या गावांचा समावेश होता. भांडवली गावाने माथा ते पायथा काम केले आहे.जिल्ह्यात जलसंधारणाचे काम मोठे...या वर्षीच्या वॉटर कपच्या तिसºया स्पर्धेत जिल्ह्यातील १६० च्यावर गावांनी सहभाग घेतला होता. त्यामध्ये माण तालुक्यातील ६६, खटावमधील ५७ आणि कोरेगाव तालुक्यातील ४२ गावांनी सहभाग घेतलेला. या सर्व गावांत जलसंधारणाचे मोठे काम झाले आहे. त्यातूनच जिल्ह्यातील दोन गावांची निवड राज्यस्तरावर झाली आहे.पुणे येथे होणाºया सोहळ्यात सकाळी दहा ते दुपारी एक वाजेपर्यंत तालुका स्तरावरील गावांचा पुरस्कार सोहळा तर दुपारी तीन ते सहा या वेळेत राज्य स्तरावरील गावांचा पुरस्कार वितरण सोहळा होणार आहे. दहिवडी येथे नुकताच स्पर्धेत सहभागी प्रत्येक घटकांचा गौरव झाला होता.राज्यातील २४ जिल्ह्यांतील ७५ तालुके स्पर्धेत सहभागीसुमारे ४,५०० गावांचा राहिला सहभागराज्यस्तरावर१५ गावे पोहोचलीपश्चिम महाराष्ट्रातील६, विदर्भ ४आणि मराठवाडा ५ गावे 

गेल्यावर्षी बिदालला हुलकावणी मिळाली. तरीही नव्या जोमाने यावर्षी चांगले काम केले. भांडवली व टाकेवाडी ही गावे राज्यपातळीवर पोहोचली. यातील एक वॉटर कपचा हक्कदार असेल.- अजित पवार, समन्वयक पाणी फाउंडेशन, माण तालुका

टॅग्स :Satara areaसातारा परिसरWater Cup Competitionवॉटर कप स्पर्धा