शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धाचा भडका, तेल खरेदीचा झपाटा! महागाई वाढणार, भारताच्या व्यापाराला मोठा  फटका
2
युद्धात उतरली महासत्ता! ऑपरेशन मिडनाइट हॅमर, इराणच्या ३ अणुतळांवर अमेरिकेचे १४ बॉम्ब
3
लेख: कमी जागा कोण घेणार? भाजप की शिंदेंची शिवसेना?
4
निम्म्या जगावर इंधनाचे संकट? इराण बंद करणार होर्मुझची सामुद्रधुनी; प्रस्ताव मंजूर
5
Pahalgam Attack: पर्यटकांवर हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांना आश्रय देणारे दोघे अटकेत
6
विशेष लेख : ...शेवटी ट्रम्प काका म्हणतील तेच खरे!
7
शरीरात लपविलेले २३ कोटींचे अमली पदार्थ जप्त; मुंबई विमानतळावर पाच जणांना अटक 
8
बघ्यांसमोर प्राण सोडला, मृतदेह २ तास रस्त्यावर; पोलिसांची विनंतीही धुडकावली
9
अग्रलेख: भावना दुखावलेल्यांची झुंड, लोकशाही धोक्यात असल्याची ही लक्षणे
10
नालेसफाईतील पैशांचा गाळ नेमका कुणाच्या खिशात? यंत्रणा काय करत होती? 
11
ENG vs IND : आता अनुभवी KL राहुलसह कॅप्टन शुबमन गिलवर मोठी जबाबदारी
12
कोकणात आणखी सहा ग्रोथ सेंटर्स; १०६ गावांत विकास केंद्रे, पर्यटन, कृषी व्यवसायाला चालना   
13
भाजपामध्ये जाणार का? एकनाथ खडसे म्हणाले, “मी आजही RSSचा स्वयंसेवक आहे, गिरीश महाजन...”
14
अमेरिकेच्या हल्ल्याला इराण कसे देणार प्रत्युत्तर? आताच्या घडीला खामेनी यांच्याकडे ३ पर्याय
15
अमेरिकेच्या इराणवरील हल्ल्यावर फारूक अब्दुल्लांचे विधान; म्हणाले, “आज जागे झाले नाही तर...”
16
ENG vs IND : जसप्रीत बुमराहचा 'पंजा'! या ३ चुकांमुळे लीड्स कसोटीत टीम इंडियानं गमावली मोठ्या आघाडीची संधी
17
साप्ताहिक राशीभविष्य: ५ राशींना सर्वोत्तम, पदोन्नती योग; बंपर लाभास अनुकूल काळ, शुभ तेच घडेल!
18
पावसाळ्यातही सुरू राहणार नक्षलविरोधी मोहीम; आत्मसमर्पण करा, अन्यथा...शाहांचा अल्टिमेटम
19
अमेरिकेनं इराणवर ज्या B-२ स्टिल्थ बॉम्बर्सनं हल्ला केला त्याची किंमत माहित्येय? तासाला किती खर्च येतो? जाणून थक्क व्हाल
20
Ashadhi Wari : दिवे घाटाची अवघड वाट पार करीत माउलींचा पालखी सोहळा कऱ्हेकाठी विसावला

मल्हारपेठ-पंढरपूर राज्य मार्गावरील पुलाला भगदाड पडल्याने वाहनचालकांची कसरत, हजारो विद्यार्थ्यांचा जीव मुठीत घेऊन प्रवास

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2017 15:40 IST

मल्हारपेठ-पंढरपूर राज्यमार्गावर असलेल्या मायणी गावाच्या पूर्व व पश्चिम बाजूच्या दोन्ही बाजूंच्या पुलाची अतिशय बिकट अवस्था झाली असून, पश्चिमेकडील पुलाच्या मध्यभागी व कडेला दोन मोठी भगदाडे पडले आहे.

मायणी- मल्हारपेठ-पंढरपूर राज्यमार्गावर असलेल्या मायणी गावाच्या पूर्व व पश्चिम बाजूच्या दोन्ही बाजूंच्या पुलाची अतिशय बिकट अवस्था झाली असून, पश्चिमेकडील पुलाच्या मध्यभागी व कडेला दोन मोठी भगदाडे पडले आहे. याच पुलावरून रोज हजारो विद्यार्थी माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षणाचा प्रवास जीव मुठीत धरून करीत आहेत. तर वाहन चालकांनाही वाहन चालवताना मोठी कसरत करावी लागत आहे.

मायणी गाव व चांदणी चौकाला जोडणाऱ्या मल्हारपेठ-पंढरपूर राज्यमार्गावरील पुलाच्या मध्यभागी मोठे भगदाड पडले आहे. तर त्याच्याच शेजारी उजव्या बाजूस गवतामध्ये (रक्षक दगडाजवळ) दुसरे एक भगदाड पडले आहे. तसेच पुलावर असंख्य लहान-मोठे खड्डेही पडलेले आहेत. या पुलाची उंची व रुंदी कमी आहे, तसेच संरक्षण जाळी नाही व पादचारी मार्गही नाही. या पुलाच्या दोन्ही बाजूस प्राथमिक शाळा, माध्यमिक शाळा, महाविद्यालय व व्यावसायिक शिक्षण घेण्यासाठी येणारे हजारो विद्यार्थी याच पुलाचा वापर करीत आहेत. त्यामुळे मोठा अपघात होण्याची शक्यता आहे.

गावातून मुख्य चौक व विटा, सांगली, वडूज, सातारा, कऱ्हाड व पुणे मुंबईसह इतर ठिकाणी जाण्यासाठी वाहनचालकांना याच पुलाचा आधार घ्यावा लागतो. याच पुलावर असंख्य खड्डे त्यातही पडलेली मोठी भगदाडे अरुंद व कमी उंचीचा पूल, रक्षक दगडावरती वाढलेली झुडपे व शिक्षणासाठी चालत असलेले हजारो विद्यार्थी व ग्रामस्थ त्यातून वाहनचालकांना वाहन चालवताना मोठी कसरत करावी लागत आहे.

गेल्या तीन महिन्यांपूर्वी याच मार्गावरील म्हणजे गावाच्या पूर्व बाजूच्या पुलाचा संरक्षण कट्टा पडला आहे. त्याकडे संबंधित बांधकाम विभागाने पूर्ण दुर्लक्ष केले आहे. मायणी पोलिसांनी अपघात टाळण्यासाठी लाल रिबीन लावून सामाजिक बांधिलकीचे दर्शन संपूर्ण मायणीकरांना घडविले होते. तरी बांधकाम विभाग झोपलेलाच असल्याचं चित्र पाहायला मिळतं आहे.