शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
2
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
3
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
4
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
5
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
6
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
7
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
8
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
9
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
10
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
11
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
12
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
13
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
14
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
15
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
16
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
17
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
18
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
19
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
20
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव

मलकापुरात ‘मुदतपूर्व’ची शक्यता !

By admin | Updated: April 21, 2017 22:24 IST

हालचाली गतिमान : नगरपरिषद करण्यासाठी अतुल भोसलेंचा पाठपुरावा

कऱ्हाड : मलकापूर नगरपंचायतीचे रूपांतर नगरपरिषदेत व्हावे यासाठी भाजपचे प्रदेश चिटणीस डॉ. अतुल भोसले आग्रही आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे त्यासाठीची मागणी लावून धरली आहे. मंत्रालय पातळीवर याबाबतच्या हालचाली गतिमान झाल्या असून, लवकरच नगरपंचायतीला नगरपरिषदेचा आकार येईल, अशी चर्चा आहे. त्यामुळे मलकापुरात मुदतपूर्व निवडणुकीची शक्यताही वर्तविली जात आहे. कृष्णा-कोयनेच्या प्रीतिसंगमावर वसलेल्या कऱ्हाडचं उपनगर म्हणून मलकापूरची ओळख निर्माण झाली आहे. खरंतर मलकापूर हा मूळचा कऱ्हाडचाच एक भाग आहे. पण १९६२ मध्ये मलकापूर ही स्वतंत्र ग्रामपंचायत म्हणून आकाराला आली. त्यावेळी ज्ञानदेव कराळे यांनी परिश्रम घेतल्याचे सांगितले जाते. राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, औद्योगिक, व्यावसायिकदृष्ट्या कऱ्हाडचे महत्त्व वाढीस लागले आणि कऱ्हाडच्या दोन्ही बाजूंनी नदी असल्याने त्याच्या विस्ताराला मर्यादा पडल्या. साहजिकच याचा परिणाम म्हणून कऱ्हाडची उपनगरे वाढू लागली. त्याला मलकापूर अपवाद नाही. पुणे-बेंगलोर महामार्गाच्या दोन्ही बाजूला मलकापूर वाढू लागले. लोकसंख्या वाढू लागल्याने गावाचा विकास त्याच पद्धतीने अपेक्षित होता. ग्रामपंचायत असल्याने विकासनिधीला मर्यादा पडत होत्या. म्हणून मनोहर शिंदे यांच्या प्रयत्नातून पृथ्वीराज चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली मलकापुरात ग्रामपंचायत सदस्य ‘मेहरबान’ झाले. कारण मलकापूरची २००८ मध्ये नगरपंचायत झाली. कऱ्हाडजवळचे महामार्गालगत वसलेले उपनगर म्हणून मलकापूरची वाढ तितक्याच झपाट्याने होत आहे. लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. त्यामुळे विकास दर वाढण्यासाठी आता नगरपंचायतीची नगरपरिषद होणे गरजेचे बनले आहे. हीच गरज ओळखून भाजपचे प्रदेश चिटणीस डॉ. अतुल भोसले यांनी मलकापूर नगरपरिषदेची मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे काही दिवसांपूर्वीच केली होती. मलकापूर नगरपंचायतीची सन २०११ ची लोकसंख्या २७ हजार इतकी आहे. आता तर त्यापेक्षा जास्त लोकसंख्या झाली आहे. नगरपंचायतीची नगरपरिषद होण्यासाठी जे काही निकष आहेत त्यात मलकापूर बसत आहे. त्या सगळ्याचा पाठपुरावा डॉ. अतुल भोसलेंनी जोरदार चालविला आहे. मंत्रालय पातळीवरही याबाबतच्या हालचाली गतिमान झाल्याचे समजते. मुख्यमंत्री फडणवीस यांनी याबाबतचा निर्णय त्वरित घेतल्यास मलकापुरात मुदतपूर्व निवडणूक झाल्यास आश्चर्य वाटायला नको. मलकापूर नगरपंचायतीची गत निवडणूक आॅगस्ट २०१३ मध्ये झाली होती. त्यामुळे पुढील निवडणुकीसाठी अजून सुमारे दीड वर्षाचा अवधी आहे. (प्रतिनिधी)