शहरं
Join us  
Trending Stories
1
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
2
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
3
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
4
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
5
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या
6
एथर कंपनीसाठी बॅड न्यूज? ग्रे मार्केटमध्ये चांगले संकेत नाही, आयपीओ उघडण्यापूर्वीच जीएमपी क्रॅश
7
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
8
रेखा झुनझुनवाला ते खन्ना यांच्यासह ५ मोठ्या गुंतवणूकदारांची शेअर्स खरेदी, तुमच्या पोर्टफोलिओमध्येही आहे का?
9
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला
10
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
11
लेडी सिंघम! डॉक्टरने पाहिलं UPSC चं स्वप्न; दिवसा रुग्णांवर उपचार अन् रात्री अभ्यास, झाली IPS
12
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं
13
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
14
"मी तिच्याशिवाय राहू शकत नाही, दहशतवाद्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे"; आईपासून दुरावली मुलं
15
रिकी पाँटिंगमुळे पंजाब आयपीएलची ट्रॉफी जिंकणार नाही, माजी क्रिकेटपटूचे गंभीर आरोप
16
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं
17
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, बॉर्डरवर रांगा...
18
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
19
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली

मागील चुकते करा, मगच हंगाम

By admin | Updated: October 18, 2015 00:21 IST

रघुनाथदादा पाटील : ६ नोव्हेंबरला साखर आयुक्त कार्यालयासमोर धरणे

सांगली : जिल्ह्यातील अनेक साखर कारखान्यांनी एफआरपीनुसार बिले दिली नाहीत. मागील हंगामाची बिले दिल्याशिवाय या वर्षीचा गळीत हंगाम सुरू करू देणार नाही, असा इशारा शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथदादा पाटील यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिला. एकरकमी एफआरपीची रक्कम व अंतिम दर ३७५० रुपये प्रतिटन मिळाला पाहिजे, या प्रमुख मागण्यांसाठी दि. ६ नोव्हेंबर रोजी पुणे येथील साखर आयुक्त कार्यालयासमोर पुरोगामी, डाव्या आणि शेतकरी संघटना धरणे आंदोलन करणार आहेत, असेही त्यांनी सांगितले. ते म्हणाले की, २०१४-१५ या वर्षातील गळीत हंगामास गेलेल्या उसाची एफआरपीनुसार शेतकऱ्यांना बिले मिळाली नाहीत. यासाठी शासनाने अनुदानाच्या माध्यमातून आर्थिक मदत करूनही कारखानदार शेतकऱ्यांना पैसे देत नाहीत. काही साखर कारखान्यांनी शासनाने दिलेल्या रकमेलाही कपात लावली आहे. त्यांच्या या निर्णयामुळे शेतकऱ्यांचे फार मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. जिल्ह्यातील सर्वच साखर कारखान्यांनी पूर्वीची सर्व थकबाकी चुकती करावी आणि त्यानंतरच २०१५-१६ वर्षातील गळीत हंगाम सुरू करावेत. एफआरपीची रक्कम देणार नाहीत, अशा कारखान्यांना साखर आयुक्तांनी परवानगी देऊ नये. या मागणीकडे शासनाने दुर्लक्ष केल्यास कारखान्यांचे गळीत हंगाम बंद पाडण्यात येतील. यावर्षीच्या उसाला साखर कारखान्यांनी प्रतिटन ३७५० रुपये दर दिला पाहिजे. यापैकी एफआरपीची रक्कम एकरकमी दिली पाहिजे. उर्वरित रक्कम हप्त्याने दिल्यास आमची काहीही हरकत नाही. या प्रश्नावरच राज्यातील सर्व संघटनांच्यावतीने दि. ६ नोव्हेंबर रोजी पुणे येथील साखर आयुक्त कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)